Saturday, April 3, 2010

रक्तदान शिबिर

यद्न्येन, दानेन, तपसा....

रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मात्र, भीतीपोटी म्हणा अथवा कोणत्यातरी गैर समजुतीमुळे म्हणा. आपण रक्तदानासाठी जात नाही.
सुदृढ आरोग्यासाठी रक्तदान करणे फायदेशीर आहे.
आपल्या शरिरात ४.५ - ५ लिटर रक्त असते. यापैकी केवळ ३०० मिली रक्त घेतले जाते. रक्तदानानंतर २ ते ३ तासात शरिरात नविन रक्तपेशी तयार होतात. म्हणजेच काय रक्तदानामुळे नवीन रक्तपेशी तयार होण्यास वाव मिळतो आणि त्यामुळे आपले आरोग्य सुदृढ राहते.

आपले मौल्यवान रक्त एखाद्यास जीवनदान देणारे ठरते. त्यामुळे रक्तदान हे सर्वश्रॆष्ठ दान आहे.

सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे रविवार, दिनांक ११ एप्रिल २०१० रोजी, भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ६
स्थळ : श्री हरिगुरुग्राम

न्यू इंग्लिश स्कूल

खेरवाडी पोलिस ठाण्याजवळ

वांद्रे (पूर्व)


रक्तादानास येण्यापूर्वी लक्षात ठेवावयाच्या गोष्टी