Thursday, August 18, 2011

राम बिना कछु मानत नाही.....हनुमान चलिसेचा अनुभव

हरि ॐ

सध्या श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे श्रीमद पुरुषार्थ यंत्राचा उत्सव म्हणुन हनुमान चलिसाचे पठण एक सप्ताह केले जात आहे. १५ ऑगस्टला परम पुज्य नंदाईच्या सानिध्यात या पठणाला सुरुवात झाली. अत्यंत उल्हासित आणि पवित्र वातावरणात हे पठण सुरु आहे. जे २१ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. या अशा मंगलमय आणि पवित्र उत्सवात सहभागी होण्याची संधी मला १७ ऑगस्टला मिळाली.

अत्यंत सुंदर आणि सर्व टेंशन्स नाहिशी करणारा हा दिवस ठरला. अत्यंत शांत आणि प्रसन्न मन झाले या पठणानंतर. आमची दुसरी बॅच होती पठणासाठी. दोन्ही बॅचेसना एक एक तास आलटून पालटून पठणाला बसण्याची संधी मिळत होती. आम्ही जेव्हा दुसर्‍यांदा बसलो. तेव्हा नंदाई देखील पठणाला आली. नंदाईचे सानिध्य रोज या पठणादरम्यान अनुभवण्याची संधी मिळते. आई आल्यानंतर आम्ही अगदी जोरोशोरोत हनुमान चालिसा म्हणालो. आई संपूर्णपणे या हनुमान चलिसेच्या शब्दात भावात हरवून तल्लीन होऊन हनुमान चालिसा म्हणत होती. मध्येच आपलाच एक प्रेमळ कटाक्ष सार्‍या लेकरांवर टाकत होती. तिच्या डोळ्यात तिच्या लेकरांसाठी अपरंपार कौतुक होत. मध्येच हनुमान चलिसा म्हणण्याचा आमचा आवाज अगदी लहान झाला. जणू झोपलोच की काय? तेव्हाच आईने सगळ्यांना पुन्हा उत्साहाने हनुमान चालिसा म्हणण्यास खुणावले. तसे आम्ही परत उत्साहाने चलिसा म्हणू लागलो. आई देखील टाळ्यांनी ठेका धरत हनुमान चलिसा म्हणू लागली. मग आमची उठायची वेळ आली. आम्ही जेव्हा उठलो तेव्हा जाताना छान आईचे दर्शन झाले. प्रेमाने तीने प्रत्येकाला पाहिले. खूप मज्जा आली हे अनुभवून.

खरंच हनुमान चलिसा पठण कस कराव हे आई कडून शिकाव. हनुमान चालिसा सुरु झाल्यावर ही तर मी पहिलीच बोलतोय या भावनेने पूर्णपणे तल्लीन होऊन म्हणावी. आपल्याला हे प्रत्येक वेळेला शक्य होईल असे नाही. पण खरंच जेव्हा कधी शक्य होते जेवढ जमतं ते अनुभवून खूप छान वाटते. कानावर पडणारी मुखाने गायली जाणारी हनुमान चलिसा कधी अनुभव देऊन जाते हे खरच कळत नाही आणि हा अनुभव असतो तृप्तीचा समाधानाचा आणि सध्या आवश्यक असणार्‍या मंगल शांततेचा. हे सार अनुभवयाचे असेल तर गुरुक्षेत्रमला जाऊन थोड्यावेळ तरी जाऊन पठण करुन यावे.

साक्षात दत्तगुरु, महिषासुरमर्दिनी, अनसूयामाता, त्रिविक्रम आणि सद्गुरुच्या सानिध्यात केलेल्या पठणाची मजा काही औरच आहे.

पठण करताना संध्याकाळ केव्हा झाली ते कळलेच नाही आणि साधारण ६.१५ च्या सुमारास बापू देखील पठणाला आले. गुरुक्षेत्रमला असलेल्या घंटे जवळच्या गेटवर उभे राहून बापूंनी किमान दोनदा तरी हनुमान चालिसा म्हटली. अत्यंत प्रेमाने सर्व भक्तांकडे, जपकांकडे त्यांनी पाहिले. काहीतरी वेगळेच वाटत होते त्यांच्याकडे पाहून. हनुमान चालिसेच्या शब्दा शब्दाचा अनुभव घेत बापू हनुमान चलिसा म्हणत होते. प्रत्येक ओळीला त्यांचे भाव बदलत होते. आपण म्हणतो ना पूर्ण ऍन्जॉय करीत म्हणतात ना! अगदी तसेच. शांत आणि आश्वासक डोळे....नजरेत अकारण कारुण्य...हृदय विरघळवणारे पुसट हास्य..आणि कृपावर्षाव करणारा हात....एवढच आठवतय.
आणि आणखीन हवय तरी काय...
राम बिना कछु मानत नाही.....ही धारणा दृढ करणारा दिवस ठरला हा

Saturday, August 6, 2011

.मैत्रीदिनाच्या अनिरुद्ध शुभेच्छा

काल आमच्या कॉलनीत काही चिल्ली पिल्ली एकमेकांच्या हातावर आपली नाव लिहित होती. रिबिन्स बांधत होती. मी जरा अधिक कुतूहलाने पाहिले त्यांच्याकडे तर ही चिल्ली पिल्ली फ्रेंडशीप डे साजरा करीत होती. हे पाहून मला खूपच हसू आले आणि मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. तेव्हा मला कॉलेजमध्ये गेल्यावरच कळले होते या दिवसाबद्दल.

आता तर शाळेतल्या पोरांना पण हा डे कॉमन झालाय. मी दहावीत असताना आलेला कुछ कुछ होता है या चित्रपटाने फ्रेंडशीप डेचे फॅड आणले होते. पहिल्यावर्षी मी जवळपास १०० च्या वर बॅण्डस जमा केले होते आणि तळहातापासून खांद्यापर्यंत नावांनी हात बरबटले होते. घरी जाऊन हात धुण्याआधीच आईने मला धुतले होते. असली थेर चालायची नाहीत.....असा रद्दड दम दिला होता. त्यानंतर पुढल्यावर्षी मात्र शिस्तीत एक डायरी बाळगली. कुणाला मैत्री करायची असल्याच त्या डायरीवर नाव लिहून पुढे जावे असा दंडकच मी घातला. मग काय उगाच आईचा दंडुका कोण खाईल. खूप छान दिवस होते ते...

असे वाटते...

पण नंतर कळते...की नाही...त्यावेळेच्या प्रवाहाबरोबर विनाकरण फुकट गेलेला वेळ...क्षणभंगूर आनंद देणारा तो काळ होता...ज्याच्यावर आता आठवले की हसू येते....

मैत्री दिनाच्या दुसर्‍यादिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर आठवेनाच या मुलाने अथवा मुलीने आपल्याशी मैत्री केली आहे का ते नाही. १०० बॅण्डस पैकी एकही बॅण्ड माझ्या आयुष्याशी घट्ट बंधू शकला नाही. दुसर्‍या दिवशी हाताला बांधलेला बॅण्ड सैल व्हावा तशी ही मैत्रीची नाती काळाच्या ओघात सैल होत गेली आणि नाहीशी झाली. ज्यांच्या जाण्याने दुःख ही झाले नाही. पण मैत्री हा कंन्सेप्ट मात्र मनात घट्ट वीण करुन राहिला. पुढील आयुष्यात आलेल्या अनुभवांवरुन मैत्रीच्या संकल्पना बदलत गेल्या आणि एका डे पुरती मर्यादीत ठेवावी अशी मैत्री आपल्याला नकोच अशा ठाम मताची मी झाले आणि यानंतर असा काय डे वैगरे साजरा करायचा नाही असे ठरवले.

पण हा दिवस पुन्हा हवाहवासा वाटू लागला. जेव्हा कधी न सुटणारा बॅण्ड घेऊन काही जण आयुष्यात आले. कुठल्याही आणा भाका नाही...कुठलेही वचन नाही...किंवा कुठलेही कारण नाही...केवळ मैत्रीसाठी मैत्री म्हणून ते बरोबर आले. ते म्हणतात ना गिफ्टेड....अगदी तसच...

काळ लोटला....वाटा बदलल्या...पण ही मंडळी आणि त्यांची मैत्री आहे तशीच आहे...
जगण्य़ाची दिशा देणारे....खराब असलेला मुड ठीक करणारे...रडू येण्याआधीच थांबविणारे...विनाकारण भांडणारे....अगदी राग काढण्यासाठी हक्काची जागा समजणारे...मर्यादाही जाणणारे....निरागस असे हे मित्र आणि मैत्रिणी....

किती बोलावे तितके कमी....यांची साथ म्हणजे आयुष्यातील चैतन्य स्थळे...ज्यांच्या ठीकाणी विसाव्याला गेल्यानंतर भरभरुन चैतन्यच मिळते असे....
परंतु हे मला अशी मैत्री आणि मी त्यांना अशी मैत्री का देऊ शकते...असा प्रश्न पडतो....
आणि तेव्हा कळते.....
दोघांकडे किंवा त्यांच्याकडे आणि माझ्याकडे असलेला मैत्रीचा मूळ स्त्रोत......मैत्रीचे खरे तत्त्व...मैत्रीचा खरा अर्थ....मैत्रीचा खरा गाभा...मैत्रीचा मर्म....मूळ मित्र...अनिरुद्ध.....

हा अनिरुद्ध माझा खरा मित्र आहे....तोच मैत्रिचे खरे नाते जगतो...मैत्री कशी असावी हे ही तोच शिकवतो...आणि त्याच्यासारखी मैत्री कुणीही करुच शकत नाही....तो माझा मित्र आहे म्हणूनच आज माझे अनेक मित्र आणि मैत्रिणी आहेत....त्यांची मैत्री एखाद्या दागिन्याहून अधिक मौल्यवान आहे...कारण ते माझ्या अनिरुद्धाने दिलेले जणू वरदानच आहे.....

माझ्या सर्व खास...जिवश्च कंठश्च....मित्र....मैत्रिणींना...सखा आणि सखींना....मैत्रीदिनाच्या अनिरुद्ध शुभेच्छा....

- Reshma Harchekar...