Friday, November 26, 2010

मला समजलेली अनिरुद्ध परेड - १ (ANIRUDDH PARADE)

हरी ॐ
परेडचे अनुभव लिहून झाल्यावर आता मी मला समजलेली अनिरुद्ध परेड यावर थोडसे लिहणार आहे. अर्थात हे पूर्णतः माझ मत आहे. कारण नुसत परेडला येणं आणि जाणं अस मी कधीच केल नाही. परेड समजून घेऊन पूर्णतः त्यात सहभाग घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामुळे ही परेड मला काही तरी नवीन शिकवीत आली. जे काही मला समजल तेच मी तुमच्यापुढे मांडणार आहे. बाकी काही नाही. आज पर्यंतच्या लिखाणाला तुम्ही भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल श्रीराम!!! यापुढे ही देत राहाल ही खात्री आहे. तर सुरुवात करुया आपल्या अनिरुध्द परेडला.

प्रत्यक्षमध्ये लागले त्याच्या दुसर्या वर्षी मला शिवाजी पार्कमध्ये प्रजासत्ताक दिनाला होणार्या परेडचे फोटो काढण्याची संधी मिळाली होती. हा इव्हेंट माझ्या दृष्टीने फारच महत्त्वाचा होता. कारण प्रथमच मी अशी परेड पाहणार होते. परेडला सुरुवात झाली. त्यातील पहिल्या आणि दुसर्या प्लाटूनची परेड पाहून मी क्षणभर फोटो काढायचीच विसरले. आहाहा!! काय ती सुरेख परेड. एका लयीत हात, पायची हालचाल..कुठेही कुणीही चुकत नाही. कमालीची शिस्त..क्लासिक दहिने देख..त्यांना पाहून वाटले..छे!! आपण काही अशी परेड केलीच नाही..माझा कधी पायच बेंड होतो..तर कधी हातच बेंड होतो..कधी पोक काढून चालते..कधी शूटींग लेगला प्रोब्लेम..पण हे सैनिक कसे बरे एवढ परफेक्ट करतात..कस जमत कस यांना...नकळत केली होती तुलना मी तेव्हा..पण ही केलेली तुलना मला खूप काही देणारी होती. खूप विचार करायला लावणारी होती. तेव्हा मला प्रश्न पडला हे लोक का करतात परेड? यांचे काही परेड करण हे काम नव्हे? मग मला ही प्रश्न पडला मी का केली परेड? का बर करायची परेड? हे प्रश्न पडले आणि या प्रश्नांची उत्तरे बापूरायानेच शोधून दिली. (एव्हाना परेड सोडून मला वर्ष उलटल होत.)

ए ए डी एम आणि रेस्क्यु ही माझी सेवा...हे माझे काम..आणि हे काम ही सेवा करताना मला शिस्त लागावी म्हणून परेड...ही माझी प्रामाणिक समजूत. परेड करण्याच्या आधी मी अनेक ए ए डी एमच्या सेवा अटेंड केल्या..पण परेडमध्ये जॉईन झाल्यानंतर सगळ्या सेवा एका शिस्तीने करण्याची सवय मला लागली..म्हणजे साध उदाहरण द्यायच म्हणजे लाईन कंट्रोल करताना तासनतास टंगळ मंगळ न करता एका जागेवर उभी राहण्याची सवय..मी मुळातच फार चंचल आहे..त्यामुळे एका जागी उभे राहून सेवा करण म्हणजे मला तरी अशक्य...परेडच्या सवयी मुळे ही चंचलता दूर झाली. तसच उभ राहण्याचा स्टॅमिनापण वाढला. खर तर सेवेला उभ राहिले की कुणीही निष्ठेने सेवा करत पण शेवटी प्रत्येकाच्या शरीराच्या क्षमतेची मर्यादा असते..ही क्षमता वाढविण्याचे काम परेडमुळे झाले..पूर्वी तर तासन तास आम्ही उभे राहयचो. त्याचा फायदा झाला. सेवा करतानाच नाही तर पुढे फोटोग्राफीच्या करीयरमध्ये परेडचा प्रचंड फायदा झाला.

लालबागच्या राज्याची गर्दी आणि त्याची विसर्जन मिरवणूक तुम्हाला सांगायला नको. तिथे परळला लालबागच्या राज्यावर पुष्पवृष्टी होते. तो फोटो काढण्यासाठी सकाळी ११.३० वाजल्यापासून मी एका दुकानाच्या छपरावर जागा पकडून उभी होती. आजूबाजूला व्हीडीयोग्राफर आणि फोटोग्राफर होते. जरा हलले की शिव्या पडायच्या. त्यामुळे नुसती उभी. पायाला खालून गरम पत्र्याचा चटका आणि डोक्यावर मध्यानीचा सूर्य अशा परिस्थीत तिथे बाप्पाचे नाव घेत उभी होते. आधी इतर गणपती आले. त्यांचे फोटो काढले आणि मग चारच्या सुमारास लालबागचा गणपती आला. तेव्हा श्वास रोखून त्याचे फोटो काढले. तो एक क्षण टीपण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. खर तर बापूरायाची कृपा म्हणून मी उभी राहू शकले..पण मी करु शकेन उभी राहेन हा आत्मविश्वास कुठून आला? परेडमुळेच. अगदी १०८ टक्के. परेडमुळेच माझा आत्मविश्वास विकसीत झाला आणि ही परेड कुणासाठी आणि कुणाची तर अनिरुद्धाची आणि अनिरुद्धाचसाठी..

या अनुभवानंतर मला समजले की ही परेड का करायची आणि याने काय होते ते. परेडमुळे स्टॅमिना वाढतो. तसेच आत्माविश्वास ही वाढतो. रेस्क्युअर म्हणून काम करताना स्टॅमिना आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. मला सगळ्या रेस्क्युच्या मेथड येतात पण समोर असलेली कॅझ्युलटी हॅण्डल करण्याचा आत्मविश्वास आणि स्टॅमिना नसेल तर???

परेडमध्ये गेल्यानंतर मी आणखी कणखर झाले. मनाने कणखर झाले. समोर आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची हिम्मत वाढली. तसेच मी एक रेस्क्युअर आहे आणि त्यानुसार निडर आणि संयमी मानसिकता बनविणे शक्य झाले. जेव्हा मी सैनिक आहे ही भावना दृढ होते...तेव्हा सगळ आपोआप जमतेच...वेगळ काही करण्याची गरज भासत नाही अस मला वाटते. असे नसते तर गुरुपौर्णिमेला रेल्वेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील जखमी प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्याहूनी वाईट, त्यांचे फोटो काढण्याची हिम्मत झाली नसती. त्यावेळी डोक फुटलेला एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात समोरुन येत होता, त्याला पाहून मला धक्का बसला पण नंतर परेडने दिलेला संयमीपणा कामी आला आणि स्वतःला सावरता आले. दुसर्याच क्षणी निडर होऊन कणखर होऊन छिन्नविच्छीन्न झालेल्या मृतदेहाचे आणि उद्धवस्त झालेल्या त्या फस्ट क्लासच्या डब्याचे फोटो काढले. तिथे तर जणू रक्ताची रंगपंचमी झाली होती.

परेड केल्यावर आधीचे दोन रविवार त्रास होतो मग नंतर एकदम फ्रेश वाटू लागत. चरखा रेग्युलर चालवला तरच तो मस्त चालतो. खूप दिवस चरखा बंद असेल आणि  अचानक आपण चालवायला घेतला तर तो नीट चालतो का? सूत निघते का व्यवस्थीत? नाही..आपल्या शरीराचेही तसेच आहे. रेग्युलर परेडमुळे कायम ऍक्टीव्ह राहता येत. शरीर ऍक्टीव्ह राहत. बुध्दी ऍक्टीव्ह राहते आणि मनही ऍक्टीव्ह राहत. तर आज तुम्हाला परेडचे काही फायदे सांगते जे मला समजले.
१) शिस्त लागते
२) स्टॅमिना वाढतो
३) आत्मविश्वास वाढतो
४) ऍक्टीव्हनेस वाढतो
५) संयम वाढतो
६) निडरता वाढते
७) सभानता वाढते
८) जाणिव वाढते
९) कार्यक्षमता वाढते
१०) एकाग्रता वाढते
११)  निरिक्षण क्षमता वाढते
१२) कल्पकता वाढते
१३) नेतृत्व क्षमता वाढते
१४) संपर्क व संवाद वाढतो
 हे काही फायदे आहेतच...या व्यतिरिक्त  ही अनेक आहेत...ह्या गुणांच्या विकासामुळे आपल्या खाजगी, व्यावहारीक, शालेय, कार्यालयीन आयुष्यामध्ये ही फायदा होतो..हो पण तसा तो फायदा करुन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

शिवाय आपली ही परेड अनिरुद्ध परेड आहे म्हणजेच अध्यात्माचा पाया असलेली परेड... मग हीचा प्रत्येक फायदा हो दुप्पटच होणार..अध्यात्मामध्ये सांघिक भक्तीला महत्त्व जास्त आहे...त्याचे फायदे ही जास्त आहेत. त्याचप्रमाणे परेडमध्ये ही सांघिकतेलाच महत्त्व आहे. एकट्याची परेड कधी असूच शकत नाही. सर्वांना एकत्र आणण्याची, माणसे जोडण्याची ताकद असणारी ही परेड आहे.....फक्त प्रश्न  माझ्या दृष्टीकोनाचा आहे..माझ्या मेहनतीचा...आणि माझ्या कमिटमेंटचा आहे...बाकी सगळ क्षेम कुशल पाहण्यास अनिरुद्ध समर्थ आहे....आहेच....
आता जे मला वाटले ते मी तुमच्यासमोर मांडले...पुढेही मांडत राहीत...कारण एकच

युद्धकर्ता श्रीराम ममः
समर्थ दत्तगुरुः मूलाधार
साचार वानरसैनिको अहं
रावण वधः निश्चितः

Wednesday, November 24, 2010

अनिरुद्धाचे तरुण...

हरि ॐ

"कायम तरुणच रहा" हा बापूरायाने दिलेला मंत्र खूप काही सांगून जातो...परेड फाऊंडेशन डेला बापूरायाने त्याच्या परेडच्या सर्व "तरुण" फौजेला हा मंत्र दिला...पण इथे वयाचे तारुण्य अपेक्षित नव्हते....तर वृत्तीचे, कृतीचे, कार्याचे तारुण्य अपेक्षित होते...तारुण्य म्हणजे केवळ कॉलेज विश्वात फुकट शायनिंग मारणार्या मुलांचे भरकटलेल वर्तन नव्हे...तर तारुण्य म्हणजे चैतन्य...तारुण्य म्हणजे नवीन काही करण्याची उर्मी...तारुण्य म्हणजे नवीन बदल स्वीकारण्याची मानसिकता...तारुण्य म्हणजे मोठेपणावर मारलेली काट आणि स्विकारलेले जाणारे लहानपण...तारुण्य म्हणजे एखाद्या ध्येयाने प्रेरित झालेले आयुष्य....तारुण्य म्हणजे कार्यशक्ती....अस मला वाटते...कारण जो स्वतःला वृद्ध समजू लागला त्याची कार्यशक्ती आपोआपच मंद होत जाते..मग अगदी २५ वर्षाचा तरुण आळसात आपले दिवस घालवू लागला तरी तो वृद्धच आणि वयाने वृद्ध असणारे पण तरुणांना लाजवेल अशा जोशाने कार्यरत असणारे सर्व जण म्हणजे जिंदादील तरुणच...अशा या आगळ्या तरुणाईशी अनिरुद्ध परेडमध्ये ओळख झाली....त्यांच्याविषयीच थोडेसे लिहणार आहे....

शनिवारी परेड सराव म्हणजेच रंगीत तालिम करताना एका प्लाटूनमध्ये एका व्यक्तीला परेड करताना पाहिले आणि आश्चर्याने पाहतच बसलो...आमच्या आजोबांच्या वयाचे एक डीएमव्ही सफाईदारपणे परेड करीत होते...दुसर्या दिवशी त्यांची भेट घेण्याचे ठरविले...औरंगाबाद प्लाटून मधील अरुणसिंह शास्त्री वयवर्षे
Arunsinh Shastri
६५.....त्यांच्याशी संवाद साधायचा म्हणजे कुठून सुरुवात करु हेच कळेना....त्यांना मी विचारले...कधी पासून अनिरुद्ध परेड पथकात आहात...मला उत्तर अपेक्षित होत...आत्ताच जॉईन केली...पण खर तर त्यांनी २००४ पासून परेड जॉईन केल्याचे त्यांनी सांगितले..हे ऐकून खरच मला त्यांचा अभिमान वाटला....त्यांनी सी सर्टीफीकेट मिळविले आहे....आणि त्यांना परेडची सवय असल्याचे त्यांनी मला सांगितले...त्यांना कुठलाही त्रास होत नाही...आणि तरुणांच्या बरोबरीने ते परेड करतात...आणि खरच त्यांची परेड खूप सुंदर आहे...त्यांना मी सहज एक प्रश्न विचारला की आम्हा लहान मुलांसोबत परेड करताना...आमच्या कमांडखाली कार्य करताना कस वाटत...तेव्हा ते म्हणाले खरच खूप छान वाटते...अस लहान मोठ काही वाटत नाही...सगळे एकाच पातळीचे आहोत...त्यांच्या या उत्तराने मला त्यांच्यातील तरुणाईची साक्ष पटली...त्यांनी स्वतःहून दोन ते तीन पिढ्यांमधील जनरेशन गॅप कमी केला....आणि यापूढेही ते परेडमध्ये राहणार अस त्यांनी सांगितले...
Vinayaksinh Joshi

त्यानंतर मी औरंगाबादचे ४५ वर्षीय विनायकसिंह जोशी यांची भेट घेतली...त्यांच्याशी संवाद साधताना...इच्छा असेल तिथे मार्ग...ही उक्ती कशी परफेक्ट आहे हे जाणवले...विनायकसिंह यांना सैन्यात जाण्याची फार इच्छा होती...मात्र त्यांना त्यांच्या कमी उंचीमुळे जाता आल नाही..एनसीसीमध्येही त्यांना भाग घेता आला नाही..सैन्यात भरती होण्याची त्यांची ही तीव्र इच्छा पूर्ण झाली नाही....मात्र ही तीव्र इच्छा अनिरुद्ध पथक परेड मध्ये पूर्ण होणार होती..म्हणून त्यांनी परेड जॉईन केली...सैनिक नाही होता आलं. पण वानरसैनिक बनण्याची संधी त्यांनी सोडली नाही..आणि परेड मध्ये असल्याचा आनंद, अभिमान आणि उत्साह त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता...ते पुढे तर परेड कंटीन्यू करणारच आहेत..शिवाय त्यांनी आपल्या मुलीला देखील परेडमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठींबा दिला आहे...त्यांची मुलगी देखील पुढच्या प्लाटूनमध्ये होती...
Vinaysinh Chndrate
त्यांच्याच प्रमाणे विनयसिंह चंद्राते (५७) दिलीपसिंह जोशी (५०) यांनी देखील याचवर्षी पासून परेड जॉईन केली...आणि ते पुढे देखील परेड करीत राहणार आहे...या सर्वांना सुरवातीला थोडा त्रास झाला...पण म्हणतात ना डर के आगे जीत है.....तसच...त्या त्रासाची पर्वा न करता त्यांनी परेड करण्याचा निर्धार केला आणि आता ते फिट आहेत...

परेडसाठी फिटनेस हवा हे महत्त्वाचे आहे....म्हणजे अगदी कसला तरी भयानक त्रास आहे आणि मी परेड जबरदस्ती करतोय व त्रास वाढवून ठेवतोय..हे चूकीचेच..पण जर आपण फिजीकल फीट आहोत तर परेडमध्ये सहभागी होऊन हा फीटनेस वाढविता येऊ शकतो...पुढे बापूरायाचीच इच्छा...

Kailassinh Shete
Ganeshsinh Nanivadekar
त्याची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत परेड नक्कीच करु अस रत्नागिरि प्लाटूनच्या ४७ वर्षीय कैलाससिंह शेटे आणि ५३ वर्षीय गणेशसिंह नानीवडेकर यांनी सांगितले..कैलाससिंह यांची मुलगी आणि गणेशसिंह यांचा मुलगा परेडमध्ये सहभागी आहेत...खरच असे प्रोत्साहन देणारे वडील पाहून खरचं खूप छान वाटले..नुसते प्रोत्साहनच नाही तर स्वतः देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून परेडमध्ये सहभागी झाले...खरच त्यांना हॅटस ऑफ..
त्यानंतर मी मुंबई प्लाटूनच्या ५३ वर्षीय किरणसिंह पेटीवाले यांना भेटले...त्यांना तर मी स्वतः सराव करताना पाहिले...कुठलिही कुरकुर न करता इतरांप्रमाणे सर्व काही करीत होते...त्यांच्या उत्साहाला खरच सलाम....
Kiransinh Petiwale
Darshanaveera Bhat
जिथे हे सर्व सिंह आपले धैर्य दाखवत होते तेथे वीरा ही मागे नव्हत्या. प्रत्येक मुलींच्या प्लाटूनमध्ये या महिला डीएमव्ही आपला ठसा उमटवून होत्या....त्यांचे वयच कुणी सांगू शकणार नाही या जोशात परेड करत होत्या. आणि परेडचा ड्रेस अंगावर चढवला की मुलगा मुलगी..लहान मोठे हा फरकच विरुन जातो...उरतात फक्ता सिंह आणि वीरा....
पुणे प्लाटूनच्या ३३ वर्षीय दर्शनावीरा भट ह्या गेली २ वर्षे परेड येत आहेत आणि प्राऊड फील करतात. अनेक महिला होत्या...खरच त्यांच्याकडे पाहून खूप अभिमान वाटला..नेहमी साडी आणि पंजाबी ड्रेस घालणार्या महिला परेडचा गणवेष घालताना जराही कचरत नाही...त्यांच्या ह्या धीराला सलाम...खरी मज्जा तर मला नंतर आली...आमच्या मुंबईच्या दुसर्या प्लाटूनमध्ये नालासोपार्याची एक मुलगी होती...तिचे नाव आठवत नाही आडनाव सिंग आहे. तिची आईपण आमच्याच प्लाटूनला होती...मी म्हटल आई आणि मुलगी एकत्र वा छान!! तेवढ्यात दुसरी मुलगी म्हणाली आई आणि मुलगी नाही तर मुलगा पण आहे....तो अंडरट्रेनी प्लाटूनमध्ये होता...वा...खरच या सिंग कुटुंबाचा अभिमान वाटला...याच बरोबर तीन जोडपी देखील परेडला होती..नवरा बायको....दोघेही परेडला...खरचं..एक जण तर होते...ते लवकरच दुबईला शिफ्ट होणार होते...पण त्या आधी परेड करायची म्हणून ठरविले होते..आदल्या रात्री गणवेश शूज तयार ठेवले आणि परेडला दुसर्या दिवशी हजर...
खर सांगायची तर ही काही निवडक उदाहरणे मी दिली आहेत...अजून अनेक उदाहरणे परेडमध्ये आहेत...यांच्या उदाहरणातून काही मुद्दे तुमच्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
खर तर इच्छा असेल तर काहीच अशक्य नाही..आणि बापूराया म्हणतोच...तू आणि मी शक्य नाही अस या जगात काहीच नाही...मग अडतय कुठ....आपल्याच मधील ह्या डीएमव्हींकडून शिकले पाहिजे....आणि एकदा तरी त्याला सलामी देता आली पाहिजे....
ही सलामी म्हणजे देखील दुसर काय हो...."मी तुझा आहे आणि फक्त तुझाच आहे....तुझ्यासाठीच इथे आहे....आणि तू आहेस म्हणून मी आहे" हाच भाव...मी देतो ती सलामी म्हणजे मी बापूंना घातलेली "साद" आणि तो देतो ती सलामी म्हणजे "प्रतिसाद"...आणि माझी "साद" जितकी तीव्र तितका त्याचा "प्रतिसाद" जलद...ह्याचा अनुभव देणारी सेवा म्हणजे "अनिरुद्ध पथक परेड"

Tuesday, November 23, 2010

परेड - अविस्मरणीय अनुभव - भाग शेवटचा (LAST PART)

हरि ॐ
अनिरुद्ध पथक सावधान....अनिरुद्ध पथक बाये से तेज चल........
चिफ परेड कंन्सलटण्ट बांगर सर यांनी ही कमांड दिली...आणि घोषपथकाने व सर्व परेड डीएमव्ही ठेका धरला...एक दो एक....तेज चल करीत स्टेजच्या उजवीकडून डावीकडे परेड सुरु झाली. स्टेजवर बापू उभे होते...तिरंगा आणि संस्थेचा ध्वज घेऊन पहिले परेड डीएमव्ही पुढे आल्याबरोबर बापूंनी सलामी दिली...नंतर मागाहून येणार्या प्रत्येक प्लाटूनने बापूंना सलामी दिली...

आम्ही सलामी देताना आणि बापू सलामी स्विकारतानाचे चित्र......हेच परेडचे शिखर...

ह्यावेळी काय वाटत हे तिथे परेड केल्याशिवाय खरच कळणार नाही...पण बापूंना त्यांच्या चिल्ल्यापिल्यांना सलामी देताना नक्कीच अभिमानाने उर भरुन येत असणार...बापूंना सलामी देताना पाहून परेड डीएमव्ही म्हणून माझ्यावर त्याने सोपविलेल्या जबाबदारीची जाणिव झाली...किती विश्वास ठेवतोय बापू माझ्यावर...किती कौतुक करतोय हा बापूराया माझ....अस वाटत..आणि सहज मनातून एकच शब्द उमटतो श्री राम!! आणि पुढचा प्रवास सुरु होतो....

सुमारे ८०० हून अधिक परेड डीएमव्ही एका तालात परेड करीत होते...ही परेड पाहताना...अनेकांचे डोळे भरुन आले....अंगावर शहारे आले...ही परेड कशी झाली हे खरच मी नाही सांगू शकत...कारण त्या परेडचा मी एक भाग होते...ज्यांनी ती पाहिली ते खूप चांगले सांगू शकतात...माझ्यासाठी ही परेड म्हणजे अविस्मरणीय सोहळा होता....या पलिकडे मी काही सांगू शकत नाही....

मला सांगायला खुप आनंद होतोय की अखेर परेड एक अविस्मरणीय अनुभव हा या अनिरुद्ध पौर्णिमेच्या परेड अनुभवापाशी "थांब"तोय...खर तर आता जो काय परेडचा अनुभव आहे तो शब्दांपलिकडचा आहे...आणि खर सांगू मला आता फार रिकामे रिकामे वाटतेय...आणि खूप बरे वाटत आहे...त्यामुळे आता या पूढे मी तुम्हाला पिडणार नाही....
BACK IN ACTION

परेड अविस्मरणीय अनुभवांची मालिका निरोप घेत आहे...काय करणार जे काही अनुभवले ते सर्व तुम्हाला सांगितले....आता माझा परेडचा नव्याने प्रवास सुरु झालाय...आता नवीन अनुभव येणार....त्यामुळे अनुभव म्हणून लिहण्यासारखे माझ्याकडे काही उरलेले नाही...

पण एक गोष्ट नक्कीच आहे.....मला समजलेली अनिरुद्ध परेड....आणि यापूढे मी तुमच्याशी हीच समज शेअर करणार आहे....पण त्याआधी....यंदा काही परेड डीएमव्हींनी माझे लक्ष वेधून घेतले..त्यांच्याबद्द्ल मीपुढील भागात माहीती देणार आहे....सो...जस्ट वेट..फॉर दी नेक्ट

Thursday, November 18, 2010

Eco-Friendly Ganesh Murti project - Award received from B.M.C.

INFO SOURCE : MANASAMARTHYADATA
We are pleased to inform that the ‘Shree Ganesh Gaurav Puraskar’ by Bombay Municipal Corporation for the year 2010, in the category ‘Best Sculptor’, has been awarded to Shree Aniruddha Aadesh Pathak, for its Idol placed with Pragati Mitra Mandal, Mhatrewadi, Borivali(W), which consists of a Certificate, A Memento And Cheque of Rs. 10000.

ECO-FRIENDLY GANESH MURTI PROJECT

The Eco-Friendly Ganesh Murti Project consists of making of Lord Ganesha idols from paper pulp. This paper pulp is made from shredded paper of ‘Ramanam’ notebooks used by the devotees, who write ‘Ramanam’ and deposit these notebooks at Upasana centers or directly with Aniruddha’s Universal Bank of Ramanam (AUBR).
These Idols disintegrate easily upon submersion in water, as compared to idols made from Plaster of Paris, which takes significantly longer to disintegrate. A notable aspect is that, the paints used are non toxic, thus contributing significantly to the control over pollution of the environment.

 INFO SOURCE : MANASAMARTHYADATA

Thursday, November 4, 2010

परेड - अविस्मरणीय अनुभव - भाग ६ (PARADE - 6)

नालासोपारा परेड केंद्रावर परेड कमांडर म्हणून पाऊल ठेवले आणि एकदम मोठ झाल्यासारख झाल. मोठ म्हणजे अंहकाराने येणारे मोठेपण नाही तर जबाबदारीने येणार मोठेपण...

चाळीस एक मुली आणि पंचवीस एक मुले इतक्या जणांचे पालकत्व बापूंनी दिले होते...परेड ग्राउंडचा हिटलर अशी माझी ख्याती तेव्हा होती. हे नुकताच मला कळले. बापाची कडक शिस्त आणि आईचा मायेचा ओलावा हीच वृत्ती मी ठेवली होती आणि त्यामुळे परेड ग्राऊंडवर येणार्या प्रत्येक मुलीशी अगदी जवळचे नाते निर्माण झाले. जेव्हा मी परेड सोडली होती...तेव्हा मीच नाही तर माझ्या मुलींच्या डोळ्यात देखील पाणी होत...आणि हेच माझ्याकडून झालेली सेवा ही उचित दिशेला असल्याची पोचपावती होती....

नालासोपाराला येणार्या परेडच्या मुलींशी माझे अगदी जवळचे नाते निर्माण झाले होते. आजही आहे.. प्रत्येकजणीच्या समस्या सोडविण्याची संधी मला मिळाली होती आणि बापूकृपेने मला त्यात यश ही आले...मी ग्राऊंडवर नसताना मला सर्वजण मिस करायचे हेच माझे मेडल होते..येथे मला खूप काही शिकायला मिळाले...
मला फार काही आठवत नाही पण चांगला परेड कमांडर होण्यासाठी मी स्वतःवर फार मेहनत घेतली होती..बाहेरील कुठलाही बदल करणे सोप असत...पण मानसिकता बदलणे अत्यंत कठीण असते...पण या पदावर सेवा करताना....मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक होते...सतत आपल्या परेडचे डीएमव्ही कसे अधिकाधिक सक्षम होतील याचा विचार डोक्यात असायचा...यासाठी काही वेगवेगळे प्रयोग केले होते.

ए ए डी एमवर छोटे छोटे प्रोजेक्ट केले...जसे की पूर, आग वैगरे...चर्चा केल्या....सूर्यनमस्कार...व्यायाम....आणि महत्त्वाचे म्हणजे रेस्क्यु सराव...तेही अनोख्या पद्धतीने....

प्रत्येक परेड डीएमव्हीचा प्रोग्रेस रिपोर्ट तयार केला होता....त्यात त्याचे प्रोग्रेस लिहला जात असे...तो किती सरावाला येतो...त्याची रेस्क्युची प्रगती किती आहे....तो किती सेवेला जातो...
हा रिपोर्ट केवळ माझ्या माहितीसाठी मी केला होता. जेणे करुन मला सर्व डीएमव्हीची माहिती कायम तोंडपाठ राहील. हा माझा छोटासा प्रयत्न होता आणखी काही नाही...

मला परेड सेंटरवर येणार्या प्रत्येकाची घरची दारची परिस्थीती तेव्हा माहीत होती...त्यामुळे त्या त्या डीएमव्हीला संभाळणे शक्य होत असे. प्रत्येकाच्या स्वभावाचे निरिक्षण आणि परिक्षण मी केले होते...त्यामुळे योग्य व्यक्तीवर योग्य ती जबाबदारी  देता आली...पुढे जाण्याची संधी प्रत्येकाला दिली...त्यामुळे आमच्यात कधीच भांडणे झाली नाहीत...किंवा राग रुसवे झाली नाहीत...माणसे जोडण्याचे काम बापूंनी इथे उत्तमरित्या करवून घेतल...

मला आठवत....दर रविवारी नालासोपारा परेड सेंटरच्या ग्राऊंडला किमान ३५ मुली हजर असायच्या....२० च्या खाली आकडा कधीच गेला नाही...हो परिक्षेदरम्यान कमी असायचे...पण परिक्षा संपली रे संपली की पुन्हा परेड ग्राऊंडवर हजर...या सर्व मुला-मुलींना कायम मी "मेरे बच्चे" म्हणूनच संबोधले...या बच्च्यांसाठी सिनियरशी अनेकदा भांडणे देखील केली...

मेरे बच्चे आगे आने चाहिये...या एका ध्येयाने प्रेरीत होऊन त्यांच्याकडून कडक सराव करुन घेतला...पण त्यांनी देखील उत्तम साथ दिली...हे अत्यंत महत्त्वाचे आहे...

सकाळी मुल नाश्ता न करता यायची...साधा परेडचा ड्रेस शिवायला ही पैसे नव्हते काहींकडे....रिक्शा परवडत नाही म्हणून परेड सेंटरला चालत यायचे....घरातून विरोध तरीही यायचे...तोंडावर परिक्षा तरीही यायचे...आजारी असो किंवा काहीही असो...कधी कुठलही कारण दिले नाही...मग अशा मुलांसाठी का नाही मला माझे १०८ टक्के परिश्रम द्यावेसे वाटणार....ही तर मला बापूंनी दिलेली सेवेची सुवर्णसंधी होती...आणि तीचे मी सोनेच केले अस मला वाटते.

प्रवासाला पैसे नाहीत म्हणून अनेकांना सेवेला जाता यायचे नाही...त्यामुळे आम्ही आयडिया केली होती...दहा दहा जणांचे ग्रुप केले होते...कुठलीही सेवा आली की एक ग्रुप जायचा...अलटरनेट...त्यामुळे कुठल्याही सेवेला नालासोपार्याच्या १० जण फिक्स...यात कोणाला वेळेचा प्रोब्लेम असेल तर अलटरनेट तयार असायचाच...जर कुणाकडे पैसे नसतील तर त्याचा खर्च आम्ही एकत्र मिळून करायचो...

जेव्हा परेडचा ड्रेस शिवायचा होता...तेव्हा एक ड्रेसची किंमत ३०० पर्यंत जात होती. माझी मुले केवळ १०० ते १५० रुपये देऊ शकत होती...त्यामुळे काय करायचे हा प्रश्न होता...कारण बुट आणि बॅरेचाही खर्च होताच...म्हणून आम्ही जे थोडेफार सधन मुले होतो...त्यांनी जास्त पैसे काढण्याचा विचार केला. त्याप्रमाणे मुलांचे शुज आणि बॅरेचे प्रश्न सोडवले...पण ड्रेसचे काय?

यासाठी आम्ही स्वस्त्यात कपडा पूरवू शकणारा डिलर शोधायला वसई पालथी घातली...आणि स्वस्त्यात ड्रेस शिवून देणारा टेलर शोधला... अथक प्रयत्नाने आम्हा सर्वांचा पूर्ण ड्रेस १५० रुपयांच्या आतच तयार झाला...ही बापूंचीच किमया...हा हिशेब आजही माझ्याकडे जपून  ठेवलाय...कारण पहिल्यांदाच इतका मोठा व्यवहार केला होता...सगळा हिशेब पूर्ण झाल्यावर जेव्हा पुन्हा माझी जास्तीचे पैसे ज्याचे त्याचे द्यायची वेळ आली. तेव्हा कुणीही ते पैसे घेतले नाही...सर्व पैसे स्वेच्छा निधीत देण्याची त्यांनी मला आदेश दिला..आणि तो मी मानला.

या परेडला एक जण यायची...वयाने मोठी होती....तिच्या घरुन बापूंना विरोध होता. तरीही ती यायची...कामाला जाते अस खोट सांगून..पंजाबी ड्रेस घालून यायची आणि ग्राऊंडवरील शाळेत चेंज करायची..पुन्हा घरी जाताना पंजाबी ड्रेस घालून जायची...खुप कष्ट घेतले तीने....तिला मी खूप ओरडायचे....वाट्टेल ते बोलायचे...पण तीने कधी वाईट वाटून नाही घेतले...उलट स्वतःमध्ये बदल केले....आज तिच्याकडे पाहताना माझा उर अभिमानाने भरुन येतो...आज तिच्याकडचे सगळे बापूंकडे येतात...काहीच प्रोब्लेम नाही...मी परेड सोडल्यानंतरही ती परेडला होती...आणि दिमाखात घरुन परेडचा ड्रेस घालून बाहेर पडायची....

अश्याच अजून काही मुली होत्या ज्यांनी स्वतःवर फार मेहनत घेतली....आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे..आज सगळ्या आपापल्या संसारात रमल्या आहेत...पण परेडच्या आठवणी काढल्यावर त्यांच्या डोळ्यातही चटकन पाणी येत...

२००५ मध्ये मी परेड सोडली...कारण तसा आदेश होता..."प्रत्यक्ष" जॉईन केल....याचवर्षी माझी परेडची तीन वर्षे पूर्ण झाली होती...ऑक्टोबर २००५ अनिरुद्ध पौर्णिमा...ही शेवटची परेड....अनिरुद्ध पौर्णिमेला पहिल्यांदाच रेस्क्यु पथक....याच वर्षी पहिल्यांदा बापूंनी उठून सलामी दिली होती...आणि पहिल्यांदाच रेस्क्यु पथकाचे कमांडर म्हणून मला कमांड देण्याची संधी मिळाली होती....बापूंनी मला मानाने निवृत्त केल....

त्या दिवशी परेडचा पहिला दिवस आठवला.....पहिली हॅपी होमची परेड आठवली...आणि पहिली अनिरुद्ध पौर्णिमेची परेड आठवली.....एका प्लाटूनच्या एका कोपर्यापासून झालेला आरंभ....आणि त्या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या प्लाटूनच्या कमांडरपदी झालेला शेवट....

ह्यावेळी काय वाटल ते मी नाही शब्दात नाही सांगू शकत.....पण मी एक सैनिक  आहे.....तो आब...तो मान... शेवटपर्यंत राखला बस्स!!!!

सैनिक म्हणून जॉईन केलेल्या परेडमधून वानरसैनिक म्हणून निवृत्ती घेतली...आणखीन काय हवं....
कुठलही मेडल...किंवा काहीही मला मिळाले नाही...मिळाला फक्त बापू...त्याचे चरण.....आणखीन काय हवं....
परेड सोडली पण खरी प्रगती तिथूनच झाली....आणखीन काय हवं
जेव्हा मी परेड कमांडर होती....तेव्हा मी काही जणांना म्हटल होत....की परेड मधूनच डीएमव्हीचा सर्वांगीण विकास होतो....आणि येथूनच खरी प्रगतीला गती मिळते....तेव्हा मला वेड्यात काढण्यात आल होत....

पण हीच गोष्ट आता सिद्ध झाली आहे.........अनेक परेड डीएमव्हीने हे सिद्ध केले आहे.... असो

आता चक्र पुन्हा सुरु होतेय.....पाच वर्षांनी पुन्हा एकदा परेड जॉईन केली आहे...आणि पुन्हा एकदा एका कोपर्यापासून सुरुवात करणार आहे....ती ही अनिरुद्ध पौर्णिमेपासून...
पण आता काही मिळविण्यासाठीसाठी नाही...कुठल्याही ध्येयाने प्रेरीत होऊन नाही तर.....
फक्त आणि फक्त परेडसाठी परेड जॉईन केली आहे.......
परेडने जे मला दिले आहे...ते परत देण्यासाठी.....
आणि माझी ही परेड असेल अनिरुद्धाच्या दिशेने जाणारी....रामराज्याच्या दिशेने जाणारी.....श्री राम!!!