Saturday, December 25, 2010

बापूराया, हे वर्ष चमत्कारीक आहे


हे वर्ष चमत्कारीक आहे
जे कधी नव्हते ते
सगळ यंदा घडत आहे

मनात उमटलेली पुसटशी इच्छा देखील
सदगुरु पूर्ण करीत आहे
त्याचे भरभरून प्रेम अनुभवताना
माझी आकृती घडत आहे
जे कधी नव्हते ते
सगळ यंदा घडत आहे
बापूराया, हे वर्ष चमत्कारीक आहे

परीसस्पर्शाची अनुभूती
सोबतीला अनिरुद्ध गती
प्रत्येक सुप्त इच्छेची पूर्ती
सुख आणि दुःखाचीही तृप्ती
सगळी कसं असं जमवून आणले आहे
जे कधी नव्हते ते सगळ यंदा घडत आहे
खरच बापूराया,  हे वर्ष चमत्कारीक आहे

गेल्या २५ वर्षात जगले नसेन
असे आयुष्य या एका वर्षात जगले
सदगुरु तुझी मी किती ऋणी झाले
अन तुझीया लिलेने भरुनी पावले
यशाअपयशाच्या व्याख्या तू सार्या बदलल्या
कल्पना ही केली नसेन अशा घटना घडविल्या
अजब लाभेवीण प्रेमाची ही जणू गजब कहाणी आहे
जे कधी नव्हते ते सगळ यंदा घडत आहे
खरच बापूराया,  हे वर्ष चमत्कारीक आहे

जे घडतेय ते असच सुरु राहू दे
सुख असो की दुःख ते तुझ्या इच्छेने येऊ दे
तुझी इच्छा माझे प्राण होऊ दे
माझी इच्छा तुझे गुणगान होऊ दे
हे वर्ष संपताना माझ्या इच्छा देखील संपतील
पुढील वर्षी मात्र फक्त तुझ्या इच्छा उरतील
तुझ्या इच्छेच्याच प्रातांत राहण्याचा माझा
नवीन वर्षांचा संकल्प आहे
जे कधी नव्हते ते सगळ यंदा घडत आहे
खरच बापूराया, हे वर्ष चमत्कारीक आहे

- रेश्मा हरचेकर २५/१२/२०१०

Friday, December 24, 2010

वास्तूबाधा

वास्तूबाधा विषयी सागताना प.पू. बापूंनी २३ -१२ २०१० च्या प्रवचनात  सांगितलेले काही महत्वाचे points

१) स्वतःच्या घरात कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये .

२) तुमच्या घरात कोणीही मनुष्य बाहेरून आत आला की प्रथम त्याला तुमच्या देवाचा /सद्गुरूंचा फोटो दिसलाच पाहिजे.(ह्यामुळे जर कोणी मनुष्य वाईट हेतू घेवुन तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर त्याचे विखार (वाईट विचार ) तुमचा देव स्वत:कडे घेतो .)

३) किचन मध्ये तुमच्या शेगडीच्या विरुद्ध (समोरच्या बाजूस तुमच्या  देवाचा फोटो असलाच पाहिजे .
ह्यामुळे तुमच्या घरात जे अन्न शिजते ते तुमच्या देवाच्या नजरेखाली बनते.

४) तुमच्या बाथरूम मध्ये नळाच्या वरती कुंकू/हळद/अष्टगंध ह्याने रोज स्वस्तिक काढावा. तो paint करून घेवु नये . तर रोज हाताने काढणे आवश्यक आहे. जर शौचालय  व  बाथरूम एकत्र असेल तर शौचालायापासून दूर नळाच्या वर स्वस्तिक काढावा.

५) रोजची अंघोळ म्हणजे स्वत: स्वत:ला अभिषेक करणे म्हणून रोजची आंघोळ करताना सद्गुरूंचे नामस्मरण करावे .(ॐ ग्लौम  अनिरुद्धाय नम: )

**** तुमच्या राहत्या घरात जर वास्तू बाधा आहे असे जाणवत  असेल तर पुढील तीन  महत्वाच्या गोष्ठी प.पू.बापूंनी  करण्यास  सांगितल्या .

१) कुठल्याही एका मंगळवारी आदिमाता चंडीकेचा फोटो हृदयाशी डाव्या बाजूला धरून श्री गुरूक्षेत्रम मंत्र म्हणत दिवसाच्या आठ भागात प्रत्येक वेळी कमीत कमी ६ मिनिटे घरात फिरावे . ( दिवसाचे  आठ भाग म्हणजे रात्री ११.३० ते दुसर्या दिवशी रात्री ११.३० पर्यंतचा काळ .ह्या काळाला ८ भागात विभागणे म्हणजे ३ तासाचा एक भाग होतो. ह्या एका भागात ६ मिनिटे असे ८ वेळा म्हणजे ४८ मिनिटे वर सांगितल्या प्रमाणे श्री गुरूक्षेत्रम मंत्र म्हणावा .( ** असा मंत्र म्हणताना त्या मंगळवारी  घरात उपस्थित असणार्या कोणाचा वाढदिवस नसावा व तो दिवस अमावास्येचा नसावा )

२)  घराला जर भूत किवा अन्य कुठली बाधा जाणवत असेल तर कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी डाव्या हातात उदीचे भांडे  घेवून उजव्या हाताने घराच्या  उंबरठ्यापासून उदी लावायला सुरुवात करावी व सगळी कडे  भिंती , कपाटे ,बाथरूम  प्रत्येक ठिकाणी घरात उदी लावत जावे . उदी लावण्याचा काळ पौर्णिमा जेव्हा सुरु होते व जेव्हा संपते ह्या मधलाच असावा. ही गोष्ट वर्षातून एकदा केली तरी चालते .

३) तिसरी महत्वाची  वास्तू बाधानाशक गोष्ट  म्हणजे प्रपत्ती ..श्री रण चंडिका  प्रपत्ती व  श्री मंगल चंडिका प्रपत्ती .

" तुमची स्वत:ला जेवढी खात्री नसेल तेवढी मला तुमची  खात्री आहे ..तुमचे दोष मी मोजत नाही तर तुमचे गुण मी मोजतो ". --- प.पू. सदगुरू श्री अनिरुद्ध बापू

----- ( श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन ..२३-१२-२०१० )

Friday, November 26, 2010

मला समजलेली अनिरुद्ध परेड - १ (ANIRUDDH PARADE)

हरी ॐ
परेडचे अनुभव लिहून झाल्यावर आता मी मला समजलेली अनिरुद्ध परेड यावर थोडसे लिहणार आहे. अर्थात हे पूर्णतः माझ मत आहे. कारण नुसत परेडला येणं आणि जाणं अस मी कधीच केल नाही. परेड समजून घेऊन पूर्णतः त्यात सहभाग घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामुळे ही परेड मला काही तरी नवीन शिकवीत आली. जे काही मला समजल तेच मी तुमच्यापुढे मांडणार आहे. बाकी काही नाही. आज पर्यंतच्या लिखाणाला तुम्ही भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल श्रीराम!!! यापुढे ही देत राहाल ही खात्री आहे. तर सुरुवात करुया आपल्या अनिरुध्द परेडला.

प्रत्यक्षमध्ये लागले त्याच्या दुसर्या वर्षी मला शिवाजी पार्कमध्ये प्रजासत्ताक दिनाला होणार्या परेडचे फोटो काढण्याची संधी मिळाली होती. हा इव्हेंट माझ्या दृष्टीने फारच महत्त्वाचा होता. कारण प्रथमच मी अशी परेड पाहणार होते. परेडला सुरुवात झाली. त्यातील पहिल्या आणि दुसर्या प्लाटूनची परेड पाहून मी क्षणभर फोटो काढायचीच विसरले. आहाहा!! काय ती सुरेख परेड. एका लयीत हात, पायची हालचाल..कुठेही कुणीही चुकत नाही. कमालीची शिस्त..क्लासिक दहिने देख..त्यांना पाहून वाटले..छे!! आपण काही अशी परेड केलीच नाही..माझा कधी पायच बेंड होतो..तर कधी हातच बेंड होतो..कधी पोक काढून चालते..कधी शूटींग लेगला प्रोब्लेम..पण हे सैनिक कसे बरे एवढ परफेक्ट करतात..कस जमत कस यांना...नकळत केली होती तुलना मी तेव्हा..पण ही केलेली तुलना मला खूप काही देणारी होती. खूप विचार करायला लावणारी होती. तेव्हा मला प्रश्न पडला हे लोक का करतात परेड? यांचे काही परेड करण हे काम नव्हे? मग मला ही प्रश्न पडला मी का केली परेड? का बर करायची परेड? हे प्रश्न पडले आणि या प्रश्नांची उत्तरे बापूरायानेच शोधून दिली. (एव्हाना परेड सोडून मला वर्ष उलटल होत.)

ए ए डी एम आणि रेस्क्यु ही माझी सेवा...हे माझे काम..आणि हे काम ही सेवा करताना मला शिस्त लागावी म्हणून परेड...ही माझी प्रामाणिक समजूत. परेड करण्याच्या आधी मी अनेक ए ए डी एमच्या सेवा अटेंड केल्या..पण परेडमध्ये जॉईन झाल्यानंतर सगळ्या सेवा एका शिस्तीने करण्याची सवय मला लागली..म्हणजे साध उदाहरण द्यायच म्हणजे लाईन कंट्रोल करताना तासनतास टंगळ मंगळ न करता एका जागेवर उभी राहण्याची सवय..मी मुळातच फार चंचल आहे..त्यामुळे एका जागी उभे राहून सेवा करण म्हणजे मला तरी अशक्य...परेडच्या सवयी मुळे ही चंचलता दूर झाली. तसच उभ राहण्याचा स्टॅमिनापण वाढला. खर तर सेवेला उभ राहिले की कुणीही निष्ठेने सेवा करत पण शेवटी प्रत्येकाच्या शरीराच्या क्षमतेची मर्यादा असते..ही क्षमता वाढविण्याचे काम परेडमुळे झाले..पूर्वी तर तासन तास आम्ही उभे राहयचो. त्याचा फायदा झाला. सेवा करतानाच नाही तर पुढे फोटोग्राफीच्या करीयरमध्ये परेडचा प्रचंड फायदा झाला.

लालबागच्या राज्याची गर्दी आणि त्याची विसर्जन मिरवणूक तुम्हाला सांगायला नको. तिथे परळला लालबागच्या राज्यावर पुष्पवृष्टी होते. तो फोटो काढण्यासाठी सकाळी ११.३० वाजल्यापासून मी एका दुकानाच्या छपरावर जागा पकडून उभी होती. आजूबाजूला व्हीडीयोग्राफर आणि फोटोग्राफर होते. जरा हलले की शिव्या पडायच्या. त्यामुळे नुसती उभी. पायाला खालून गरम पत्र्याचा चटका आणि डोक्यावर मध्यानीचा सूर्य अशा परिस्थीत तिथे बाप्पाचे नाव घेत उभी होते. आधी इतर गणपती आले. त्यांचे फोटो काढले आणि मग चारच्या सुमारास लालबागचा गणपती आला. तेव्हा श्वास रोखून त्याचे फोटो काढले. तो एक क्षण टीपण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. खर तर बापूरायाची कृपा म्हणून मी उभी राहू शकले..पण मी करु शकेन उभी राहेन हा आत्मविश्वास कुठून आला? परेडमुळेच. अगदी १०८ टक्के. परेडमुळेच माझा आत्मविश्वास विकसीत झाला आणि ही परेड कुणासाठी आणि कुणाची तर अनिरुद्धाची आणि अनिरुद्धाचसाठी..

या अनुभवानंतर मला समजले की ही परेड का करायची आणि याने काय होते ते. परेडमुळे स्टॅमिना वाढतो. तसेच आत्माविश्वास ही वाढतो. रेस्क्युअर म्हणून काम करताना स्टॅमिना आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. मला सगळ्या रेस्क्युच्या मेथड येतात पण समोर असलेली कॅझ्युलटी हॅण्डल करण्याचा आत्मविश्वास आणि स्टॅमिना नसेल तर???

परेडमध्ये गेल्यानंतर मी आणखी कणखर झाले. मनाने कणखर झाले. समोर आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची हिम्मत वाढली. तसेच मी एक रेस्क्युअर आहे आणि त्यानुसार निडर आणि संयमी मानसिकता बनविणे शक्य झाले. जेव्हा मी सैनिक आहे ही भावना दृढ होते...तेव्हा सगळ आपोआप जमतेच...वेगळ काही करण्याची गरज भासत नाही अस मला वाटते. असे नसते तर गुरुपौर्णिमेला रेल्वेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील जखमी प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्याहूनी वाईट, त्यांचे फोटो काढण्याची हिम्मत झाली नसती. त्यावेळी डोक फुटलेला एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात समोरुन येत होता, त्याला पाहून मला धक्का बसला पण नंतर परेडने दिलेला संयमीपणा कामी आला आणि स्वतःला सावरता आले. दुसर्याच क्षणी निडर होऊन कणखर होऊन छिन्नविच्छीन्न झालेल्या मृतदेहाचे आणि उद्धवस्त झालेल्या त्या फस्ट क्लासच्या डब्याचे फोटो काढले. तिथे तर जणू रक्ताची रंगपंचमी झाली होती.

परेड केल्यावर आधीचे दोन रविवार त्रास होतो मग नंतर एकदम फ्रेश वाटू लागत. चरखा रेग्युलर चालवला तरच तो मस्त चालतो. खूप दिवस चरखा बंद असेल आणि  अचानक आपण चालवायला घेतला तर तो नीट चालतो का? सूत निघते का व्यवस्थीत? नाही..आपल्या शरीराचेही तसेच आहे. रेग्युलर परेडमुळे कायम ऍक्टीव्ह राहता येत. शरीर ऍक्टीव्ह राहत. बुध्दी ऍक्टीव्ह राहते आणि मनही ऍक्टीव्ह राहत. तर आज तुम्हाला परेडचे काही फायदे सांगते जे मला समजले.
१) शिस्त लागते
२) स्टॅमिना वाढतो
३) आत्मविश्वास वाढतो
४) ऍक्टीव्हनेस वाढतो
५) संयम वाढतो
६) निडरता वाढते
७) सभानता वाढते
८) जाणिव वाढते
९) कार्यक्षमता वाढते
१०) एकाग्रता वाढते
११)  निरिक्षण क्षमता वाढते
१२) कल्पकता वाढते
१३) नेतृत्व क्षमता वाढते
१४) संपर्क व संवाद वाढतो
 हे काही फायदे आहेतच...या व्यतिरिक्त  ही अनेक आहेत...ह्या गुणांच्या विकासामुळे आपल्या खाजगी, व्यावहारीक, शालेय, कार्यालयीन आयुष्यामध्ये ही फायदा होतो..हो पण तसा तो फायदा करुन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

शिवाय आपली ही परेड अनिरुद्ध परेड आहे म्हणजेच अध्यात्माचा पाया असलेली परेड... मग हीचा प्रत्येक फायदा हो दुप्पटच होणार..अध्यात्मामध्ये सांघिक भक्तीला महत्त्व जास्त आहे...त्याचे फायदे ही जास्त आहेत. त्याचप्रमाणे परेडमध्ये ही सांघिकतेलाच महत्त्व आहे. एकट्याची परेड कधी असूच शकत नाही. सर्वांना एकत्र आणण्याची, माणसे जोडण्याची ताकद असणारी ही परेड आहे.....फक्त प्रश्न  माझ्या दृष्टीकोनाचा आहे..माझ्या मेहनतीचा...आणि माझ्या कमिटमेंटचा आहे...बाकी सगळ क्षेम कुशल पाहण्यास अनिरुद्ध समर्थ आहे....आहेच....
आता जे मला वाटले ते मी तुमच्यासमोर मांडले...पुढेही मांडत राहीत...कारण एकच

युद्धकर्ता श्रीराम ममः
समर्थ दत्तगुरुः मूलाधार
साचार वानरसैनिको अहं
रावण वधः निश्चितः

Wednesday, November 24, 2010

अनिरुद्धाचे तरुण...

हरि ॐ

"कायम तरुणच रहा" हा बापूरायाने दिलेला मंत्र खूप काही सांगून जातो...परेड फाऊंडेशन डेला बापूरायाने त्याच्या परेडच्या सर्व "तरुण" फौजेला हा मंत्र दिला...पण इथे वयाचे तारुण्य अपेक्षित नव्हते....तर वृत्तीचे, कृतीचे, कार्याचे तारुण्य अपेक्षित होते...तारुण्य म्हणजे केवळ कॉलेज विश्वात फुकट शायनिंग मारणार्या मुलांचे भरकटलेल वर्तन नव्हे...तर तारुण्य म्हणजे चैतन्य...तारुण्य म्हणजे नवीन काही करण्याची उर्मी...तारुण्य म्हणजे नवीन बदल स्वीकारण्याची मानसिकता...तारुण्य म्हणजे मोठेपणावर मारलेली काट आणि स्विकारलेले जाणारे लहानपण...तारुण्य म्हणजे एखाद्या ध्येयाने प्रेरित झालेले आयुष्य....तारुण्य म्हणजे कार्यशक्ती....अस मला वाटते...कारण जो स्वतःला वृद्ध समजू लागला त्याची कार्यशक्ती आपोआपच मंद होत जाते..मग अगदी २५ वर्षाचा तरुण आळसात आपले दिवस घालवू लागला तरी तो वृद्धच आणि वयाने वृद्ध असणारे पण तरुणांना लाजवेल अशा जोशाने कार्यरत असणारे सर्व जण म्हणजे जिंदादील तरुणच...अशा या आगळ्या तरुणाईशी अनिरुद्ध परेडमध्ये ओळख झाली....त्यांच्याविषयीच थोडेसे लिहणार आहे....

शनिवारी परेड सराव म्हणजेच रंगीत तालिम करताना एका प्लाटूनमध्ये एका व्यक्तीला परेड करताना पाहिले आणि आश्चर्याने पाहतच बसलो...आमच्या आजोबांच्या वयाचे एक डीएमव्ही सफाईदारपणे परेड करीत होते...दुसर्या दिवशी त्यांची भेट घेण्याचे ठरविले...औरंगाबाद प्लाटून मधील अरुणसिंह शास्त्री वयवर्षे
Arunsinh Shastri
६५.....त्यांच्याशी संवाद साधायचा म्हणजे कुठून सुरुवात करु हेच कळेना....त्यांना मी विचारले...कधी पासून अनिरुद्ध परेड पथकात आहात...मला उत्तर अपेक्षित होत...आत्ताच जॉईन केली...पण खर तर त्यांनी २००४ पासून परेड जॉईन केल्याचे त्यांनी सांगितले..हे ऐकून खरच मला त्यांचा अभिमान वाटला....त्यांनी सी सर्टीफीकेट मिळविले आहे....आणि त्यांना परेडची सवय असल्याचे त्यांनी मला सांगितले...त्यांना कुठलाही त्रास होत नाही...आणि तरुणांच्या बरोबरीने ते परेड करतात...आणि खरच त्यांची परेड खूप सुंदर आहे...त्यांना मी सहज एक प्रश्न विचारला की आम्हा लहान मुलांसोबत परेड करताना...आमच्या कमांडखाली कार्य करताना कस वाटत...तेव्हा ते म्हणाले खरच खूप छान वाटते...अस लहान मोठ काही वाटत नाही...सगळे एकाच पातळीचे आहोत...त्यांच्या या उत्तराने मला त्यांच्यातील तरुणाईची साक्ष पटली...त्यांनी स्वतःहून दोन ते तीन पिढ्यांमधील जनरेशन गॅप कमी केला....आणि यापूढेही ते परेडमध्ये राहणार अस त्यांनी सांगितले...
Vinayaksinh Joshi

त्यानंतर मी औरंगाबादचे ४५ वर्षीय विनायकसिंह जोशी यांची भेट घेतली...त्यांच्याशी संवाद साधताना...इच्छा असेल तिथे मार्ग...ही उक्ती कशी परफेक्ट आहे हे जाणवले...विनायकसिंह यांना सैन्यात जाण्याची फार इच्छा होती...मात्र त्यांना त्यांच्या कमी उंचीमुळे जाता आल नाही..एनसीसीमध्येही त्यांना भाग घेता आला नाही..सैन्यात भरती होण्याची त्यांची ही तीव्र इच्छा पूर्ण झाली नाही....मात्र ही तीव्र इच्छा अनिरुद्ध पथक परेड मध्ये पूर्ण होणार होती..म्हणून त्यांनी परेड जॉईन केली...सैनिक नाही होता आलं. पण वानरसैनिक बनण्याची संधी त्यांनी सोडली नाही..आणि परेड मध्ये असल्याचा आनंद, अभिमान आणि उत्साह त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता...ते पुढे तर परेड कंटीन्यू करणारच आहेत..शिवाय त्यांनी आपल्या मुलीला देखील परेडमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठींबा दिला आहे...त्यांची मुलगी देखील पुढच्या प्लाटूनमध्ये होती...
Vinaysinh Chndrate
त्यांच्याच प्रमाणे विनयसिंह चंद्राते (५७) दिलीपसिंह जोशी (५०) यांनी देखील याचवर्षी पासून परेड जॉईन केली...आणि ते पुढे देखील परेड करीत राहणार आहे...या सर्वांना सुरवातीला थोडा त्रास झाला...पण म्हणतात ना डर के आगे जीत है.....तसच...त्या त्रासाची पर्वा न करता त्यांनी परेड करण्याचा निर्धार केला आणि आता ते फिट आहेत...

परेडसाठी फिटनेस हवा हे महत्त्वाचे आहे....म्हणजे अगदी कसला तरी भयानक त्रास आहे आणि मी परेड जबरदस्ती करतोय व त्रास वाढवून ठेवतोय..हे चूकीचेच..पण जर आपण फिजीकल फीट आहोत तर परेडमध्ये सहभागी होऊन हा फीटनेस वाढविता येऊ शकतो...पुढे बापूरायाचीच इच्छा...

Kailassinh Shete
Ganeshsinh Nanivadekar
त्याची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत परेड नक्कीच करु अस रत्नागिरि प्लाटूनच्या ४७ वर्षीय कैलाससिंह शेटे आणि ५३ वर्षीय गणेशसिंह नानीवडेकर यांनी सांगितले..कैलाससिंह यांची मुलगी आणि गणेशसिंह यांचा मुलगा परेडमध्ये सहभागी आहेत...खरच असे प्रोत्साहन देणारे वडील पाहून खरचं खूप छान वाटले..नुसते प्रोत्साहनच नाही तर स्वतः देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून परेडमध्ये सहभागी झाले...खरच त्यांना हॅटस ऑफ..
त्यानंतर मी मुंबई प्लाटूनच्या ५३ वर्षीय किरणसिंह पेटीवाले यांना भेटले...त्यांना तर मी स्वतः सराव करताना पाहिले...कुठलिही कुरकुर न करता इतरांप्रमाणे सर्व काही करीत होते...त्यांच्या उत्साहाला खरच सलाम....
Kiransinh Petiwale
Darshanaveera Bhat
जिथे हे सर्व सिंह आपले धैर्य दाखवत होते तेथे वीरा ही मागे नव्हत्या. प्रत्येक मुलींच्या प्लाटूनमध्ये या महिला डीएमव्ही आपला ठसा उमटवून होत्या....त्यांचे वयच कुणी सांगू शकणार नाही या जोशात परेड करत होत्या. आणि परेडचा ड्रेस अंगावर चढवला की मुलगा मुलगी..लहान मोठे हा फरकच विरुन जातो...उरतात फक्ता सिंह आणि वीरा....
पुणे प्लाटूनच्या ३३ वर्षीय दर्शनावीरा भट ह्या गेली २ वर्षे परेड येत आहेत आणि प्राऊड फील करतात. अनेक महिला होत्या...खरच त्यांच्याकडे पाहून खूप अभिमान वाटला..नेहमी साडी आणि पंजाबी ड्रेस घालणार्या महिला परेडचा गणवेष घालताना जराही कचरत नाही...त्यांच्या ह्या धीराला सलाम...खरी मज्जा तर मला नंतर आली...आमच्या मुंबईच्या दुसर्या प्लाटूनमध्ये नालासोपार्याची एक मुलगी होती...तिचे नाव आठवत नाही आडनाव सिंग आहे. तिची आईपण आमच्याच प्लाटूनला होती...मी म्हटल आई आणि मुलगी एकत्र वा छान!! तेवढ्यात दुसरी मुलगी म्हणाली आई आणि मुलगी नाही तर मुलगा पण आहे....तो अंडरट्रेनी प्लाटूनमध्ये होता...वा...खरच या सिंग कुटुंबाचा अभिमान वाटला...याच बरोबर तीन जोडपी देखील परेडला होती..नवरा बायको....दोघेही परेडला...खरचं..एक जण तर होते...ते लवकरच दुबईला शिफ्ट होणार होते...पण त्या आधी परेड करायची म्हणून ठरविले होते..आदल्या रात्री गणवेश शूज तयार ठेवले आणि परेडला दुसर्या दिवशी हजर...
खर सांगायची तर ही काही निवडक उदाहरणे मी दिली आहेत...अजून अनेक उदाहरणे परेडमध्ये आहेत...यांच्या उदाहरणातून काही मुद्दे तुमच्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
खर तर इच्छा असेल तर काहीच अशक्य नाही..आणि बापूराया म्हणतोच...तू आणि मी शक्य नाही अस या जगात काहीच नाही...मग अडतय कुठ....आपल्याच मधील ह्या डीएमव्हींकडून शिकले पाहिजे....आणि एकदा तरी त्याला सलामी देता आली पाहिजे....
ही सलामी म्हणजे देखील दुसर काय हो...."मी तुझा आहे आणि फक्त तुझाच आहे....तुझ्यासाठीच इथे आहे....आणि तू आहेस म्हणून मी आहे" हाच भाव...मी देतो ती सलामी म्हणजे मी बापूंना घातलेली "साद" आणि तो देतो ती सलामी म्हणजे "प्रतिसाद"...आणि माझी "साद" जितकी तीव्र तितका त्याचा "प्रतिसाद" जलद...ह्याचा अनुभव देणारी सेवा म्हणजे "अनिरुद्ध पथक परेड"

Tuesday, November 23, 2010

परेड - अविस्मरणीय अनुभव - भाग शेवटचा (LAST PART)

हरि ॐ
अनिरुद्ध पथक सावधान....अनिरुद्ध पथक बाये से तेज चल........
चिफ परेड कंन्सलटण्ट बांगर सर यांनी ही कमांड दिली...आणि घोषपथकाने व सर्व परेड डीएमव्ही ठेका धरला...एक दो एक....तेज चल करीत स्टेजच्या उजवीकडून डावीकडे परेड सुरु झाली. स्टेजवर बापू उभे होते...तिरंगा आणि संस्थेचा ध्वज घेऊन पहिले परेड डीएमव्ही पुढे आल्याबरोबर बापूंनी सलामी दिली...नंतर मागाहून येणार्या प्रत्येक प्लाटूनने बापूंना सलामी दिली...

आम्ही सलामी देताना आणि बापू सलामी स्विकारतानाचे चित्र......हेच परेडचे शिखर...

ह्यावेळी काय वाटत हे तिथे परेड केल्याशिवाय खरच कळणार नाही...पण बापूंना त्यांच्या चिल्ल्यापिल्यांना सलामी देताना नक्कीच अभिमानाने उर भरुन येत असणार...बापूंना सलामी देताना पाहून परेड डीएमव्ही म्हणून माझ्यावर त्याने सोपविलेल्या जबाबदारीची जाणिव झाली...किती विश्वास ठेवतोय बापू माझ्यावर...किती कौतुक करतोय हा बापूराया माझ....अस वाटत..आणि सहज मनातून एकच शब्द उमटतो श्री राम!! आणि पुढचा प्रवास सुरु होतो....

सुमारे ८०० हून अधिक परेड डीएमव्ही एका तालात परेड करीत होते...ही परेड पाहताना...अनेकांचे डोळे भरुन आले....अंगावर शहारे आले...ही परेड कशी झाली हे खरच मी नाही सांगू शकत...कारण त्या परेडचा मी एक भाग होते...ज्यांनी ती पाहिली ते खूप चांगले सांगू शकतात...माझ्यासाठी ही परेड म्हणजे अविस्मरणीय सोहळा होता....या पलिकडे मी काही सांगू शकत नाही....

मला सांगायला खुप आनंद होतोय की अखेर परेड एक अविस्मरणीय अनुभव हा या अनिरुद्ध पौर्णिमेच्या परेड अनुभवापाशी "थांब"तोय...खर तर आता जो काय परेडचा अनुभव आहे तो शब्दांपलिकडचा आहे...आणि खर सांगू मला आता फार रिकामे रिकामे वाटतेय...आणि खूप बरे वाटत आहे...त्यामुळे आता या पूढे मी तुम्हाला पिडणार नाही....
BACK IN ACTION

परेड अविस्मरणीय अनुभवांची मालिका निरोप घेत आहे...काय करणार जे काही अनुभवले ते सर्व तुम्हाला सांगितले....आता माझा परेडचा नव्याने प्रवास सुरु झालाय...आता नवीन अनुभव येणार....त्यामुळे अनुभव म्हणून लिहण्यासारखे माझ्याकडे काही उरलेले नाही...

पण एक गोष्ट नक्कीच आहे.....मला समजलेली अनिरुद्ध परेड....आणि यापूढे मी तुमच्याशी हीच समज शेअर करणार आहे....पण त्याआधी....यंदा काही परेड डीएमव्हींनी माझे लक्ष वेधून घेतले..त्यांच्याबद्द्ल मीपुढील भागात माहीती देणार आहे....सो...जस्ट वेट..फॉर दी नेक्ट

Thursday, November 18, 2010

Eco-Friendly Ganesh Murti project - Award received from B.M.C.

INFO SOURCE : MANASAMARTHYADATA
We are pleased to inform that the ‘Shree Ganesh Gaurav Puraskar’ by Bombay Municipal Corporation for the year 2010, in the category ‘Best Sculptor’, has been awarded to Shree Aniruddha Aadesh Pathak, for its Idol placed with Pragati Mitra Mandal, Mhatrewadi, Borivali(W), which consists of a Certificate, A Memento And Cheque of Rs. 10000.

ECO-FRIENDLY GANESH MURTI PROJECT

The Eco-Friendly Ganesh Murti Project consists of making of Lord Ganesha idols from paper pulp. This paper pulp is made from shredded paper of ‘Ramanam’ notebooks used by the devotees, who write ‘Ramanam’ and deposit these notebooks at Upasana centers or directly with Aniruddha’s Universal Bank of Ramanam (AUBR).
These Idols disintegrate easily upon submersion in water, as compared to idols made from Plaster of Paris, which takes significantly longer to disintegrate. A notable aspect is that, the paints used are non toxic, thus contributing significantly to the control over pollution of the environment.

 INFO SOURCE : MANASAMARTHYADATA

Thursday, November 4, 2010

परेड - अविस्मरणीय अनुभव - भाग ६ (PARADE - 6)

नालासोपारा परेड केंद्रावर परेड कमांडर म्हणून पाऊल ठेवले आणि एकदम मोठ झाल्यासारख झाल. मोठ म्हणजे अंहकाराने येणारे मोठेपण नाही तर जबाबदारीने येणार मोठेपण...

चाळीस एक मुली आणि पंचवीस एक मुले इतक्या जणांचे पालकत्व बापूंनी दिले होते...परेड ग्राउंडचा हिटलर अशी माझी ख्याती तेव्हा होती. हे नुकताच मला कळले. बापाची कडक शिस्त आणि आईचा मायेचा ओलावा हीच वृत्ती मी ठेवली होती आणि त्यामुळे परेड ग्राऊंडवर येणार्या प्रत्येक मुलीशी अगदी जवळचे नाते निर्माण झाले. जेव्हा मी परेड सोडली होती...तेव्हा मीच नाही तर माझ्या मुलींच्या डोळ्यात देखील पाणी होत...आणि हेच माझ्याकडून झालेली सेवा ही उचित दिशेला असल्याची पोचपावती होती....

नालासोपाराला येणार्या परेडच्या मुलींशी माझे अगदी जवळचे नाते निर्माण झाले होते. आजही आहे.. प्रत्येकजणीच्या समस्या सोडविण्याची संधी मला मिळाली होती आणि बापूकृपेने मला त्यात यश ही आले...मी ग्राऊंडवर नसताना मला सर्वजण मिस करायचे हेच माझे मेडल होते..येथे मला खूप काही शिकायला मिळाले...
मला फार काही आठवत नाही पण चांगला परेड कमांडर होण्यासाठी मी स्वतःवर फार मेहनत घेतली होती..बाहेरील कुठलाही बदल करणे सोप असत...पण मानसिकता बदलणे अत्यंत कठीण असते...पण या पदावर सेवा करताना....मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक होते...सतत आपल्या परेडचे डीएमव्ही कसे अधिकाधिक सक्षम होतील याचा विचार डोक्यात असायचा...यासाठी काही वेगवेगळे प्रयोग केले होते.

ए ए डी एमवर छोटे छोटे प्रोजेक्ट केले...जसे की पूर, आग वैगरे...चर्चा केल्या....सूर्यनमस्कार...व्यायाम....आणि महत्त्वाचे म्हणजे रेस्क्यु सराव...तेही अनोख्या पद्धतीने....

प्रत्येक परेड डीएमव्हीचा प्रोग्रेस रिपोर्ट तयार केला होता....त्यात त्याचे प्रोग्रेस लिहला जात असे...तो किती सरावाला येतो...त्याची रेस्क्युची प्रगती किती आहे....तो किती सेवेला जातो...
हा रिपोर्ट केवळ माझ्या माहितीसाठी मी केला होता. जेणे करुन मला सर्व डीएमव्हीची माहिती कायम तोंडपाठ राहील. हा माझा छोटासा प्रयत्न होता आणखी काही नाही...

मला परेड सेंटरवर येणार्या प्रत्येकाची घरची दारची परिस्थीती तेव्हा माहीत होती...त्यामुळे त्या त्या डीएमव्हीला संभाळणे शक्य होत असे. प्रत्येकाच्या स्वभावाचे निरिक्षण आणि परिक्षण मी केले होते...त्यामुळे योग्य व्यक्तीवर योग्य ती जबाबदारी  देता आली...पुढे जाण्याची संधी प्रत्येकाला दिली...त्यामुळे आमच्यात कधीच भांडणे झाली नाहीत...किंवा राग रुसवे झाली नाहीत...माणसे जोडण्याचे काम बापूंनी इथे उत्तमरित्या करवून घेतल...

मला आठवत....दर रविवारी नालासोपारा परेड सेंटरच्या ग्राऊंडला किमान ३५ मुली हजर असायच्या....२० च्या खाली आकडा कधीच गेला नाही...हो परिक्षेदरम्यान कमी असायचे...पण परिक्षा संपली रे संपली की पुन्हा परेड ग्राऊंडवर हजर...या सर्व मुला-मुलींना कायम मी "मेरे बच्चे" म्हणूनच संबोधले...या बच्च्यांसाठी सिनियरशी अनेकदा भांडणे देखील केली...

मेरे बच्चे आगे आने चाहिये...या एका ध्येयाने प्रेरीत होऊन त्यांच्याकडून कडक सराव करुन घेतला...पण त्यांनी देखील उत्तम साथ दिली...हे अत्यंत महत्त्वाचे आहे...

सकाळी मुल नाश्ता न करता यायची...साधा परेडचा ड्रेस शिवायला ही पैसे नव्हते काहींकडे....रिक्शा परवडत नाही म्हणून परेड सेंटरला चालत यायचे....घरातून विरोध तरीही यायचे...तोंडावर परिक्षा तरीही यायचे...आजारी असो किंवा काहीही असो...कधी कुठलही कारण दिले नाही...मग अशा मुलांसाठी का नाही मला माझे १०८ टक्के परिश्रम द्यावेसे वाटणार....ही तर मला बापूंनी दिलेली सेवेची सुवर्णसंधी होती...आणि तीचे मी सोनेच केले अस मला वाटते.

प्रवासाला पैसे नाहीत म्हणून अनेकांना सेवेला जाता यायचे नाही...त्यामुळे आम्ही आयडिया केली होती...दहा दहा जणांचे ग्रुप केले होते...कुठलीही सेवा आली की एक ग्रुप जायचा...अलटरनेट...त्यामुळे कुठल्याही सेवेला नालासोपार्याच्या १० जण फिक्स...यात कोणाला वेळेचा प्रोब्लेम असेल तर अलटरनेट तयार असायचाच...जर कुणाकडे पैसे नसतील तर त्याचा खर्च आम्ही एकत्र मिळून करायचो...

जेव्हा परेडचा ड्रेस शिवायचा होता...तेव्हा एक ड्रेसची किंमत ३०० पर्यंत जात होती. माझी मुले केवळ १०० ते १५० रुपये देऊ शकत होती...त्यामुळे काय करायचे हा प्रश्न होता...कारण बुट आणि बॅरेचाही खर्च होताच...म्हणून आम्ही जे थोडेफार सधन मुले होतो...त्यांनी जास्त पैसे काढण्याचा विचार केला. त्याप्रमाणे मुलांचे शुज आणि बॅरेचे प्रश्न सोडवले...पण ड्रेसचे काय?

यासाठी आम्ही स्वस्त्यात कपडा पूरवू शकणारा डिलर शोधायला वसई पालथी घातली...आणि स्वस्त्यात ड्रेस शिवून देणारा टेलर शोधला... अथक प्रयत्नाने आम्हा सर्वांचा पूर्ण ड्रेस १५० रुपयांच्या आतच तयार झाला...ही बापूंचीच किमया...हा हिशेब आजही माझ्याकडे जपून  ठेवलाय...कारण पहिल्यांदाच इतका मोठा व्यवहार केला होता...सगळा हिशेब पूर्ण झाल्यावर जेव्हा पुन्हा माझी जास्तीचे पैसे ज्याचे त्याचे द्यायची वेळ आली. तेव्हा कुणीही ते पैसे घेतले नाही...सर्व पैसे स्वेच्छा निधीत देण्याची त्यांनी मला आदेश दिला..आणि तो मी मानला.

या परेडला एक जण यायची...वयाने मोठी होती....तिच्या घरुन बापूंना विरोध होता. तरीही ती यायची...कामाला जाते अस खोट सांगून..पंजाबी ड्रेस घालून यायची आणि ग्राऊंडवरील शाळेत चेंज करायची..पुन्हा घरी जाताना पंजाबी ड्रेस घालून जायची...खुप कष्ट घेतले तीने....तिला मी खूप ओरडायचे....वाट्टेल ते बोलायचे...पण तीने कधी वाईट वाटून नाही घेतले...उलट स्वतःमध्ये बदल केले....आज तिच्याकडे पाहताना माझा उर अभिमानाने भरुन येतो...आज तिच्याकडचे सगळे बापूंकडे येतात...काहीच प्रोब्लेम नाही...मी परेड सोडल्यानंतरही ती परेडला होती...आणि दिमाखात घरुन परेडचा ड्रेस घालून बाहेर पडायची....

अश्याच अजून काही मुली होत्या ज्यांनी स्वतःवर फार मेहनत घेतली....आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे..आज सगळ्या आपापल्या संसारात रमल्या आहेत...पण परेडच्या आठवणी काढल्यावर त्यांच्या डोळ्यातही चटकन पाणी येत...

२००५ मध्ये मी परेड सोडली...कारण तसा आदेश होता..."प्रत्यक्ष" जॉईन केल....याचवर्षी माझी परेडची तीन वर्षे पूर्ण झाली होती...ऑक्टोबर २००५ अनिरुद्ध पौर्णिमा...ही शेवटची परेड....अनिरुद्ध पौर्णिमेला पहिल्यांदाच रेस्क्यु पथक....याच वर्षी पहिल्यांदा बापूंनी उठून सलामी दिली होती...आणि पहिल्यांदाच रेस्क्यु पथकाचे कमांडर म्हणून मला कमांड देण्याची संधी मिळाली होती....बापूंनी मला मानाने निवृत्त केल....

त्या दिवशी परेडचा पहिला दिवस आठवला.....पहिली हॅपी होमची परेड आठवली...आणि पहिली अनिरुद्ध पौर्णिमेची परेड आठवली.....एका प्लाटूनच्या एका कोपर्यापासून झालेला आरंभ....आणि त्या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या प्लाटूनच्या कमांडरपदी झालेला शेवट....

ह्यावेळी काय वाटल ते मी नाही शब्दात नाही सांगू शकत.....पण मी एक सैनिक  आहे.....तो आब...तो मान... शेवटपर्यंत राखला बस्स!!!!

सैनिक म्हणून जॉईन केलेल्या परेडमधून वानरसैनिक म्हणून निवृत्ती घेतली...आणखीन काय हवं....
कुठलही मेडल...किंवा काहीही मला मिळाले नाही...मिळाला फक्त बापू...त्याचे चरण.....आणखीन काय हवं....
परेड सोडली पण खरी प्रगती तिथूनच झाली....आणखीन काय हवं
जेव्हा मी परेड कमांडर होती....तेव्हा मी काही जणांना म्हटल होत....की परेड मधूनच डीएमव्हीचा सर्वांगीण विकास होतो....आणि येथूनच खरी प्रगतीला गती मिळते....तेव्हा मला वेड्यात काढण्यात आल होत....

पण हीच गोष्ट आता सिद्ध झाली आहे.........अनेक परेड डीएमव्हीने हे सिद्ध केले आहे.... असो

आता चक्र पुन्हा सुरु होतेय.....पाच वर्षांनी पुन्हा एकदा परेड जॉईन केली आहे...आणि पुन्हा एकदा एका कोपर्यापासून सुरुवात करणार आहे....ती ही अनिरुद्ध पौर्णिमेपासून...
पण आता काही मिळविण्यासाठीसाठी नाही...कुठल्याही ध्येयाने प्रेरीत होऊन नाही तर.....
फक्त आणि फक्त परेडसाठी परेड जॉईन केली आहे.......
परेडने जे मला दिले आहे...ते परत देण्यासाठी.....
आणि माझी ही परेड असेल अनिरुद्धाच्या दिशेने जाणारी....रामराज्याच्या दिशेने जाणारी.....श्री राम!!!

Tuesday, October 26, 2010

परेड - अविस्मरणीय अनुभव - भाग ५ (PARADE - 5)

हरी ॐ
खुप दिवस झाले ब्लॉगवर काही अपडेट माहिती द्यायला वेळच मिळाला नाही. गणपती गेले...नवरात्र गेली आणि आता दिवाळी आली...पण कामाच्या गडबडीत ब्लॉगकडे जरा दुर्लक्ष झाले. म्हणून आज जरा जबरदस्तीने लिहायला बसले...मी प्रोमिस केले होते की परेडचा अविस्मरणीय प्रवास पुढे पण लिहीत राहीन..आता तोच धागा पकडून पुढचा प्रवास सुरु करुया...

तर चौथ्याभागात तुम्हाला मी सांगितले की परेड रेस्क्युची धम्माल आता सांगणार आहे...पण मुहूर्त नाही मिळाला..तर आता ऐका...

रेस्क्यु
परेड हा ए ए डी एमचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सगळ्या परेडच्या मुलांनी रेस्क्युमध्ये सहभागी हॊणे तर क्रमप्राप्त होते..हो पण रेस्क्युच्या टीममध्ये माझी निवड कशी झाली हेच मला कळले नाही...हो पण तेव्हा आम्ही केवळ पाचच मुली होतो...बाकी सगळी मुले होती...कुठे कुठे सराव करायचो...खर तर सराव करायला जागाच नसायची...पण तरी देखील जागा मिळेल तसा सराव करायचो...अगदी झोकून देऊन...


तिसर्या माळ्यावरुन उडी मारलेली...
रेस्क्युच्या लेक्चरमध्ये  सगळ्या मेथड तर शिकलो...पण प्रात्यक्षिकाचे काय? याचा सराव कुठे करायचा....
तर आम्ही सगळे बांद्राला आपल्या हरीगुरुग्रामच्या मागे एक मैदान होते...तिथे एक मोठे होर्डींग होते. त्या होर्डींगवर म्हणजे त्या होर्डींगच्या पिलर्सवर सराव करायचे ठरविले.  आधीतर ती उंची बघून माझ्या काळाजात धस्स झाले...पण आता ही भिती गेली पाहिजे. म्हणून पुढे पाऊल टाकायचे ठरविले. तेव्हा आमच्या बरोबर वैभव कुलकर्णी, अजय भिसे, प्रसाद धुवाळी ही सगळी मंडळी होती..

Rescue
साधारण वीस एक फुटावरुन शिडीचा दोर सोडलेला असायचा. त्याच्यावर चढून वर जायचे...शिकलेले प्रत्यक्षात आणणे वाटते तितके सोपे नाही. शिडी गाठेवरुन वर चढण्यासाठी विशीष्ट टेक्नीकचा वापर करावा लागायचा.. त्यामुळे गोल गोल न फिरता सलग वर चढता येत होते..शिडी गाठीवर चढण्यासाठी हातात खूप जोर असणे आवश्यक आहे..आणि तोच नेमका नव्हता. म्हणून पूल अप्स.सूर्यनमस्कार मारायचो..शिडी गाठीवर चढून अंगठा आणि त्याबाजूचे बोट हे कायम दुखापतीत असायचे...पण पर्वा केली कुणी...बॅंडेज बांधून पुन्हा सराव करु लागायचो...म्हणूनच बहुतेक आजही शिडी गाठीवर चढण्याचा आत्मविश्वास आहे...

वरती चढलो की त्या होर्डींगच्या पट्ट्यांवर जाऊन बसायचो..उंच टॉप ऑफ दी वर्ल्ड वाटायचे...तिथे बसून आम्ही हॅपी होम दिसतेय का? ते पाहायचो...हो पण आम्ही आमच्या सुरक्षीततेची पूर्ण काळ्जी घ्यायचो बर का!!!

बैल गाठ बांधून बसायचो...म्हणजे खाली पडणार नाही. मग एक आम्हाला दिव्य शिकवल...ते म्हणजे स्लायडींग....बापरे..म्हणजे त्या उंचावरुन उडी मारायची...दोरीवर टाकलेल्या लूप ला पकडून उडी मारायची आणी खाली घसरत यायचे...पहिल्यांदा केले...तेव्हा पोटात असला गोळा आला काय सांगु...वाटल मेलो!!! पण नंतर सवय झाली....अगदी डाव्या हातचा मळ जणू काही....

बरच काही शिकलो...खुर्ची गाठने कस सोडायचे....कस उतरायचे....मंकी क्रॉअल...इत्यादी...
मग या रेस्क्यु टीम तर्फे अनेक ठीकाणी डेमो झाले...अनेक ठीकाणी आम्ही शिकवायला गेलो...चांगलेच लक्षात राहणारे डेमो म्हणजे...बांद्रा पी एफ ऑफीसला झालेला डेमो आणि हरिगुरुग्रामला अहिल्या आणि बलच्या विद्यार्थ्यांसाठी झालेला डेमो...

चढण्याच्या तयारीत मी
बांद्रा पी एफ ऑफीसला डेमो जोरात सुरु होता. तेव्हा कळल की रेक्लमेशन जवळच्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे...आम्ही तसेच पळालो...मला जीवरक्षक गाठ बांधण्यात आली होती. मी तशीच पळाले...ती  गाठ धावता धावता सोडवली. एका टॅक्सीवाल्या थांबवून आम्ही त्याच्या टॅक्सीत घुसलो आणि अपघात स्थळी गेलो. त्या पुलावरुन खाली धगधगती आग पाहिली...अत्यंत भीती वाटली...पण खाली गेलो आणि क्राऊड मॅनेजमेंटला सुरुवात केली...त्यानंतर हरीगुरुग्रामला झालेला डेमो भन्नाट होता...हरीगुरुग्रामच्या तीसर्या माळ्यावर रॅपलींग करत चढत जायचे...मग वरुन खाली उडी मारायची...खरच हा अनुभव भारी होता...


हरीगुरुग्रामच्या भिंतींवर चढताना मी
या सरावामुळे इतका आत्मविश्वास मिळाला की पुढील आयुष्यात कराव्या लागणार्या उचापत्यांसाठी पक्की तयारी झाली...ते कसे ते पुढील काही भागात पाहू. या रेस्क्यु सरावा दरम्यान जी काही भीती होती..ती बापूंनी मनातून काढली. उंचीची भीती, पाण्याची भीती, उडी मारण्याची भीती, आगीची भीती, सापाची भीती, रक्ताची भीती सगळ्या प्रकारच्य़ा भीती मनातून बापूंनी काढल्या.

नेरुळला, डहाणूला डेमोला जाण्याची संधी मिळाली होती. या दरम्यान भरपूर काही शिकता आले..खरचं बापू आपल्याला काय काय शिकण्याची संधी देत आहे. याची जाणीव झाली..एक समर्थ डीएमव्ही बनण्यासाठी बापू घेत असलेली मेहनत शब्दात वर्णूच शकत नाही. केवळ शरीरानेच नाही तर मानसिक आणि बौधिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी बापू सर्व त्याच्या डीएमव्हीव मेहनत घेतात..प्रश्न आपला आहे...मी किती करतो? असो...
डहाणू डेमो..सापाला हाताळताना....

या कणखर प्रशिक्षणामुळे भविष्यात फोटोग्राफर म्हणून एका पुरुष फोटोग्राफर सारखेच किंबुहना त्याच्याहून जरा जास्तच कष्ट आणि उचापत्या करण्याचे बळ या प्रक्षिणातून मिळाले.
आता पुढील भागात नालासोपारा परेड केंद्राची जडण घडण पाहू...जिथे मी माझे प्राण ओतले होते....नालासोपारा परेड केंद्राचे परेड कमांडर म्हणून सेवा करताना माझ्यात होणारा बदल हा विलक्षण होता.. अवघ्या २१ वयाची असताना परेड केंद्रावर येणार्या सर्व मुला मुलींची मी पालक झाले होते...आणि हा अनुभव खूप काही शिकविणारा होता...अंतर्मूख करणारा होता. लहान वयातच जबाबदारींची जाणिव परेड कशी काय करुन देऊ शकते हे तुम्हालाही कळेल..

परेड - अविस्मरणीय अनुभव - धम्माल,सोहळा, भाग ४,भाग ३,भाग २, भाग १

Monday, October 4, 2010

परेड एक अविस्मरणीय सोहळा - PARADE FOUNDATION DAY

हरी ॐ,
परेड एक अविस्मरणिय अनुभवाचे चार भाग लिहून झाले......आणि पुढच लिहायचे राहिले....पण आता पुन्हा ही सिरिज सुरु करणार........पण सुरु करणार ते एका अविस्मरणिय सोहळ्यापासून...परेड फाऊंडेशन डेच्या सोहळ्यापासून........जो ३ ऑक्टोबर २०१० रोजी श्री हरीगुरुग्राम येथे पार पडला....काय झाल या सोहळ्यात? अहो तर, विचारा काय नाही झाले.....गेल्या सात वर्षात परेड डीएमव्हींनी विचारही केला नसेल. ते सर्व झाले...मला तर खर शब्दात मांडणे ही कठीण होतेय....एकच शब्द "भन्नाट"

२३ सप्टेंबर हा परेडचा फाऊंडेशन डे. ह्या दिवसाचा सोहळा रविवारी ३ ऑक्टोबरला परेड डीएमव्ही ने आयोजित केला होता. दिंडी, पादुकापूजन, पठण, सत्संग असा दिवसभरात कार्यक्रम आखला होता. सर्व परेड डीएमव्हींनी या कार्यक्रम करण्यासाठी चांगलीच कंबर कसलेली दिसत होती.

प्रवेशद्वारा जवळ भव्य रांगोळी....मग आतमध्ये साईबाबा आणि बापूंची सुंदर रांगोळी...स्टेजवर सुंदर डेकोरेशन...बापू, आई, दादा, आद्यपिपा, दत्तबाप्पा या सर्वांना लड्यांचे हार घातले होते..अत्यंत सुंदर आणि सुबक हार बनविले होते....माहीती कक्षामध्ये परेड प्रोजेक्टची माहीती देणारे बॅनर्स होते.. एका बाजूला चरखे सुरु होते...सकाळी दिंडीतून बाप्पाच्या पादुकांचे आगमन झाले...खर तर मी सोहळ्याला फार वेळ उपस्थित नव्हते. त्यामुळे माझ्या मित्र मैत्रिणींनी शेअर केलेली मज्जा तुम्हाला सांगतेय....

सगळे मुले-मुली दिंडीत तुफान नाचले...सकाळी स्वप्निलसिंह, पौरससिंह आणि समीरदादा ही होते...मी दुपारी अडीचच्या सुमारास पोहोचले. दत्तबावनी, हनुमानचालिसा अटेंड केली. दर्शन घेऊन....सगळ्यांना भेटले...जुने नवीन डीएमव्ही भेटले....खूप छान वाटले... तीन वाजता मी ऑफीसला जायला निघाले...खर तर जावेसे वाटत नव्हते....पण नाईलाज होता..जड अंतःकरणाने निघाले...आणि काहीही झाले तरी रात्री परत यायचे अस ठरवले.. दरम्यान फोनवर फोन सुरु होते...नंदाई आणि सुचितदादा सोहळ्याला आल्याचे कळले...ऐकूनच मला खूप भरुन आले...आईने सगळे डेकोरेशन पाहीले. खूप कौतुक केले सगळ्यांचे...लड्यांचे हार आणि पादुकांखाली केलेली गादी हात लावून पाहीली...तीला खूप आवडले..असे एका मैत्रिणीने सांगितले...एका मुलीने आईला निघताना म्हटले, "आई आणखी थोडा वेळ थांब ना." तेव्हा आई म्हणाली, "बाळांनो, मी तुमच्यासाठीच आलेली आहे." अस मला एका मुलीने सांगितले..

दिवसभर तर सर्व डीएमव्हींनी मज्जा केली...पण संध्याकाळी लवकर ये अस....प्रितीवीरा, नेहावीरा, प्रणालीवीरा या सगळ्यांनी सांगितले...त्यामुळे मला ही कधी पोहोचतेय अस झाल...चार वाजता मी गुरुक्षेत्रमला काही कामानिमित्त गेले तेव्हा बापू हॅपी होम मधून निघाले..मस्त दर्शन झाले....बापू मिटींगला जात असावेत असा अंदाज बांधला...पण बापू परेड सोहळ्यासाठी जातील का? असा प्रश्न मला पडला...बापू सोहळ्याला जावेत अस मला खूप वाटत होते...आणि ते जाणारच असा मला विश्वास वाटतच होते..आणि तेव्हा बापूंना म्हटले काहीही झाले तरी मला आता तूम्ही वेळेत पोहचवा हरीगुरुग्रामला...आणि तसेच झाले....

खार एस. व्ही. रोड वरुन हरीगुरुग्रामला जायला रिक्षा मिळत नाही एरव्ही..पण त्या रात्री पटकन रिक्षा मिळाली...आणि १५ मिनिटांच्या आत ८.३५ ला मी हरीगुरुग्रामला पोहचले...मी वेळेत पोहोचल्याचा आनंद माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणी नेहा आणि प्रितीलाच झाल्याचे त्यांच्या चेहर्यावर दिसत होते. मी गेले हॉलमध्ये बसले...परेडचे डीएमव्ही गात होते...बापू बसले होते....सगळेच गात होते.....मी पोहोचले तेव्हा....ओंकार व्यापका अनिरुद्ध नाथा हा अभंग सुरु होता....मग हरी हरा हा अभंग सुरु झाला...मग ए ए डी एमचे गाणे सुरु झाले...दे मनःसार्मथ्यदाता....शहारे आले अंगावर....

सगळे जण प्रत्येक गाण्यानंतर ललकारी देत होते...तेव्हा बापू म्हणाले "आता प्रत्येक गाण्यानंतर ललकारी देत राहीलात तर कार्यक्रम वाढेल आता...तर ललकारी सगळ्यात शेवटी द्या. आता ओरडायचे नाही आणि रडायचेही नाही...मात्र गायचे सर्वांनी"

त्यानंतर पुढच्या गाण्याला सगळे नाचायला उठले....याचा फायदा घेत मी आणि सर्व मागे असलेले डीएमव्ही पुढे गेले...थेट स्टेज समोर....आणि तूफान नाचलो....अरे सगळ वेगळच होते.....काय एनर्जी होती बापूंमध्ये आणि सर्व डीएमव्ही मध्ये... सगळे उड्या मारत होते उंच उंच...मुलांची डोकी तर वरच्या भिंतींना आपटतील की काय अस वाटले!!!

बापूंचे नाचायच्या एक एक स्टेप तर भारी होत्या...आणि एक्सप्रेशन तर लई भारी...जोगवा, गोंधळ, घरबा...सहीच

 एक गाणे झाले माखन की चोरी...ते तर भारी होते...त्या गाण्याच्या प्रत्येक वाक्याला तसेच हावभाव बापू करत होते....
बापू के संग करो माखन की चोरी
चोरो की पूरी हो गई तय्यारी
पकडे गये तो बापू मारेगी आई
आई का गुस्सा बापू तुझसे भी भारी
दाऊ को भी ना ये चोरी है प्यारी
अरे भाग मत रे.
माखन लिए
चखवा दे अपनेही ऊंगली से....

ह्या गाण्यांच्या ओळीप्रमाणेच बापू नाचत होते...आई का गुस्सा म्हटल्यावर दोन्ही हात गालावर ठेवून "बापरे" अस करतात ना तसेच केले. अरे भाग मत रे....ला धावतोय अशी ऍक्टींग केली..अरे लई भारी...

नंतर सलग गजर अभंग...धम्माल.....शेवट्च्या गजर नंतर....बापूंनी एक ऍक्शन केली. आपण एखादी गोष्ट जिंकल्यावर कस दोन्ही हाताच्या मुठी वळून "येस" अस करतो...तस केले... अरे काय काय सांगू...मला सांगता पण येत नाही....

शेवटी बापू बोलायला लागले...

कधीही दमलात , कंटाळलात , नाराज झालात ,डीपरेशन
येतंय असं वाटलं, तर माझ फक्त एक वाक्य ऐकायचं , परत परत स्वत:च्याच
कानांनी स्वत:च्याच मनात ऐकायचे , हे वाक्य कधीही विसरू नका
"I LOVE YOU"

हे बापू बोलल्यावर आम्ही देखील "I LOVE YOU" "I LOVE YOU" ओरडलो. आणि श्रीराम श्रीराम ओरडलो...

त्यावेळी काय वाटल हे याचे वर्णन शब्दात करताच येणार नाही.....नंतर बापूंनी परेडच्या सर्व डीएमव्हींना जे सकाळ पासून होते त्यांना आत बोलवल...आणि त्यांच्याशी बोलले...नंतर बापूंनी माहिती कक्षात परेड बद्दलची माहिती घेतली..सगळे जण खूप खूष झालेत....

सगळे परेड डीएमव्हींनी बापू आई दादांना खूप जवळून अनुभवल....कधी विचार ही केला नसेल...इतक प्रत्येकाला मिळाले....२५० हून अधिक जण होते...त्या प्रत्येकाचा वेगळा आनंद वेगळा अनुभव.....

त्या हॉलमध्ये आनंदाचा उत्साहाचा नुसता स्फोट झाला होता....काय सांगू? त्याच्या प्रेमाच्या वर्षावात सगळे ओले चिंब....संपूर्ण वातावरणात तारुण्य, चैतन्य सळसळत होत.....कालच्या सोहळ्याने नवीन उमेद आणि आत्मविश्वास मिळाला आहे प्रत्येकाला...खरच काल खूप बर वाटल...

गेली सात वर्षे परेड डीएमव्ही बापूंच्या हृदयापर्यंत त्यांच्या चरणापर्यंत पोहचण्यासाठी सेतू बांधत होते..जेव्हा बापू I Love You  बोलले...तेव्हा सगळ्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. ही मेहनत एका दिवसाची तर एका महिन्याची नव्हती. ही मेहनत गेल्या सात वर्षांची होती..परेड डीएमव्हींनी घेतलेल्या शारिरीक, मानसिक, बौद्धीक आणि आध्यात्मिक कष्टांचे चीज झाले आणि ते ही त्यांनीच करवून घेतले...देता है तो छप्पर फाड के....असच झाल... हा सेतू बांधण्यासाठी समिरदादा, पौरससिंह आणि स्वप्निलसिंह यांचे सातत्याने मिळालेले प्रोत्साहन आणि पाठबळ अत्यंत महत्त्वाचे आहे.

कालचा सोहळा म्हणजे मधुफलवाटीकाच वाटला मला....मेहनतीनंतर श्रमपरिहारासाठी असलेली मधुफलवाटीका....

आता पुढील रामराज्याच्या प्रवासासाठी नवीन उत्साह, चैतन्य आणि आत्मविश्वास मिळाला....प्रत्येक परेड डीएमव्हींनी बापूंना चांगला डीएमव्ही बनण्याचे, नेहमी तरुण राहण्याचे वचन दिले आहे आणि ते आता पूर्ण करायचे आहे...आणि तोच करवून घेणार...नक्की १०८ टक्के....

मला एका गोष्टीचे अत्यंत वाईट वाटले...ते म्हणजे माझ्या नावाच्या सुरुवातीला असलेल्या "EX"  या शब्दाचे...एक्स परेड डीएमव्ही रेश्मावीरा हरचेकर....या "एक्स" चा खून करणार आहे मी. हा एक्स काढून, फाडून, त्याचा चोळामोळा करुन, जाळून टाकायचा आहे मला.....एकच प्रार्थना.....हा एक्स पुन्हा माझ्या वाट्याला आणू नकोस....आणि कायम ऍक्टीव्ह डिएमव्ही ठेव...जशी जाणिव तू रविवारी दुपारी करुन दिलीस..

(रविवारी दुपारी वसई स्टेशन वर एक म्हातार्या बाईंना चक्कर आली..तेथे मी माझे डीएमव्हीचे कर्तव्य पार पाडले.. बापूंनी जाणिव करुन दिली की मी अजूनही परेड डीएमव्ही आहे...)

कदमताल करणार्यांच्या
हृदयाचा ताल तू केव्हा धरलास
कळलेच नाही

तुझ्या बरोबर नाचताना
दमलेल्या मनाचा क्षीण कधी संपला
कळलेच नाही

तुझ्याकडे पाहत असताना
आम्ही कधी संपलो कधी ते
कळलेच नाही

तुझ्या रंगात रंगताना
आम्ही कधी असे बदललो
कळलेच नाही

तुझ्यासाठी झिजताना
आम्ही कधी घडलो
कळलेच नाही

"आय लव्ह यू" म्हणालास
तेव्हाआम्ही रडलो की हसलो
कळलेच नाही

- रेश्मा हरचेकर ४/१०/१०

Wednesday, September 22, 2010

पर्यावरण हिताय...पुनर्विसर्जन आणि स्वच्छता

गौरी गणपतीच्या विसर्जन अगदी थाटामाटात केले..वाजत गाजत मिरवणूकी काढल्या..मुंबईचे सागर किनारे भक्त सागराने भरुन गेले......पण.....दुसर्या दिवशी तुम्ही याच किनार्यावर गेलात का? चैत्यन्य आणि उत्साहाने रसरसला हा सागर दुसर्या दिवशी अगदी भकास दिसत होता... अत्यंत उदास....केविलवाणा....का?
ज्या गणरायाला आदल्या दिवशी वाजत गाजत त्याच्य घरी पाठवले.....तो गणराय घरी न पोहचताच अगदी असाह्य परिस्थीतीत किनार्याच्या कुशीत तड्फडत होता.....ऐकायला अगदी भयानक वाटते ना!!! पण खर सांगू हे अस दृश्य पाहणे अधिक भयानक आहे....हृदयाला चिरा पाडणार आहे....गेली कित्येक वर्षे हे दृश्य असच दिसत आहे...आणि आपण मात्र सोईस्करपणे या कडे कानाडोळा करीत आहोत...

विसर्जनाच्या वेळेस केवळ गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. एकदा का विसर्जन केले की त्या मूर्तीतला देव निघून जातो...अस म्हणतात....अरे पण ती मूर्ती असते देवाचीच ना!!! मग त्यात देव असो वा नसो....ती दुसर्या दिवशी भग्न अवस्थेत कशी पहावेल...किती स्वार्थी आहोत ना आपण...आपला हेतू साध्य झाला की देवाकडे पण आपण दुर्लक्ष करतो....ही तर स्वार्थीपणाची परीसीमा असल्याचे मला वाटते.

हे दृश्य दिसू नये यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत..वैयक्तिक...सामाजिक...सांघिक...सरकार आणि प्रसारमाध्यमेदेखील हे दृश्य दिसू नये यासाठी प्रयत्न करताना दिसतात...त्यांचे कौतुकच आहे....पण आणखीन एक गोष्ट करणे आवश्यक आहे...ती म्हणजे चौपाटी स्वच्छता आणि गणेशमूर्तींचे पुनरविसर्जन....
पालिका करते ना हे सगळ पण आम्हाला काय गरज? खरच गरज नाही आम्हाला? नीट विचार करायला हवा....पालिका करते कारण ते त्यांचे काम आहे...आम्ही करायचे कारण आमचे ते कर्तव्य आहे....देवाच्या प्रती...पर्यावरणाच्या प्रती....पर्यावरण हितासाठी मोठमोठ्या बाता करुन भागणार नाही....त्यासाठी झटले पाहिजे...माझ्या दैनंदिन कामातून वेळ काढून....आणि ते सहज जमते....मला ही यावर्षी ते जमले...

अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या चौपाटी स्वच्छता आणि पुनर्विसर्जन सेवेला यंदा मी गेले...सकाळी ९ वाजता बोलाविले होते...पण साधारण ८:४५ ला सेवेला सुरुवात झाली. मी चौपाटीला १० ला पोहचले..नाव नोंदवून आणि बॅच लावून बीचवर सेवेला पळाले...मी गेले तेव्हा पाहिले...की चौपाटी तशी स्वच्छ करण्यात आली होती..निर्माल्य आणि इतर कचरा उचलण्यात आला होता...

समिरदादा आणि डॉ. पौरससिंह यांच्यासह इतर कार्यकर्ते गणेशमूर्ती पूनर्विसर्जीत करीत होते..आम्ही पूर्ण बीचवर फेरफटका मारला...ओहटी सुरु होती...त्यामुळे मूर्ती वाळूत रुतलेल्या दिसत होत्या...त्या मूर्ती आणि मूर्त्यांचे भग्न अवशे़ष उचलून आम्ही एका ठीकाणी गोळा करीत होतो...त्यात दुसर्या टोकाला जमा झालेला अवशेषांचा खच जेसीबी मशीनने आणला गेला...आतातर अवशेषांची एक टेकडी तयार झाली...समुद्र बाहेर मूर्त्या ओकतच होता...आणि आम्ही जमा करीत होतो...मग मूर्त्या सापडणे थांबल्यानंतर आम्ही समुद्रात एक साखळी केली..अवशेषांच्या टेकडीपासून थेट आत समुद्रात...तिथे पहिला मुलगा लाईफ जॅकेट घालून गेला,...त्याच्या कमरेला दोरी बांधली होती...त्या दोरीच्या आधारे आम्ही कमरेहून अधिक पाण्यात उभे होतो...महिलांना मागे ठेवण्यात आले होते...पण यामध्ये मी आत समुद्रात पहिली उभी होते..माझ्यापुढे पुरुष कार्यकर्ते होते...माझ्यापुढे महिलांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता...त्या पाण्यात वाळूमध्ये पाय रोवून मी उभी होते..आणि मागून येणारे अवशेष पूढे पास करीत होते...पुढे ती मुले हे अवशेष पुनरविसर्जित करीत होते...

SameerDada
समिरदादा आणि डॉ. पौरससिंह अविरत काम करीत होते...त्यांच्याबरोबरीने आणि मार्गदर्शनाखाली सेवा करायला भारी मज्जा आली....खरच आपल्या संस्थेचे सर्वोच्च कार्यकर्ते...संचालक...ज्या प्रमाणे झोकून देऊन काम करीत होते...ते पाहून खरच प्रोत्साहन मिळाले....त्यांच्याकडून शिकता आलं की कशी सेवा करायची...संस्थेचे संचालक असूनही सामान्य भक्त आणि कार्यकर्त्याच्या पातळीवर येऊन झोकून देऊन काम करणारे पौरससिंह आणि समिरदादांना पाहताना एकच वाटल....की कार्यकर्ता असावे तर असे..."मी करतो हा भावच नाही यांच्याठायी."


Dr. Paurassinh Aniruddh Joshi (center)



Sameerdada


Dr. Paurassinh Aniruddh Joshi


आणि खरच!! आपण ईथे काही करतो...अस समजण चूकीचे आहे....कारण जी काय सेवा देवाने करवून घेतली ती जर मी करायची म्हटली तर अशक्यच होती...कारण एरव्ही नेहमीचे वजन उचण्यासही कां कू करणार्या माझ्यात मोठ मोठ्या मूर्त्या एकटीने उचलण्याची ताकद आली कुठून? जीना चढायला ही दम लागतो...मग त्या समुद्राच्या पाण्यात जोरदार लाटेच्या तडाख्यात खंबीरपणे उभे राहण्याची ताकद तेथे उपस्थित महिलांमध्ये आली कुठून? रात्रभर जागरण पण सकाळी एकदम फ्रॆश...सेवा करताना एकही जांभई नाही...हे कसे? अंगात इतके बळ कुठून आले आणि कधी आले ते कळलेच नाही? आणि सेवा करुन पुन्हा ३ वाजता ऑफीसचे काम थेट ९ वाजे पर्यंत नॉनस्टॉप करणे मला कसे शक्य झाले.....हे सगळे प्रश्न म्हणजे माझ्यासाठी सदगुरुचा चमत्कारच आहे. तोच सगळ करवून घेतो....याची प्रचिती सेवे दरम्यान आली.

समुद्रात आम्ही अवशेष पुनर्विसर्जित करत होतो...तर ते समुद्राच्या लाटा पुन्हा बाहेर फेकत होते..आम्ही पाण्यात उतरलो होतो तर आमच्या पायावरुन अवशेष सरकत होते...हे अत्यंत वाईट वाटत होते...पाय हलवताच येत नव्हता....चारी बाजूला अवशेष...खूप लागले पायाला....पण आम्ही हटलो नाही...परत परत  अवशेष आत टाकत होतो...एका क्षणानंतर आम्ही हताश झालो...कारण अवशेष पुन्हा बाहेर येत होते किनार्यावर....मग एक आयडीया केली...ओहटी असल्याने पाणी बर्यापैकी आत होते...त्यामुळे पाणी जिथपर्यंत येत होते...तिथेच खड्डे करुन त्यात अवशेष ठेवले आणि चारी बाजूंनी आणि वरुन वाळू टाकली...म्हणजे भरती आल्यावर हे अवशेष बरोबर पाण्याखाली जातील आणि पुन्हा किनार्यावर येणार नाहीत...अशी सेवा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी शांतीपाठ आणि शुभंकरा स्तोत्र घेतले आणि सेवा संपविली.
खरच एक वेगळा अनुभव घेतला... 

अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी म्हणजेज उद्याच्या गुरुवारी देखील दुपारी २ ते ७ या वेळेत अशीच सेवा गिरगाव, माहिम, दादर, जुहू चौपाटीवर आहे...मातॄभूमीचे ऋण फेडण्याची, पर्यावरणाचे ऋण फेडण्याची चांगली संधी आहे...वेळ काढून या सेवेस हजर राहता आले तर उत्तमच आहे....
मग येणार ना!!!  

अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने लोक या सेवेसाठी येणे आवश्यक आहे...कारण या दिवशी गणेश मूर्त्यांची संख्या आणि आकार अवाढव्य असतात...आणि चौपाटीवरील दृश्य अत्यंत विदारक असते....मला वाटते पीओपीचा वापर करणार्या प्रत्येकाने हे दृश्य पहावे...ती व्यक्ती निश्चितच पुढल्यावर्षी ईको फ्रेंडली अर्थात पर्यावरण हिताचा मार्ग स्विकारेल.

Saturday, September 18, 2010

दे...धम्माल...मिरवणूक गणूबाप्पाची

अनिरुद्ध गुरुक्षेत्रम गणपती मिरवणूकीचा हॅंग ओव्हर अजून उतरलेला नाही..त्यामुळे जरा वृत्तांत लिहण्यास उशीर झाला. असो..पण जास्त उशिर करुन चालायच नाही...बरोबर ना!!!
अडीच दिवसासाठी येतो आणि नुसत खुळ करुन टाकतो...हा गणपती बाप्पा पण आणि हा अनिरुद्ध बाप्पापण...नादखुळा...खर तर शेवटच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना मन खूप भरुन येत...पण त्याला पूर्ण भक्तीभावाने आणि वाजत गाजत निरोप देण्यास हवाच ना!!! त्यात बापूंच्या घरचा गणपती जो कधी परका वाटतच नाही...मग त्याच्या निरोप समारंभात छे छे निरोप उत्सवात..झोकून देणे इतकच आपल्याला करता येऊ शकते..बापूंच्या गणपती विसर्जन मिरवणूकीची मजाच आणि थाटच निराळा असतो. आणि खरच या भक्ती प्रेमाच्या सोहळ्यात पूर्णतः धुंद होऊन जातो...या सोहळ्याची झिंग अशी आहे की बापू आई आणि दादांसह गणपती बाप्पा देखील डोळ्यासमोरुन जात नाही. आहा आहा!!! अगदी लोभस आणि गोंडस रुप आहे...शब्दच नाहीत माझ्याकडे...
यावर्षी मला फोटो काढण्यासाठी "प्रत्यक्ष" मधून पाठविले होते...मी जरा टेंशनमध्येच होते..उगाचच...आदल्या रात्रीपासून प्लॅनिंग सुरु होते. कसे फोटो काढायचे..कुठून काढायचे...कुठे चढायचे...सगळ काही प्लॅन्ड...पण आयत्यावेळी पोपट व्हायचा तो झालाच...असो...तर प्लॅनिंगप्रमाणे मी फोटो काढायला सुरुवात केली. फोटोच नाही तर व्हीडीओ शूट देखील केले. पण मज्जा आली..सर्वप्रथम आई बापू दादा दोन लिफ्टने खाली आले...ते आले नाही तर आम्ही खटाखट क्लिक करायला सुरुवात केली. आई सोबत शाकंबरीवीरा दत्तोपाध्ये (मुलगी) आणि निष्ठावीरा जोशी (सून) दोघीही होत्या. शांकबरीवीराच्या हातात औक्षणाचे ताट होते..थोड्यावेळाने एका लिफ्ट्मधून दत्तबाप्पा आणि एका लिफ्टमधून गणपती बाप्पाची मूर्ती आणली गेली. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये (जावई) आणि डॉ. पौरससिंह जोशी (मुलगा) यांनी आसनावर दत्तबाप्पा आणि गणपती बाप्पाला ठेवले..नंतर सर्वप्रथम नंदाईने गणपती बाप्पाचे औक्षण केले...अगदी प्रेमाने....मग शांकबरीवीरा आणि निष्ठावीरा यांनी औक्षण केले..त्यानंतर सुचितदादांच्या आईंनी औक्षण केले..मग सुखकर्ता दुःखहर्ता आरती घेण्यात आली. आरती झाल्यानंतर गणपती आणि दत्तबाप्पाच्या मूर्तीला सजवलेल्या गाडीवर ठेवण्यात आले आणि गाडी हळूहळू ढकलत हॅपी होम गेटच्या बाहेर आणण्यात आली. काय मस्त वाटत होते...दोन्ही बाजूला तुतार्या वाजत आहेत आणि त्यामधून गणपती बाप्पा हळू हळु पुढे सरकत आहे..गणपतीच्या मार्गावर आई  पवित्र जल शिंपडत आहे. अस करत मोठ्या सजवलेल्या ट्रकजवळ गाडी येते...पौरससिंह आणि स्वप्निलसिंह आधी दत्तबाप्पाला त्याच्या जागी विराजमान करतात आणि मग गणपती बाप्पाला..मग बापू आई दादा सजवलेल्या ट्रकवर चढतात आणि अत्यंत प्रेमाने दत्तबाप्पा आणि गणूबाप्पाचे दर्शन घेतात..मग त्या ट्रकच्या मागे असलेल्या भक्त समुदायाला हात वर करुन दर्शन देतात.. मग बापू आईचा हात धरुन सावकाश खाली उतरतात...पुढे बापू कागद्याच्या लगद्याने बनविलेल्या शंकराच्या मोठ्या पिंडीच्या ट्रकवर चढतात..पिंडीला फुले, बेल आणि हार अर्पण करुन भक्तांच्या गर्दीमधून कोपर्यावरील स्टेजवर जातात..स्टेजवर जाताच...मोठ्या आवाजात गजर स्पिकरवर सुरु होतात..गणपती बाप्पा मोरया.....
मग एके एक ग्रुप पुढे बापू आई दादांचे दर्शन घेत पुढे सरकतो...प्रत्येकाला मनसोक्त दर्शन मिळते..ते देतात...मला एक गम्मत वाटली.. एवढी गर्दी होती...या गर्दीतही नंदाईला कुणी तरी अगदी ओळखीचे दिसले...तेव्हा बापूंचे लक्ष दुसरीकडे होते....तेव्हा आईने बापूंना त्या व्यक्तीकडे पहायला सांगितले..."अनिरुद्ध तिकडे बघ" अस काहीस ती पुटपुटलेले मी ऐकले...तेव्हा मी खालीच स्टेज जवळच होते ना!! आणि मग बापूंनी आईने सांगितलेल्या दिशेने बघून मस्त हात वर करुन अच्छा केला.. मला कमाल वाटली. आईचे किती बारीक लक्ष असते प्रत्येकाकडे...यावरुन ते मला समजले...
सगळे भक्त स्टेजच्या समोर आले की हलतच नव्हते..तेव्हा बापू आई दादा त्यांना हळूहळू पुढे सरका असे सारखे सांगत होते...भक्त थोडीच ऐकत आहे......आपल्या प्राणप्रिय सदगुरुला पाहण्यातच ते सगळे विसरुन गेलेले दिसले...खर तर हे भक्त पुढे सरकतच नव्हते स्वतःहून...मागचे भक्त पुढच्याला धक्का मारत पुढे येत होते...त्यामुळे हे पुढे जात होते...आणि तो मागचा भक्त स्टेजसमोर आला की तो तीथेच खिळायचा...मग त्याच्या मागचा भक्त स्टेजसमोरुन येण्यासाठी त्याला धक्का मारायचा...हे असच चालत होत...मला जाम गम्मत वाटली. एरव्ही जरासा धक्का लागल्यावर रागाने पेटणारी माणसे सदगुरु समोरुन कुणी धक्का मारल्याशिवाय हलणारच नाही अशाच ऍटीट्युड्मध्ये दिसली...जाम गम्मत वाटली...देवाला किती पाहू आणि किती सामावून घेऊ हाच भाव त्यांचा दिसत होता...आणि कितीही पाहीले सदगुरुला तरी ते कमीच वाटते...

मी फुल्टू फोटो काढण्यात बिझी होते...इथे तिथे लक्ष नव्हते....काही ग्रुप्स पुढे गेल्यानंतर बापू आणि त्यांचे सुरक्षारक्षक जाऊ लागले...स्टेजवर आई आणि दादा दर्शन देत होते...सगळे ग्रुप्स मिरवणूकीत गेल्यावर आई दादा पुन्हा हॅपी होमला गेले..

मिरवणूकीत सर्वप्रथम समीरदादा चालत होते...त्यांच्या पुढे तुतारीवाले आणि मागे लेझीम पथक होते...त्यांच्याबरोबरच स्वप्निलसिंह आणि पौरससिंह होते...ते सगळी मिरवणूकीची व्यवस्था पाहण्यात रमले होते...अधून मधून नाचत ही असावेत...मग झेंडे, गरुडटका घेऊन डीएमव्ही होते..नंतर एक एक ग्रुप्स पुरुष व महिलांचे होते....दिंडीचे ग्रुप होते...सगळे जण सॉलिड म्हणजे सॉलिडच नाचत होते...या सगळ्यांचे फोटो काढले...पाणी वाटप अखंड सुरु होते...प्रसाद वाटप चालत होते...वेगवेगळ्या स्पॉटवर गणूबाप्पाचे औक्षण करण्यात येत होते...सर्व भक्तांना औक्षण करण्याची संधी मिळत होती...

सगळे बेदम नाचले....मूली आणि महिलापण कुठेही कमी नाही...

बापू देखील भक्तांबरोबर नाचले....आणि काय नाचले सांगू!!!! त्यांच्या सारखे नाचणारे कुणीही नाही...मध्येच नाचायचे...चालायचे दोन्ही बाजूंनी जमलेल्या भक्तांना मनसोक्त हात वर करुन दर्शन द्यायचे...खरच ही मिरवणूक म्हणजे भक्तांची ऐश असते...

साधारण दहा वाजता मिरवणूक आटोपती घेतात...सगळे स्पीकर्स बंद करुन भक्तांना माघरी हॅपी होमला प्रसाद घेण्यासाठी पाठवतात...आणि काही ठराविक मंडळी बीचवर जातात...

हॅपी होमला सगळ्या भक्तांना प्रसादाच्या पॅकेटस देण्यात येते...यंदा आई आणि दादा स्वःत सगळ्यांना प्रसाद देत होते...आईच्या हातून प्रसाद घेऊन आम्ही आमच्या घरी परतलो....आता वाट पाहत आहोत ती पुढच्या वर्षीची अगदी त्याच दिवसापासून जेव्हा गणूबाप्पा त्याच्या घरी परतला...

अजूनही मिरवणूकीतील बापू आई दादा माझ्या डोळ्यासमोरुन जात नाही...आणि नकोच जायला....त्यांचे एक एक हाव भाव आठवत आहेत...अविस्मरणीय.....

सगळे  जण माझ्या मागे लागले आहेत...रेश्मा, आई बापू दादांचे फोटॊ देना!!! व्हीडीओ दाखव ना!!!..ब्लॉगवर टाक ना!!! पण खर सांगू. जरा वाट पहा....आपल्या नव्याने सुरु झालेल्या मनःसामर्थ्यदाता वेबसाईटवर लवकरच या अनोख्या गणेशोत्सवाचे फोटॊ आणि व्हीडीओ पाहण्यास मिळतील....थोडा धीर धरा....मला ही हे फोटो कधी साईटवर येत आहे अस झालेय....मला ही राहवत नाही म्हणून शेवटी शब्दातून चित्र उभं करण्याचा प्रयास केला आहे...देवाने जमवून घेतल आहेच...श्रीराम!!!! हरी ओम...बोला गणपती बाप्पा मोरया! अनिरुद्ध बाप्पा मोरया!!!!

Sunday, September 12, 2010

रांग....देवाची....

हरी ओम
काल बापूंच्या घरच्या गणपतीला जाण्याचे ठरविले होते. खर तर रात्रीची महाआरती अटेंड करायची होती. त्या हिशेबाने मी माझी मैत्रिण सोनाली शिंदे आणि तीची बहीण अशा आम्ही तीघी जणींनी कार्यकर्ताच्या पासाची रांग लावली. आम्हाला वाटले महाआरती पर्यंत आम्ही आत जाऊ..पण झाले भलतेच...आम्ही महाआरतीला ही हॅपी होम पासून खूप लांब उभे राहिलो होतो. खूप वेळ लागत होता दर्शनाला. यावर्षी पासून बाप्पाने संकल्प सुपारीची प्रथा सुरु केली आहे. त्यामुळेच हळू हळू पुढे रांग सरकत होती.. संध्याकाळी सात वाजता रांग लावली होती. पोटात काहीही नव्हते..त्यात साडी नेसली होती..बापरे...कस काय उभे राहणार होते देवालाच ठाऊक...

खर तर मला कधी देवासाठी ताटकळत रांगेत उभे राहण्याचा प्रश्नच आला नव्हता. तेही इतका वेळ...जेव्हा प्रथम बापूंच्या प्रवचनाला आले...तेव्हा मला कसलेच भान नव्हते...तर रांगेचे कसले असणार...पण इतकेच आठवते की तेव्हा ही फार काळ आम्हाला रांगेत उभे रहावे लागले नव्हते.. आणि त्यानंतर कायम मी कुठल्याना कुठल्या सेवेला असायचे म्हणून दर्शन पटकन व्हायचे..असो तर काल अर्थात गणेश चतुर्थीला बापूंच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी रांग लावली. संध्याकाळी सात वाजता रांग लावली. पण ते संकल्प सुपारीच्या प्रथेमुळे दर्शन खुप हळू सुरु होते. प्रंचड वेळ लागणार असल्याचे कळले. तरी पण ठरवले की रांगेतूनच जायच..काही ही झाले तरी...आमची पासाची रांग होती. पण ती जनरल रांग पाहून माझ्या पोटातच गोळा आला..त्या रांगेत उभे असणार्या प्रत्येक भक्ताला मनापासून वंदन करावेसे वाटले...इतका वेळ इतका मोठ्या रांगेत धीराने उभे राहणे हे कस शक्य आहे...हे फक्त तो भक्तच जाणतो आणि बापूच जाणतो. या रांगेत आबालवृद्ध, लहान मुले, स्त्री पुरुष अगदी शिस्तीने उभे होते. प्रत्येकाला काही ना काही त्रास होत होता..पण सगळे जण बाप्पाचे नाव घेत होत असलेला/नसलेला त्रास सहन करत रांगेत उभे होते. कुणी अखंड जप करीत होते, कुणी रामनाम वही लिहत होत, कुणाच्या अखंड बाप्पाच्या गप्पा रंगल्या होत्या आणि मी मात्र आपल्या मोबाईलवरुन नेट सर्फ करण्यात गुंगले होते...अर्थात आपली मनःसामर्थ्यदाता वेबसाईट पाहण्यात. मधे मधे पाऊस कोसळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र जणू बापूने दम दिला आणि गपचूप बसला अशी त्याची गत झाली होती. त्यामुळे हलकासा शिडकावा केवळ झाला. मला एका जागेवर स्थिर उभे राहणे अजिबातच शक्य नव्हते. त्यामुळे माझ्या सारख्या हॅपी होमच्या बाहेर चकरा सुरु होत्या. खर तर मी अस्वस्थ होते...कारण मला रांगेतूनच दर्शन घ्यायचे होते आणि महाआरती देखील अटेंड करायची होती...पण हे शक्य होईल असे वाटत नव्हते.

आठ-सव्वा आठ वाजता गुरुक्षेत्रमची आरती सुरु झाली. झाल!!! दर्शन थांबवले. त्यानंतर गणपतीच्या महाआरतीला सुरुवात झाली..अकरावाजे पर्यंत आरती सुरु होती..म्हणजे साधारण आठ वाजल्या पासून रात्री ११/११:३० पर्यंत दर्शन बंद होते...

पण काल वेळेची पर्वा कुणाला होती? प्रत्येक जण दर्शन घेऊनच जाणार या निर्धारानेच आला होता.. पण माझी गोची झाली. मला महाआरती अटेंड करायची होती आणि मी बाहेर...मी महाआरतीला कधीच थांबत नाही...पण आज खास महाआरती अटेंड करायची याच उद्देशाने आले होते...असो...वेळ पुढे जात होता....पोटात कावळे त्रास द्यायला लागले...जवळपास काही नव्हत....मग कुठे काही मिळतय का या उद्देशाने आम्ही पुढे हॅपी होमच्या दिशेने जाऊ लागलो...तोच आरती सुरु झाली. आणि आम्ही हॅपी होमच्या गेट समोरच उभे राहीलो....खूप गर्दी होती...पण मला अशी जागा मिळाली की जिथून थेट टीव्ही आणि टीव्हीवर बापूंच्या घरातील आरती स्पष्ट दिसत होती. आरतीचा आवज देखिल मस्त येत होता लाऊडस्पीकरवरुन...महाआरती अटेंड करण्याची इच्छा मस्त बापूंनी पूर्ण केली...जवळपास २२ ते २३ आरत्या मनमोकळेपणे म्हटल्या. अस वाटतच नव्हत की आपण कोणत्या तरी रस्त्यावर उभे राहून आरती अटेंड करतो...जी स्पंदने आतील लोकांना जाणवतील तसे़च मला बाहेर ही जाणवत होते...प्रसन्न वाटत होते...सगळ्यात मज्जा महिषासुरमर्दीनीच्या "माते गायत्री" या आरतीला आली. समोर आई चण्डीका होती...आणि उदे उदे उदे चा गजर आसमंतात भरल्यासारखा वाटला....त्यावेळी रोमांच उठले..त्यानंतर कोट्यावधी अपराध पतीत मी या रेणूकामातेच्या आरतीला डोळे भरुन आले...ही आरतीच अशी आहे. बापू पण भावूक झाल्य़ासारखे वाटले...नंतर आरती संपली आणि बापूंचे आभार मानून मी पुन्हा आपल्या रांगेत गेले..आरती सुरु होण्यापूर्वी भूक लागली होती हे मी विसरुनच गेले.. रांगेत गेल्यानंतर मग गजर सुरु झाला....रांगेत पुसटच ऐकू येत होता गजर... एक-दोन मिनिटे गजर झाल्यानंतर अचानक..."बापू गजर म्हणत आहेत" अस वाटल मला...हा आवाज बापूंचाच आहे..हे ओळखता आले...मी पुन्हा हॅपी होमला धूम ठोकली..गेटच्या बाहेरुन टीव्हीवर पाहण्याचा प्रयत्न केला...तर अरे हो!!  बापूच गजर घेत होते...सही..."मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया" मस्त गात होते....मज्जा आली...वेगवेगळ्या चालीत...मध्येच फास्ट मध्येच स्लो....त्यांना हवा तसा. आणि मध्येच त्या कॅमेर्यावाल्याने बापूंचा क्लोज अप घेतला..सॉलिड....त्या कॅमेर्यावाल्याला नशीब बुद्धी झाली क्लोज अप घ्यायची...आणि आम्हाला मस्त दर्शन झाले...क्लोज अप घेतल्यावर सगळे भक्त बापूंना पाहण्यासाठी धडपड करु लागले...सगळ्यांना धन्य धन्य वाटले...गजर झाला आणि पुन्हा रांगेत उभे राहिलो...
मग बरोबर १२ ला आम्ही गुरुक्षेत्रममध्ये शिरलो....इतक्यावेळ पायाला खडी लागत होती...पण जेव्हा गुरुक्षेत्रमच्या फरशीचा स्पर्श झाला....तेव्हा सगळा क्षीण निघून गेला....आता कितीही वेळ झाला तरी चालेल...पण बाप्पाचे दर्शन घ्यायचेच....रांगेत उभे होतो....उशीर झाला होता....१२:३० झाले....बहुतेक शेवटची ट्रेन चुकणार आता असच वाटले...म्हटल चुकली तर चुकली...होईल काही तरी सोय...आणि पुढे काय झाले ते माहीत नाही पण १२:४५ ला दर्शनाला आम्ही ७ व्या मजल्यावर गेलो होतो...हातात संकल्प सुपारी घेऊन... बापूंच्या घरी शिरलो तेव्हा काहिच त्रास होत नव्हता....तसेच गणपती बाप्पाचे आणि दत्तबाप्पाचे मनसोक्त दर्शन घेता आले..शांत चित्ताने नवस ही बोलता आला....पण बापू आई दादाचे दर्शन नाही झाले...

बापू आई दादाचे दर्शन नाही झाले.....पण कोणतीही खंत वाटली नाही किंवा वाईट वाटले नाही...कारण रांगेत उभे राहिल्यापासून बापू आई दादा तीघेही माझ्याबरोबर होते....त्यांचा हा "सहवास" मला त्यांच्या घरातून बाहेर पडताना जाणवला...कारण तीघांचेही दर्शन झाले नाही याची तसू भरही खंत तेव्हा मनात नव्हती....का? याचा विचार केल्यावर कळल की ते माझ्या बरोबरच होते कायम....अगदी घरी रात्री २:२० ला पोहचेपर्यंत. तसे ते नेहमी असतातच..पण मीच विसरते..

रात्री बिछान्यावर पडताना....शरिराचा एकेक भाग दुखत होता...पण या देवाच्या रांगेतील एक एक गोष्ट आणि एक एक अनुभव आठवून मला हसू येत होते....मी कशी काय या रांगेत उभे राहीले? हा प्रश्न पडला...पण लगेच त्याचे उत्तर सापडले...रांगेत मी उभीच नव्हते....ही देवाची रांग होती...आणि देव़च रांगेत उभा होता...नाही का? नाहीतर आपल्यात एवढी शक्ती आहेच कुठे?
पण एक बर वाटल....देवासाठी ताटकळत राहण....ज्या वाटेने हजारो भक्त गेले त्या वाटेने आपणही जाण....आणि मुख्य म्हणजे रांगेत उभे राहून देह झिजवणे....आणि थोडे शारिरिक कष्ट घेणे अस बरच काही अनुभवता आले....आणि खरच जे इतक्या वेळ रांगेत उभे राहिले...नेहमी राहतात....या सामान्य भक्तांच्या या असामान्य निर्धाराला मनापासून सलाम!!!! आणि  मी देखिल यांच्यातलीच एक आहे...आणि कायम राहो ही प्रार्थना!!! श्री राम

झालो जरी कुणीही आम्ही
सामान्यत्व सुटु नये
सामान्यातील असामान्यत्व
आमुचे कुणी लुटू नये....

Friday, September 10, 2010

गणपती माझा नाचत आला!!!

आज घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे..मी अनुभवलेले गणरायाचे सगळ्यात सॉलिड आगमन म्हणजे बापूंच्या घरच्या गणपतीचे आगमन. संध्याकाळी चार पाचच्या सुमारास बांद्रा पश्चिम लिंक रोडवरील अमरसन्स शोरुमजवळच्या गल्लीतून बापूंच्या घरच्या गणरायाच्या आगमनाची मिरवणूक निघते. सगळ्यात पुढे लेझीम पथक, नंतर दिंडी, आणि बेन्जो असे वेगवेगळे ग्रुप्स या मिरवणूकीत् सहभागी होतात. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करुन मिरवणूकीला सुरुवात होते..अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लहान मुले-मुली, महिला-पुरुष भक्तगण या मिरवणूकीत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या मिरवणूकीत सगळे स्वतःला विसरुन सहभागी होतात. सॉलिड नाचतात. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये आणि डॉ. पौरससिंह जोशी यांच्यासह समस्त बापू भक्तगण परिवार या मिरवणूकीत सहभागी होतो. अंधार होता होता...मिरवणूक बापूंच्या घराजवळ हॅपी होमला पोहचते..गजर, संगीत आणि बाप्पाच्या आगमनाचा आनंद टीपेला पोहोचतो. हॅपी होमच्या गेटजवळ भक्तांची अलोट गर्दी दाटलेली असते. गेटवर लेझीम पथक आधी येते...बापू आई दादा स्वतः गणरायाचे स्वागत करण्यासाठी खाली सज्ज असतात. लेझीम पथक आपले वेगवेगळे कर्तब बापूंपुढे सादर करतात..प्रत्येक जण बापूंचे दर्शन घेऊन नाचत पुढे जातो...मग मागून गणराय येतो...नंदाई गणरायाचे स्वागत करण्यासाठी औक्षणाचे ताट घेऊन आलेली असते. अत्यंत प्रेमाने नंदाई गणरायाचे औक्षण करते. मग गणेशमूर्ती घरी नेल्यावर बापू बेन्जोच्या तालावर सॉलिड नाचतात. त्यावेळेला जे तिथे वातावरण असते त्याचे कुणी वर्णनच करु शकत नाही, असे मला वाटते. ही गोष्ट प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी. गेल्यावर्षी मी हे सारे अनुभवले...आता यंदा काय काय होतेय याची मला आता उत्सुकता लागली आहे...मिरवणूक सुरु होण्यापर्यंतची अधीरता आणि सगळा कार्यक्रम संपल्यानंतरची तृप्तता याच्यासारख दुसर काही नाही....अरे हो!! ही तर फक्त आगमनाच्या मिरवणूकीची गोष्ट सांगितली....खरतर विसर्जनाच्या मिरवणूकीची याहून मोठी धम्माल आहे...आगमनाची मिरवणूक म्हणजे विसर्जन मिरवणूकीच्या तुलनेत फक्त १ टक्के आहे असे मला वाटते...सो. आज या. अनुभवा! पण एक लक्षात ठेवा...हा ट्रेलर आहे....पूर्ण पिक्चर तर सोमवारी आहे!!!!!
मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!

Friday, September 3, 2010

शक्ती दे_ एका दहावीतल्या मुलाची सुंदर कविता

 माझ्या सहकारी प्रभावीरा खिलारी यांचा मुलगा निखिल खिलारी याने बापूंवर अत्यंत सुंदर कविता केली आहे.. तो नववीत असताना त्याने ही कविता केली होती...नक्की वाचा...


शक्ती दे


तूच आहेस मनःसामर्थ्यदाता
तूच आहेस शक्तीदाता
विनायका तू, गजानना तू
तूच आहेस बुद्धीदाता
कृपासिंधु तू बलदाता

तूच धावशी संकटाला
तूच येई मदतीला
इथवर आलो दोन्ही कर जोडूनी
तुझ्या चरणांशी ठेवूनी मस्तक माझे
म्हणता, म्हणता माझे जीवन सर्व झाले तुझे

नकोसा झाला हा लाचार जन्म
ह्या जन्माला तू कुठेतरी वळण दे
दे मज शक्ती तू बलशाली
प्रतिकार करावया त्या शत्रूशी

पेटून उठू दे अंगात त्यागाच संचार
नसानसांत सळसळून उठू दे रक्ताचा अंगार
पुन्हा नव्याने जगण्याची, उसळण्याची तू शक्ती दे

निलेश सुरेश खिलारी
इयत्ता दहावी

Sunday, August 22, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग ४ (PARADE)

हरि ओम,
धपा धप तीन भाग लिहून झाले....जरा चौथ्या भागासाठी वेळ घेतला...मुद्दामूनच घेतला...कारण आता परेडसारख्याच अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी वळणार आहे....रेस्क्यु प्रॅक्टीस...
परेड काय आहे....आणि  रेस्क्यु प्रॅक्टीस काय? याचा मी नेहमी विचार करायचे...यातील जास्त महत्त्वाचे काय? .हा प्रश्न मला एकाने विचारला होता..मला उत्तर तेव्हा देता आले नाही...पण आज मी हे उत्तर देते...माझ्यामते, परेड आणि रेस्क्यू प्रॅक्टीस ही दोन्ही ए ए डी एमची विभक्त नसलेली जुळी बाळे आहेत...एकाशिवाय दुसरे राहू शकत नाही...दोघेही एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी एका डीएमव्हीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. फक्त थॊडासा फरक जर करायचा झाला तर परेड हे साध्य नाही...साधन आहे...तर रेस्क्यु प्रॅक्टीस किंवा रेस्क्यु हे साध्य आहे...मी परेड का करायची तर....रेस्क्यु ऑपरेशनसाठी सदैव फिट रहावे म्हणून....म्हणजे जस आपल्या देशाचे सैनिक सीमेवर लढतात...ते त्यांचे कार्य असते...अगदी तसच...DMV चे आहे...अस मला वाटत...ते सीमेवरील आपत्तीशी लढतात....आपले काम सीमेआत येणार्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीशी लढणे आहे...आता लढणे म्हणजे आगाऊपणा करत पुढे पुढे करण आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणं नाही...तर आपल्या सरकारी यंत्रणांना (पोलीस द्ल, अग्नीशामक दल इत्यादी) त्यांच्या कामात पूर्ण सहकार्य करणं...कोणतीही आपत्ती उदभवू नये याची दक्षता घेणं...हे सगळ मी या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून करायच...आणि ते उचित पद्धतीने करता याव...यासाठी ए ए डी एमचा डी एम व्ही होण गरजेच आहे....नाही तर काही तरी वेड्यासारख करायच आणि आपत्ती निवारण करण्या ऐवजी आपत्ती वाढवून ठेवायची...याच सगळ्यात मोठ्ठ आणि तापदायक उदाहरण म्हणजे "अफवा" पसरविणे....असो...मला काय म्हणायचे ते कळलेच असेल तुम्हाला...नसेल तर यावर आपण पुन्हा कधी तरी सविस्तर बोलू...आता वळूया आमच्या भन्नाट रेस्क्यू प्रॅक्टीसकडे....

तर परेडच्या रेस्क्यु प्रॅक्टीसकडे वळण्याआधी केंद्रावरील रेस्क्यु सरावाची थोडीशी मज्जा सांगते...केंद्रावर आमचा ए ए डी एम चा मस्त ग्रुप होता...मला अजूनही आठवतय...सगळे झपाटलेले होतो तेव्हा...मी, आशिष भाई, सुनि ताई, प्रसाद, प्रतिभा, भक्ती, निलेश, पराग इत्यादी...वेड लागल्यासारखा सराव करायचो...हीच आमची वसईची रेस्क्यु मेन टीम होती...आशिष भाई म्हणजे आशिष सोलंकी याने आम्हा सर्वांना बांधून ठेवलेले...अरे बांधून ठेवलेले म्हणजे एकत्र बांधून ठेवलेले...आज सगळे वेगवेगळ्या सेवेत सहभागी झालेले असलो तरिही त्या आठवणि ताज्या आहेत... खूप प्रॅक्टीस करायचो...मी तेव्हा अत्यंत बारीक होते आणि वजनाने तर एकदम फूलच होते...त्यामुळे प्रत्येक प्रॅक्टीसला माझा हमखास बळी जायचा...म्हणजे सर्व जण मला कॅज्युलटी म्हणून वापरायचे...ही झाली केंद्राची रेस्क्यु टीम..दुसरी अजून एक टीम होती...बोरीवली ते विरारमधील अती ऍक्टीव्ह डीएमव्हींची..यामध्ये मला फारशी नावे आठवत नाहीत पण मी, सुनी ताई, प्रसाद, शैलेश धुरी, अनिकेत कोळंबकर, सचिन सरैय्या, निलेश पोवळे असे बरेच जण होतो...अरे काय धम्माल केली आहे आम्ही...बोरीवली ते बोईसर दरम्यान कुठेही ए ए डी एम चा कोर्स असला की जायचो आम्ही...सोबत...अरविंदसिंह नातू (नातू काका), जाधव काका, अशोकसिंह वर्तक हे कधीतरी असायचे मार्गदर्शन द्यायला...सगळे जण या तिघांना जाम टरकायचे..पण हे तिनही काका आम्हाला छान मार्गदर्शन करायचे...खूप शिकायला मिळाले यांच्याकडून...खूप छान मोटीव्हेशन द्यायचे...मला सगळ्यात जास्त भिती नातू काका आणि वर्तक काकांची वाटायची...ते गुगली प्रश्न विचारायचे...ते दिसले की मी लांब पळायची...पण आता नाही घाबरत :). एकदा नातू काकांनी मला विरारला चालेल्या प्रॅक्टीस दरम्यान प्रश्न विचारला..मी त्याचे उत्तर दिले तर त्या उत्तरावर पुन्हा प्रश्न विचारला..बापरे मी नंतर उत्तरच दिले नाही पुढचा प्रश्न येईल या भितीने...प्रश्न नेमका आठवत नाही पण तेव्हा ते म्हणाले होते की एका डीएमव्हीचे G K  पक्के पाहीजे...त्याला सगळ्या चालू घडामोडींची माहीती पाहीजे. तेव्हा पासून मी तस स्वतःला शक्य तितके अपडेटेड ठेवायला लागले...आणि त्याचा आत्ता खूप फायद झाला...Thank You Very Much Natu Kaka...त्यानंतर वर्तक काकांनी मला पाणजू येथे झालेल्या कोर्सला प्रश्न विचारला सगळ्यांसमोर...रेश्मा आता तू इतक करतेस सेवा आणि AADM  पुढे लग्न झाल्यावर काय करणार? तुझ्या नवर्याने नाही पाठवल मग? तेव्हा मला खूप भिती वाटली. खरच अस झाल तर...पण मी ठामपणे उत्तर दिले...नवरा सोडेन बापूंची सेवा नाही....यावर त्यांनी माझ्याशी खूप वाद घातला..(हा वाद माझ्या भल्यासाठीच होता हे मला पक्के ठाऊक होते) पण मी ठाम होते...आजही आहे...पण खरच त्यांनी त्या दिवशी विचारलेल्या प्रश्नाने माझे विचार बदलू लागले...आणि खरच मला काय हवय...आणि काय नकोय याची एक चौकट बनू लागली...पण ही चौकट माझे बंधन नाही बनली...आणि या मर्यादेच्या चौकटीत राहूनच प्रगतीच्या दिशेने माझा जोमाने प्रवास सुरु झाला...जो आजही सुरु आहे..तेव्हा माझे वय १९/२० असेल..हे सगळ सांगायचा मुद्दा असा की, ए ए डी एम आणि परेड या सारख्या सेवांमध्ये फक्त मी सहभागी नाही झाले..तर या सेवा करताना अनेक बाबींतून मी घडत गेले...या सेवे दरम्यान संपर्कात आलेल्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखे होते..ते मी शिकले...त्यामुळे या बापूंच्या कार्यात झोकून दिल्याने माझ कुठही नुकसान झाले नाही. अनेकांनी मला वेड्यात काढले...अगदी नातेवाईकांनी सुद्धा...बापूंच्या सेवेत आणि या नसत्या उद्योगात सहभागी होऊन तुला काय मिळणार आहे? काय उपयोग याचा? अशा प्रश्नांचा भडीमार व्हायचा...पण असे प्रश्न झेलण्याची ताकद बापूंनी दिली. तेव्हा त्यांना मी उत्तरे दिली नाहीत...आणि आज पुन्हा त्यांच्यात हे प्रश्न विचारण्याची हिम्मत नाही...ह्यालाच म्हणतात खरा "बापूंचा चमत्कार"

तर असो,

आम्ही मचाण बांधण्यापासून ते मोडण्यापर्यंतचे आणि या दरम्यान डेमॊ दाखविण्याचे सर्व उद्योग करायचो..सचिन सरैय्या, निलेश, शैलेश, प्रसाद हे सगळे मचाण बांधण्यात पुढे असायचे..एकदा तर सगळे मचाणावर चढलो...आणि पडतय की काय अस झालेल...पण बापू कृपेने नाही पडले...आणि आम्ही सगळे सुखरुप होतो...वसईलाच झालेले हे बहुतेक...आम्ही रेस्क्युच्या काही नविन पद्धती देखील शोधून काढल्या होत्या..अभ्यासक्रमाच्या बाहेरील....हा हा हा....काय भन्नाट डोकी चालायची आमची..केंद्रावर रेस्क्यु प्रॅक्टीस जोरदार चालली होती...मध्येच आम्ही कांदीवलीला एका शाळेत सरावाला जायचो...तिथे त्या बैठ्या शाळेच्या छपरावर जायचो आणि तिथून सेफ जंपचा सराव करायचो...मी एकदाच मारली जंप..बाबारे!!!...लय भिती वाटायची जंप ला...लॅडरने चढणे उतरणे वैगरे...त्यानंतर दहिसरच्या मैदानात सराव सुरु झाला...येथे तर धम्माल यायची..प्रसाद धुमाळी, सत्या..वैगरे दहिसरचे डीएमव्ही येथे एकत्र सराव करायचो...

इकडची एक गम्मत आठवतेय...दहिसरचे हे ग्राऊंड जरा गवताळ होत...त्यामुळे इथे सराव करताना फार प्रसन्न वाटायच...रात्री ७ / ७:३० नंतर सराव चालायचा. आम्ही इथे कॅज्युलटीला स्ट्रेचरवर घ्यायचो त्या ग्राऊंडला चक्कर मारायचो. एक किंवा दोन..मला हे सगळे सारखे कॅज्युलटी बनवायचे...त्यामुळे इथे माझा सराव कमीच व्हायचा...खर सांगू मी कुणाला उचलू शकेन अस कुणीच नव्हत तिथे...आणि मी परेफेक्ट कॅज्युल्टी असायची....डीएमव्हीला अजिबात सहकार्य न करणारी...अंगच टाकून द्यायची मी मला हॅण्डल करणार्या डीएमव्हीवर...मग मज्जा यायची त्यांची...असो...तर एकदा सगळ्या मुलींनी मला रोप स्ट्रेचरवर उचलले. त्यांनी बरोबर उचलले नव्हते...एक राऊंड झाल्यानंतर त्यांनी मला खाली ठेवले. खाली ठेवताना माझ डोक आपटले...माझा श्वासोच्छावास बंद होता..अंग थंड पडले होते...डोळे वर गेले होते...ठेवल्यानंतर मी उठेनाच...सगळे घाबरले...भक्ती हरचेकर माझी चुलत चुलत बहीण ही माझ्या डोक्याजवळ होती स्ट्रेचर धरायला. ती घाबरली. तीने मला गदा गदा हलविले मी उठली नाही...बाकीच्यांनी हात पाय चोळायला घेतले..भक्ती खूप घाबरली..शेवटी तिने थोबाडीत मारायला सुरुवात केली मला. एक...दोन...तीन..फटाफट...दहा तरी मारल्या असतील तिने...शेवटी मला सहन नाही झाले....आणि मी म्हटल बस!!!! आले मी शुद्धीवर...आणि हसायला लागले..हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा
मी नाटक करीत होते..पाचच मिनिटाचे होते...पण सगळ्यांचे धाबे दणाणले होते...मी मस्त त्या गवतावर पहडून सगळ्यांकडे पाहत होते हसत...सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते..भक्तीचे पाण्याने डबडबले डोळे पाहून मला हसूच आवरेना...मग माझी वाट लागली...सगळ्यांनी असले धुतलय मला!!!...भक्तीने तर गळाच धरला..सुनिताईने चांगलेच धपाटे घातले...मुलांनी तर त्यांच्या वतीने माझ्या कमरेत लाथ घालायला सांगितली..तुडव तुडव तुडवला मला..आणि वॉर्निंग दिली..पुन्हा अस करायच नाही...सगळ्या डीएमव्हींची..हुशार डीएमव्हीची तेव्हा फाटली होती..मला जाम हसू येत होत..मग सगळे शांत झाल्यावर मी त्यांना म्हटल तुम्ही सगळ्यांनी चुकीच्या पद्धतीने मला उचलल होत...त्यामुळे माझा पाठीचा कणा कामातून गेला असता..शिवाय माझ डोक ही आपटल...कितीला पडल असत हे एका कॅज्युलटीला...म्हणून मी मुद्दामुनच नाटक केले...हा हा हा हा...
त्यांना पण हे लक्षात आल...पण पुन्हा मी अस करणार नाही अस वचन दिल्यानंतरच त्यांनी मला माफ केल..मी पण अस पुन्हा कधी केल नाही...नाहीतर लांडगा आला रे आला झाल असत माझ..आणि माझ्याही चुका होतच होत्या की...पण एक गोष्ट यानंतर छान झाली ती म्हणजे मी कॅज्युलटी म्हणून नाकारले जाऊ लागले झाले...कुणीही चालेल रेश्मा नको....हा हा हा....
असो तर अशी धम्माल करीत चालायचा आमचा रेस्क्यु सराव...त्यानंतर माझी निवड परेडच्या रेस्क्यु टीममध्ये झाली...आणि इथे तर सगळ भन्नाटच होत....आहा हा काय दिवस होते ते...अगदी मंतरलेले....Top of the World.. ते पाहू आपण पुढच्या भागात...सावधान होऊन ऐका बर का!!!! तूर्तास अनिरुद्ध पथक विश्राम

Saturday, August 21, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - विशे़ष

अरे तीन दिवसात ३ भाग लिहून झाले...आता चौथा भाग....या भागात रेस्क्युची मजा सांगणार होती ना मी?? हो सांगणारच आहे..पण या भागात नाही....जरा उत्सुकता ताणून धरुया आणखीन...कारण मी येथे बुफे नाही ठेवलाय...ही पंगत आहे..ज्यात भात वाढल्यानंतरच वरण येणार...स्वतःच्या मर्जीने कुणालाही आधी वरण मी घेऊ देणार नाही....पण मी जे काही वाढणार ते अगदी प्रेमाने आणि बापूंवरील निष्ठेनेच...मग बसणार या परेडच्या पंगतीला? छे!!! मी पण बावळट आहे. काय विचारतेय...तुम्ही बसलातच की....भात, वरण, भाजी घेतलीच की तुम्ही आधीच्या तीन भागात...आता पोळीची वेळ. नाही...पण आता तुम्हाला मी पोळी देणार नाही तर मिरचीचा ठेचा देणार आहे....झोंबला तर माफ करा!! पण माझा नाईलाज आहे...कारण आधीच सांगितले हा बुफे नाही जिथे तुम्हाला हवे ते मिळेल... ही पंगत आहे...माझ्या बापूंवरील प्रेमाची, परेडवरील निष्ठेची...आणि मी आणि माझ्या बापूंनीच ठरवलय...की आता या भागात ठेचाच द्यायचा....

जरा चक्रावलात ना!! चायला ही कोण कुठली रेश्मा आम्हाला ठेचा देतेय...हीलाच ठेचू...असे विचार पण मनात आले असतील तुमच्या...असो...तुम्ही मला ठेचा नाहीतर ठोका....मला काही फरक पडत नाही....पण हा ठेचा द्यावसा वाटला तो स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये यांनी तिसर्या भागावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ... या प्रतिक्रीयेमध्ये स्वप्निलसिंह म्हणतात, "तुझ्या लेखाबरोबरच मी बाकीच्यांचे प्रतिसाद सुध्दा वाचले पण खर सांगू का लेख जेवढा अप्रतिम जिवंत वाटला, प्रतिसाद तेवढेच शुष्क वाटले. उत्साह आणि चैतन्याने भरलेली परेड, तेवढाच जिवंत त्यावरचा लेख, तोही एका DMV ने लिहलेला. पण प्रतिसाद देणारे परेड DMV, आणि बाकीचे मात्र अतिशय अनुत्साही वाटले. खरतर मला वाटले की कोणीतरी आपलाही अनुभव येथे देईल, त्यांच्या वेळेसची मजा शेअर करेल, उत्साहात स्वतःचा ब्लॉग सुरु करेल. पण ती जादू काही घडली नाही. दुसर्‍याला छान म्हणण्याबरोबरच माझे काहीतरी सुध्दा त्याच्या बरोबर शेअर करणे महत्वाचे असते."

त्यामुळेच

ही घ्या ह्या ठेच्यातील पहिली मिरची :
तीन भाग लिहून झाले...सगळ्यांनी माझे कौतुक केले...पण मला या कौतुकाची अपेक्षा नव्हती...कारण मला जे काय मिळवायचे होते ते मिळवले आणि जे काही मिळवायचे आहे ते मिळविण्यास मी आणि माझा बापू समर्थ आहोत...पण यामागची खरी तळमळ काय? तर हेच जे स्वप्निलसिंहनी सांगितले..खरचं मला अपेक्षा होती...ती ह्या अनुभवांच्या वाचकांकडून उत्स्फुर्त प्रतिसादाची...जो "छान, व्हेरी गुड, अप्रतिम आणि ग्रेट या शब्दांच्या पलिकडला असेल...पण छे मी हरले....तुमची गाडी याच्या पुढे गेलीच नाही....पोपटच केला माझा...त्यामुळे मला खर तर प्रश्न पडलाय पुढचे अनुभव देऊ की नको....पण मी देणार आहे....कारण मला कमेंटची पर्वा नाही तर कृतीची आहे....जी परेड ग्राऊंडवर किंवा परेडमध्ये दिसणे आवश्यक आहे.

ही घ्या ह्या ठेच्यातील दुसरी मिरची :
लेख जेवढा अप्रतिम जिवंत वाटला, प्रतिसाद तेवढेच शुष्क वाटले. असे स्वप्निलसिंह म्हणतात...खरचं प्रतिसाद शुष्क आहेत...बापूंचा एक अनुभव मांडता येत नाही...आपल्याला...लाज वाटायला पाहिजे...बापूंबद्द्ल दोन ओळीपण लिहता येत नाही....आपल्याला....अरे/अग इतक कठीण काय असत त्यात...वेडु वाकूडे सगळे शब्द त्याला समजतात...अरे/अग मग काय हरकत आहे...कुणी सांगितलय अलंकारिक भाषा वापरायला...ही काय ब्लॉग स्पर्धा आहे...की निंबध लेखन आहे....ही तर आपल्या बापूंच्या कौतुकांची स्लॅम बुक आहे...यात मला अती सामान्य भाषेत बापूंबद्दल लिहता येईल की...कशाला घाबरत आहात...मी तरी कुठली सभ्य भाषा वापरली आहे...चायला मायला शब्द (सो कॉल्ड शिव्या) कितीदा आले असतील लिखाणात...पण त्या सुद्धा तुम्ही सहज वाचल्या की...त्यातला भाव तुम्हाला कळतो...की...मग जस बोलता तस लिहा. हो! पण जास्त शिव्यापण वापरु नका....तस इकडे कुणाला भाषेची पडलेली नाही...हा माझा आणि माझ्या बापूचा ब्लॉग आहे येथे भाषेपेक्षा भावाला जास्त महत्त्व आहे..येऊ देत ना तुमचे जीवंत प्रतिसाद...माझ्या या जिवंत अनुभवाला....प्रतिसादच कशाला तुमचेच जिवंत अनुभवच येऊ द्या....अनुभवच कशाला....तुमचा जीवंत ब्लॉगच होऊन जाऊ दे ना!!!!

ही घ्या ह्या ठेच्यातील तिसरी मिरची :

"काय आहे रेश्मा तू खूप छान लिहलयस...या तोडीच आम्हाला लिहता येत नाही...आणि खर सांगू वेळ नाही मिळत...तुला काय तू पडीक असतेस इंटरनेटवर...तुला कोण घरी विचारणार...आम्हाला संसार आहे..मुले बाळे आहेत....तुला काय? आम्हाला वेळ नाही मिळत..." सॉरी बॉस मला कारण देऊ नका...स्वतःचा डीफेन्सही मांडू नका..मला लिहता येत नाही अस जो म्हणणारा आहे ना!! त्याला कधीच लिहता येणार नाही...कारण जो पर्यंत लिहून घेणार्याची जागा मी माझ्या बापूला देत नाही तोपर्यंत लिहताच येणार नाही त्या व्यक्तीला...सॉरी कठोर बोलतेय...पण खर तेच आहे....आणि माझ्या अनुभवाचेच बोल आहेत....
दुसर म्हणजे वेळ नाही....प्लीज डोन्ट से धीस....अगेन टू मी....कारण वेळ काढला तर मिळतो....आणि वेळ काढता येतो....मला माहित आहे....खरच काही जणांना वेळ नसतोच...पण जे काढू शकतात...त्यांनी तो काढावा...आणि तुम्हाला तो नक्की मिळेल याची मला खात्री आहे...खर सांगू माझ्या ब्लॉगवर तसेच...इतरांच्या ब्लॉगवर वेळात वेळ काढून जर स्वप्निलसिंह कमेंट देऊ शकतात...तर नक्कीच आपण कुणीही देऊ शकतो...
आणि राहिली गोष्ट मी इंटरनेटवर पडीक असण्याची...तर मित्र-मैत्रींणींनो मला शेंड्या लावू नका...कोण कोण कुठल्या कुठल्या सोशल नेटवर्कींग साईट्वर काय काय खयाली पुलाव पकवत असतात. ते मला चांगलेच ठाऊक आहे....हे सगळ करत असताना पाच मिनिटाचा वेळ काढून तुम्हाला तुमच्या बापूंचे गुणसंकिर्तन करावेसे वाटत नाही?...का त्याची गरज वाटत नाही...की बापूंचा अनुभव शेअर करायला लाज वाटते? होय मी इंटरनेटवर पडीक आहे...रात्र रात्र घालवते मी यावर....पण कशासाठी....उत्तर तुमच्या समोर आहे....तुमच्या पेक्षा अधिक चांगले खयाली पुलाव ही पकवत असते....पण त्यातही माझा बापू हा असतोच...शोधाल तर सापडेल...सांगायचा मुद्दा असा....की दहशतवादी देखिल त्यांच्या प्रचार प्रसारासाठी इंटरनेट, ब्लॉगचा वापर करत आहेत....म्हणजे हा किति प्रभावी मिडीया आहे ते समजून घ्या....आणि किमान दोन ओळींचे बापूंचे गुणसंकिर्तन करा...प्लीज हरी ओम, आणि श्रीराम, अथवा राम अस हजारदा कॉपीपेस्ट करु नका...नाहीतर तुम्ही म्हणाल हे देखिल नामसंकिर्तन आहे..चालेल की....नाही चालणार....मला माझ्या बापूंचे प्रेम शब्दात व्यक्त करण्यास जमणे म्हणजेच त्याचे गुणसंकिर्तन करणे होय...अस मला वाटते...आणि हे देखिल तोच आपल्याकडून करवून घेतो...कारण त्याला हे आवडते...नाही का?
उरला प्रश्न संसाराचा मग तुमचा असो की माझा..तर एक गोष्ट सांगते...की बापू आईंना देखिल संसार आहे आणि तो व्यापक आहे....त्यांच्या मुला-मुलींचेही संसार आहेत...तरीही ते सगळ व्यवस्थित मॅनेज करतात...कारण ते त्यांच्या देवाला कारणे देत नाही....आणि नेमून दिलेले कार्य करतात...आपली त्यांच्याशी तुलना कधीच नाही पण त्यांच्याकडून हे नक्कीच शिकू शकतो आणि प्रयास करु शकतो ......तुमच माहीत नाही बुवा पण मी तरी शिकते बाबा...

अरे काय म्हणता तुमच्याकडे कॉम्प्युटर नाही, आणि तुमच्याकडे कॉम्प्युटर असून चालविता येत नाही..इंटरनेट वापरता येत नाही...अहो तुम्हाला आठवत नाही का?...बापू प्रवचनातून कित्येकदा बोलले होते की ज्याला कॉम्प्युटर, इंटरनेट वापरता येत नाही तो २१ व्या शतकात अडाणी ठरेल...मग अडाणी ठरायच आहे का आपल्याला...नाही ना!! मग ज्यांना शक्य आहे त्यांनी शिकायला नको का? मग शिका....
ठीक आहे ज्यांना नाही शिकता येणार किंवा ज्यांना सायबरचा खर्च नाही परवडणार...त्यांनी त्यांचे अनुभव हाताने लिहुन द्या ना....इंटरनेटवर टाकायची जबाबदारी माझी आणि माझ्यासारख्या पडीक इंटरनेटकरांची....अरे किती ब्लॉगर्स आहेत....द्या त्यांच्याकडे लिहून....मलाच दिला पाहिजे अस ही नाही....शिवाय इंटरनेटवर अनुभव द्यायला आपली हक्काची जागा पण आपल्याला लवकरच मिळणार आहे....बरं का!!! हे लक्षात ठेवा....

अरे बापरे खुप झोंबला का हो ठेचा? नाही झोंबला ना!!!! मला माहीतच होत नाही झोंबणार....आणि ज्याने माझी "साद" ओळखून "अपेक्षीत" तो "प्रतिसाद" दिला आहे...त्याला हा ठेचा नाही झॊंबणार...पण तरीही प्रत्येकाला नावाला ठेचा लागतोच नाही का? तेच तेच गोड...मुळमुळीत रोज कोण खाणार...म्हणून जरा हा झटका....

परेडबद्दल मी लाखो अनुभव लिहीन पण शेवटी परेड ग्राऊंड हे ओसाड आणि परेड डीएमव्ही, डीएमव्ही हे शुष्क, राहणार असतील...तर काय उपयोग ना!....आणि मग ठेचाही फुकट गेला म्हणायचा....असो....ठेचा उपयोगी पडो अथवा फुकट जावो....रेस्क्यु अनुभवाची पोळी तुमच्या घशात मी आणि बापू घालणारच आहोत...आणि ती तुम्ही प्रेमाने खाणार याची मला खात्री आहे....जास्तच झोंबणारे लिहले असेल...तर शंभरदा माफी मागते....कारण "ठेचा देण्याचा" माझा अधिकार नाही. याचे मला भान आहे....पण हा ठेचा मित्र मैत्रीणींना वाटण्याचा अधिकार नक्कीच आहे...कारण तुम्हाला देण्याआधी तो मी खाल्ला आहे...आणि त्याचा मला उपयोग झाला आहे....


तर भेटू रविवारी, रिपोर्टींग टायमिंग ७:३०, ग्राऊंड "साद" ..नक्की या! पण कोरडे नका येऊ....तुमच्या प्रतिसादाची "ढगफूटी" होऊ दे....महापूराची वाट पाहतेय....हरि ओम!! श्री राम.....

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग १
परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग २
परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग ३