Wednesday, July 30, 2014

मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए


१७ जुलैच्या गुरुवारची गोष्ट....मी ऑफिससाठी निघाले. जरा मूड डाऊन होता पण का ते कळत नव्हते. म्हणून जरा रिफ्रेश होण्यासाठी गाणी ऐकण्याचे ठरविले. गाणी ऐकता ऐकता अचानक मला भरुन आले. डोळे डबडबले आणि काय होतेय हेच कळेनासे झाले. खार स्टेशन आले म्हणून दारात उभे राहिले तर आणखीनच रडू सुटले. डोळ्यातील काजळ ओघळून एव्हाना गालावर आले होते. आजूबाजूचे लोक माझ्याकडे पाहत आश्चर्य व्यक्त करीत होते. ये लडकी क्यो रो रही है? असा प्रश्न त्यांच्या डोळ्यात होता. माझ्या रडण्यामागच कारण काय असावे याचा तर्क ही लोक १०८ टक्के लावत असणार. पण मला कशाचीच फिकीर नव्हती आणि भान ही नव्हते. आपल्या रोजच्या वाटेने पावल चालत होती मात्र सार लक्ष आणि प्राण एकवटला होता तो कानात सुरु असलेल्या गाण्यामध्ये....



अत्यंत तीव्रतेने कुणाची तरी आठवण हे गाणे करुन देत होत. ही आठवण इतकी तीव्र होती की अश्रुंना देखील आवर घालणे मला शक्य नव्हते. कोणते होते हे गाणे आणि कुणाची आठवण करुन देत होते....

मन मस्त मगन, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए.....या त्या गाण्याच्या ओळी ज्या मला माझ्या बापूरायाची आठवण करुन देत होते. आणि खरच तीव्र आठवण. अशी आठवण यापूर्वी कधीही आली नव्हती.....

बापू श्री हरिगुरुग्रामला येत नाही. तपश्चर्येला बसले आहेत. बापू दिसत नाही....अस सगळ आहे. मग काय झाले? आपल्या भल्यासाठीच करत आहेत ना ते! त्यांची तपश्चर्या संपली की भेटतील, दिसतील. अशी मनाची समजूत घालून मी होते. मला बापू दिसले नाही तरी ते माझ्याबरोबर आहेतच हा विश्वासही आहेच. तसेच महिनो महिने बापूंना मी पाहीले नसल्याने "अब तो आदत सी हो गयी है" या आविर्भावातच माझ जगण चाललेल.

पण त्या दिवशी हे गाण ऐकताना जाणवले की ही समजूत म्हणजे माझ्या बापूसाठी माझ्या उफाळून येणार्‍या भावनांना मी जबरदस्तीने घातलेले वेसण आहे. नाही! नाहीच राहू शकत मी बापूंना पाहिल्याशिवाय! हेच सत्य आहे. नाहीच राहू शकत बापूंचे नाव घेतल्याशिवाय! मग ते मंत्र स्वरुप असो किंवा कसेही.

मला बापूंचे दर्शन नाही झाले तरी मी फोटो पाहून राहू शकते हा बुरखाच फाटला त्या दिवशी. मलाही पाहचेय बापूंना अगदी डोळेभरुन. अगदी हृदयभरुन पाहयचेय. अगदी त्यासाठी मी मग कोणतीही रांग ही मोडायला तयार होते आणि कुठेही वर चढायला तयार होते. अगदी कोणतीही धडपड करायला तयार होते. अगदी जे धाडस कधी केले नव्हते तेही करायला मी तयार होते. बस्स!! मला फक्त बापूंना पाहचेय....

मात्र पुन्हा स्वतःच्या भावनेला आणि आवेगाला संयमाने वेसण घातले आणि निमुटपणे ऑफीसला गेले...
कारण अवस्थाच अशी होती

इश्क की धून रोज जलाए
उठता धुऑं तो कैसे छुपाए

अनिरुद्धाच्या प्रेमाची धून मला स्वस्थ बसू देतच नव्हती. जरा स्वस्थ बसावे म्हटले की "अनिरुद्ध धून" जागृत करायचे.....आणि त्यामुळे या आठवणींची तीव्रता अधिकच वाढली....या तीव्रतेमुळे वाहणारे अश्रु कसे थांबवणार होते मी? माझ्या हातातच नव्हत मुळी आणि मग काय
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

आखिया करे जी हजुरी
मांगे है तेरी मंजुरी

बापू राया हे डोळे तुझेच ऐकतात. तुझी इच्छा असल्याशिवाय हे वाहतही नाही आणि थांबतही नाही. तुझ्याकडे डोळे वर करुन बघण्यासाठी देखील तुझी इच्छा लागते. आज हे डोळे वाहत आहेत कारण ती बहुतेक तुझीच इच्छा आहे. तुझ्या आठवणीत त्यांना पाझर फुटण्यासाठी देखील तुझी परवानगी नव्हती. पण बापूराया त्यांना वहायचे आहे. थेट थेट तुझ्या चरणांपाशी. तुझ्यावर अभिषेक करायचाय या डोळ्यातील जलाने. दुसरे तरी काय आहे माझ्याकडे. माझ्या मनातील भाव हा डोळ्यातून जल म्हणून वाहतोय. म्हणून मी रडतेय रडतेय...तुझ्या आठवणीत. तुझी आठवण....आठवणींची साठवण.....काय आहे त्या साठवणीत?

कजरासी आहें दिन रंग जाए
तेरी कस्तुरी रैन जगाए

तुझा हुंकार, तुझी गर्जना, तुझा शब्द....ही तुझी आह...म्हणजेच तुझी साद...माझ्या कानात गुंजतेय...दर गुरुवारी तुझा शब्द ऐकत नाही....पण पूर्वीचे काही तू बोललेलास तेच परत परत ऐकून माझा एक एक दिवस जात आहे. आयुष्यात नवनवीन रंग भरले जात आहेत. तुझ्या प्रवचनाचा एक एक व्हीडीओ बघून माझा एक एक क्षण जातो. तु नसताना तुझे शब्द आठवतात. पाळतो कीती हा जरा प्रश्न आहेच. पण तरी तुझे शब्द आठवतात. तुझ्या या शब्दातून निघणारा कस्तुरी सुगंध घेऊन माझी रात्र होते. खरचं ही कस्तुरी आहे. अगदी महागडी. अगदी दुर्मिळ अशी कस्तुरी.....तुझ्या प्रवचनांची ही कस्तुरी माझ्या आयुष्यातील प्रत्येक रात्र जागवते. मी जरी झोपले असेन तरी माझे भविष्य जागवते....उजळवते....सांभाळते.......

म्हणूनच बापूराया....
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए
चाहे भी तो भुल ना पाए
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

जोगिया जोग लगाके
मखरा रोग लगाके

बापू तू तपश्चर्येला बसलास खरा. माझ्यासाठी. मी जस मन्मथला पाळणा घरात सोडून कामाला निघून जाते. अगदी तसच तू आम्हाला सोडून गेलास. मन्मथने कितीही भेकाड पसरले तरीही कर्तव्य पार पाडण्यासाठी छातीवर दगड ठेवून तीथून निघावे लागते. मन्मथ रडून रडून लालेलाल होतो. पण मला काही दया माया दाखवता येत नाही. पण खर सांगू का आज मी मन्मथच्या जागी स्वतःला पाहत आहे. माझी आई अशी मला सोडून कठोर होऊन लांब गेली आहे. आणि म्हणुनच आज मी देखिल भेकाड पसरले आहे.
पण खर सांगू का बापू एक गोष्ट देखील माहित आहे. जस ऑफीसमध्ये ही सतत बाळाचा विचार माझ्या डोक्यात असतो तसाच तुझ्याही डोक्यात सतत असणारच. हा विचार बाजूला सारुन मी जस काम पुढे करत राहते तस तू ही करत असणार. आणि संध्याकाळी सकाळ पेक्षा दुप्पट वेगाने मी पाळणाघराकडे धूम ठोकते....फक्त माझ्या लेकराला भेटायला....त्याला आपल्या घरी न्यायला....तसच अगदी तसच तूही श्री हरिगुरुग्रामला तुझ्या लेकरांना भेटायला तळमळत असशील याची खात्री आहे. आणि तू येशील.....लवकरच याची खात्री आहे. कारण तुझ्या बाबतीत ही हेच सत्य आहे.....
इश्क की धून रोज जलाए
उठता धुऑं तो कैसे छुपाए
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

बापू गुरु पौर्णिमेला तू आला नाहीस. पण इथे एक वेगळेच चित्र होते. दूरदूरहून तुझे दिवाने तुला भेटायला आले होते. त्यांना पाहून मला एकच वाटले......
ओढ की थारी प्रीत की चादर
आया तेरे शहर में रांझा तेरा

आणि कोण म्हणते की तू तिथे नव्हतास....साफ खोट......अगदी प्रत्येकाचा विश्वास होता की माझा बापू येथे आहेच... अगदी ह्यावर शिक्कामोर्तब व्हावे असे सगळे तुला भेटत होते....तुझे दर्शन घेत होते....
दुनिया जमाना झूठा फसाना
जीने मरने का वादा साचा मेरा
या श्रद्धावानांची कमिटमेंट पाहून खरच पटल....की सार जग हे भ्रम आहे....तुझ्या आणि माझ्यात जे बोलणे होते....ज्या आणा भाका होतात त्याच खर्‍या....
म्हणूनच बापूराया.....
शिश महल ना मुझको सुहाए
तुझ संग सुखी रोटी भाए

खरच बापू तू नसलेला शिश महल नको.....तु नाहीस तेथे काहीच नाही....ज्या सुखासाठी तू लांब जातोस बापू अस सुख ही नको...आमच्या ज्या भल्यासाठी तू लांब जातो अस भल ही नको....
असच दुखाःत ही मी खितपत पडत राहिन पण तू लांब जाऊ नकोस....नाही म्हणजे नाही....
मी उपाशी राहीन, शिळ पाक खाईन
पण दृष्टी आड जाऊ नकोस
दृष्टी गेली तरी चालेल पण तुझी जाणिव नको जाऊ देऊस....
तुला राग येईल, तु भले चिडशील पण तरीही बापू मला तुला घट्ट धरुन राहयचे.....
अगदी मन्मथ करतो तसच कवटाळून राहचेय...
कडेवर उचलून घे...
तू दूर गेल्याची भावना किंवा सिच्युएशन देखिल आता मी हॅंडलही करु शकत नाही....
विचार तर लांबच राहिला....
एक मात्र नक्की...
आई लांब गेल्यावर ढाय मोकलून रडणार्‍या माझ्याच मुलामध्ये आता मीच दिसत आहे....
कारण;
इश्क की धून रोज जलाए
उठता धुऑं तो कैसे छुपाए
----------------------------------------------------------
हे गाणे ऐकताना अशा सगळ्या भावना, विचार उफाळून आले.
आणि दुसर्‍या दिवशी बापू सूचितदादांसह हॅपी होमला भेटले.
आणि अतिशय सुंदर हसले......डोळे मिचकावले.....आणि जे बोलायचे ते डोळ्यांनी बोलले.....
कित्येक दिवस तडफडत असलेल्या बाळाला शांत केले....
तेव्हा मनात एकच पंचाक्षरी मंत्र प्रगटला
......I love you my dad.......
......I love you my dad.......
......I love you my dad.......

- रेश्मा नारखेडे......