वास्तूबाधा विषयी सागताना प.पू. बापूंनी २३ -१२ २०१० च्या प्रवचनात सांगितलेले काही महत्वाचे points
१) स्वतःच्या घरात कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये .
२) तुमच्या घरात कोणीही मनुष्य बाहेरून आत आला की प्रथम त्याला तुमच्या देवाचा /सद्गुरूंचा फोटो दिसलाच पाहिजे.(ह्यामुळे जर कोणी मनुष्य वाईट हेतू घेवुन तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर त्याचे विखार (वाईट विचार ) तुमचा देव स्वत:कडे घेतो .)
३) किचन मध्ये तुमच्या शेगडीच्या विरुद्ध (समोरच्या बाजूस तुमच्या देवाचा फोटो असलाच पाहिजे .
ह्यामुळे तुमच्या घरात जे अन्न शिजते ते तुमच्या देवाच्या नजरेखाली बनते.
४) तुमच्या बाथरूम मध्ये नळाच्या वरती कुंकू/हळद/अष्टगंध ह्याने रोज स्वस्तिक काढावा. तो paint करून घेवु नये . तर रोज हाताने काढणे आवश्यक आहे. जर शौचालय व बाथरूम एकत्र असेल तर शौचालायापासून दूर नळाच्या वर स्वस्तिक काढावा.
५) रोजची अंघोळ म्हणजे स्वत: स्वत:ला अभिषेक करणे म्हणून रोजची आंघोळ करताना सद्गुरूंचे नामस्मरण करावे .(ॐ ग्लौम अनिरुद्धाय नम: )
**** तुमच्या राहत्या घरात जर वास्तू बाधा आहे असे जाणवत असेल तर पुढील तीन महत्वाच्या गोष्ठी प.पू.बापूंनी करण्यास सांगितल्या .
१) कुठल्याही एका मंगळवारी आदिमाता चंडीकेचा फोटो हृदयाशी डाव्या बाजूला धरून श्री गुरूक्षेत्रम मंत्र म्हणत दिवसाच्या आठ भागात प्रत्येक वेळी कमीत कमी ६ मिनिटे घरात फिरावे . ( दिवसाचे आठ भाग म्हणजे रात्री ११.३० ते दुसर्या दिवशी रात्री ११.३० पर्यंतचा काळ .ह्या काळाला ८ भागात विभागणे म्हणजे ३ तासाचा एक भाग होतो. ह्या एका भागात ६ मिनिटे असे ८ वेळा म्हणजे ४८ मिनिटे वर सांगितल्या प्रमाणे श्री गुरूक्षेत्रम मंत्र म्हणावा .( ** असा मंत्र म्हणताना त्या मंगळवारी घरात उपस्थित असणार्या कोणाचा वाढदिवस नसावा व तो दिवस अमावास्येचा नसावा )
२) घराला जर भूत किवा अन्य कुठली बाधा जाणवत असेल तर कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी डाव्या हातात उदीचे भांडे घेवून उजव्या हाताने घराच्या उंबरठ्यापासून उदी लावायला सुरुवात करावी व सगळी कडे भिंती , कपाटे ,बाथरूम प्रत्येक ठिकाणी घरात उदी लावत जावे . उदी लावण्याचा काळ पौर्णिमा जेव्हा सुरु होते व जेव्हा संपते ह्या मधलाच असावा. ही गोष्ट वर्षातून एकदा केली तरी चालते .
३) तिसरी महत्वाची वास्तू बाधानाशक गोष्ट म्हणजे प्रपत्ती ..श्री रण चंडिका प्रपत्ती व श्री मंगल चंडिका प्रपत्ती .
" तुमची स्वत:ला जेवढी खात्री नसेल तेवढी मला तुमची खात्री आहे ..तुमचे दोष मी मोजत नाही तर तुमचे गुण मी मोजतो ". --- प.पू. सदगुरू श्री अनिरुद्ध बापू
----- ( श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन ..२३-१२-२०१० )