Saturday, April 13, 2013

अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा

न्हाऊ तुझिया प्रेमेच्या कार्यक्रमात कोणते अंभग घेतले जाणार आ्हेत याची खरच उत्सुकता लागली आहे. पण खरोखर असे वाटते की हा कार्यक्रम अतंर्मुख करणारा असेल. मी तर आता सध्या ईमाजिनच करतेय...की या स्टेडीअम मध्ये बसले आहे...चिक्कार श्रद्धावान आलेले आहेत. स्वतः आई बापू दादा आलेले आहेत. कुठे पडद्यावर किंवा एलईडीवर थेट प्रक्षेपण सुरु आहे. स्टेजवर समोर सगळे आर्टीस्ट आहेत...इतक सगळ असूनही मन शांत शांत झालेय..कारण अभंग सुरु आहे..

 ...अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा....

 माझ्या फेव्हरेट अभंगा पैकी असलेला हा अभंग असेल का? कुणास ठाऊक... पण नुसते ईमॅजिन करुनच अंगावर काटा उभा राहिला आहे. या अभंगाच्या पहिल्या दोन ऒळ्या ऐकल्या की भरभरुन कौतुक करत मोठ्या आईला श्रीराम म्हणणारे माझे बाबा अर्थात बापू आठवतात. पूर्वी जेव्हा हा अभंग ऐकायचे तेव्हा असे मनात यायचे आद्यपिपांचा लळा जसा बापूंना लागला तसा माझा ही लागेल का? बापू माझे ही कौतुक कधी करतील का? पण जस जस या बापूरायाच्या चरणी बापूज्ञ होत गेले तसे तसे जाणवू लागले की मुळात या अनिरुद्धाला त्याच्या सार्‍याच भक्तांचा तितकाच लळा आहे...आणि प्रत्येक बाळाचे तितकेच कौतुक आहे. आणि मी ही हे अगदी सामान्य पातळीवर बोलत आहे...कारण मी हे स्वतः अनुभवले आहे...माझ्य बाबतीतही आणि इतर अनेकांच्या बाबतीत ही.... 

एकदा काय झाले बापू, समिरदादा आणि आम्ही काही ऑफीस दोन एक मंडळी समिरदादांच्या रुममध्ये बसलेलो होतो. तेव्हा आपलाच एक श्रद्धावान भक्त तिथे आला. तो श्रद्धावान एका मराठी मालिकेमध्ये तीन ते पाच मिनिटाचा रोल करीत होता. त्याचा तो रोल बापूंनी पाहीला आणि खरंच त्या रोलसाठी त्या भक्ताचे इतके पोट भरुन कौतुक केले...की विचारु नका...त्यावेळी बापूंच्या चेहर्‍यावर जो आनंद आणि समाधान होता तो पाहण्यात मलाच खुप भरुन आले. मग तो भक्त गेल्यानंतर बापू पुन्हा आम्हाला म्हणाले, की अगदी छोटासा रोल होता पण काय मनापासून आणि आत्मविश्वासाने केला होता. छान.... त्यावेळी अगदी सहज माझ्या मनात आद्यपिपांच्या या अभंगाच्या सुरुवातीच्या ...अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा.... या ओळ्या उमटल्या... 

आद्यपिपां आणि इतर श्रेष्ठ भक्तांचे सगळेच अभंग आपल्या दैनंदिन आयुष्यात अनुभवता येतात. हेच अभंग पूर्ण तल्लीन होऊन ऐकण्याची संधी फार कमी वेळा मिळत असते....ह्या कार्यक्रमाच्या निम्मित्ताने आपल्या प्रत्येकाला आता ही संधी मिळणार आहे. बस्स आता ह्या कार्यक्रमाला बापू नावाचा घननीळ मेघ दाटून आला असेल आणि अभंगांचा मुसळधार...मन शितल करणारा पाऊस पडणार आहे....मग फक्त मला पिसारा फुलवून तयार राहयचेय...या प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघायला....
अंबज्ञ -

रेश्मावीरा नारखेडे