Thursday, November 4, 2010

परेड - अविस्मरणीय अनुभव - भाग ६ (PARADE - 6)

नालासोपारा परेड केंद्रावर परेड कमांडर म्हणून पाऊल ठेवले आणि एकदम मोठ झाल्यासारख झाल. मोठ म्हणजे अंहकाराने येणारे मोठेपण नाही तर जबाबदारीने येणार मोठेपण...

चाळीस एक मुली आणि पंचवीस एक मुले इतक्या जणांचे पालकत्व बापूंनी दिले होते...परेड ग्राउंडचा हिटलर अशी माझी ख्याती तेव्हा होती. हे नुकताच मला कळले. बापाची कडक शिस्त आणि आईचा मायेचा ओलावा हीच वृत्ती मी ठेवली होती आणि त्यामुळे परेड ग्राऊंडवर येणार्या प्रत्येक मुलीशी अगदी जवळचे नाते निर्माण झाले. जेव्हा मी परेड सोडली होती...तेव्हा मीच नाही तर माझ्या मुलींच्या डोळ्यात देखील पाणी होत...आणि हेच माझ्याकडून झालेली सेवा ही उचित दिशेला असल्याची पोचपावती होती....

नालासोपाराला येणार्या परेडच्या मुलींशी माझे अगदी जवळचे नाते निर्माण झाले होते. आजही आहे.. प्रत्येकजणीच्या समस्या सोडविण्याची संधी मला मिळाली होती आणि बापूकृपेने मला त्यात यश ही आले...मी ग्राऊंडवर नसताना मला सर्वजण मिस करायचे हेच माझे मेडल होते..येथे मला खूप काही शिकायला मिळाले...
मला फार काही आठवत नाही पण चांगला परेड कमांडर होण्यासाठी मी स्वतःवर फार मेहनत घेतली होती..बाहेरील कुठलाही बदल करणे सोप असत...पण मानसिकता बदलणे अत्यंत कठीण असते...पण या पदावर सेवा करताना....मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक होते...सतत आपल्या परेडचे डीएमव्ही कसे अधिकाधिक सक्षम होतील याचा विचार डोक्यात असायचा...यासाठी काही वेगवेगळे प्रयोग केले होते.

ए ए डी एमवर छोटे छोटे प्रोजेक्ट केले...जसे की पूर, आग वैगरे...चर्चा केल्या....सूर्यनमस्कार...व्यायाम....आणि महत्त्वाचे म्हणजे रेस्क्यु सराव...तेही अनोख्या पद्धतीने....

प्रत्येक परेड डीएमव्हीचा प्रोग्रेस रिपोर्ट तयार केला होता....त्यात त्याचे प्रोग्रेस लिहला जात असे...तो किती सरावाला येतो...त्याची रेस्क्युची प्रगती किती आहे....तो किती सेवेला जातो...
हा रिपोर्ट केवळ माझ्या माहितीसाठी मी केला होता. जेणे करुन मला सर्व डीएमव्हीची माहिती कायम तोंडपाठ राहील. हा माझा छोटासा प्रयत्न होता आणखी काही नाही...

मला परेड सेंटरवर येणार्या प्रत्येकाची घरची दारची परिस्थीती तेव्हा माहीत होती...त्यामुळे त्या त्या डीएमव्हीला संभाळणे शक्य होत असे. प्रत्येकाच्या स्वभावाचे निरिक्षण आणि परिक्षण मी केले होते...त्यामुळे योग्य व्यक्तीवर योग्य ती जबाबदारी  देता आली...पुढे जाण्याची संधी प्रत्येकाला दिली...त्यामुळे आमच्यात कधीच भांडणे झाली नाहीत...किंवा राग रुसवे झाली नाहीत...माणसे जोडण्याचे काम बापूंनी इथे उत्तमरित्या करवून घेतल...

मला आठवत....दर रविवारी नालासोपारा परेड सेंटरच्या ग्राऊंडला किमान ३५ मुली हजर असायच्या....२० च्या खाली आकडा कधीच गेला नाही...हो परिक्षेदरम्यान कमी असायचे...पण परिक्षा संपली रे संपली की पुन्हा परेड ग्राऊंडवर हजर...या सर्व मुला-मुलींना कायम मी "मेरे बच्चे" म्हणूनच संबोधले...या बच्च्यांसाठी सिनियरशी अनेकदा भांडणे देखील केली...

मेरे बच्चे आगे आने चाहिये...या एका ध्येयाने प्रेरीत होऊन त्यांच्याकडून कडक सराव करुन घेतला...पण त्यांनी देखील उत्तम साथ दिली...हे अत्यंत महत्त्वाचे आहे...

सकाळी मुल नाश्ता न करता यायची...साधा परेडचा ड्रेस शिवायला ही पैसे नव्हते काहींकडे....रिक्शा परवडत नाही म्हणून परेड सेंटरला चालत यायचे....घरातून विरोध तरीही यायचे...तोंडावर परिक्षा तरीही यायचे...आजारी असो किंवा काहीही असो...कधी कुठलही कारण दिले नाही...मग अशा मुलांसाठी का नाही मला माझे १०८ टक्के परिश्रम द्यावेसे वाटणार....ही तर मला बापूंनी दिलेली सेवेची सुवर्णसंधी होती...आणि तीचे मी सोनेच केले अस मला वाटते.

प्रवासाला पैसे नाहीत म्हणून अनेकांना सेवेला जाता यायचे नाही...त्यामुळे आम्ही आयडिया केली होती...दहा दहा जणांचे ग्रुप केले होते...कुठलीही सेवा आली की एक ग्रुप जायचा...अलटरनेट...त्यामुळे कुठल्याही सेवेला नालासोपार्याच्या १० जण फिक्स...यात कोणाला वेळेचा प्रोब्लेम असेल तर अलटरनेट तयार असायचाच...जर कुणाकडे पैसे नसतील तर त्याचा खर्च आम्ही एकत्र मिळून करायचो...

जेव्हा परेडचा ड्रेस शिवायचा होता...तेव्हा एक ड्रेसची किंमत ३०० पर्यंत जात होती. माझी मुले केवळ १०० ते १५० रुपये देऊ शकत होती...त्यामुळे काय करायचे हा प्रश्न होता...कारण बुट आणि बॅरेचाही खर्च होताच...म्हणून आम्ही जे थोडेफार सधन मुले होतो...त्यांनी जास्त पैसे काढण्याचा विचार केला. त्याप्रमाणे मुलांचे शुज आणि बॅरेचे प्रश्न सोडवले...पण ड्रेसचे काय?

यासाठी आम्ही स्वस्त्यात कपडा पूरवू शकणारा डिलर शोधायला वसई पालथी घातली...आणि स्वस्त्यात ड्रेस शिवून देणारा टेलर शोधला... अथक प्रयत्नाने आम्हा सर्वांचा पूर्ण ड्रेस १५० रुपयांच्या आतच तयार झाला...ही बापूंचीच किमया...हा हिशेब आजही माझ्याकडे जपून  ठेवलाय...कारण पहिल्यांदाच इतका मोठा व्यवहार केला होता...सगळा हिशेब पूर्ण झाल्यावर जेव्हा पुन्हा माझी जास्तीचे पैसे ज्याचे त्याचे द्यायची वेळ आली. तेव्हा कुणीही ते पैसे घेतले नाही...सर्व पैसे स्वेच्छा निधीत देण्याची त्यांनी मला आदेश दिला..आणि तो मी मानला.

या परेडला एक जण यायची...वयाने मोठी होती....तिच्या घरुन बापूंना विरोध होता. तरीही ती यायची...कामाला जाते अस खोट सांगून..पंजाबी ड्रेस घालून यायची आणि ग्राऊंडवरील शाळेत चेंज करायची..पुन्हा घरी जाताना पंजाबी ड्रेस घालून जायची...खुप कष्ट घेतले तीने....तिला मी खूप ओरडायचे....वाट्टेल ते बोलायचे...पण तीने कधी वाईट वाटून नाही घेतले...उलट स्वतःमध्ये बदल केले....आज तिच्याकडे पाहताना माझा उर अभिमानाने भरुन येतो...आज तिच्याकडचे सगळे बापूंकडे येतात...काहीच प्रोब्लेम नाही...मी परेड सोडल्यानंतरही ती परेडला होती...आणि दिमाखात घरुन परेडचा ड्रेस घालून बाहेर पडायची....

अश्याच अजून काही मुली होत्या ज्यांनी स्वतःवर फार मेहनत घेतली....आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे..आज सगळ्या आपापल्या संसारात रमल्या आहेत...पण परेडच्या आठवणी काढल्यावर त्यांच्या डोळ्यातही चटकन पाणी येत...

२००५ मध्ये मी परेड सोडली...कारण तसा आदेश होता..."प्रत्यक्ष" जॉईन केल....याचवर्षी माझी परेडची तीन वर्षे पूर्ण झाली होती...ऑक्टोबर २००५ अनिरुद्ध पौर्णिमा...ही शेवटची परेड....अनिरुद्ध पौर्णिमेला पहिल्यांदाच रेस्क्यु पथक....याच वर्षी पहिल्यांदा बापूंनी उठून सलामी दिली होती...आणि पहिल्यांदाच रेस्क्यु पथकाचे कमांडर म्हणून मला कमांड देण्याची संधी मिळाली होती....बापूंनी मला मानाने निवृत्त केल....

त्या दिवशी परेडचा पहिला दिवस आठवला.....पहिली हॅपी होमची परेड आठवली...आणि पहिली अनिरुद्ध पौर्णिमेची परेड आठवली.....एका प्लाटूनच्या एका कोपर्यापासून झालेला आरंभ....आणि त्या दिवशी अत्यंत महत्त्वाच्या प्लाटूनच्या कमांडरपदी झालेला शेवट....

ह्यावेळी काय वाटल ते मी नाही शब्दात नाही सांगू शकत.....पण मी एक सैनिक  आहे.....तो आब...तो मान... शेवटपर्यंत राखला बस्स!!!!

सैनिक म्हणून जॉईन केलेल्या परेडमधून वानरसैनिक म्हणून निवृत्ती घेतली...आणखीन काय हवं....
कुठलही मेडल...किंवा काहीही मला मिळाले नाही...मिळाला फक्त बापू...त्याचे चरण.....आणखीन काय हवं....
परेड सोडली पण खरी प्रगती तिथूनच झाली....आणखीन काय हवं
जेव्हा मी परेड कमांडर होती....तेव्हा मी काही जणांना म्हटल होत....की परेड मधूनच डीएमव्हीचा सर्वांगीण विकास होतो....आणि येथूनच खरी प्रगतीला गती मिळते....तेव्हा मला वेड्यात काढण्यात आल होत....

पण हीच गोष्ट आता सिद्ध झाली आहे.........अनेक परेड डीएमव्हीने हे सिद्ध केले आहे.... असो

आता चक्र पुन्हा सुरु होतेय.....पाच वर्षांनी पुन्हा एकदा परेड जॉईन केली आहे...आणि पुन्हा एकदा एका कोपर्यापासून सुरुवात करणार आहे....ती ही अनिरुद्ध पौर्णिमेपासून...
पण आता काही मिळविण्यासाठीसाठी नाही...कुठल्याही ध्येयाने प्रेरीत होऊन नाही तर.....
फक्त आणि फक्त परेडसाठी परेड जॉईन केली आहे.......
परेडने जे मला दिले आहे...ते परत देण्यासाठी.....
आणि माझी ही परेड असेल अनिरुद्धाच्या दिशेने जाणारी....रामराज्याच्या दिशेने जाणारी.....श्री राम!!!