Tuesday, July 28, 2015

डॉ. अब्दुल कलाम सर आजही आपल्या बरोबर आहेत...

Dr. A. P. J. Abdul Kalam
Dr. A. P. J. Abdul Kalam

भारताचे राष्ट्रपती कोण? हा प्रश्न मला आजही विचारला तरी आधी माझ्या डोळ्यासमोर येतात ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. पण त्यांचे नाव उच्चारण्याआधीच भानावर येते आणि जाणिव होते की ते माजी राष्ट्रपती आहेत. सद्य नाही. परंतु #राष्ट्रपती म्हणून तेच माझ्या स्मरणशक्तीत फिक्स्ड झाले आहे. 

त्यांचे काल अचानक झालेले निधन ही बातमी खरंच धक्कादायक होती. पण सृष्टीचा नियम "आला तो जाणारच" असा आहे. पण कसा जातो आणि काय करुन जातो हे मात्र आपल्या हातात असते. ह्याची जाणिव आपल्याला होते ती #मिसाईल मॅन डॉ. कलाम सरांच्या जीवन प्रवासावरुन.

देशातील कोवळ्या कळ्यांना योग्य त्या दिशेने खुलवण हे कर्म ज्यांनी धर्म म्हणून स्विकारला त्या डॉ. कलामांना ते कार्य करतानाच "वीरमरण" आले अस मला वाटते. #युद्धभूमीत मायभूमीची सेवा करताना एका जवानाला जसे मरण येते तसेच मरण डॉ. कलामांना कर्मभूमीवर मिळाले. एखाद्या कर्मयोद्धाला शोभेल असेच वीरमरण त्यांना प्राप्त झाले. 

यात काल एक कटू सत्य देखील मी अनुभवल. किंबहुना आपण सार्‍यांनीच अनुभवले. एखादी मौल्यवान गोष्ट जेव्हा आपल्या हातातून सुटून जाते तेव्हाच तीची किंमत कळते आणि मग हळहळण्याशिवाय आपल्या हाती काहीच उरत नाही. महापुरुष, पुण्यात्मे आणि संताबाबतही असच होत. ते असतात, ते कळकळीने काही सांगत असतात, आपले कार्य करित असतात....प्रबोधन करित असतात....आणि आपण मात्र झोपा काढत असतो. मग असा पुण्यात्मा आपला कार्यकाल संपवून जेव्हा भर्गलोकी निघून जातो तेव्हा आपण खड्‍कन जागे होतो. तेही काहीतरी अनमोल गमावल्याच्या दुःखाने, पश्चातापाने आणि हळहळीने. आणि हातात केवळ तेच रिकामे भांडे उरते. 

पण या पुण्यात्मांचे तसे नसते ते त्यांची उणिव कधीच भासू देणार नाही अशी तरतूद करुन जातात. आपल्या विचारांमधून..आपल्या कार्यांमधून.....पण पुढची सगळी जबाबदारी आपली असते. आपण आपली जबाबदारी पार पाडतो का? हा प्रश्न आहे. 

भारताने असे अनेक पुण्यात्मे जन्माला घातले. पण त्यांना आपण केवळ जयंती आणि पुण्यतिथीला आठवतो. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होणारा किंवा टिळक तुम्ही हवे होता असे म्हणणारा नायक हा चित्रपटातच पाहायला मिळतो. हे दुर्दैव.

काय गम्मत आहे पहा ना! या एकेका पुण्य़ात्माच्या चरित्रामधून दुसरा पुण्यात्मा जन्माला घालण्याची ताकद असते. मग अडतय कुठे याचा विचार व्हायला हवा. 

काल डॉ. कलाम गेले आणि त्यांचे विचार, कार्य, महानता हे सांगणारे असंख्य़ मॅसेजेस आले. जवळपास प्रत्येक मॅसेज मी वाचला आणि तो मॅसेज कुणी पाठवला तेही पाहिले. आज एकूण सार्‍यांचेच कलाम प्रेम उफाळून आले. खर तर यायलाच पाहिजे पण ते एका दिवसासाठी नको. शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणारे डॉ. अब्दुल कलाम यांना खरी श्रद्धांजली म्हणजे हे RIP मॅसेज नाही तर त्यांनी जगाला दिलेला मॅसेज फॉलो करणे हा आहे. त्यांचे स्वप्न सत्यात आणणे ते आहे. 

मी फार मोठा काही तीर मारु शकत नाही कदाचित....पण ज्या डॉ. कलामांचे शिक्षणावर प्रेम होते ते शिक्षण तरी मी नीट पूर्ण केले पाहीजे. ज्या डॉ. कलमांनी मातृभूमीतच आपल्या संशोधनाने कमाल केली त्या वैज्ञानिक डॉ. कलामांचे अनुकरण करुन माझ्या शिक्षणाचा फायदा देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे, अस मला वाटते. 

आज आम्हा सर्वांना त्यांचा खूप आदर आहे. पण त्यांच्या शिकवणीतील किती गोष्टी अमलात आणल्या आहेत आजपर्यंत? मला अस वाटते अनेकांना काल संध्याकाळ पासून त्यांच्या कार्याची माहिती होऊ लागली असेल. अनेकांना त्यांचे इंडीया २०२० मिशन कालच कळले असेल. तर काहींना हे सारं आधीच माहित असेल आणि त्यांच्या आपल्यातून निघून जाण्याने पुन्हा एकदा आठवले असेल. मग जो काही हा कलामनामा आहे तो तसाच आठवणीत राहू द्यावा आणि पुन्हा एकदा देशाच्या अनेक कोपर्‍यांमधून डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम जन्माला यावेत....अस मला वाटते....

परवाच एक रिक्षावाला मला बोलत होता..."क्या मॅडम क्या बताऊ आपको...मेरे रिक्षा में मेरे बेटो-बेटी के उमर के बच्चे बैठते है। और नशा करते रहते है। पढे लिखे है पर उसका कुछ परिणाम उनपे दिखता नही। सिर्फ कमाना और उडाना यही उन्हे पता रहेता है। अपने मॉं-बाप को भी ये सॅंभाल नही सकते देश क्या सॅंभालेंगे? और जिनके हाथो देश सॅंभालने की ताकद होती है वो मेरे रिक्षा भी नही देख सकते क्योंकी वो इस देश मे ही नही रेहते। और ये दोनो के बीच मैं जो है वो अपने काम, संसार और खूद की जिम्मेवारीसे परेशान है वो देश का क्या सोचेंगे? क्या होगा इस देश का?"  खर तर ही परिस्थिती सत्य आणि गंभीर आहे. 

पण त्या रिक्षावाल्याचा चिंताग्रस्त चेहरापाहून मी एकच बोलू शकले, "जो होगा वो मंजूरे खुदा होगा। आपके मन में जैसे यह सवाल आया है वैसा सवाल हर एक मन मे आए तो कुछ अलग हो सकता है। और उसके लिए हमारा देशप्रेम सच्चा और पक्का होना चाहिए। और वो हरपल जागृत रहना चाहिए।"

असेच "सच्चा और पक्का देशप्रेम" हे डॉ. अब्दुल कलाम सरांचे आहे...म्हणूनच ते प्रत्येकावर प्रभाव पाडू शकले..प्रगती करु शकले व देशालाही प्रगतीच्या दिशेने नेऊ शकले.....असे मला वाटते.....

श्रद्धांजली वाहीली की आपण मान्य करतो की ती व्यक्ती आपल्यात नाही....
आज मला डॉ. ए. पी. जे.  अब्दुल कलाम सरांना आदरांजली अर्पण करावीशी वाटतेय....
कारण ते आपल्याला सोडून गेलेले नाहीत.....
...त्यांचे प्रेरणादायी विचार...मार्गदर्शन...आजही आपल्या बरोबर आहे....

- रेश्मा नारखेडे

Dr. A. P. J. Abdul Kalam Sir Quotes

You have to dream before your dreams can come true.

#Excellence is a continuous process and not an accident.

Life is a difficult game. You can win it only by retaining your birthright to be a person.

Man needs his difficulties because they are necessary to enjoy success.

We will be remembered only if we give to our younger generation a prosperous and safe India, resulting out of economic prosperity coupled with #civilizational heritage.

Those who cannot work with their hearts achieve but a hollow, half-hearted success that breeds bitterness all around.

Educationists should build the capacities of the spirit of inquiry, creativity, entrepreneurial and moral leadership among students and become their role model.

Look at the sky. We are not alone. The whole universe is friendly to us and conspires only to give the best to those who dream and work.

If a #country is to be corruption free and become a nation of beautiful minds, I strongly feel there are three key societal members who can make a difference. They are the father, the mother and the teacher.

My message, especially to young people is to have courage to think differently, courage to invent, to travel the unexplored path, courage to discover the impossible and to conquer the problems and succeed. These are great qualities that they must work towards. This is my message to the young people.


Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma