अध्यात्म आणि विज्ञान गोष्ट सांगणार्या दोन भाषा असल्याचे सुप्रसिद्ध लेखक डॅन ब्राऊन यांनी भारतातील त्यांच्या भेटी दरम्यान म्हटले. Link1-The Huffington Post, Link 2-Time of India
Dan Brown |
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥
( अयं भगवद्गीतायाः चतुर्थोध्यायस्य ज्ञानकर्मसंन्यासयोगस्य चतुस्त्रिंशत्तमः (३४) श्लोकः)
हा श्लोक सद्गुरूंकडून ज्ञान कसं मिळवावं, हे सांगतो. ज्यांना सद्वस्तूचं ज्ञान झालं आहे, जे खरे यथार्थ सद्गुरू आहेत त्यांना प्रणिपात करून, त्यांची सेवा करून, त्यांना अत्यंत विनयानं प्रश्न विचारला की हे अर्जुना ते तुला यथार्थ ज्ञान देतील, असं भगवंतांनी या श्लोकाद्वारे सांगितलं आहे.
याच प्रमाणे सदगुरु अनिरुद्ध बापू सुद्धा आपल्या प्रवचनातून यथार्थ ज्ञान देत असतात. त्यांच्या श्रद्धावान मित्रांना पडलेल्या प्रश्नांचे समाधान उचित वेळेस करीत असतात. सध्या बापू विविध अल्गोरिदम समजवून सांगत आहेत. संख्याशास्त्रातील अध्यात्माचा त्यांनी परिचय करून दिला. अध्यात्म आणि विज्ञान हे एकरुप आहेत हे त्यांनी डॉ. निकोला टेसलाच्या जीवनगाथेवरुन पटवून दिले आहे. अध्यात्म आणि विज्ञान याचा एकत्रित विचार करताना एक गोष्ट माझ्याही लक्षात आली. ती मांडण्याचा प्रयास करीत आहे.
बापूंनी प्रवचनातून स्वार्म इंटेलिजन्सची करून दिली. माझा काही फारसा अभ्यास या विषयावर झाला नाही. पण एकंदरीत स्वार्म बद्द्ल जे थोडे फार कळले ते असे की सामुहिक बुद्धीमत्ता आणि त्यातून तयार होणारी अभेद्य शक्ती. बापूंनी प्रवचनात ही स्वार्म टेक्नॉलॉजी स्पष्ट करण्यासाठी एक मुंग्यांचा व्हीडीओ दाखविला. ज्यात सर्व मुंग्या एकत्रित येऊन एकाच पद्धतीचे वर्तन करून भल्या मोठ्या लाटेचा देखील सामना करतात आणि सुखरुप नदी पार करतात. मुंगीसारख्या प्राण्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेबाबत संशोधन झाले आहे आणि होत आहे व या संशोधनात थक्क करणारी माहिती मिळत आहे. सामूहिक बुद्धिमत्तेने अशक्य वाटणारी कार्ये लीलया करता येतात, हा मुद्दा मुंग्याच्या सामूहिक(swarm intelligence) बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. मुंग्यांची वसाहत, त्यामागील त्यांची कल्पकता, त्यांचे अन्न गोळा करणे, शेती आणि पशुपालन करणे याबाबतच्या संशोधनाबद्द्ल सांगून परम पुज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात सामूहिक बुद्धिमत्तेबाबत सविस्तर माहिती दिली, ती आपण या व्हिडियोत पाहू शकतात.
परंतु या ठीकाणी मला मांडायचा मुद्दा असा की या स्वार्म टेक्नॉलॉजीचा आणि अध्यात्माचा निकटचा संबंध आहे. किंबहुना अध्यात्माच्या पिपलिका या मार्गाचे वैज्ञानिक स्वरुप असल्याचे मला वाटते. अध्यात्मामध्ये मुंगीचे फार महत्त्व आहे. पिपलिका मार्ग - पिपलिका म्हणजे मुंगी. मुंगीचा मार्ग.....हा काय आहे मुंगीचा मार्ग?
आणि आपले आद्य पिपलिका पांथस्थ म्हणजेच आद्यपिपा - सुरेशचंद्र दत्तोपाध्ये. सुचितदादा व समिरदादांचे वडील. ते म्हणतात,
पिपा म्हणे अनिरुद्धाने| मजसि नेले ह्याची मार्गे|
तुम्ही धावारे सत्त्वर| बापू उभाची तत्त्पर॥
याचे स्पष्टीकरण देताना सुहाससिंह डोंगरे म्हणतात -
आद्यपिपा काय म्हणतात ? मी ह्या मार्गाने गेलो नाही, तर अनिरुद्धाने मला ह्या मार्गाने नेले. पूर्ण शरणागती....कुठेही जराही अहंपणा नाही. अनिरुद्धांचा मार्ग म्हणजे देवयान पंथ, पिपीलिका पंथ म्हणजेच पुरुषार्थ पंथ. पिपीलिका म्हणजे मुंगी. मुंगी जशी सदैव पुरुषार्थ करत असते व ती सदैव सामूहिक प्रयासांसह क्रियाशील असते, त्याप्रमाणे श्रीमद्पुरुषार्थाचा श्रद्धावान सर्व श्रद्धावानांसह एक श्रद्धावंत समाज म्हणून सदैव पुरुषार्थशील असतो. अशा पुरुषार्थी सैनिकांचा पंथ म्हणजेच ‘भक्तिसेतू’ व हा भक्तिसेतू रामाच्या आज्ञेने, हनुमंताच्या मार्गदर्शनाने बांधणारे श्रद्धावान पिपीलिकामार्गाचे प्रवासी आहेत. ह्या सर्व अनिरुद्धभक्तांमध्ये ‘आद्य पिपीलिकापांथस्थ’ म्हणून अग्रणी असणारे असे हे आद्यपिपादादा !
मुंगी हा खरा पुरुषार्थ करीत असते. ही मुंगीच आपल्याला भक्ती, एकनिष्ठता आणि कठॊर श्रद्धा शिकविते. अपार कष्ट सोसूनही ती कधीही आपला मार्ग बदलत नाही. या मुंगीच्या भूमिकेत जाऊन महाधर्मवर्मन योगिंद्रसिंह जोशी म्हणतात,
हेचि मागत आलो, हेचि पुढे मागू
पिपा संत संगू नामपाठ ।
योग्या मुंगी जैसी जन्मोजन्मी खोडी
गुळ ना तो सोडी, तुटो मुंडी ॥ २ ॥
हा गुळ कुठला...तर या देवयान पंथावर राहण्याची सदिच्छा हाच तो गुळ..त्या परमात्म्याचे चरण हाच गुळ मग त्या गुळासाठी मुंडी मोडली तरी बेहत्तर.
हीच मुंगी काय करू शकते हे मुक्ताबाई सांगते.
संत मुक्ताबाई म्हणते,
मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सुर्यासी||
मुंगी एवढे लहान असलो तरी मुंगीमध्ये सुर्याला गिळंकृत करण्याची ताकद तिच्यात असते म्हणजेच अशक्य ते शक्य करण्याची ताकद तिच्यात असतेच असते. मात्र त्यासाठी मुंगी बनणे गरजेचे आहे. मुंगी सारखे खडतर परिश्रम आवश्यक आहे. भक्तीमार्गात मुंगीचे महत्त्व अनन्य आहे.
स्वार्म इंटेलिजन्स म्हणजे सामुहिक बुद्धीमत्ता ही गोष्ट दुर्जनांवरील सजन्नांच्या विजयाचा "विजयमंत्र"च आहे, असे मला वाटते. "रावण वधः निश्चितः" हा आत्मविश्वास देणारी मुंगीच वानरसैनिक आहे असे मला वाटते.
- रेश्मावीरा नारखेडे....