Showing posts with label My Experiences. Show all posts
Showing posts with label My Experiences. Show all posts

Thursday, February 12, 2015

आत्मबल - तुझे माझे नाते आई

आत्मबलचा कार्यक्रम नुकताच झाला. मला प्रत्यक्ष कार्यक्रमाला जाता आले नाही. परंतु या कालावधीत मी माझ्या वेळच्या आत्मबलच्या आठवणींमध्ये रमले होते...खरच एक एक आठवण जपून ठेवण्यासारखी आहे. किती सांगू आणि किती नाही. या आत्मबलच्या क्लास मध्ये मला काय मिळाल हे शब्दात सांगता येणार नाही पण तीन प्रमुख गोष्टी मला मिळाल्या त्या म्हणजे आई, मी आणि सख्या. आज जेव्हा लग्न झाले आणि बाळ झाले तेव्हा जाणवतेय आत्मबल संपलेले नाही. आज खरच जाणवते एका मुलीचे रुपांतर पत्नी आणि आईमध्ये जेव्हा होते...तेव्हाचा बदल हा साधासुधा नसतो. आत्मबल हा बदल स्वीकारण्यास व पेलण्यास समर्थ करते. ते ही अगदी हसत खेळत. 

नंदाईच्या सानिध्यात आपल्यात सहज होणारे बदल आपल्याला देखील कळत नाही. मग वेळ जसा पुढे जातो तशी आपल्याला त्याची जाणिव होत जाते. आणि तेव्हा लक्षात येते की आई आपल्यावर किती मेहनत घेत आहे आणि जर आपण तिला हवी तशी साथ दिली तर आपल्या आयुष्याचे सोने होऊ शकते. होय!!! नंदाईने माझ्या आयुष्याचे सोने केले...

आईने मेहनत घेतली म्हणजे नक्की काय? आई जेव्हा क्लासमध्ये येते आपल्याला काही शिकविते तेव्हा ती आपल्यावर मेहनतच घेत असते. ती आपल्या छोट्याश्या रोलसाठी सुद्धा जीवाच रान करते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी ती आपल्यापेक्षा जास्त प्रयास करते. आपल्या वाट्याला जी काही भूमिका येईल त्यात १०८ टक्के पूर्ण प्रयास करायचे ही मोठी शिकवण आई देते...हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहीजे. माझ्या आयुष्यात जो रोल मला बापूंनी दिला आहे तो १०८ टक्के पूर्ण समर्थाने पार पाडणे आवश्यक असते व ते कसे करावे हे आई स्नेहसंमेलनाच्या मार्फत शिकविते असे मला वाटते. आत्मबल हे स्वार्म सायन्स आहे. संघशक्तिचा एक उच्चतम अविष्कार आहे. 


मला अजूनही आठवत तेराव्या बॅचमधील भूक नाटकातील "बॉस’ चा रोल. अधिक वेळ न देऊ शकल्याने मला अगदी छोटासा हा रोल मिळाला होता. पण आईने दिलेल्या बळामुळे आणि बापूंच्या कृपेमुळे हा रोल खरच अजरामर ठरला. माझी लहानपणापासून इच्छा खुप होती की आपण रंगमंच गाजवावा. ती इच्छा आईने आत्मबलमधून पूर्ण करुन घेतली. रोल छोटा होता की मोठा होता ह्या पेक्षा ती आईने दिलेली एक महत्त्वपूर्ण जबाबदारी होती याची मला जाणिव होत होती. 

माझा रोल लंपट, बाईलवेडा अश्या ठरकी बॉसचा होता. जे मला सुरुवातीला पचविणे कठीण झाले. पण तरीही आईने दिलेले काम आहे हे जमणारच ह्या विश्वासाने मी मेहनत करु लागले. या रोलसाठी आवश्यक ते सर्व काही केले. हा रोल नीट व्हावा म्ह्णून सिगरेट, दारु पिणार्‍या लोकांचे निरिक्षण केले. चित्रपट सिरिअल्स मधून ठरकी पुरुष कसे बाई कडे बघतात याचे निरिक्षण केले. व तसे आपल्या अभिनयात उतरविण्याचा प्रयत्न केला. It was challenge to me. 
THE BOSS - AATMABAL DRAMA

माझा एक वाईट बॉस म्हणून आईला राग आला पाहिजे आणि तिला मला चप्पल काढून मारावेसे वाटले पाहिजे. हे माझे टारगेट होते. त्याप्रमाणे एका रन थ्रूला बेसमेंटमध्ये रिहसल सुरु होती. जागा कमी असल्यामुळे एरव्ही लांब असणारी आई यावेळेस अगदी समोर म्हणजे अगदी एक फुटाच्या अंतरावर बसली होती. मला एक डायलॉग समोर पाहून बोलायचा होता आणि आई समोर होती. पण खर तर मी घाबरले होते. मग मनातून मोठ्या आईचे, दत्तबाप्पा आणि बापूंचे स्मरण करुन जे काय होईल ते होईल अस म्हणत आईच्या डोळ्यात डोळे घालून तो डायलॉग म्ह्टला. यावेळी मला स्पष्ट दिसत होते की आईला माझ्या डायलॉगची आणि नजरेची किळस वाटत होती. आणि शेवटी आई म्हणालीच की तुला चप्पल काढून मारावेसे वाटत आहे.....
ऍण्ड येस इथे सगळ जिंकले होते. आईला हवा तसा माझा रोल झाला होता. 

ह्या नंतर मुख्य कार्यक्रम झाला. कौतुक झाल, पण एक गोष्ट आजही डोक्यातून गेली नाही.....
ती म्हणजे आईने मला हा बॉसचा रोल देऊन काय साधल? माझ्यासाठी हा रोल काय देऊन गेला?
तर खूप काही देऊन गेला. एक आत्मबलचा साधा रोल आपल्या मन बुद्धीत बदल घडवून आणू शकतो. विचारसरणी बदलू शकतो. आपल्याला सतर्क करु शकतो हे प्रथमच मी अनुभवले आणि यापेक्षा बरच काही. 
जसे पंचतंत्रच्या गोष्टींमधून आपल्याला बोध मिळत असतो तसा त्मबलच्या प्रत्येक क्षणातून आपल्याला बोध मिळत असतो...फक्त ते बोधामृत पिण्यासाठी आपल्याला चातक असावे लागते....
आज पुढे कितीही वर्षे गेली आणि अगदी मरणाच्या दारावर असेन तेव्हाही मला आठवेल आपण अस काहीतरी आयुष्यात केले होते ज्यामुळे काही क्षण तरी आई समाधानी झाली होती. आणि हा अनुभव आत्मबलच्या प्रत्येक सखीने मिळवून हृदयाच्या कप्प्यात ठेवावा. यात खुप मोठी ताकद आहे, असे मला वाटते. 

तुझे माझे नाते
जगावेगळे काही
माझ्यातले बळ तू
शक्ती तू आई

तुझ्या चेहर्‍याचे हास्य
अन समाधाना पायी
स्वतःशीच शर्यत पहा
लावली मी आई

सुवर्ण क्षणांची
सुवर्ण गाठोडी
पुन्हा उघडण्याची
लागली मला घाई

चरण उराशी
आत्मबल हाताशी
संसार माथ्यासी
समर्पित होण्यास
बोलव ग आई

- रेश्मा नारखेडे
२/१२/१५

Thursday, December 18, 2014

स्व-आरोग्याकडे पाहण्याचा एक स्वार्थी दृष्टीकोन


Self-Health-Doctor

१३ डिसेंबर हा दिवस दृष्टीकोन पालटणारा ठरला. आरश्यात केवळ आपण कसे दिसतो हेच आज पर्यंत पहात आले पण १४ डीसेंबरला प्रथमच आरश्यात स्वतःचे आरोग्य कसे आहे हे न्याहळायला लागले. तेव्हा जाणवले की चांगले आरोग्य हेच खरे सौंदर्य आणि खरे सौंदर्य चेहर्‍यावर नसून पोटात आहे.....हा हा हा....नक्कीच अजब वाटले असेल. पण हे १०८ टक्के खर आहे. कारण १३ डिसेंबर २०१४ रोजी डॉ. अनिरुद्धसिंह धैर्यधर जोशी (अनिरुद्ध बापू) यांचा सेल्फ हेल्थचा सेमिनार अटेंट केला आणि माझे माझ्या आरोग्याबद्दलचे विचारच बदलले. खरच आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही आणि घ्यायची म्हटली तर नेमके काय करायचे हेच कळत नाही. जोपर्यंत आपण स्वतःच्या आरोग्याविषयी स्वार्थी बनत नाही तोपर्यंत चवीच्या आणि खाण्याच्या मोहातून सुटका होत नाही. बापूंनी या व्याख्यानातून ही जाणिव करुन दिली.व्याख्यानाची सुरुवातच मुळी बापूंनी सकारात्मक करुन दिली.

Everything can be repair. हो आपण सगळ काही सुधारु शकतो. दुरुस्त करु शकतो. आरोग्याच्या बाबतीत बोलताना सेमीनारच्या शेवटापर्यंत ह्या वाक्याची पूरेपूर जाणीव झाली.

बापूंनी डॉ थॉमस यांचे एक वाक्य सांगितले. Health is not value till sickness come. आरोग्याची किंमत आजारपण आल्याशिवाय कळत नाही आणि खरंच आज एकही अशी व्यक्ती नसावी की ती आजारी नाही. प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या व्याधीने पछाडलेलाच आहे. काहींची व्याधी मानसिक तर काहींची शारीरिक. आणि या व्याधींचा वापर आपण अनेकदा सांत्वनासाठी करुन घेतो.

मी देखील अनेक व्यक्ती पाहील्या आहेत की त्यांना झालेल्या (?) आजारांचा वारंवार उच्चार करुन जगाची सिंपथी मिळविण्याचा प्रयत्न करतात व जबाबदार्‍या टाळतात. कधी तरी खरंच व्यक्ती आजारी असते पण अनेकदा हे आजारपण ओढावून घेतलेले असते. आपण वारंवार एकाच गोष्टीचा विचार केला की ती मनात जाऊन मोठी होते किंवा प्रत्यक्षात येते. अनेकदा तसेच काहीतरी होत असावे . मग आजाराचा विचार करण्यापेक्षा आरोग्याचा विचार केला तर ८० ट्क्के आजार दूर पळतील आणि आरोग्याचा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचे हे बापूंनी सांगितले.

मनाला फ्रेश वाटत असेल तर शरिराला ही फ्रेश वाटत असत. मन थकलेले असेल तर शरीरही आपले कार्य नीट करु शकत नाही. म्हणून मनाने उदास असणार्‍या व्यक्ती विशेष कार्यशील ठरु शकत नाही. त्यामुळे मनाचा उदासपणा जाऊन त्यास चैतन्य येणे आवश्यक असते. पण खर तर मन हे अन्नमय आहे. म्हणजे शेवटी आपण काय खातो यावरच आपले सर्वस्व अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. आणि आपण काय खावे व काय खाऊ नये तसेच ते कसे खावे हे बापूंनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले.

हे कनेक्शन सांगताना बापूंनी "दी फरगॉटन ऑर्गन" ची ओळख करुन दिली. ते म्हणजे आपल्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरीया. या चांगल्या बॅक्टेरियांचे महत्त्व विशद करताना बापूंनी अगदी थक्क करणारी माहीती दिली. या चांगल्या बॅक्टेरियांच्या प्रभावामुळे माणूस आस्तीक बनत जातो, धीट बनत जातो आणि हे सिद्ध होण्यासाठी आणखी काही कालावधी जाईल. पण हे १०८ टक्के खर आहे असं बापूंनी सांगितले आहे आणि गुन्हेगारांमध्ये वाईट बॅक्टेरियाचे प्रमाण अधिक असल्याचेही शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.

याबाबत मी एक जवळून अनुभव घेतला आहे. माझ्या ओळखीतला एक तरुण मुलगा अतीशय व्यसनी व गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. आस्तीकता नावाला देखील असेल की नाही माहीत नाही. एक दिवस काय झाले माहीत नाही पण व्यसनाचा अतिरेक झाला आणि स्वतःच ठरवले की बस झाले....आता आपण तब्येत सुधरायची.  यासाठी त्या व्यक्तीने व्यायामाचे व्यसन घेतले. बॉडी बनवायची. या ध्यासासाठी त्याने अन्न बदलले....व्यसने सोडली.....व्यायामाचे वेड जरा अतीच होते...पण तरिही त्यामुळे नकळत बदल होत होता....आणि हा बदल आस्तिकतेकडे भक्तीकडे झुकणारा होता...पुढे व्यायामाचे वेड सुटले...पण भक्ती आणि आस्तिकता कायम राहीली.....त्या व्यक्तीने ही हा बापूंचा सेमिनार अटेंड केला. सेमीनारनंतर त्या व्यक्तीनेच मला या गोष्टीची कबूली दिली....की व्यायाम आणि डायट केले नसते तर आज इथे भक्तीमय परिवारात नसतो...भक्तीमय परिवारात नसतो तर आयुष्याला वळण लागले नसते....आयुष्याला वळण लागले नसते तर आता नोकरी आणि अभ्यासात प्रगती केली नसती. आता पुन्हा बापूंच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम व डायटमधील वेड बाजूला सारुन प्रकृतीला उचित असे व्यायाम व डायट करीन.....असा निर्धार केला.

हे ऎकून मला बापूंनी सांगितलेल्या चांगल्या बॅक्टेरियाच्या प्रभावाचे जबरस्त उदाहरण पहायला मिळाले. मग मी स्वतःकडे देखील पाहीले. कारण नुकतच डॉ. सुचित दत्तोपाध्ये अर्थात सुचितदादांच्या मार्गदर्शनानुसार माझे ही डायट सुरु होते. त्यांनी दिलेले हे डायट म्हणजे बापूंनी दिलेल्या मोठ्या सेमीनारचाच एक भाग होता आणि या डायट फॉलो केल्याने शरिरावरच नाही तर मनावरही उत्तम परिणाम झाला. मी घालवून बसत असलेली माझी कार्यशीलता आणि अर्थात चुणचुणीतपणा मला पुन्हा मिळाला. मन शांत झाले, विचार स्पष्ट झाले. निर्णय क्षमता, निरिक्षण क्षमता, कल्पना क्षमता प्रगल्भ झाली आणि त्याचा रिझल्ट माझ्या रोजच्या कामात मला मिळू लागला. मन अन्नमय याचा अनुभव मी स्वतः घेतला.

स्वतःचा पहिला स्वार्थ म्हणजे स्वतःचे आरोग्य. हे समीकरण बापूंनी दिले. कारण आरोग्य म्हणजे केवळ शारिरिक, मानसिक नाही तर त्यापुढे जाऊन खूप व्यापक असल्याचे या व्याख्याना दरम्यान जाणवले. अशा या स्वतःच्या आरोग्य विषयकची माहीती मी वाट पाहत आहे. लवकरच ही माहीती समिरदादांच्या ब्लॉगवर यावी व डॉ. पौरससिंह जोशी यांच्या टीम अंतर्गत बनणारी वेबसाईट लवकरात लवकर यावी ही सदीच्छा व त्यासाठी शुभेच्छा. तसेच उपासना केंद्रावर ह्या व्याख्यानाची सीडी लावल्यास चुकवू नका.....इतके उचित स्वार्थी तर आपण बनूच शकतो.....अबंज्ञ

http://www.healthonics.healthcare/
-  रेश्मावीरा नारखेडे

Saturday, November 15, 2014

अध्यात्म आणि विज्ञान - गाभा एक, दोन भाषा


अध्यात्म आणि विज्ञान गोष्ट सांगणार्‍या दोन भाषा असल्याचे सुप्रसिद्ध लेखक डॅन ब्राऊन यांनी भारतातील त्यांच्या भेटी दरम्यान म्हटले. Link1-The Huffington Post, Link 2-Time of India

Dan Brown
अतीशय सुंदर अशा कादंबर्‍या देणार्‍या ब्राऊन यांचे हे मत ऐकून खुप आनंद झाला. कारण विज्ञानाचे अवडंबर माजवून अध्यात्माला कमी लेखणारे जगात कमी नाही. जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरु होते. बापूआत्तापर्यंत हेच सांगत आले. किंबहुना त्यांच्या प्रवचनात अध्यात्म हे विज्ञानाच्या आधाराने आणि विज्ञान अध्यात्माच्या आधाराने समजवून सांगितले जाते. खरचं आणि त्यामुळेच बापूंचे विचार पटतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर किंवा जस्टीफीकेशन बापूंच्या प्रवचनातून मिळतेच मिळते. ब्राऊन    यांच्या निमित्ताने "अध्यात्म की विज्ञान" हा विषय बाजूला जाऊन अध्यात्म आणि विज्ञान नाण्याच्या दोन बाजू असल्याच्या बातम्या तरी झळकू लागल्या. ज्याला जे पटेल त्यावर त्याने विश्वास ठेवावा. पण सत्य हेच आहे की अध्यात्म आणि विज्ञान हे एकमेकांपासून वेगळे नाहीत.

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥ 
( अयं भगवद्गीतायाः चतुर्थोध्यायस्य ज्ञानकर्मसंन्यासयोगस्य चतुस्त्रिंशत्तमः (३४) श्लोकः)
हा श्लोक सद्गुरूंकडून ज्ञान कसं मिळवावं, हे सांगतो. ज्यांना सद्वस्तूचं ज्ञान झालं आहे, जे खरे यथार्थ सद्गुरू आहेत त्यांना प्रणिपात करून, त्यांची सेवा करून, त्यांना अत्यंत विनयानं प्रश्न विचारला की हे अर्जुना ते तुला यथार्थ ज्ञान देतील, असं भगवंतांनी या श्लोकाद्वारे सांगितलं आहे.

याच प्रमाणे सदगुरु अनिरुद्ध बापू सुद्धा आपल्या प्रवचनातून यथार्थ ज्ञान देत असतात. त्यांच्या श्रद्धावान मित्रांना पडलेल्या प्रश्नांचे समाधान उचित वेळेस करीत असतात. सध्या बापू विविध अल्गोरिदम समजवून सांगत आहेत. संख्याशास्त्रातील अध्यात्माचा त्यांनी परिचय करून दिला. अध्यात्म आणि विज्ञान हे एकरुप आहेत हे त्यांनी डॉ. निकोला टेसलाच्या जीवनगाथेवरुन पटवून दिले आहे. अध्यात्म आणि विज्ञान याचा एकत्रित विचार करताना एक गोष्ट माझ्याही लक्षात आली. ती मांडण्याचा प्रयास करीत आहे. 

बापूंनी प्रवचनातून स्वार्म इंटेलिजन्सची करून दिली. माझा काही फारसा अभ्यास या विषयावर झाला नाही. पण एकंदरीत स्वार्म बद्द्ल जे थोडे फार कळले ते असे की सामुहिक बुद्धीमत्ता आणि त्यातून तयार होणारी अभेद्य शक्ती. बापूंनी प्रवचनात ही स्वार्म टेक्नॉलॉजी स्पष्ट करण्यासाठी एक मुंग्यांचा व्हीडीओ दाखविला. ज्यात सर्व मुंग्या एकत्रित येऊन एकाच पद्धतीचे वर्तन करून भल्या मोठ्या लाटेचा देखील सामना करतात आणि सुखरुप नदी पार करतात. मुंगीसारख्या प्राण्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेबाबत संशोधन झाले आहे आणि होत आहे व या संशोधनात थक्क करणारी माहिती मिळत आहे. सामूहिक बुद्धिमत्तेने अशक्य वाटणारी कार्ये लीलया करता येतात, हा मुद्दा मुंग्याच्या सामूहिक(swarm intelligence) बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. मुंग्यांची वसाहत, त्यामागील त्यांची कल्पकता, त्यांचे अन्न गोळा करणे, शेती आणि पशुपालन करणे याबाबतच्या संशोधनाबद्द्ल सांगून परम पुज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात सामूहिक बुद्धिमत्तेबाबत सविस्तर माहिती दिली, ती आपण या व्हिडियोत पाहू शकतात.


परंतु या ठीकाणी मला मांडायचा मुद्दा असा की या स्वार्म टेक्नॉलॉजीचा आणि अध्यात्माचा निकटचा संबंध आहे. किंबहुना अध्यात्माच्या पिपलिका या मार्गाचे वैज्ञानिक स्वरुप असल्याचे मला वाटते. अध्यात्मामध्ये मुंगीचे फार महत्त्व आहे. पिपलिका मार्ग - पिपलिका म्हणजे मुंगी. मुंगीचा मार्ग.....हा काय आहे मुंगीचा मार्ग? 

आणि आपले आद्य पिपलिका पांथस्थ म्हणजेच आद्यपिपा - सुरेशचंद्र दत्तोपाध्ये. सुचितदादा व समिरदादांचे वडील.  ते म्हणतात,

पिपा म्हणे अनिरुद्धाने| मजसि नेले ह्याची मार्गे|
तुम्ही धावारे सत्त्वर| बापू उभाची तत्त्पर॥

याचे स्पष्टीकरण देताना सुहाससिंह डोंगरे म्हणतात -

आद्यपिपा काय म्हणतात ? मी ह्या मार्गाने गेलो नाही, तर अनिरुद्धाने मला ह्या मार्गाने नेले. पूर्ण शरणागती....कुठेही जराही अहंपणा नाही. अनिरुद्धांचा मार्ग म्हणजे देवयान पंथ, पिपीलिका पंथ म्हणजेच पुरुषार्थ पंथ. पिपीलिका म्हणजे मुंगी. मुंगी जशी सदैव पुरुषार्थ करत असते व ती सदैव सामूहिक प्रयासांसह क्रियाशील असते, त्याप्रमाणे श्रीमद्पुरुषार्थाचा श्रद्धावान सर्व श्रद्धावानांसह एक श्रद्धावंत समाज म्हणून सदैव पुरुषार्थशील असतो. अशा पुरुषार्थी सैनिकांचा पंथ म्हणजेच ‘भक्तिसेतू’ व हा भक्तिसेतू रामाच्या आज्ञेने, हनुमंताच्या मार्गदर्शनाने बांधणारे श्रद्धावान पिपीलिकामार्गाचे प्रवासी आहेत. ह्या सर्व अनिरुद्धभक्तांमध्ये ‘आद्य पिपीलिकापांथस्थ’ म्हणून अग्रणी असणारे असे हे आद्यपिपादादा !

मुंगी हा खरा पुरुषार्थ करीत असते. ही मुंगीच आपल्याला भक्ती, एकनिष्ठता आणि कठॊर श्रद्धा शिकविते. अपार कष्ट सोसूनही ती कधीही आपला मार्ग बदलत नाही. या मुंगीच्या भूमिकेत जाऊन महाधर्मवर्मन योगिंद्रसिंह जोशी म्हणतात,

हेचि मागत आलो, हेचि पुढे मागू 
पिपा संत संगू नामपाठ । 
योग्या मुंगी जैसी जन्मोजन्मी खोडी 
गुळ ना तो सोडी, तुटो मुंडी ॥ २ ॥ 

हा गुळ कुठला...तर या देवयान पंथावर राहण्याची सदिच्छा हाच तो गुळ..त्या परमात्म्याचे चरण हाच गुळ मग त्या गुळासाठी मुंडी मोडली तरी बेहत्तर.

हीच मुंगी काय करू शकते हे मुक्ताबाई सांगते. 
संत मुक्ताबाई म्हणते,

मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सुर्यासी||

मुंगी एवढे लहान असलो तरी मुंगीमध्ये सुर्याला गिळंकृत करण्याची ताकद तिच्यात असते म्हणजेच अशक्य ते शक्य करण्याची ताकद तिच्यात असतेच असते. मात्र त्यासाठी मुंगी बनणे गरजेचे आहे. मुंगी सारखे खडतर परिश्रम आवश्यक आहे. भक्तीमार्गात मुंगीचे महत्त्व अनन्य आहे.

स्वार्म इंटेलिजन्स म्हणजे सामुहिक बुद्धीमत्ता ही गोष्ट दुर्जनांवरील सजन्नांच्या विजयाचा "विजयमंत्र"च आहे, असे मला वाटते. "रावण वधः निश्चितः" हा आत्मविश्वास देणारी मुंगीच वानरसैनिक आहे असे मला वाटते.

- रेश्मावीरा नारखेडे....



भावस्वरूप बापूराया


यावर्षी देखील अधिवेशनला जायची संधी मिळाली. समिरदादा बापूंचे करीत असलेले गुणसंकिर्तन ऐकायचे यासारखी सुवर्ण संधी प्राप्त झाली.  बापू प्रत्यक्ष उपस्थित नव्हते पण...अधिवेशनाचा विषय होता फक्त बापू...आणि मग त्याचे अस्तित्व सर्वत्र जाणावयाला लागले. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच दादा म्हणाले की या बापूंचे प्रेम अक्षरशः अंगावर येते....आणि ते कसे ते दोन दिवस अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर जाणविले. दादांनी म्हटलेली वरील गोष्ट अगदी प्रत्येकाने अनुभवली असेल. इतुके अनंत प्रेम फक्त त्याचे.....

बापूंचे मानवत्व जाणून घेता घेता आपण त्याच्या दिव्यत्वापर्यंत कधी जाऊन पोहचतो हे कळतच नाही हे अगदी उदाहरणासहित दादांनी विषद केले. हा बापू असा आहे, हा बापू तसा आहे....हे जाणून घेताना आधी तो "माझा आहे" हे मान्य केले की मग आपण सहज त्याच्याशी जोडले जातो. मग तो माझा मित्र आहे की डॉक्टर आहे की सद्‍गुरु आहे की देव आहे....कुठल्याही नात्यात त्यास ठेवा. तो ना म्हणत नाही. त्याला फक्त आपलं मानलं पाहिजे. हे जाणवले. 

बापूंचे विविध पैलू जाणून घेताना भारावून गेल्यासारखे होते. केवळ एक व्यक्तीमत्व म्हणून देखील बापूंना जाणून घेण्याचा प्रयास केला तरी आपण त्यांच्या प्रेमात पडतो आणि नकळत आपल्या आयुष्यातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण बापूंना स्थान देऊन मोकळे होतो. बापू आयुष्यात येण्याआधी विविध सेलिब्रेटी माझे आयडॉल असायचे. अगदी प्रत्येक क्षेत्रातील. पण आता प्रत्येक क्षेत्रात महारथ मिळविणारे एकमेव बापूच माझ्या जीवनाचे आयडॉल झाले आहेत. 

या अधिवेशात दादा बापूंबद्द्ल बोलत असताना अक्षरशः अंगावर काटा येत होता. दरवर्षी अधिवेशनात बापू स्टेजवर दिसायचे यावेळी मात्र प्रथमच हृदयात दिसला. हो बापू माझ्या हृदयात दिसला. माझे अंतःकरण बापू प्रेमाने तुडूंब भरल्याचे मला जाणवले. कुठल्याही देवत्वाची किंवा दिव्यत्वाची अनुभूती नाही आली. परंतु बापूंच्या मानवत्वाची, मानवतेची, माणुसकीची आणि मुख्य म्हणजे "माझ्या मनातील माझ्या बापूंची अनुभती आली." तो दुसरीकडे कुठेही नसून माझ्या मनात, माझ्या आयुष्यात आहे याची अनुभूती आली. तो काय म्हणून माझ्या आयुष्यात आहे? हा प्रश्न मला अनेक जण विचारायचे. आज त्याचे उत्तर सापडले. तो केवळ देव म्हणून नाही, सदगुरु म्हणूनही नाही...प्रामुख्याने तो "भाव" म्हणून माझ्या आयुष्यात आहे. हीच मोठी आणि सत्य जाणीव या अधिवेशनात झाली.

खरचं हा बापू, हा अनिरुद्ध म्हणजे "भाव" आहे. प्रत्येक श्रद्धावानाच्या, प्रत्येक सज्जनाच्या मनातील पवित्र भाव म्हणजे माझा हा मूर्तीमंत बापूराया...आणि त्याची आल्हादिनी शक्ती "भावना" स्वरुपात प्रकट होते. हीच ती सरस्वती...हीच ती भक्तीरुपीणी...मनात भाव असल्याशिवाय भावना प्रकट होऊ शकत नाही...आणि या भावापासून भावनेचे प्रकटीकरण होण्यासाठी प्रेरणा देते ती त्याचीच प्रेमशक्ती. 

ह्याच प्रेमशक्तीचा अनुभव घेतला यंदाच्या अधिवेशनात.....

Wednesday, July 30, 2014

मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए


१७ जुलैच्या गुरुवारची गोष्ट....मी ऑफिससाठी निघाले. जरा मूड डाऊन होता पण का ते कळत नव्हते. म्हणून जरा रिफ्रेश होण्यासाठी गाणी ऐकण्याचे ठरविले. गाणी ऐकता ऐकता अचानक मला भरुन आले. डोळे डबडबले आणि काय होतेय हेच कळेनासे झाले. खार स्टेशन आले म्हणून दारात उभे राहिले तर आणखीनच रडू सुटले. डोळ्यातील काजळ ओघळून एव्हाना गालावर आले होते. आजूबाजूचे लोक माझ्याकडे पाहत आश्चर्य व्यक्त करीत होते. ये लडकी क्यो रो रही है? असा प्रश्न त्यांच्या डोळ्यात होता. माझ्या रडण्यामागच कारण काय असावे याचा तर्क ही लोक १०८ टक्के लावत असणार. पण मला कशाचीच फिकीर नव्हती आणि भान ही नव्हते. आपल्या रोजच्या वाटेने पावल चालत होती मात्र सार लक्ष आणि प्राण एकवटला होता तो कानात सुरु असलेल्या गाण्यामध्ये....



अत्यंत तीव्रतेने कुणाची तरी आठवण हे गाणे करुन देत होत. ही आठवण इतकी तीव्र होती की अश्रुंना देखील आवर घालणे मला शक्य नव्हते. कोणते होते हे गाणे आणि कुणाची आठवण करुन देत होते....

मन मस्त मगन, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए.....या त्या गाण्याच्या ओळी ज्या मला माझ्या बापूरायाची आठवण करुन देत होते. आणि खरच तीव्र आठवण. अशी आठवण यापूर्वी कधीही आली नव्हती.....

बापू श्री हरिगुरुग्रामला येत नाही. तपश्चर्येला बसले आहेत. बापू दिसत नाही....अस सगळ आहे. मग काय झाले? आपल्या भल्यासाठीच करत आहेत ना ते! त्यांची तपश्चर्या संपली की भेटतील, दिसतील. अशी मनाची समजूत घालून मी होते. मला बापू दिसले नाही तरी ते माझ्याबरोबर आहेतच हा विश्वासही आहेच. तसेच महिनो महिने बापूंना मी पाहीले नसल्याने "अब तो आदत सी हो गयी है" या आविर्भावातच माझ जगण चाललेल.

पण त्या दिवशी हे गाण ऐकताना जाणवले की ही समजूत म्हणजे माझ्या बापूसाठी माझ्या उफाळून येणार्‍या भावनांना मी जबरदस्तीने घातलेले वेसण आहे. नाही! नाहीच राहू शकत मी बापूंना पाहिल्याशिवाय! हेच सत्य आहे. नाहीच राहू शकत बापूंचे नाव घेतल्याशिवाय! मग ते मंत्र स्वरुप असो किंवा कसेही.

मला बापूंचे दर्शन नाही झाले तरी मी फोटो पाहून राहू शकते हा बुरखाच फाटला त्या दिवशी. मलाही पाहचेय बापूंना अगदी डोळेभरुन. अगदी हृदयभरुन पाहयचेय. अगदी त्यासाठी मी मग कोणतीही रांग ही मोडायला तयार होते आणि कुठेही वर चढायला तयार होते. अगदी कोणतीही धडपड करायला तयार होते. अगदी जे धाडस कधी केले नव्हते तेही करायला मी तयार होते. बस्स!! मला फक्त बापूंना पाहचेय....

मात्र पुन्हा स्वतःच्या भावनेला आणि आवेगाला संयमाने वेसण घातले आणि निमुटपणे ऑफीसला गेले...
कारण अवस्थाच अशी होती

इश्क की धून रोज जलाए
उठता धुऑं तो कैसे छुपाए

अनिरुद्धाच्या प्रेमाची धून मला स्वस्थ बसू देतच नव्हती. जरा स्वस्थ बसावे म्हटले की "अनिरुद्ध धून" जागृत करायचे.....आणि त्यामुळे या आठवणींची तीव्रता अधिकच वाढली....या तीव्रतेमुळे वाहणारे अश्रु कसे थांबवणार होते मी? माझ्या हातातच नव्हत मुळी आणि मग काय
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

आखिया करे जी हजुरी
मांगे है तेरी मंजुरी

बापू राया हे डोळे तुझेच ऐकतात. तुझी इच्छा असल्याशिवाय हे वाहतही नाही आणि थांबतही नाही. तुझ्याकडे डोळे वर करुन बघण्यासाठी देखील तुझी इच्छा लागते. आज हे डोळे वाहत आहेत कारण ती बहुतेक तुझीच इच्छा आहे. तुझ्या आठवणीत त्यांना पाझर फुटण्यासाठी देखील तुझी परवानगी नव्हती. पण बापूराया त्यांना वहायचे आहे. थेट थेट तुझ्या चरणांपाशी. तुझ्यावर अभिषेक करायचाय या डोळ्यातील जलाने. दुसरे तरी काय आहे माझ्याकडे. माझ्या मनातील भाव हा डोळ्यातून जल म्हणून वाहतोय. म्हणून मी रडतेय रडतेय...तुझ्या आठवणीत. तुझी आठवण....आठवणींची साठवण.....काय आहे त्या साठवणीत?

कजरासी आहें दिन रंग जाए
तेरी कस्तुरी रैन जगाए

तुझा हुंकार, तुझी गर्जना, तुझा शब्द....ही तुझी आह...म्हणजेच तुझी साद...माझ्या कानात गुंजतेय...दर गुरुवारी तुझा शब्द ऐकत नाही....पण पूर्वीचे काही तू बोललेलास तेच परत परत ऐकून माझा एक एक दिवस जात आहे. आयुष्यात नवनवीन रंग भरले जात आहेत. तुझ्या प्रवचनाचा एक एक व्हीडीओ बघून माझा एक एक क्षण जातो. तु नसताना तुझे शब्द आठवतात. पाळतो कीती हा जरा प्रश्न आहेच. पण तरी तुझे शब्द आठवतात. तुझ्या या शब्दातून निघणारा कस्तुरी सुगंध घेऊन माझी रात्र होते. खरचं ही कस्तुरी आहे. अगदी महागडी. अगदी दुर्मिळ अशी कस्तुरी.....तुझ्या प्रवचनांची ही कस्तुरी माझ्या आयुष्यातील प्रत्येक रात्र जागवते. मी जरी झोपले असेन तरी माझे भविष्य जागवते....उजळवते....सांभाळते.......

म्हणूनच बापूराया....
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए
चाहे भी तो भुल ना पाए
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

जोगिया जोग लगाके
मखरा रोग लगाके

बापू तू तपश्चर्येला बसलास खरा. माझ्यासाठी. मी जस मन्मथला पाळणा घरात सोडून कामाला निघून जाते. अगदी तसच तू आम्हाला सोडून गेलास. मन्मथने कितीही भेकाड पसरले तरीही कर्तव्य पार पाडण्यासाठी छातीवर दगड ठेवून तीथून निघावे लागते. मन्मथ रडून रडून लालेलाल होतो. पण मला काही दया माया दाखवता येत नाही. पण खर सांगू का आज मी मन्मथच्या जागी स्वतःला पाहत आहे. माझी आई अशी मला सोडून कठोर होऊन लांब गेली आहे. आणि म्हणुनच आज मी देखिल भेकाड पसरले आहे.
पण खर सांगू का बापू एक गोष्ट देखील माहित आहे. जस ऑफीसमध्ये ही सतत बाळाचा विचार माझ्या डोक्यात असतो तसाच तुझ्याही डोक्यात सतत असणारच. हा विचार बाजूला सारुन मी जस काम पुढे करत राहते तस तू ही करत असणार. आणि संध्याकाळी सकाळ पेक्षा दुप्पट वेगाने मी पाळणाघराकडे धूम ठोकते....फक्त माझ्या लेकराला भेटायला....त्याला आपल्या घरी न्यायला....तसच अगदी तसच तूही श्री हरिगुरुग्रामला तुझ्या लेकरांना भेटायला तळमळत असशील याची खात्री आहे. आणि तू येशील.....लवकरच याची खात्री आहे. कारण तुझ्या बाबतीत ही हेच सत्य आहे.....
इश्क की धून रोज जलाए
उठता धुऑं तो कैसे छुपाए
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

बापू गुरु पौर्णिमेला तू आला नाहीस. पण इथे एक वेगळेच चित्र होते. दूरदूरहून तुझे दिवाने तुला भेटायला आले होते. त्यांना पाहून मला एकच वाटले......
ओढ की थारी प्रीत की चादर
आया तेरे शहर में रांझा तेरा

आणि कोण म्हणते की तू तिथे नव्हतास....साफ खोट......अगदी प्रत्येकाचा विश्वास होता की माझा बापू येथे आहेच... अगदी ह्यावर शिक्कामोर्तब व्हावे असे सगळे तुला भेटत होते....तुझे दर्शन घेत होते....
दुनिया जमाना झूठा फसाना
जीने मरने का वादा साचा मेरा
या श्रद्धावानांची कमिटमेंट पाहून खरच पटल....की सार जग हे भ्रम आहे....तुझ्या आणि माझ्यात जे बोलणे होते....ज्या आणा भाका होतात त्याच खर्‍या....
म्हणूनच बापूराया.....
शिश महल ना मुझको सुहाए
तुझ संग सुखी रोटी भाए

खरच बापू तू नसलेला शिश महल नको.....तु नाहीस तेथे काहीच नाही....ज्या सुखासाठी तू लांब जातोस बापू अस सुख ही नको...आमच्या ज्या भल्यासाठी तू लांब जातो अस भल ही नको....
असच दुखाःत ही मी खितपत पडत राहिन पण तू लांब जाऊ नकोस....नाही म्हणजे नाही....
मी उपाशी राहीन, शिळ पाक खाईन
पण दृष्टी आड जाऊ नकोस
दृष्टी गेली तरी चालेल पण तुझी जाणिव नको जाऊ देऊस....
तुला राग येईल, तु भले चिडशील पण तरीही बापू मला तुला घट्ट धरुन राहयचे.....
अगदी मन्मथ करतो तसच कवटाळून राहचेय...
कडेवर उचलून घे...
तू दूर गेल्याची भावना किंवा सिच्युएशन देखिल आता मी हॅंडलही करु शकत नाही....
विचार तर लांबच राहिला....
एक मात्र नक्की...
आई लांब गेल्यावर ढाय मोकलून रडणार्‍या माझ्याच मुलामध्ये आता मीच दिसत आहे....
कारण;
इश्क की धून रोज जलाए
उठता धुऑं तो कैसे छुपाए
----------------------------------------------------------
हे गाणे ऐकताना अशा सगळ्या भावना, विचार उफाळून आले.
आणि दुसर्‍या दिवशी बापू सूचितदादांसह हॅपी होमला भेटले.
आणि अतिशय सुंदर हसले......डोळे मिचकावले.....आणि जे बोलायचे ते डोळ्यांनी बोलले.....
कित्येक दिवस तडफडत असलेल्या बाळाला शांत केले....
तेव्हा मनात एकच पंचाक्षरी मंत्र प्रगटला
......I love you my dad.......
......I love you my dad.......
......I love you my dad.......

- रेश्मा नारखेडे......


Tuesday, January 7, 2014

Paduka Pradan Sohala


बहुत दिनों के बाद मेरा इतवार सद्‍गुरु सेवा में व्यतित हुआ। ५ जनवरी २०१४ को अपने श्री हरिगुरुग्राम में सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूजींकी पादुकाओं का वितरण नए उपासना केंद्रो को हुआ। इन नए केंद्रो को अपने संस्था के वेबसाईटस‌ के बारे में जानकारी देने की सेवा मुझे थी। लेकीन उसके बाद मुझे फोटोग्राफी करने का अवसर मिला। शायद यही सेवा मेरे लिए उस दिन उचित थी। क्योंकी कॅमेरा की नजरसे मैंने इस महा उत्सव को इक नयी तरह से अनुभव किया। इन भक्तो के प्यार का सैलाब देखते देखते मैं खुद इसमें कब बेह गयी मुझे पता भी नही चला। महाराष्ट्र के छोटे छोटे गांव से भक्त अपने सद्‍गुरु की पादुकाएं लेने के लिए मुंबई में आए थे। क्या खुशी थी उनकी चेहरे पे! आहा हा! क्या प्यार था उनकी निगाहो में। 

इस कार्यक्रम की शुरुवात ९ बजे बापूजी के चिन्मय पादुकाओ की पूजनसे हुई। सबसे पहिले संघ में ४१ केंद्र के प्रमुख सेवक पूजन को बैठे थे। वे जिस तरह से पादुकाओं का पूजन कर रहे थे; उसे देखते देखते मेरी भी ऑंखो में पानी आ गया। धीरे धीरे जप के साथ पूजक पादुकाओं पे कुमकुम, हल्दी और अबीर अर्पण कर रहे थे। जैसे हर एक के बापू अलग है, वैसेही हर एक केंद्र को दी गई पादुकाए अलग दिख रही है। सांघिक पादुका पूजन की इससे पहले मैंने अनुभूती नही ली थी; लेकीन आज यह सांघिक पूजन देखकर बहुत अच्छा लगा।
पूजन के बाद पूजनीय समिरदादां के हस्ते संत्संग के वातावरण मे पादुकाओंका वितरण किया गया। हर एक ने अपनी तरह से पादुकाओ बडे प्यार से सद‍गुरु नाम के गजरमे सर पे उठा अपने गांव ले निकले। पादुका लेने के लिए बडे बुढे, बच्चे सारे आए थे। 

कितने जन तो ऐसे थे की जिन्होने बापूजी पहले कभी प्रत्यक्ष देखा नही था। लेकीन उनका उत्साह हमसे कई गुना जादा था। 

बारी बारी हर एक जन पादुकाओ को सर पे उठा के नाच रहे थे। यह सारा महोत्सव मैंने मुख्य स्टेजके ऊपरसे देखा। एक क्षण तो मैं स्तब्ध हो गई। एक बाजू गजर चालू था "मन रमले रे" और दुसरी और सारे श्रद्धावान बेहोश होके नाच रहे थे। इस दृश्य का वर्णन करना मेरे बस की बात नही है। मैं तो सिर्फ इस दृश्य का अनुभव ले रही थी। ऐसे लगा की आषाढ-कार्तिकी में होनेवाली पंढरपूर की वारी यहा मार्गशिष मेंही आगयी है। मेरी ऑंखॊसे धाराएं बहने लगी। 

"मुझे लगा के मेरी ऐसी भक्ती कही खो गई है, ऐसा भाव कही खो गया है। मैं भी कभी इन्ही भक्तो की तरह पागल थी। लेकिन आज मुझे क्या हो गया है मुझे समझ नही आ रहा। क्या करे बापू?" ऐसे मेरे मन मे विचार आने लगा। इसलिए मैंने पिछे बापूजी के तस्वीर को देखा और पलक झपकतेही स्टेज के ऊपरसे उतरकर इसी भक्त सागर की एक बुंद बनगई। 

तब तक "आय लव्ह यू माय डॅड" का गजर शुरु हुआ था। हम सब नाचने लगे। तब मैंने देखा के मेरे आजूबाजू मैं सब गांव के लोग थे जिन्हे शायद ही अंग्रेजी का ज्ञान था। शायद नही था। फिर भी वे "आय लव्ह यू माय डॅड" का गजर जोर शोर से कर रहे थे। तब मुझे एक बात समझ आयी "प्यार को कोई भाषा नही होती" और "आय लव्ह यू माय डॅड" हे सिर्फ पाच शब्द नही...ये तो वो मंत्रस्वरुप शब्द हैं जिसके उच्चारण से हम उत्साहित, उल्हासित होते है। 

मैं समिरदादा की बहुत अंबज्ञ हूं के उन्होने मुझे यह कार्यक्रम अनुभव करने का अवसर दिया। जिसके वजहसे मुझे अपने हृदय मैं बापू की पादुकाए प्रस्थापित करने का मार्ग मिला। मैं अंबज्ञ हूं।

- रेश्मा नारखेडे


Photos on Facebook - 



Friday, August 30, 2013

Sai For Me....AAI For Me


HARI OM



नुकतच Aanjaneya Publications आंजनेया प्रकाशनच्या वेबसाईटवरुन मागावलेली Happy English Stories ची पहिली सिरिज साई फॉर मी Sai For Me ची पुस्तके घरी आली. अगदी सुंदर पॅकींग असलेले पार्सल अत्यंत अधाश्याप्रमाणे फोडून त्यातून आईची भेट बाहेर काढली. झपझप आठही पुस्तकांवर नजर फिरवून साई फॉर मी चे पहिले पुस्तक वाचण्यास घेतले.


पुस्तकावरील ओळ न ओळ वाचली. अगदी पब्लीकेशन कुठले...पत्ता वगैरे.....


आणि बिगनर्स सेक्शन पासुन सुरुवात केली. सर्वप्रथम विद्यार्थी म्हणून न वाचता...कुतुहूल म्हणून वाचले...आणि मग वाचता वाचता खरच amazed झाले.

आता तुम्ही म्हणाल अस का? कारण तसेच आहे. मराठी माध्यमाची विद्यार्थीनी असल्यामुळे कायम इंग्लिश सुधारण्यासाठी धडपड करत होते. इंग्लिश बोलताना आत्मविश्वास नसल्याने कायम मागे मागे राहायचे. इंग्लिश सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली सर्वच प्रसिद्ध पुस्तके माझ्याकडे आहेत. त्यांच्या मदतीने इंग्लिश बोलता आले, लिहिता आले, वाचता ही आले, समजता देखिल आले पण आत्मविश्वास काही आला नाही. कारण या सगळ्या पुस्तकातून मी मराठीतच इंग्लिश शिकले. आणि त्यामुळे मराठीत विचार करुन मग इंग्लिश्मध्ये बोलण्याची सवय लागली आणि त्यामुळे आत्मविश्वास अधिकच खालावत गेला. 

साई फॉर मी - १ चे बिगिनर्स आणि इंटरमिजिट सेक्शन वाचतानाच एक लख्ख प्रकाश डोक्यात पडला आणि लक्षात आले की हेच मला हवे होते...आणि असच हवे होते.

प्रत्येक पुस्तकामागे मग ते कोणतेही असो त्यामागे एक संकल्पना असते. एक हेतू असतो. एक प्रवाह असतो....आणि त्या पुस्तकांचा एक प्रभाव देखील असतो. खरं तर पुस्तक म्हणजे कागद आणि त्यावरील काळी शाळी नसून एक जिवंत, अनुभवसंपन्न, मार्गदर्शक व्यक्तीमत्व असते. मात्र त्या दृष्टीने पुस्तके वाचली पाहिजेत.

साई फॉर मी म्हणजे तर माझ्या सोबत माझी आईच असल्यासारखे आहे. अर्थात नंदाईने लिहलेल्या या पुस्तकातून तीचे वात्सल्य पदोपदी जाणविते. आणि मी हे ठामपणे सांगू शकते; नव्हे सिद्ध करु शकते. आज मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे बाळाचे संगोपन भरण पोषण कसे करावे हे मला ठाऊक आहे. कोणत्या वयात बाळाला काय खायल द्यावे याचे भान मला राखावे लागते. चार महिन्यापर्यंत केवळ आईचे दूध, चौथ्या महिन्यानंतर फळांचा रस, मग हळू हळू पेज, मऊ खिचडी मग हळू हळू पूर्ण जेवण असा क्रम असतो. कारण बाळाला झेपेल पचेल तेवढच द्यायचे. हेच तत्त्व नंदाईने या पुस्तके लिहताना वापरले आहे असे मला वाटते. 

बघा ना एकाच अर्थाचे तीन वेगवेगळे शब्द बिगिनर्स, इंटरिमिडीएट आणि अडवान्स लेव्हलवर वापरले आहेत. उदा. मिशन, असायमेंट, टास्क...तीन वेगळ्या लेव्हलवर आईने शब्द introduce केले आहेत. गम्मत पुढे अशी आहे की एकच गोष्ट सांगण्यासाठी आईने हे तीन शब्द एका समान वाक्यात वापरले आहेत. अस प्रत्येक ठीकाणी आहे.
Beginners : to begin the mission of writing stories.
Intermediate : to begin the assignment of writing stories
Advance : to begin the task of writing stories.

बाळाला त्याच्या पचनशक्तीनुसार जसे अन्न दिले जाते त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आकलनशक्तीनुसार इथे शिकविले गेले आहे. त्यामुळे मला एकच वाक्य तीन वेगळ्या शब्दांचा वापर करुन कसे लिहता येते हे कळते. 

तसेच शेवटी आईने हेच तीन शब्द तीन वेगवेगळ्या वाक्यात वापरुन दाखविले आहेत; जिथे हे शब्द APT कसे वापरायचे हे कळते.
B : Neil Armstrong was the first person who accomplished the mission of landing on the moon.
I : Advance nations outsource assignments to developing countries.
A : Tending to a special child is a huge task for the parents.

अगदी प्रत्येकाला उपयोगी पडेल अशी ही पुस्तके आहेत. याआधी आईकडून इंग्लिशचे धडे आत्मबलमधून गिरिवले आहे. आज पुन्हा या क्लासला गेल्यासारखे वाटते. या पुस्तकांना अनेकविध पैलू आहेत. 

त्यातील महत्त्वाचा पैलू म्हणजे साईकथांच्या माध्यमातून इंग्लिश शिकणे. आज अधिक सोप्या भाषेतून मग ती इंग्लिश का असेना साईसच्चरित्र वाचल्याची अनुभूती आली. फेरिटेल्समध्ये हरविणार्‍या लहान मुलांना साई कथांच्या माध्यमातून संस्कार करणे अधिक सोपे आहे. पण या कथा सोप्या करुन कशा सांगाव्यात हा प्रश्न पडला होता. हा प्रश्न देखील या पुस्तकांमुळे सुटला आहे. तसेच जणू साईसच्चरित्र चित्र रुपातही समोर आले आहे त्यामुळे अगदी लहान मुले ही या चित्रांतुन कथा समजू शकतील. 

एकाच संकल्पनेतून अनेक हेतू या पुस्तकाच्या माध्यमातून साध्य होतात. आईने व बापूंनी ही पुस्तके आपल्या हातात तर दिली आहेत आता कितीक व्यापक आणि विविधांगी उपयोग आपण करुन घेतो हे आपल्यावर आहे.

मी तर बाबा जाम खुश आहे..."वात्सल्याची शुद्ध मुर्ती आई काळजी वाही"    याची पुरेपुर अनुभूती मला आलेली आहे. कारण मला प्रश्न पडलाच होता...की माझ्या बाळाला मी पुढे कोणत्या गोष्टी कश्या सांगणार आहे? जे संस्कार मला त्याच्यावर करायचे आहेत ते मी कसे करणार...

पण हा प्रश्न त्याच्या "MOM" नेच सोडविला. 

आता त्याची आज्जीच ("MOM") रोज रात्री गोष्ट सांगायला येणार हे नक्की.

(सोबत माझे ही इंग्लिशची उजळणी आई घेणार)

Happy English Stories चा साई फॉर मी सारखा प्रवाह अखंड माझ्या आयुष्यात रहावा व ह्या अशा पुस्तकांची घरोघरी लायब्ररी व्हावी व पिढ्यान पिढ्या इंग्रजी शिकण्यासाठी यांचा वापर व्हावा ही मोठ्या आईच्या चरणी सदिच्छा....मी अंबज्ञ आहे....

- Reshmaveera Narkhede


Monday, May 13, 2013

कमळ पाहिले मी राया..कमळ पाहिले मी...


किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात....
कमळ पाहिले मी राया..कमळ पाहिले मी...

गुरुवारी हा अभंग ऐकला आणि मन अजूनही ह्या अभंगाच्याच अवती-भोवती घुटमळतेय. ह्या अभंगाचि जादू अशीच आहे. मात्र, ह्या अभंगाचा इफेक्ट इतके दिवस टिकून राहण्यास कारणीभूत ठरलेली अजून एक व्यक्ती...जॉर्ज वॉशिंटन कार्व्हर..
यास योगायोग म्हणा किंवा आणखी काहीही...परंतु ह्या अभंगाचा भावार्थ, अर्थ, मतितार्थ मला कळावा म्हणूनच की काय गुरुवारीच बापूंनी माझ्याकडून "एक होता कर्व्हर" हे पुस्तक वाचून पूर्ण करुन घेतले. मंगळवारी रात्री पुस्तक हातात मिळाल्यानंतर दोन दिवसात झपाटल्यासारखं वाचून काढले. तसे हे पुस्तक मी दुसर्‍यांदा वाचत होते पाच सहा वर्षांपूर्वी जेव्हा मी हे पुस्तक वाचले होते...तेव्हाची अधीरता आणि उत्साह आजही वाचताना होता. त्यावेळी ह्या पुस्तकाने अर्थात कार्व्हर यांच्या चरित्राने जसे अंतर्मूख केले होते तसेच आजही केले...फक्त यावेळी साथ मिळाली ती आद्यपिपादादांच्या "कमळ पाहिले मी रे राया" या अभंगाची. 
डॉ. कार्व्हर यांच्या चरित्राने मला कमळ पाहिले राया हा अभंग समजण्याची बुद्धी मिळाली...तर अभंग काय सांगतो हे अनुभवण्यची सुसंधी कार्व्हर यांच्या चरित्रातून मिळाली. अंबज्ञ.
खरचं, 
कमळ पाहिले मी राया....कमळ पाहिले मी...॥धृ॥

काय त्याची सुंदरता....काय त्याचा थाट...
चिखलामधूनी वर येऊनी...झळके दिमाखात राया...झळके दिमाखात ॥१॥

गुलामगिरीच्या चिखलातूनवर आलेल्या कार्व्हर यांच्या जीवन कमळाने सार्‍या जगाला उजळून टाकले. अठराविश्व दारिद्र्य, गुलामगिरीचे ओझे, आईपासून कायमचा विरह, कृष कुपोषित शरिर असलेला ज्याचे नाव ही स्वतःचे नाही...कुळ नाही...पूर्वजांचा पत्ता नाही असे हे "मेरीचे पोर" परमेश्वरावरील असीम निष्ठेने व स्वकष्टाने चिखलातून वर आले आणि दिमाखात झळकले. 

मोझेस कार्व्हर या जर्मन शेतकर्‍याने मेरीला गुलाम म्हणून विकत घेतले. पुढे गुलाम पळविणार्‍या टोळीने मेरीला पळवून नेले व तिचे दोन महिन्याचे पोर पोरके झाले. मात्र कार्व्हर व त्याची पत्नी सूझन ह्यांनी या मरणोन्मुख पोराचा नीट सांभाळ करुन वाढविला. त्यांनीच त्याची विनम्र आणि प्रामाणिक वृत्ती पाहून जॉर्ज असे नामकरण केले. कार्व्हर कुटुंबियांचेच नाव त्याने लावले. 

निसर्गाच्या सानिध्यात रमणे, झाडा-फुलांबरोबर खेळणे, बागकाम करणे हेच काय ते जॉर्ज करीत असे. हा छोटा जॉर्ज म्हणजे छोटा माळी झाला होता. अंगाने कृश, दुबळा, नाजूक होता. मात्र त्याच्या हातात विलक्षण कसब होते. चुली लिंपणं, लोकर पिंजणे, कातडी कमावणं, मेणबत्या बनविणे, मसाले तयार करणे, पाव-बिस्कीट तयार करणे, विणकाम करणे, चित्रकला, असं सगळ सगळ तो लहानपणीच करायला शिकला होता.

त्याला खूप शिकायचे होते आणि आपल्या बांधवातून या गुलामगिरिच्या चिखलातून बाहेर काढायचे होते. हे एकच ध्येय त्याचे होते आणि म्हणूनच चित्रकार किंवा म्युझिशियन न होता तो एक कृषिशास्त्रज्ञ झाला. 
दहा वर्षाचा असताना त्याने शिक्षणासाठी कार्व्हर यांच्या घरच्या सुरक्षित वातावरणातून अज्ञात असुरक्षित अशा जगात पाऊल टाकले. काबाडकष्टकरुन शिक्षणासाठी पैसा गोळा केला. कित्येक दिवस उपासमारिला सामोरे गेला. शिक्षणाचा खर्च वाढला की काबाडकष्ट ही वाढले. या दरम्यान लावणी, पेरणी, लॉंड्री अशी बरीच कामे तो शिकला. त्याने कोणाकडूनही कधीच काहीही फुकट घेतले नाही. जो त्याला मदत करी त्याच्या घरी जाऊन तो त्याचे घरकाम, बागकाम करीत असे. पुढे तो तोतरा बोलणारा मुलगा उत्तमरित्या गाणे ही गाऊ लागला. 
अशी उत्तरोत्तर प्रगती करीत त्याने अवघ्या जगावर आपली प्रभा पसरली. काय नाही केले ह्या कार्व्हरने...अगदी सगळ काही...एका तपस्वी सारखे आपले आयुष्य मानवजातीच्या कल्याणासाठी व्यतित केले.
आपण केलेल्या प्रयोगांवर संशोधनावर कधीच पेटंट घेतले नाही. मुक्त मनाने आणि मुक्त हस्ताने ज्ञानदान केले.  पुढे जसे झाडांवर उपचार करणारा डॉक्टर, हा जनावरांचा आणि माणसांचाही डॉक्टर झाला. तेही कोणतेही विधीवत प्रशिक्षण न घेता. त्यांना लोकांनी डॉक्टर ही पदवी दिली. त्यानंतर कित्येक वर्षांनी त्यांना डॉक्टरेट मिळाली होती. 

मधमाशी नेई मध...कधी नारीच्या केसात..
कधी सुकूनी उन्हात...कमळ झाकळत राया....कमळ झाकळत ॥२॥

खरंच कमळाचा वापर ज्या मुक्तपणे होतो तशाच मुक्तपणे विविध मार्गांनी कार्व्हर यांचा उपयोग समस्त काळ्या गोर्‍या समाजाला झाला. कधी कुणी त्यांच्याकडे मोठ मोठ्या संशोधनासाठी ऑफर घेऊन येई तर कधी एखादा सामान्य शेतकरी आपल्या शेतातील साधीशी अडचण घेऊन येई. दोन्ही परिस्थीतीत कार्व्हर तितक्यात तन्मयतेने उपयोगी राहिले. याबदल्यात त्यांनी घेतले काय? तर काहीच नाही....साध्या दुवा किंवा आर्शीवादाची देखील अपेक्षा नाही...देवाचे कार्य म्हणून करीत गेले...कमळ म्हणून वर आले आणि कमळ बनूनी राहिले...
कित्येकदा कष्टाच्या उन्हात सुकून झाकळले...कधीच स्वतःचा विचार केला नाही...त्यांनी केलेल्या कष्टाचा आणि सहन केलेल्या हालआपेष्टांचा आपण विचार ही करु शकत नाही. त्यांच्या वाटेला  "काळा" म्हणून शेवटपर्यंत येत राहीलेली हिनतापूर्वक वागणूक पाहून या अभंगाच्या पुढील चरण आठवते...

इतुके कष्ट केले त्याने, पंकातून दूर गेला
मग व्यर्थ का रे सारे, जीव दुर्दैवात राया...जीव दुर्दैवात...॥३॥

मला असे वाटते हा प्रश्न आद्यपिपा बापूंना विचारत आहे. किंवा आपल्या मनात सहज प्रश्न उमटतो की इतके कष्ट केले तरी शेवटी काय मिळाले, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी झटलो पण शेवटी मी दुर्दैवातच असा प्रश्न पडतो. आणि इथेच परमेश्वरावरील विश्वासाला हादरे बसू लागतात. आपल्यासाठी आद्यपिपादादा बापूंना हा प्रश्न विचारत आहे...आणि या प्रश्नाचे खरे समाधान पुढील चरणात बापू करीत आहे असे दिसते...
कार्व्हरच्या बाबतित तेच झाले...वरकरणी पाहता त्यांचे आयुष्य इतरांना दुर्दैवी वाटले, त्यांची दया आली..कुणी त्यांची कीव केली... पण या सार्‍याकडे त्यांनी दुर्लक्ष केले...जणू काही त्यांना माहित होते...
पिप्या ऐक माशी तृप्त, सौंदर्याचा गुण सत्व
किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात...काहीही ना व्यर्थ जा...॥४॥

त्यांच्या कार्यामुळे त्यांनी अनेकांना तृप्त केले होते...समाधान दिले होते..स्वतःतर कमळ बनले पण अनेकांना देखील कमळ बनण्याची प्रेरणा दिली...
त्यांच्यासाठी परमेश्वराचे बाहू किरण होऊन पसरले...सार्‍या जगावर... 
त्यांचा हातगुण, त्यांचे कार्य किरणांप्रमाणे परमेश्वरांच्या बाहूंनी जगभर पसरविले...
कारण लहानपणापासून त्यांचा एका गोष्टीवर ठाम विश्वास होता....
काहीही ना व्यर्थ जात.....
त्यांनी घेतलेल्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत काहीही व्यर्थ गेले नाही. अगदी भौतिक गोष्टीत त्यांच्याकडे टाकाऊ असे काहीच नव्हते. टाकाऊ पासून त्यांनी अनेक टीकाऊ गोष्टी बनविल्या....आपले आयुष्य ही आणि इतरांचे ही...
आद्यपिपादादांच्या या अभंगाचे रसरशीत उदाहरण माझ्यासमोर आले...ही बापूरायांची असीम कृपा...
आणि मी सहज म्हणते...सगळं व्यर्थ आहे...
या अभंगाद्वारे आद्यपिपांनी खरच डोळे उघडले आहेत...
या अनिरुद्धासारखा सद्गुरु माझ्या बरोबर असताना माझा देखील श्वास व्यर्थ नाही जाणार...कारण याचे बाहू किरण आहेत...

खरं तर या अभंगाचा भावार्थ कीती खोल असेल माहित नाही...पण वरवर का असेना जे मला समजले, जसे समजले ते लिहल्यापासून राहावले नाही...

कारण 
किरण असती बाहू माझे....
काहीही ना व्यर्थ जात....
ह्या ओळी म्हणजे माझाही जीवंत अनुभव आहे. कार्व्हर या संतपदाला पोहोचलेल्या शास्त्रज्ञापासून ते माझ्यासारख्या सामान्य भक्ताच्या आयुष्याला हा आद्यपिपांचा अभंग व्यापून टाकतो. हीच या अभंगाची खासियत आहे. आयुष्य असावे कसे तर कमळासारखे...खरंच बापू आयुष्य असावे तर या कमळासारखे...आणि खरंच बापूंवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचे आय़ुष्याचे कमळ होणारच..
कारण प्रत्येकजण ह्या कलियुगातील विविध प्रकारच्या चिखलातून सूर्यरुपी बापूंच्या ओढीनेवर आलेला आहे...
चिखलात लोळणार्‍या सुकराचे देखील कमळ करण्याचे सामर्थ्य या माझ्या सदगुरु अनिरुद्धात आहे, हे कदापि विसरुन चालणार नाही.

- रेश्मावीरा शैलेशसिंह नारखेडे

Saturday, April 13, 2013

अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा

न्हाऊ तुझिया प्रेमेच्या कार्यक्रमात कोणते अंभग घेतले जाणार आ्हेत याची खरच उत्सुकता लागली आहे. पण खरोखर असे वाटते की हा कार्यक्रम अतंर्मुख करणारा असेल. मी तर आता सध्या ईमाजिनच करतेय...की या स्टेडीअम मध्ये बसले आहे...चिक्कार श्रद्धावान आलेले आहेत. स्वतः आई बापू दादा आलेले आहेत. कुठे पडद्यावर किंवा एलईडीवर थेट प्रक्षेपण सुरु आहे. स्टेजवर समोर सगळे आर्टीस्ट आहेत...इतक सगळ असूनही मन शांत शांत झालेय..कारण अभंग सुरु आहे..

 ...अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा....

 माझ्या फेव्हरेट अभंगा पैकी असलेला हा अभंग असेल का? कुणास ठाऊक... पण नुसते ईमॅजिन करुनच अंगावर काटा उभा राहिला आहे. या अभंगाच्या पहिल्या दोन ऒळ्या ऐकल्या की भरभरुन कौतुक करत मोठ्या आईला श्रीराम म्हणणारे माझे बाबा अर्थात बापू आठवतात. पूर्वी जेव्हा हा अभंग ऐकायचे तेव्हा असे मनात यायचे आद्यपिपांचा लळा जसा बापूंना लागला तसा माझा ही लागेल का? बापू माझे ही कौतुक कधी करतील का? पण जस जस या बापूरायाच्या चरणी बापूज्ञ होत गेले तसे तसे जाणवू लागले की मुळात या अनिरुद्धाला त्याच्या सार्‍याच भक्तांचा तितकाच लळा आहे...आणि प्रत्येक बाळाचे तितकेच कौतुक आहे. आणि मी ही हे अगदी सामान्य पातळीवर बोलत आहे...कारण मी हे स्वतः अनुभवले आहे...माझ्य बाबतीतही आणि इतर अनेकांच्या बाबतीत ही.... 

एकदा काय झाले बापू, समिरदादा आणि आम्ही काही ऑफीस दोन एक मंडळी समिरदादांच्या रुममध्ये बसलेलो होतो. तेव्हा आपलाच एक श्रद्धावान भक्त तिथे आला. तो श्रद्धावान एका मराठी मालिकेमध्ये तीन ते पाच मिनिटाचा रोल करीत होता. त्याचा तो रोल बापूंनी पाहीला आणि खरंच त्या रोलसाठी त्या भक्ताचे इतके पोट भरुन कौतुक केले...की विचारु नका...त्यावेळी बापूंच्या चेहर्‍यावर जो आनंद आणि समाधान होता तो पाहण्यात मलाच खुप भरुन आले. मग तो भक्त गेल्यानंतर बापू पुन्हा आम्हाला म्हणाले, की अगदी छोटासा रोल होता पण काय मनापासून आणि आत्मविश्वासाने केला होता. छान.... त्यावेळी अगदी सहज माझ्या मनात आद्यपिपांच्या या अभंगाच्या सुरुवातीच्या ...अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा.... या ओळ्या उमटल्या... 

आद्यपिपां आणि इतर श्रेष्ठ भक्तांचे सगळेच अभंग आपल्या दैनंदिन आयुष्यात अनुभवता येतात. हेच अभंग पूर्ण तल्लीन होऊन ऐकण्याची संधी फार कमी वेळा मिळत असते....ह्या कार्यक्रमाच्या निम्मित्ताने आपल्या प्रत्येकाला आता ही संधी मिळणार आहे. बस्स आता ह्या कार्यक्रमाला बापू नावाचा घननीळ मेघ दाटून आला असेल आणि अभंगांचा मुसळधार...मन शितल करणारा पाऊस पडणार आहे....मग फक्त मला पिसारा फुलवून तयार राहयचेय...या प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघायला....
अंबज्ञ -

रेश्मावीरा नारखेडे

Monday, February 11, 2013

आत्मबल पुष्प १४ मध्यंतरपूर्व


आत्मबलाच्या १३ व्या पुष्पाचे आणि महोत्सवाच्या पुष्पगुच्छाची एक छोटाशी पाकळी बनण्याची लागोपाठ संधी मिळाली होती. त्यानंतर प्रथमच आत्मबलचा कार्यक्रम प्रेक्षक म्हणून पाहणार होते. ह्या आत्मबलाचा एक घटक होण्यापूर्वी देखील आत्मबलचे कार्यक्रम पाहिले होते. मात्र, आता एक आत्मबलची सखी म्हणून कार्यक्रम पाहण्यास अत्यंत वेगळे वाटत होते. आधी वाटायचे या सख्या किती छान परफॉमन्स करित आहेत. किती मस्त डान्स करीत आहेत.  किती मनोरंजन करीत आहेत. प्रबोधन करीत आहेत. मात्र कालच्या प्रोग्रॅमला ह्या नव्या सख्यांना पाहताना क्षणोक्षणी त्यांची मेहनत, कष्ट किती आहे याची जाणिव होत होती. त्याहूनी जास्त माझ्या नंदाईची मेहनत, कष्ट किती आहेत याची जाणिव होत होती. आमच्या वेळेला आम्ही पाहिले आहे की आई किती मेहनत घेते. रात्र पाहत नाही...वेळ काळ पाहत नाही आणि अविरत श्रम घेत असते. एखाद्या तपस्वीनी सारखी....सारखी कशाला? तपस्वीनी म्हणूनच. तिचे एक तप संपून दुसर्‍या तपाला सुरुवात झालीच आहे. या दुसर्‍या तपाचे पहिला टप्पादेखील पूर्ण झाला. आणि सगळ्यांनी पाहीले एका तपातून मिळालेल्या तेजामध्ये आत्मबलचे १४ पुष्प कसे बहरले.

महोत्सवाच्या भव्य दिव्य कार्यक्रमानंतर १४ व्या पुष्पाचा कार्यक्रम जसा हवा अगदी तसाच होता. आत्मबलची प्रभा अजून वाढवणारा होता आणि याचे सर्व श्रेय जाते ते फक्त आणि फक्त नंदाईलाच. कारण मी हे ठामपणे सांगू शकते, इथे कुणीही कितीही मेहनत केली असेल ती फक्त नंदाईच्या चेहर्‍यावर एक समाधानाची, आनंदाची लकेर पाहण्यासाठीच केली आहे. फक्त तिच्यासाठी आणि बापूंच्या संकल्पासाठी. आणि जेव्हा कुणीही नंदाईसाठी आणि बापूंच्या संकल्पपूर्तीसाठी कार्यात झोकून देतो तेव्हा बळ देणारी, ते कार्य पूर्ण करणारी मोठी आईच असते. आणि मला खात्री आहे हे प्रत्येकाने अनुभवलेले असेल. 

आता या १४ व्या पुष्पाच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचे झाल्यास स्पीचलेसच होऊन जाऊ. पण खरच बोलल्याशिवाय रहावत नाही आणि बोलावे म्हटले तर सुचत नाही. माझा सुरुवातीचा स्वागताचा डान्स मिस झाला. पण मूहूर्त नाटकाच्या वेळेस मी पोहचलेले होते. ह्या नाटकाचे डायरेक्शन, संवाद आणि विषयाची हाताळणी इतकी मस्त होती की सॉलिड एन्जॉय केले. या नाटकाद्वारे मुहूर्त आणि ज्योतिषी यांच्या ग्रहातार्‍यांमागे लागून आपल्या आयुष्याच्या खर्‍या सुख आणि शांती या महत्त्वपूर्ण सुर्य चंद्रापासून दूर जाणार्‍या देवभोळ्या लोकांची गत कशी होते? यावर खेळकर आणि खोडकर असे भाष्य केलेले होते. खुद्द बापूंची कुंडली पाहण्याचा प्रयत्न करणारे आजोबा पाहून बापूंना देखील हसू आवरले नव्हते. ज्योतिषशास्त्राला बापूंचा विरोध नाही पण त्याहूनी सरस सदगुरु शास्त्र आहे हे सहज आणि सोप्या शब्दात पटवून दिले आणि या सदगुरु शास्त्रात एका प्रेमाशिवाय कोणतेही बंधन नसते. त्याबरोबर बापू भक्ताशीच लग्न करायचे आहे असा हट्ट धरुन बसणार्‍या मुलींचा कान ही आईने सहज पिळला. ह्या चूकीच्या हट्टापायी अनेक अडचणींना सामोर्‍या जाणार्‍या आपल्या मुलींना अगदी मार्मिक तर्‍हेने समजवीले आहे आणि हे फक्त आईच करु शकते. आपल्या सासरकडच्या मंडळींना उचित मार्गावर आणण्यासाठी या नाटकातील नायिकेने अविरोधाने पुढे जाऊन कसा काय बदल घडवून आणला हे पाहणे इंटरेस्टींग होते. या नाटकातील संवाद आणि नेपथ्यपण सुंदर होते आणि सर्वच नॉन प्रोफेशनल सख्यांनी प्रोफेशनली काम केले आहे. कुठेही या नाटकाची लय तुटली आहे, मध्येच काहीतरी वेगळेच आलेय अस काहीही वाटत नव्हते. 

Aatmabal 2013_Muhurta

त्यानंतर, इंग्लीश नाटक होते. टू सर विथ लव्ह. या नाटकाबद्दल मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे हलके फुलके संवाद. या नाटकातून बापू शिक्षक म्हणून कसे आहेत हे दाखविले गेले पण तेही एका वेगळ्या तर्‍हेने. नाटकातील इंजिनियरिंग कॉलेजच्या फेअरवेल पार्टी दरम्यान जुन्या आठवणीत रमणारी विद्यार्थी-विद्यार्थीनी आपल्या कौशिक सरांबद्दल भरभरुन बोलतात. कौशिक सरांनी या मुलांच्या आयुष्याला जी वेगळी दिशा दिली त्याबद्दल भरभरुन बोलतात. मात्र या कौशिक सरांचे प्रेरणास्थान दुसरे तिसरे कुणीही नसून अनिरुद्ध बापू आहेत हे जेव्हा कळते तेव्हा खरच भरुन होते. एक आदर्श शिक्षक म्हणून जरी कौशिक सरांना ओळखले जात असले तरी त्यांचा आदर्श शिक्षक हे बापूच आहे. हे या नाटकातून दाखविले. तेव्हा जाणविले की या बापूंचा आदर्श प्रत्येक बाबतीत आपण ठेवू शकतो. एक आर्दश शिक्षक, आर्दश विद्यार्थी, एक आर्दश वडील, मित्र, प्रेक्षक अशा प्रत्येक बाबतीत आपण बापूंनाच आदर्श म्हणून ठेवले पाहिजे. अस केल्यास जे यश कौशिक सरांना लाभलेले दाखविले ते आपल्याही मिळू शकते. आज रामाला देव म्हणून देव्हार्‍यात कोंडणार्‍यापेक्षा रामाला आदर्श म्हणून हृदयात कोंडणारा अधिक सुखी होतो ही गोष्ट मनावर पक्की ठसली. 
Aatmabal 2013_ To sir with Love


अर्थात आईने दाखविलेल्य़ा नाटकांमधून प्रत्येकजण वेगवेगळा बोध घेऊ शकतो. मला जे कळले ते मी मांडले. या नाटकामध्ये एलईडीचा वापर करुन दिलेला एक संदेश हृदयास भिडला. दोन जीवलग मित्रांमध्ये भांडण होते आणि एक जण दुसर्‍याला थोबाडीत मारतो. तेव्हा ज्याने मार खाल्ला आहे तो आपल्या मनातले शल्य वाळूवर लिहून मोकळा होतो. मात्र, जेव्हा मारणार मित्र एका गुंडापासून त्याचे प्राण वाचवतो तेव्हा तो आपल्या मनातली कृतज्ञता आणि त्या घटनेची आठवण दगडावर लिहून ठेवतो. यातून दिलेला संदेश म्हणजे आपली जीवाभावाची माणसांमुळे जेव्हा दुःख होते तेव्हा ती आठवण वाळूवर लिहायची म्हणजे ते कधी ना कधी काळाच्या ओघात पुसून जाईल. मात्र, त्यांच्या बद्दलच्या चांगल्यागोष्टी आपण दगडावर अर्थात मनावर कोरुन ठेवायच्या. ज्या कधीच पुसल्या जाणार नाहीत. इतका अप्रतिम संदेश अर्थात बापूंची शिकवण अत्यंत सुंदरपणे मांडली.  या इंग्रजी नाटकाचा प्लस पॉईंट म्हणजे सोप्पे आणि चुचुरीत संवाद जे समजायला सोप्पे होते आणि जरी समजले नाहीत तरी प्रसंग अगदी बोलके घेतले होते. 

या नाटकानंतर अत्यंत सुंदर आणि स्वर्गिय असे मयूर नृत्य होते. या नृत्याबद्दल लिहणे कठीणच आहे. इतकेच म्हणू शकते की डोळ्याचे पारणं फिटले. रोजा या चित्रपटाच्या ये हसी वादिया या गाण्याच्या संगितावर "मेघ दाटे नभी, हर्ष झाला मनी" हे गाणे रचले गेले होते. या म्युझिकमध्ये हे शब्द इतके चपखल बसले होते की जणू असे वाटले की ए आर रेहमान नी या आपल्या अभंगासाठीच संगीत तयार केले असावे. या गाण्यात एक वेगळीच डेप्थ होती. संगीताची निवड, शब्द रचना, नृत्य दिग्दर्शन, कॉच्युम्स, एलईडीवरील क्लिपिंग, लाईटींग ह्यांचे समिकरण इतक परफेक्ट जुळून आले होते की बस्स! शब्दच नाही...हे नृत्य फक्त पाहवे बस्स..या बद्दल काही लिहूच शकत नाही. हे नृत्य पाहताना वातावरण या निळ्या-सावळ्याच्या निळाईमध्ये मिसळून निळसर होऊन गेले होते....अवर्णनिय...हे नृत्य पाहताना प्रत्येक प्रेक्षक मोर झाला आणि डुलायला लागला असेल असे वाटते. इतरांचे माहित नाही माझे मात्र असेच झाले. हॅटस ऑफ टू नंदाई फॉर दिस अल्टीमेट कंसेप्ट.

Aatmbal 2013_Mayur Dance


आता इथे मी सुद्धा मध्यंतर घेते कारण याच्या नंतर जे जे काही झाले ते लिहण्यासाठी मध्यंतराची नितांत आवश्यकता आहे.