Showing posts with label NANDAI'S ANUBHAV. Show all posts
Showing posts with label NANDAI'S ANUBHAV. Show all posts

Thursday, February 12, 2015

आत्मबल - तुझे माझे नाते आई

आत्मबलचा कार्यक्रम नुकताच झाला. मला प्रत्यक्ष कार्यक्रमाला जाता आले नाही. परंतु या कालावधीत मी माझ्या वेळच्या आत्मबलच्या आठवणींमध्ये रमले होते...खरच एक एक आठवण जपून ठेवण्यासारखी आहे. किती सांगू आणि किती नाही. या आत्मबलच्या क्लास मध्ये मला काय मिळाल हे शब्दात सांगता येणार नाही पण तीन प्रमुख गोष्टी मला मिळाल्या त्या म्हणजे आई, मी आणि सख्या. आज जेव्हा लग्न झाले आणि बाळ झाले तेव्हा जाणवतेय आत्मबल संपलेले नाही. आज खरच जाणवते एका मुलीचे रुपांतर पत्नी आणि आईमध्ये जेव्हा होते...तेव्हाचा बदल हा साधासुधा नसतो. आत्मबल हा बदल स्वीकारण्यास व पेलण्यास समर्थ करते. ते ही अगदी हसत खेळत. 

नंदाईच्या सानिध्यात आपल्यात सहज होणारे बदल आपल्याला देखील कळत नाही. मग वेळ जसा पुढे जातो तशी आपल्याला त्याची जाणिव होत जाते. आणि तेव्हा लक्षात येते की आई आपल्यावर किती मेहनत घेत आहे आणि जर आपण तिला हवी तशी साथ दिली तर आपल्या आयुष्याचे सोने होऊ शकते. होय!!! नंदाईने माझ्या आयुष्याचे सोने केले...

आईने मेहनत घेतली म्हणजे नक्की काय? आई जेव्हा क्लासमध्ये येते आपल्याला काही शिकविते तेव्हा ती आपल्यावर मेहनतच घेत असते. ती आपल्या छोट्याश्या रोलसाठी सुद्धा जीवाच रान करते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी ती आपल्यापेक्षा जास्त प्रयास करते. आपल्या वाट्याला जी काही भूमिका येईल त्यात १०८ टक्के पूर्ण प्रयास करायचे ही मोठी शिकवण आई देते...हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहीजे. माझ्या आयुष्यात जो रोल मला बापूंनी दिला आहे तो १०८ टक्के पूर्ण समर्थाने पार पाडणे आवश्यक असते व ते कसे करावे हे आई स्नेहसंमेलनाच्या मार्फत शिकविते असे मला वाटते. आत्मबल हे स्वार्म सायन्स आहे. संघशक्तिचा एक उच्चतम अविष्कार आहे. 


मला अजूनही आठवत तेराव्या बॅचमधील भूक नाटकातील "बॉस’ चा रोल. अधिक वेळ न देऊ शकल्याने मला अगदी छोटासा हा रोल मिळाला होता. पण आईने दिलेल्या बळामुळे आणि बापूंच्या कृपेमुळे हा रोल खरच अजरामर ठरला. माझी लहानपणापासून इच्छा खुप होती की आपण रंगमंच गाजवावा. ती इच्छा आईने आत्मबलमधून पूर्ण करुन घेतली. रोल छोटा होता की मोठा होता ह्या पेक्षा ती आईने दिलेली एक महत्त्वपूर्ण जबाबदारी होती याची मला जाणिव होत होती. 

माझा रोल लंपट, बाईलवेडा अश्या ठरकी बॉसचा होता. जे मला सुरुवातीला पचविणे कठीण झाले. पण तरीही आईने दिलेले काम आहे हे जमणारच ह्या विश्वासाने मी मेहनत करु लागले. या रोलसाठी आवश्यक ते सर्व काही केले. हा रोल नीट व्हावा म्ह्णून सिगरेट, दारु पिणार्‍या लोकांचे निरिक्षण केले. चित्रपट सिरिअल्स मधून ठरकी पुरुष कसे बाई कडे बघतात याचे निरिक्षण केले. व तसे आपल्या अभिनयात उतरविण्याचा प्रयत्न केला. It was challenge to me. 
THE BOSS - AATMABAL DRAMA

माझा एक वाईट बॉस म्हणून आईला राग आला पाहिजे आणि तिला मला चप्पल काढून मारावेसे वाटले पाहिजे. हे माझे टारगेट होते. त्याप्रमाणे एका रन थ्रूला बेसमेंटमध्ये रिहसल सुरु होती. जागा कमी असल्यामुळे एरव्ही लांब असणारी आई यावेळेस अगदी समोर म्हणजे अगदी एक फुटाच्या अंतरावर बसली होती. मला एक डायलॉग समोर पाहून बोलायचा होता आणि आई समोर होती. पण खर तर मी घाबरले होते. मग मनातून मोठ्या आईचे, दत्तबाप्पा आणि बापूंचे स्मरण करुन जे काय होईल ते होईल अस म्हणत आईच्या डोळ्यात डोळे घालून तो डायलॉग म्ह्टला. यावेळी मला स्पष्ट दिसत होते की आईला माझ्या डायलॉगची आणि नजरेची किळस वाटत होती. आणि शेवटी आई म्हणालीच की तुला चप्पल काढून मारावेसे वाटत आहे.....
ऍण्ड येस इथे सगळ जिंकले होते. आईला हवा तसा माझा रोल झाला होता. 

ह्या नंतर मुख्य कार्यक्रम झाला. कौतुक झाल, पण एक गोष्ट आजही डोक्यातून गेली नाही.....
ती म्हणजे आईने मला हा बॉसचा रोल देऊन काय साधल? माझ्यासाठी हा रोल काय देऊन गेला?
तर खूप काही देऊन गेला. एक आत्मबलचा साधा रोल आपल्या मन बुद्धीत बदल घडवून आणू शकतो. विचारसरणी बदलू शकतो. आपल्याला सतर्क करु शकतो हे प्रथमच मी अनुभवले आणि यापेक्षा बरच काही. 
जसे पंचतंत्रच्या गोष्टींमधून आपल्याला बोध मिळत असतो तसा त्मबलच्या प्रत्येक क्षणातून आपल्याला बोध मिळत असतो...फक्त ते बोधामृत पिण्यासाठी आपल्याला चातक असावे लागते....
आज पुढे कितीही वर्षे गेली आणि अगदी मरणाच्या दारावर असेन तेव्हाही मला आठवेल आपण अस काहीतरी आयुष्यात केले होते ज्यामुळे काही क्षण तरी आई समाधानी झाली होती. आणि हा अनुभव आत्मबलच्या प्रत्येक सखीने मिळवून हृदयाच्या कप्प्यात ठेवावा. यात खुप मोठी ताकद आहे, असे मला वाटते. 

तुझे माझे नाते
जगावेगळे काही
माझ्यातले बळ तू
शक्ती तू आई

तुझ्या चेहर्‍याचे हास्य
अन समाधाना पायी
स्वतःशीच शर्यत पहा
लावली मी आई

सुवर्ण क्षणांची
सुवर्ण गाठोडी
पुन्हा उघडण्याची
लागली मला घाई

चरण उराशी
आत्मबल हाताशी
संसार माथ्यासी
समर्पित होण्यास
बोलव ग आई

- रेश्मा नारखेडे
२/१२/१५

Friday, August 30, 2013

Sai For Me....AAI For Me


HARI OM



नुकतच Aanjaneya Publications आंजनेया प्रकाशनच्या वेबसाईटवरुन मागावलेली Happy English Stories ची पहिली सिरिज साई फॉर मी Sai For Me ची पुस्तके घरी आली. अगदी सुंदर पॅकींग असलेले पार्सल अत्यंत अधाश्याप्रमाणे फोडून त्यातून आईची भेट बाहेर काढली. झपझप आठही पुस्तकांवर नजर फिरवून साई फॉर मी चे पहिले पुस्तक वाचण्यास घेतले.


पुस्तकावरील ओळ न ओळ वाचली. अगदी पब्लीकेशन कुठले...पत्ता वगैरे.....


आणि बिगनर्स सेक्शन पासुन सुरुवात केली. सर्वप्रथम विद्यार्थी म्हणून न वाचता...कुतुहूल म्हणून वाचले...आणि मग वाचता वाचता खरच amazed झाले.

आता तुम्ही म्हणाल अस का? कारण तसेच आहे. मराठी माध्यमाची विद्यार्थीनी असल्यामुळे कायम इंग्लिश सुधारण्यासाठी धडपड करत होते. इंग्लिश बोलताना आत्मविश्वास नसल्याने कायम मागे मागे राहायचे. इंग्लिश सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली सर्वच प्रसिद्ध पुस्तके माझ्याकडे आहेत. त्यांच्या मदतीने इंग्लिश बोलता आले, लिहिता आले, वाचता ही आले, समजता देखिल आले पण आत्मविश्वास काही आला नाही. कारण या सगळ्या पुस्तकातून मी मराठीतच इंग्लिश शिकले. आणि त्यामुळे मराठीत विचार करुन मग इंग्लिश्मध्ये बोलण्याची सवय लागली आणि त्यामुळे आत्मविश्वास अधिकच खालावत गेला. 

साई फॉर मी - १ चे बिगिनर्स आणि इंटरमिजिट सेक्शन वाचतानाच एक लख्ख प्रकाश डोक्यात पडला आणि लक्षात आले की हेच मला हवे होते...आणि असच हवे होते.

प्रत्येक पुस्तकामागे मग ते कोणतेही असो त्यामागे एक संकल्पना असते. एक हेतू असतो. एक प्रवाह असतो....आणि त्या पुस्तकांचा एक प्रभाव देखील असतो. खरं तर पुस्तक म्हणजे कागद आणि त्यावरील काळी शाळी नसून एक जिवंत, अनुभवसंपन्न, मार्गदर्शक व्यक्तीमत्व असते. मात्र त्या दृष्टीने पुस्तके वाचली पाहिजेत.

साई फॉर मी म्हणजे तर माझ्या सोबत माझी आईच असल्यासारखे आहे. अर्थात नंदाईने लिहलेल्या या पुस्तकातून तीचे वात्सल्य पदोपदी जाणविते. आणि मी हे ठामपणे सांगू शकते; नव्हे सिद्ध करु शकते. आज मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे बाळाचे संगोपन भरण पोषण कसे करावे हे मला ठाऊक आहे. कोणत्या वयात बाळाला काय खायल द्यावे याचे भान मला राखावे लागते. चार महिन्यापर्यंत केवळ आईचे दूध, चौथ्या महिन्यानंतर फळांचा रस, मग हळू हळू पेज, मऊ खिचडी मग हळू हळू पूर्ण जेवण असा क्रम असतो. कारण बाळाला झेपेल पचेल तेवढच द्यायचे. हेच तत्त्व नंदाईने या पुस्तके लिहताना वापरले आहे असे मला वाटते. 

बघा ना एकाच अर्थाचे तीन वेगवेगळे शब्द बिगिनर्स, इंटरिमिडीएट आणि अडवान्स लेव्हलवर वापरले आहेत. उदा. मिशन, असायमेंट, टास्क...तीन वेगळ्या लेव्हलवर आईने शब्द introduce केले आहेत. गम्मत पुढे अशी आहे की एकच गोष्ट सांगण्यासाठी आईने हे तीन शब्द एका समान वाक्यात वापरले आहेत. अस प्रत्येक ठीकाणी आहे.
Beginners : to begin the mission of writing stories.
Intermediate : to begin the assignment of writing stories
Advance : to begin the task of writing stories.

बाळाला त्याच्या पचनशक्तीनुसार जसे अन्न दिले जाते त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आकलनशक्तीनुसार इथे शिकविले गेले आहे. त्यामुळे मला एकच वाक्य तीन वेगळ्या शब्दांचा वापर करुन कसे लिहता येते हे कळते. 

तसेच शेवटी आईने हेच तीन शब्द तीन वेगवेगळ्या वाक्यात वापरुन दाखविले आहेत; जिथे हे शब्द APT कसे वापरायचे हे कळते.
B : Neil Armstrong was the first person who accomplished the mission of landing on the moon.
I : Advance nations outsource assignments to developing countries.
A : Tending to a special child is a huge task for the parents.

अगदी प्रत्येकाला उपयोगी पडेल अशी ही पुस्तके आहेत. याआधी आईकडून इंग्लिशचे धडे आत्मबलमधून गिरिवले आहे. आज पुन्हा या क्लासला गेल्यासारखे वाटते. या पुस्तकांना अनेकविध पैलू आहेत. 

त्यातील महत्त्वाचा पैलू म्हणजे साईकथांच्या माध्यमातून इंग्लिश शिकणे. आज अधिक सोप्या भाषेतून मग ती इंग्लिश का असेना साईसच्चरित्र वाचल्याची अनुभूती आली. फेरिटेल्समध्ये हरविणार्‍या लहान मुलांना साई कथांच्या माध्यमातून संस्कार करणे अधिक सोपे आहे. पण या कथा सोप्या करुन कशा सांगाव्यात हा प्रश्न पडला होता. हा प्रश्न देखील या पुस्तकांमुळे सुटला आहे. तसेच जणू साईसच्चरित्र चित्र रुपातही समोर आले आहे त्यामुळे अगदी लहान मुले ही या चित्रांतुन कथा समजू शकतील. 

एकाच संकल्पनेतून अनेक हेतू या पुस्तकाच्या माध्यमातून साध्य होतात. आईने व बापूंनी ही पुस्तके आपल्या हातात तर दिली आहेत आता कितीक व्यापक आणि विविधांगी उपयोग आपण करुन घेतो हे आपल्यावर आहे.

मी तर बाबा जाम खुश आहे..."वात्सल्याची शुद्ध मुर्ती आई काळजी वाही"    याची पुरेपुर अनुभूती मला आलेली आहे. कारण मला प्रश्न पडलाच होता...की माझ्या बाळाला मी पुढे कोणत्या गोष्टी कश्या सांगणार आहे? जे संस्कार मला त्याच्यावर करायचे आहेत ते मी कसे करणार...

पण हा प्रश्न त्याच्या "MOM" नेच सोडविला. 

आता त्याची आज्जीच ("MOM") रोज रात्री गोष्ट सांगायला येणार हे नक्की.

(सोबत माझे ही इंग्लिशची उजळणी आई घेणार)

Happy English Stories चा साई फॉर मी सारखा प्रवाह अखंड माझ्या आयुष्यात रहावा व ह्या अशा पुस्तकांची घरोघरी लायब्ररी व्हावी व पिढ्यान पिढ्या इंग्रजी शिकण्यासाठी यांचा वापर व्हावा ही मोठ्या आईच्या चरणी सदिच्छा....मी अंबज्ञ आहे....

- Reshmaveera Narkhede


Monday, February 11, 2013

आत्मबल पुष्प १४ मध्यंतरपूर्व


आत्मबलाच्या १३ व्या पुष्पाचे आणि महोत्सवाच्या पुष्पगुच्छाची एक छोटाशी पाकळी बनण्याची लागोपाठ संधी मिळाली होती. त्यानंतर प्रथमच आत्मबलचा कार्यक्रम प्रेक्षक म्हणून पाहणार होते. ह्या आत्मबलाचा एक घटक होण्यापूर्वी देखील आत्मबलचे कार्यक्रम पाहिले होते. मात्र, आता एक आत्मबलची सखी म्हणून कार्यक्रम पाहण्यास अत्यंत वेगळे वाटत होते. आधी वाटायचे या सख्या किती छान परफॉमन्स करित आहेत. किती मस्त डान्स करीत आहेत.  किती मनोरंजन करीत आहेत. प्रबोधन करीत आहेत. मात्र कालच्या प्रोग्रॅमला ह्या नव्या सख्यांना पाहताना क्षणोक्षणी त्यांची मेहनत, कष्ट किती आहे याची जाणिव होत होती. त्याहूनी जास्त माझ्या नंदाईची मेहनत, कष्ट किती आहेत याची जाणिव होत होती. आमच्या वेळेला आम्ही पाहिले आहे की आई किती मेहनत घेते. रात्र पाहत नाही...वेळ काळ पाहत नाही आणि अविरत श्रम घेत असते. एखाद्या तपस्वीनी सारखी....सारखी कशाला? तपस्वीनी म्हणूनच. तिचे एक तप संपून दुसर्‍या तपाला सुरुवात झालीच आहे. या दुसर्‍या तपाचे पहिला टप्पादेखील पूर्ण झाला. आणि सगळ्यांनी पाहीले एका तपातून मिळालेल्या तेजामध्ये आत्मबलचे १४ पुष्प कसे बहरले.

महोत्सवाच्या भव्य दिव्य कार्यक्रमानंतर १४ व्या पुष्पाचा कार्यक्रम जसा हवा अगदी तसाच होता. आत्मबलची प्रभा अजून वाढवणारा होता आणि याचे सर्व श्रेय जाते ते फक्त आणि फक्त नंदाईलाच. कारण मी हे ठामपणे सांगू शकते, इथे कुणीही कितीही मेहनत केली असेल ती फक्त नंदाईच्या चेहर्‍यावर एक समाधानाची, आनंदाची लकेर पाहण्यासाठीच केली आहे. फक्त तिच्यासाठी आणि बापूंच्या संकल्पासाठी. आणि जेव्हा कुणीही नंदाईसाठी आणि बापूंच्या संकल्पपूर्तीसाठी कार्यात झोकून देतो तेव्हा बळ देणारी, ते कार्य पूर्ण करणारी मोठी आईच असते. आणि मला खात्री आहे हे प्रत्येकाने अनुभवलेले असेल. 

आता या १४ व्या पुष्पाच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचे झाल्यास स्पीचलेसच होऊन जाऊ. पण खरच बोलल्याशिवाय रहावत नाही आणि बोलावे म्हटले तर सुचत नाही. माझा सुरुवातीचा स्वागताचा डान्स मिस झाला. पण मूहूर्त नाटकाच्या वेळेस मी पोहचलेले होते. ह्या नाटकाचे डायरेक्शन, संवाद आणि विषयाची हाताळणी इतकी मस्त होती की सॉलिड एन्जॉय केले. या नाटकाद्वारे मुहूर्त आणि ज्योतिषी यांच्या ग्रहातार्‍यांमागे लागून आपल्या आयुष्याच्या खर्‍या सुख आणि शांती या महत्त्वपूर्ण सुर्य चंद्रापासून दूर जाणार्‍या देवभोळ्या लोकांची गत कशी होते? यावर खेळकर आणि खोडकर असे भाष्य केलेले होते. खुद्द बापूंची कुंडली पाहण्याचा प्रयत्न करणारे आजोबा पाहून बापूंना देखील हसू आवरले नव्हते. ज्योतिषशास्त्राला बापूंचा विरोध नाही पण त्याहूनी सरस सदगुरु शास्त्र आहे हे सहज आणि सोप्या शब्दात पटवून दिले आणि या सदगुरु शास्त्रात एका प्रेमाशिवाय कोणतेही बंधन नसते. त्याबरोबर बापू भक्ताशीच लग्न करायचे आहे असा हट्ट धरुन बसणार्‍या मुलींचा कान ही आईने सहज पिळला. ह्या चूकीच्या हट्टापायी अनेक अडचणींना सामोर्‍या जाणार्‍या आपल्या मुलींना अगदी मार्मिक तर्‍हेने समजवीले आहे आणि हे फक्त आईच करु शकते. आपल्या सासरकडच्या मंडळींना उचित मार्गावर आणण्यासाठी या नाटकातील नायिकेने अविरोधाने पुढे जाऊन कसा काय बदल घडवून आणला हे पाहणे इंटरेस्टींग होते. या नाटकातील संवाद आणि नेपथ्यपण सुंदर होते आणि सर्वच नॉन प्रोफेशनल सख्यांनी प्रोफेशनली काम केले आहे. कुठेही या नाटकाची लय तुटली आहे, मध्येच काहीतरी वेगळेच आलेय अस काहीही वाटत नव्हते. 

Aatmabal 2013_Muhurta

त्यानंतर, इंग्लीश नाटक होते. टू सर विथ लव्ह. या नाटकाबद्दल मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे हलके फुलके संवाद. या नाटकातून बापू शिक्षक म्हणून कसे आहेत हे दाखविले गेले पण तेही एका वेगळ्या तर्‍हेने. नाटकातील इंजिनियरिंग कॉलेजच्या फेअरवेल पार्टी दरम्यान जुन्या आठवणीत रमणारी विद्यार्थी-विद्यार्थीनी आपल्या कौशिक सरांबद्दल भरभरुन बोलतात. कौशिक सरांनी या मुलांच्या आयुष्याला जी वेगळी दिशा दिली त्याबद्दल भरभरुन बोलतात. मात्र या कौशिक सरांचे प्रेरणास्थान दुसरे तिसरे कुणीही नसून अनिरुद्ध बापू आहेत हे जेव्हा कळते तेव्हा खरच भरुन होते. एक आदर्श शिक्षक म्हणून जरी कौशिक सरांना ओळखले जात असले तरी त्यांचा आदर्श शिक्षक हे बापूच आहे. हे या नाटकातून दाखविले. तेव्हा जाणविले की या बापूंचा आदर्श प्रत्येक बाबतीत आपण ठेवू शकतो. एक आर्दश शिक्षक, आर्दश विद्यार्थी, एक आर्दश वडील, मित्र, प्रेक्षक अशा प्रत्येक बाबतीत आपण बापूंनाच आदर्श म्हणून ठेवले पाहिजे. अस केल्यास जे यश कौशिक सरांना लाभलेले दाखविले ते आपल्याही मिळू शकते. आज रामाला देव म्हणून देव्हार्‍यात कोंडणार्‍यापेक्षा रामाला आदर्श म्हणून हृदयात कोंडणारा अधिक सुखी होतो ही गोष्ट मनावर पक्की ठसली. 
Aatmabal 2013_ To sir with Love


अर्थात आईने दाखविलेल्य़ा नाटकांमधून प्रत्येकजण वेगवेगळा बोध घेऊ शकतो. मला जे कळले ते मी मांडले. या नाटकामध्ये एलईडीचा वापर करुन दिलेला एक संदेश हृदयास भिडला. दोन जीवलग मित्रांमध्ये भांडण होते आणि एक जण दुसर्‍याला थोबाडीत मारतो. तेव्हा ज्याने मार खाल्ला आहे तो आपल्या मनातले शल्य वाळूवर लिहून मोकळा होतो. मात्र, जेव्हा मारणार मित्र एका गुंडापासून त्याचे प्राण वाचवतो तेव्हा तो आपल्या मनातली कृतज्ञता आणि त्या घटनेची आठवण दगडावर लिहून ठेवतो. यातून दिलेला संदेश म्हणजे आपली जीवाभावाची माणसांमुळे जेव्हा दुःख होते तेव्हा ती आठवण वाळूवर लिहायची म्हणजे ते कधी ना कधी काळाच्या ओघात पुसून जाईल. मात्र, त्यांच्या बद्दलच्या चांगल्यागोष्टी आपण दगडावर अर्थात मनावर कोरुन ठेवायच्या. ज्या कधीच पुसल्या जाणार नाहीत. इतका अप्रतिम संदेश अर्थात बापूंची शिकवण अत्यंत सुंदरपणे मांडली.  या इंग्रजी नाटकाचा प्लस पॉईंट म्हणजे सोप्पे आणि चुचुरीत संवाद जे समजायला सोप्पे होते आणि जरी समजले नाहीत तरी प्रसंग अगदी बोलके घेतले होते. 

या नाटकानंतर अत्यंत सुंदर आणि स्वर्गिय असे मयूर नृत्य होते. या नृत्याबद्दल लिहणे कठीणच आहे. इतकेच म्हणू शकते की डोळ्याचे पारणं फिटले. रोजा या चित्रपटाच्या ये हसी वादिया या गाण्याच्या संगितावर "मेघ दाटे नभी, हर्ष झाला मनी" हे गाणे रचले गेले होते. या म्युझिकमध्ये हे शब्द इतके चपखल बसले होते की जणू असे वाटले की ए आर रेहमान नी या आपल्या अभंगासाठीच संगीत तयार केले असावे. या गाण्यात एक वेगळीच डेप्थ होती. संगीताची निवड, शब्द रचना, नृत्य दिग्दर्शन, कॉच्युम्स, एलईडीवरील क्लिपिंग, लाईटींग ह्यांचे समिकरण इतक परफेक्ट जुळून आले होते की बस्स! शब्दच नाही...हे नृत्य फक्त पाहवे बस्स..या बद्दल काही लिहूच शकत नाही. हे नृत्य पाहताना वातावरण या निळ्या-सावळ्याच्या निळाईमध्ये मिसळून निळसर होऊन गेले होते....अवर्णनिय...हे नृत्य पाहताना प्रत्येक प्रेक्षक मोर झाला आणि डुलायला लागला असेल असे वाटते. इतरांचे माहित नाही माझे मात्र असेच झाले. हॅटस ऑफ टू नंदाई फॉर दिस अल्टीमेट कंसेप्ट.

Aatmbal 2013_Mayur Dance


आता इथे मी सुद्धा मध्यंतर घेते कारण याच्या नंतर जे जे काही झाले ते लिहण्यासाठी मध्यंतराची नितांत आवश्यकता आहे.

Monday, January 7, 2013

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी

हरि ॐ 
जुन्या वर्षाची समाप्ती आणि नव्या वर्षाचा आरंभ एका अमानुष घटनेच्या प्रभावाखालीच झाला. दिल्ली गॅंगरेप प्रकरण त्याची हादरवणारी सत्य कथा पाहून विचार सुन्न झाले. आजच्या काळात एका स्त्रीला सुरक्षितता नावाला देखिल उरलेली नसल्याचे दिसून येते. दिल्ली गॅंगरेप प्रकरणाबरोबरच अशा अनेक बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. अगदी हा विषय इतका तापलेला असताना देखिल बलात्कार होतच आहे. काय समजायचे यास? वासनेपुढे विचारशक्तीच गोठल्याचे हे चांगलेच उदाहरण आहे. कसलीस भिती न उरलेल्या नराधमांकडून दुसरी अपेक्षा तरी काय....कितीही मोठा आणि कठोर कायदा आला तरी शोषिताचे दुःख शेवटी शोषिताचेच असते. ह्या अशा शोषणाला सामोर्‍या गेलेल्या शोषिताची जी हानी होते ती कश्यानेच भरुन येणारी नसते. दिल्ली गॅंगरेप घटनेतील पिडीत मुलीला आज बहादूर असे संबोधले जाते. ती मृत्यूशी कडवी झुंज कशी देत होती हे आपण सारे पाहत होतो. पण एक गोष्ट आपण विसरतो..."त्याशिवाय तिला काही पर्यायच उरत नव्हता..." आणि हे विदारक सत्य आहे. प्रत्येक पिडीत त्याच्यावर झालेल्या शोषणाच्या विरोधात लढू पाहतो...पण त्याची ती जखम कधीच भरुन येत नसावी. कारण दुःख शेवटी त्याला भोगायला लागले आहे. असे दुःख ज्यांनी भोगले नाही त्यांना बोलणे सोपे असते पण.....

या अशा अनेक घटनांनी समाजात वावरताना स्त्रीचा आत्मविश्वास पूर्णपणे तुटतो. ती सतत भितीच्या छायेत वावरत राहते. यावर उपाय होणे आवश्यक आहे. कठोर कायदा करुन गुन्हेगारांना शिक्षा दिलीच पाहीजे मात्र त्या आधीच गुन्हा होऊच शकणार नाही अशी यंत्रणा असणे आवश्यक आहे. कोण बनवेल अशी यंत्रणा...?

हा प्रश्न सगळ्यांच पडला. पण उत्तर मात्र एका ठिकाणाहूनच आले. परम पूज्य बापूंनी जाहीर केलेली पाच कलमे. अध्यात्माच्या माध्यमातून स्वसंरक्षणाची यंत्रणा बापूंनी दिली. बापूंच्या या पाच कलमांनी नुसता आत्मविश्वासच नाही तर निडरपणे समाजात वावरण्याची शक्ती देखील आली आणि स्वसंरक्षण हे खर्‍या अर्थाने स्वसंरक्षण कसे असू शकते ते कळले. पाच कलमे तर बापूंनी आता जाहिर केली. परंतु २००२ पासूनच स्त्रीयांना स्वसंरक्षण करता यावे साठी बापूंनी अहिल्या संघ सुरु केले आहे. या अहिल्या संघातून अनेक स्त्रीयांनी बलविद्या आणि प्राच्यविद्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

काहीही चूक नसताना शिळा झालेल्या अहिल्येसारखीच गत स्त्रीयांची आहे. "स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी". कोणत्याही स्त्रीला या अहिल्येसारखे शिळा होऊन रहावे लागू नये म्हणून बापूंची आणि नंदाईची धडपड स्त्रीला अधिकाधिक सक्षम, सामर्थ्यवान बनवेल ही शंकाच नाही.....कारण कुणी मदतीला येईल ही अपेक्षा ठेवून कलियुगात वावरल्यास हाती फक्त निराशाच येईल...त्यामुळे आपली मदत आपण स्वतःच करणे आवश्यक आहे......सदैव पाठीशी असणार्‍या भाऊ, पिता, मुलगा, मित्र, सद्‍गुरु अनिरुद्धांनी दिलेला आधार घेऊन....
हरि ॐ

आश्‍वासक बापू

ll हरि ॐ ll
 कालच्या श्रीहरिगुरुग्राम येथील आपल्या प्रवचनात, श्रीअनिरुद्धांनी भारतात नुकत्याच घडलेल्या काही घटनांवर भाष्य केलं; ज्या घटनांमुळे अख्खा भारत हादरून गेला, ढवळून निघाला. प्रत्येक सुज्ञ आणि संवेदनशील भारतीय नागरीक ह्या घटनांनी व्यथित झाला. बापूंनी त्यांच्या ह्या प्रवचनामध्ये त्यांच्या सर्व श्रद्धावान मित्रांना एक आश्वासक दिलासा दिला.

Tuesday, April 17, 2012

नंदावन फुलवत....नंदाईच्या वनात दुसरी भेट...१६/०४/२०१२

नंदावन फुलवत....नंदाईच्या वनात दुसरी भेट...१६/०४/२०१२

by Reshmaveera Shaileshsinh Narkhede on Tuesday, April 17, 2012 at 3:59pm ·
सोमवारी अचानक माझ्यासाठी कोमलवीराचा फोन आला. साडे सहा वाजता तूला कॅमेरा घेऊन हॅप्पी होमच्या सातव्या मजल्यावर फोटो काढायला बोलाविले आहे. अर्ध्यातासात कॅमेर्‍याची सोय करुन मी सातव्या मजल्यावर पोहचले. तिथे धांगडधिंग्याच्या मावशी-दादांची नंदाई मिटींग घेत होती. मी गेल्यावर मला पाच मिनिट बसायला सांगितले. तोपर्यंत मला माहितच नव्हते काय कुठले फोटो काढायचे ते. आईने मिटींग थांबविली आणि बाहेर आली. तिच्या हातात बॅटरीवर चालणारा छोटा पंखा होता. त्याने आई हवा घेत बाहेर आली आणि मला म्हणाली, हे बघ किती छान आहे ना!!! मी बघतच बसले...मला काही कळतच नव्हते. आई म्हणाली फोटो काढ..मग आईने छान पोझ देऊन फोटो काढून घेतला. मग म्हणाली चल वर. तेव्हा माझ्या लक्षात आले की आई गच्चीत नेतेय...म्हणजेच तिच्या नंदावनात. मी पुढे होते. मी आधी नंदावनात शिरले. मागून आई आली. आत येण्याआधी आईने नंदावनाच्या उंबरठ्याला वाकून हात लावून नमस्कार केला. जसे आपण देवळाची पायरी चढताना करतो तसेच. हे पाहून माझी मलाच लाज वाटली. आपण ही या नंदावनात येताना नमस्कार करुन यायला हवं होतं. म्हणून मी मनोमन नमस्कार केला.

आता या नंदावनात मला खरी मेजवानी मिळणार याची मला खात्री होती. त्यामुळे मी तयारीतच होती. आईने सर्वप्रथम मला तिच्या नंदावनात आलेला लाल भोपळा दाखविला. एक नाही तर चक्क दोन..छोट्याश्या मचाणावर भोपळ्याची वेल चढत गेली होती आणि त्यावरुन दोन मस्त जाडजूड भोपळे आईकडे टकामका पाहत असल्याचे मला जाणवले. आपल्या बाळांचे फोटो काढण्यास ज्याप्रमाणे आई सांगते त्याच भावनेने माझ्या या भोपळ्यांचे फोटो काढ अस आईने सांगितले. अग माझे नको काढू या भोपळ्यांचे फोटो काढ. तेव्हा मला मी पण एक भोपळा असल्याचे जाणवले. मग पुढे आई मला सूर्यफुलांनी बहरलेला विभाग दाखविला. तेव्हा आई सांगत होती की सुर्याच्या दिशेने ही फुले फिरत असतात. जिथे सूर्य आहे त्या दिशेनेच सुर्यफुलांची ओढ असते. हे समजवून देताना यातील खर मर्म मनात उतरत होते. आपणही या सूर्यफुलांप्रमाणे असावे सद्गुरुरुपी सूर्याची कायम ओढ असलेल्या फुलासारखे. पुढे आईने या फुलांना खुप प्रेमाने कुरवाळले. त्यावेळी मला मी सुद्धा सूर्यफुल व्हावे असे वाटले.

त्यानंतर आईने मला भोपळी मिरची दाखवायला नेले. पण ती मिरची गळुन पडली होती. तेव्हा तिच्या चेहर्‍यावरची खंत स्पष्ट दिसत होती. इथे छान भोपळी मिरची आलेली पण ती गळून पडली ग! अस म्हणत ती छोटीशी भोपळी मिरची तीने हातात उचलून दाखविली. त्याबद्दल तिला खूप वाईट वाटत होत. पण तिला खात्रीपण होती की पुन्हा या रोपाला भोपळी मिरची येईल. काहीही दुखलं खुपलं, कितीही वाईट झाले, कितिही दुःख वाट्याला आले तरीही श्रद्धावान हा कायम होपफुल असावा हे आईने मला दाखवून दिले.

पुढे आईने मला शतावरीची वेल दाखविली. त्याची लाल चुटुकदार फळे आईने छान हातावर घेतली आणि मला फोटोसाठी पोझ दिली आणि पुढे म्हणाली अग शतावरीचा काढ हं फोटो. मी हो म्हटल आणि आईचापण फोटो काढला..

मग आईने वेगवेगळी झाडे फुले दाखवत मला लिंबाच्या झाडापाशी नेले. तिथे एक मोठा लिंबू आला होता. पण तो दिसतच नव्हता. आई खुप शोधत होती. पण सापडलाच नाही. शेवटी एक चिटुकला लिंबू दाखवला आणि त्याचा फोटो काढायला सांगितला. मी फोटो काढला. मग आई बोलली किती छान वास येतोय ना!! अस म्हणत तीने लिंबाच्या पानाला हात चोळला आणि सरळ माझ्या नाकावर ठेवला. मला काही कळेच ना!! वास घे म्हणाली. वास खरच खूप छान होता. पण तो जास्त छान होता कारण तो आईच्या हाताला येत होता. यावेळी काय वाटल ते सांगायला जमणार नाही पण छान वाटले. त्यानंतर तो मोठा लिंबू सापडला आणि तो पाहायला आई मागे फिरली आणि मग त्याचा फोटो काढायला सांगितला.

मग आईने वांगी, पेरू, चिकू आणि झाडाला आलेल्या मिरच्या दाखवल्या. नंतर दाखवला तो आंबा. एकदम एक्साईट होऊन आईने झाडाला आलेला पहिला आंबा दाखविला. जणू नवी नवरी सगळ्यांसमोर खुले पणाने यायला लाजते त्याप्रमाणे ही मोठ्या आंब्याची कैरी हिरव्यागार पानांच्या पडद्यामागे लपली होती. आईने अलगद हा पडदा दूर सारला आणि या आंब्याचे मी फोटो काढले. मग आईने सांगितले माझ्या बोन्सायच्या झाडालापण आंबा लागला आहे आणि मी त्याचा ही फोटो काढला.

आईने मग नंदावनातील वेगवेगळ्या रंगाची, शेडसचे गुलाब दाखविले. मग छोट्या छोट्या कुल्लडमध्ये लावलेली तुळशीची रोपे दाखविली. छोट्या कुंडीतील वडाचे झाड ही दाखविले. मग आईने एक काट्यांचे रोप दाखविले पण ते पूर्ण फूलांनी बहरले होते. आई म्हणाली बघ हे काट्यांचे झाड असूनही कस फुलांनी बहरले आहे. असच असाव. या एका वाक्यात आई बरच काही बोलून गेली. आपल्या सगळ्यांना हे तीने धीराचे बोल दिले, अस माझ मत आहे. बापू सांगतात की आता पुढचा मार्ग हा काट्याकुट्यांच आहे पण तरिही आपल्या आयुष्यात बहर आपण्यासाठी प्रयत्न करावा आणि हे शक्य आहे हे आईने त्या रोपाच्या मार्फत दाखवून दिले.

आईचे नंदावन पुन्हा पाहताता खूप छान वाटले. पण या दुसर्‍याभेटीत हे नंदावन वेगळे भासत होते कारण इथे क्षणाक्षणाला बदल होत असतो, क्षणा क्षणाला विकास होत असतो. फक्त बदलत नसते ती नंदाईची माया, तिचे प्रेम, तिचे कष्ट..आणि तिचा उत्साह....आईच्या या नंदावनात गेल्यावर आपण कुठेतरी वेगळीकडे आहोत हे प्रकर्षाने जाणविते. वाटतच नाही मुंबईसारख्या शहरात आपण आहोत.
ग्रामराज्यातील "परस बाग" कशी असावी हे आईच्या नंदावनाकडे पाहून कळते. ज्यांच्याकडे जागा आहे गच्ची आहे त्यांनी आईच्या नंदावनावनासारखे आनंदवन करायला हरकत नाही. असे आनंदवन उभारता उभारता आयुष्याचे आनंदवन कधी होईल हे कळणार सुद्धा नाही.

आणि हा सगळा खटाटोप तिच्या सगळ्या बाळांसाठी....तिचे नंदावन सर्वांना पाहयला मिळावे म्हणून तीने हे फोटो शूट करुन घेतले आणि फेसबुकवर मला शेअर करायला सांगितले.....आहे ना आई आपली सॉलिड..........

Wednesday, September 22, 2010

पर्यावरण हिताय...पुनर्विसर्जन आणि स्वच्छता

गौरी गणपतीच्या विसर्जन अगदी थाटामाटात केले..वाजत गाजत मिरवणूकी काढल्या..मुंबईचे सागर किनारे भक्त सागराने भरुन गेले......पण.....दुसर्या दिवशी तुम्ही याच किनार्यावर गेलात का? चैत्यन्य आणि उत्साहाने रसरसला हा सागर दुसर्या दिवशी अगदी भकास दिसत होता... अत्यंत उदास....केविलवाणा....का?
ज्या गणरायाला आदल्या दिवशी वाजत गाजत त्याच्य घरी पाठवले.....तो गणराय घरी न पोहचताच अगदी असाह्य परिस्थीतीत किनार्याच्या कुशीत तड्फडत होता.....ऐकायला अगदी भयानक वाटते ना!!! पण खर सांगू हे अस दृश्य पाहणे अधिक भयानक आहे....हृदयाला चिरा पाडणार आहे....गेली कित्येक वर्षे हे दृश्य असच दिसत आहे...आणि आपण मात्र सोईस्करपणे या कडे कानाडोळा करीत आहोत...

विसर्जनाच्या वेळेस केवळ गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. एकदा का विसर्जन केले की त्या मूर्तीतला देव निघून जातो...अस म्हणतात....अरे पण ती मूर्ती असते देवाचीच ना!!! मग त्यात देव असो वा नसो....ती दुसर्या दिवशी भग्न अवस्थेत कशी पहावेल...किती स्वार्थी आहोत ना आपण...आपला हेतू साध्य झाला की देवाकडे पण आपण दुर्लक्ष करतो....ही तर स्वार्थीपणाची परीसीमा असल्याचे मला वाटते.

हे दृश्य दिसू नये यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत..वैयक्तिक...सामाजिक...सांघिक...सरकार आणि प्रसारमाध्यमेदेखील हे दृश्य दिसू नये यासाठी प्रयत्न करताना दिसतात...त्यांचे कौतुकच आहे....पण आणखीन एक गोष्ट करणे आवश्यक आहे...ती म्हणजे चौपाटी स्वच्छता आणि गणेशमूर्तींचे पुनरविसर्जन....
पालिका करते ना हे सगळ पण आम्हाला काय गरज? खरच गरज नाही आम्हाला? नीट विचार करायला हवा....पालिका करते कारण ते त्यांचे काम आहे...आम्ही करायचे कारण आमचे ते कर्तव्य आहे....देवाच्या प्रती...पर्यावरणाच्या प्रती....पर्यावरण हितासाठी मोठमोठ्या बाता करुन भागणार नाही....त्यासाठी झटले पाहिजे...माझ्या दैनंदिन कामातून वेळ काढून....आणि ते सहज जमते....मला ही यावर्षी ते जमले...

अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या चौपाटी स्वच्छता आणि पुनर्विसर्जन सेवेला यंदा मी गेले...सकाळी ९ वाजता बोलाविले होते...पण साधारण ८:४५ ला सेवेला सुरुवात झाली. मी चौपाटीला १० ला पोहचले..नाव नोंदवून आणि बॅच लावून बीचवर सेवेला पळाले...मी गेले तेव्हा पाहिले...की चौपाटी तशी स्वच्छ करण्यात आली होती..निर्माल्य आणि इतर कचरा उचलण्यात आला होता...

समिरदादा आणि डॉ. पौरससिंह यांच्यासह इतर कार्यकर्ते गणेशमूर्ती पूनर्विसर्जीत करीत होते..आम्ही पूर्ण बीचवर फेरफटका मारला...ओहटी सुरु होती...त्यामुळे मूर्ती वाळूत रुतलेल्या दिसत होत्या...त्या मूर्ती आणि मूर्त्यांचे भग्न अवशे़ष उचलून आम्ही एका ठीकाणी गोळा करीत होतो...त्यात दुसर्या टोकाला जमा झालेला अवशेषांचा खच जेसीबी मशीनने आणला गेला...आतातर अवशेषांची एक टेकडी तयार झाली...समुद्र बाहेर मूर्त्या ओकतच होता...आणि आम्ही जमा करीत होतो...मग मूर्त्या सापडणे थांबल्यानंतर आम्ही समुद्रात एक साखळी केली..अवशेषांच्या टेकडीपासून थेट आत समुद्रात...तिथे पहिला मुलगा लाईफ जॅकेट घालून गेला,...त्याच्या कमरेला दोरी बांधली होती...त्या दोरीच्या आधारे आम्ही कमरेहून अधिक पाण्यात उभे होतो...महिलांना मागे ठेवण्यात आले होते...पण यामध्ये मी आत समुद्रात पहिली उभी होते..माझ्यापुढे पुरुष कार्यकर्ते होते...माझ्यापुढे महिलांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता...त्या पाण्यात वाळूमध्ये पाय रोवून मी उभी होते..आणि मागून येणारे अवशेष पूढे पास करीत होते...पुढे ती मुले हे अवशेष पुनरविसर्जित करीत होते...

SameerDada
समिरदादा आणि डॉ. पौरससिंह अविरत काम करीत होते...त्यांच्याबरोबरीने आणि मार्गदर्शनाखाली सेवा करायला भारी मज्जा आली....खरच आपल्या संस्थेचे सर्वोच्च कार्यकर्ते...संचालक...ज्या प्रमाणे झोकून देऊन काम करीत होते...ते पाहून खरच प्रोत्साहन मिळाले....त्यांच्याकडून शिकता आलं की कशी सेवा करायची...संस्थेचे संचालक असूनही सामान्य भक्त आणि कार्यकर्त्याच्या पातळीवर येऊन झोकून देऊन काम करणारे पौरससिंह आणि समिरदादांना पाहताना एकच वाटल....की कार्यकर्ता असावे तर असे..."मी करतो हा भावच नाही यांच्याठायी."


Dr. Paurassinh Aniruddh Joshi (center)



Sameerdada


Dr. Paurassinh Aniruddh Joshi


आणि खरच!! आपण ईथे काही करतो...अस समजण चूकीचे आहे....कारण जी काय सेवा देवाने करवून घेतली ती जर मी करायची म्हटली तर अशक्यच होती...कारण एरव्ही नेहमीचे वजन उचण्यासही कां कू करणार्या माझ्यात मोठ मोठ्या मूर्त्या एकटीने उचलण्याची ताकद आली कुठून? जीना चढायला ही दम लागतो...मग त्या समुद्राच्या पाण्यात जोरदार लाटेच्या तडाख्यात खंबीरपणे उभे राहण्याची ताकद तेथे उपस्थित महिलांमध्ये आली कुठून? रात्रभर जागरण पण सकाळी एकदम फ्रॆश...सेवा करताना एकही जांभई नाही...हे कसे? अंगात इतके बळ कुठून आले आणि कधी आले ते कळलेच नाही? आणि सेवा करुन पुन्हा ३ वाजता ऑफीसचे काम थेट ९ वाजे पर्यंत नॉनस्टॉप करणे मला कसे शक्य झाले.....हे सगळे प्रश्न म्हणजे माझ्यासाठी सदगुरुचा चमत्कारच आहे. तोच सगळ करवून घेतो....याची प्रचिती सेवे दरम्यान आली.

समुद्रात आम्ही अवशेष पुनर्विसर्जित करत होतो...तर ते समुद्राच्या लाटा पुन्हा बाहेर फेकत होते..आम्ही पाण्यात उतरलो होतो तर आमच्या पायावरुन अवशेष सरकत होते...हे अत्यंत वाईट वाटत होते...पाय हलवताच येत नव्हता....चारी बाजूला अवशेष...खूप लागले पायाला....पण आम्ही हटलो नाही...परत परत  अवशेष आत टाकत होतो...एका क्षणानंतर आम्ही हताश झालो...कारण अवशेष पुन्हा बाहेर येत होते किनार्यावर....मग एक आयडीया केली...ओहटी असल्याने पाणी बर्यापैकी आत होते...त्यामुळे पाणी जिथपर्यंत येत होते...तिथेच खड्डे करुन त्यात अवशेष ठेवले आणि चारी बाजूंनी आणि वरुन वाळू टाकली...म्हणजे भरती आल्यावर हे अवशेष बरोबर पाण्याखाली जातील आणि पुन्हा किनार्यावर येणार नाहीत...अशी सेवा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी शांतीपाठ आणि शुभंकरा स्तोत्र घेतले आणि सेवा संपविली.
खरच एक वेगळा अनुभव घेतला... 

अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी म्हणजेज उद्याच्या गुरुवारी देखील दुपारी २ ते ७ या वेळेत अशीच सेवा गिरगाव, माहिम, दादर, जुहू चौपाटीवर आहे...मातॄभूमीचे ऋण फेडण्याची, पर्यावरणाचे ऋण फेडण्याची चांगली संधी आहे...वेळ काढून या सेवेस हजर राहता आले तर उत्तमच आहे....
मग येणार ना!!!  

अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने लोक या सेवेसाठी येणे आवश्यक आहे...कारण या दिवशी गणेश मूर्त्यांची संख्या आणि आकार अवाढव्य असतात...आणि चौपाटीवरील दृश्य अत्यंत विदारक असते....मला वाटते पीओपीचा वापर करणार्या प्रत्येकाने हे दृश्य पहावे...ती व्यक्ती निश्चितच पुढल्यावर्षी ईको फ्रेंडली अर्थात पर्यावरण हिताचा मार्ग स्विकारेल.

Saturday, September 18, 2010

दे...धम्माल...मिरवणूक गणूबाप्पाची

अनिरुद्ध गुरुक्षेत्रम गणपती मिरवणूकीचा हॅंग ओव्हर अजून उतरलेला नाही..त्यामुळे जरा वृत्तांत लिहण्यास उशीर झाला. असो..पण जास्त उशिर करुन चालायच नाही...बरोबर ना!!!
अडीच दिवसासाठी येतो आणि नुसत खुळ करुन टाकतो...हा गणपती बाप्पा पण आणि हा अनिरुद्ध बाप्पापण...नादखुळा...खर तर शेवटच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना मन खूप भरुन येत...पण त्याला पूर्ण भक्तीभावाने आणि वाजत गाजत निरोप देण्यास हवाच ना!!! त्यात बापूंच्या घरचा गणपती जो कधी परका वाटतच नाही...मग त्याच्या निरोप समारंभात छे छे निरोप उत्सवात..झोकून देणे इतकच आपल्याला करता येऊ शकते..बापूंच्या गणपती विसर्जन मिरवणूकीची मजाच आणि थाटच निराळा असतो. आणि खरच या भक्ती प्रेमाच्या सोहळ्यात पूर्णतः धुंद होऊन जातो...या सोहळ्याची झिंग अशी आहे की बापू आई आणि दादांसह गणपती बाप्पा देखील डोळ्यासमोरुन जात नाही. आहा आहा!!! अगदी लोभस आणि गोंडस रुप आहे...शब्दच नाहीत माझ्याकडे...
यावर्षी मला फोटो काढण्यासाठी "प्रत्यक्ष" मधून पाठविले होते...मी जरा टेंशनमध्येच होते..उगाचच...आदल्या रात्रीपासून प्लॅनिंग सुरु होते. कसे फोटो काढायचे..कुठून काढायचे...कुठे चढायचे...सगळ काही प्लॅन्ड...पण आयत्यावेळी पोपट व्हायचा तो झालाच...असो...तर प्लॅनिंगप्रमाणे मी फोटो काढायला सुरुवात केली. फोटोच नाही तर व्हीडीओ शूट देखील केले. पण मज्जा आली..सर्वप्रथम आई बापू दादा दोन लिफ्टने खाली आले...ते आले नाही तर आम्ही खटाखट क्लिक करायला सुरुवात केली. आई सोबत शाकंबरीवीरा दत्तोपाध्ये (मुलगी) आणि निष्ठावीरा जोशी (सून) दोघीही होत्या. शांकबरीवीराच्या हातात औक्षणाचे ताट होते..थोड्यावेळाने एका लिफ्ट्मधून दत्तबाप्पा आणि एका लिफ्टमधून गणपती बाप्पाची मूर्ती आणली गेली. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये (जावई) आणि डॉ. पौरससिंह जोशी (मुलगा) यांनी आसनावर दत्तबाप्पा आणि गणपती बाप्पाला ठेवले..नंतर सर्वप्रथम नंदाईने गणपती बाप्पाचे औक्षण केले...अगदी प्रेमाने....मग शांकबरीवीरा आणि निष्ठावीरा यांनी औक्षण केले..त्यानंतर सुचितदादांच्या आईंनी औक्षण केले..मग सुखकर्ता दुःखहर्ता आरती घेण्यात आली. आरती झाल्यानंतर गणपती आणि दत्तबाप्पाच्या मूर्तीला सजवलेल्या गाडीवर ठेवण्यात आले आणि गाडी हळूहळू ढकलत हॅपी होम गेटच्या बाहेर आणण्यात आली. काय मस्त वाटत होते...दोन्ही बाजूला तुतार्या वाजत आहेत आणि त्यामधून गणपती बाप्पा हळू हळु पुढे सरकत आहे..गणपतीच्या मार्गावर आई  पवित्र जल शिंपडत आहे. अस करत मोठ्या सजवलेल्या ट्रकजवळ गाडी येते...पौरससिंह आणि स्वप्निलसिंह आधी दत्तबाप्पाला त्याच्या जागी विराजमान करतात आणि मग गणपती बाप्पाला..मग बापू आई दादा सजवलेल्या ट्रकवर चढतात आणि अत्यंत प्रेमाने दत्तबाप्पा आणि गणूबाप्पाचे दर्शन घेतात..मग त्या ट्रकच्या मागे असलेल्या भक्त समुदायाला हात वर करुन दर्शन देतात.. मग बापू आईचा हात धरुन सावकाश खाली उतरतात...पुढे बापू कागद्याच्या लगद्याने बनविलेल्या शंकराच्या मोठ्या पिंडीच्या ट्रकवर चढतात..पिंडीला फुले, बेल आणि हार अर्पण करुन भक्तांच्या गर्दीमधून कोपर्यावरील स्टेजवर जातात..स्टेजवर जाताच...मोठ्या आवाजात गजर स्पिकरवर सुरु होतात..गणपती बाप्पा मोरया.....
मग एके एक ग्रुप पुढे बापू आई दादांचे दर्शन घेत पुढे सरकतो...प्रत्येकाला मनसोक्त दर्शन मिळते..ते देतात...मला एक गम्मत वाटली.. एवढी गर्दी होती...या गर्दीतही नंदाईला कुणी तरी अगदी ओळखीचे दिसले...तेव्हा बापूंचे लक्ष दुसरीकडे होते....तेव्हा आईने बापूंना त्या व्यक्तीकडे पहायला सांगितले..."अनिरुद्ध तिकडे बघ" अस काहीस ती पुटपुटलेले मी ऐकले...तेव्हा मी खालीच स्टेज जवळच होते ना!! आणि मग बापूंनी आईने सांगितलेल्या दिशेने बघून मस्त हात वर करुन अच्छा केला.. मला कमाल वाटली. आईचे किती बारीक लक्ष असते प्रत्येकाकडे...यावरुन ते मला समजले...
सगळे भक्त स्टेजच्या समोर आले की हलतच नव्हते..तेव्हा बापू आई दादा त्यांना हळूहळू पुढे सरका असे सारखे सांगत होते...भक्त थोडीच ऐकत आहे......आपल्या प्राणप्रिय सदगुरुला पाहण्यातच ते सगळे विसरुन गेलेले दिसले...खर तर हे भक्त पुढे सरकतच नव्हते स्वतःहून...मागचे भक्त पुढच्याला धक्का मारत पुढे येत होते...त्यामुळे हे पुढे जात होते...आणि तो मागचा भक्त स्टेजसमोर आला की तो तीथेच खिळायचा...मग त्याच्या मागचा भक्त स्टेजसमोरुन येण्यासाठी त्याला धक्का मारायचा...हे असच चालत होत...मला जाम गम्मत वाटली. एरव्ही जरासा धक्का लागल्यावर रागाने पेटणारी माणसे सदगुरु समोरुन कुणी धक्का मारल्याशिवाय हलणारच नाही अशाच ऍटीट्युड्मध्ये दिसली...जाम गम्मत वाटली...देवाला किती पाहू आणि किती सामावून घेऊ हाच भाव त्यांचा दिसत होता...आणि कितीही पाहीले सदगुरुला तरी ते कमीच वाटते...

मी फुल्टू फोटो काढण्यात बिझी होते...इथे तिथे लक्ष नव्हते....काही ग्रुप्स पुढे गेल्यानंतर बापू आणि त्यांचे सुरक्षारक्षक जाऊ लागले...स्टेजवर आई आणि दादा दर्शन देत होते...सगळे ग्रुप्स मिरवणूकीत गेल्यावर आई दादा पुन्हा हॅपी होमला गेले..

मिरवणूकीत सर्वप्रथम समीरदादा चालत होते...त्यांच्या पुढे तुतारीवाले आणि मागे लेझीम पथक होते...त्यांच्याबरोबरच स्वप्निलसिंह आणि पौरससिंह होते...ते सगळी मिरवणूकीची व्यवस्था पाहण्यात रमले होते...अधून मधून नाचत ही असावेत...मग झेंडे, गरुडटका घेऊन डीएमव्ही होते..नंतर एक एक ग्रुप्स पुरुष व महिलांचे होते....दिंडीचे ग्रुप होते...सगळे जण सॉलिड म्हणजे सॉलिडच नाचत होते...या सगळ्यांचे फोटो काढले...पाणी वाटप अखंड सुरु होते...प्रसाद वाटप चालत होते...वेगवेगळ्या स्पॉटवर गणूबाप्पाचे औक्षण करण्यात येत होते...सर्व भक्तांना औक्षण करण्याची संधी मिळत होती...

सगळे बेदम नाचले....मूली आणि महिलापण कुठेही कमी नाही...

बापू देखील भक्तांबरोबर नाचले....आणि काय नाचले सांगू!!!! त्यांच्या सारखे नाचणारे कुणीही नाही...मध्येच नाचायचे...चालायचे दोन्ही बाजूंनी जमलेल्या भक्तांना मनसोक्त हात वर करुन दर्शन द्यायचे...खरच ही मिरवणूक म्हणजे भक्तांची ऐश असते...

साधारण दहा वाजता मिरवणूक आटोपती घेतात...सगळे स्पीकर्स बंद करुन भक्तांना माघरी हॅपी होमला प्रसाद घेण्यासाठी पाठवतात...आणि काही ठराविक मंडळी बीचवर जातात...

हॅपी होमला सगळ्या भक्तांना प्रसादाच्या पॅकेटस देण्यात येते...यंदा आई आणि दादा स्वःत सगळ्यांना प्रसाद देत होते...आईच्या हातून प्रसाद घेऊन आम्ही आमच्या घरी परतलो....आता वाट पाहत आहोत ती पुढच्या वर्षीची अगदी त्याच दिवसापासून जेव्हा गणूबाप्पा त्याच्या घरी परतला...

अजूनही मिरवणूकीतील बापू आई दादा माझ्या डोळ्यासमोरुन जात नाही...आणि नकोच जायला....त्यांचे एक एक हाव भाव आठवत आहेत...अविस्मरणीय.....

सगळे  जण माझ्या मागे लागले आहेत...रेश्मा, आई बापू दादांचे फोटॊ देना!!! व्हीडीओ दाखव ना!!!..ब्लॉगवर टाक ना!!! पण खर सांगू. जरा वाट पहा....आपल्या नव्याने सुरु झालेल्या मनःसामर्थ्यदाता वेबसाईटवर लवकरच या अनोख्या गणेशोत्सवाचे फोटॊ आणि व्हीडीओ पाहण्यास मिळतील....थोडा धीर धरा....मला ही हे फोटो कधी साईटवर येत आहे अस झालेय....मला ही राहवत नाही म्हणून शेवटी शब्दातून चित्र उभं करण्याचा प्रयास केला आहे...देवाने जमवून घेतल आहेच...श्रीराम!!!! हरी ओम...बोला गणपती बाप्पा मोरया! अनिरुद्ध बाप्पा मोरया!!!!

Friday, September 10, 2010

गणपती माझा नाचत आला!!!

आज घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे..मी अनुभवलेले गणरायाचे सगळ्यात सॉलिड आगमन म्हणजे बापूंच्या घरच्या गणपतीचे आगमन. संध्याकाळी चार पाचच्या सुमारास बांद्रा पश्चिम लिंक रोडवरील अमरसन्स शोरुमजवळच्या गल्लीतून बापूंच्या घरच्या गणरायाच्या आगमनाची मिरवणूक निघते. सगळ्यात पुढे लेझीम पथक, नंतर दिंडी, आणि बेन्जो असे वेगवेगळे ग्रुप्स या मिरवणूकीत् सहभागी होतात. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करुन मिरवणूकीला सुरुवात होते..अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लहान मुले-मुली, महिला-पुरुष भक्तगण या मिरवणूकीत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या मिरवणूकीत सगळे स्वतःला विसरुन सहभागी होतात. सॉलिड नाचतात. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये आणि डॉ. पौरससिंह जोशी यांच्यासह समस्त बापू भक्तगण परिवार या मिरवणूकीत सहभागी होतो. अंधार होता होता...मिरवणूक बापूंच्या घराजवळ हॅपी होमला पोहचते..गजर, संगीत आणि बाप्पाच्या आगमनाचा आनंद टीपेला पोहोचतो. हॅपी होमच्या गेटजवळ भक्तांची अलोट गर्दी दाटलेली असते. गेटवर लेझीम पथक आधी येते...बापू आई दादा स्वतः गणरायाचे स्वागत करण्यासाठी खाली सज्ज असतात. लेझीम पथक आपले वेगवेगळे कर्तब बापूंपुढे सादर करतात..प्रत्येक जण बापूंचे दर्शन घेऊन नाचत पुढे जातो...मग मागून गणराय येतो...नंदाई गणरायाचे स्वागत करण्यासाठी औक्षणाचे ताट घेऊन आलेली असते. अत्यंत प्रेमाने नंदाई गणरायाचे औक्षण करते. मग गणेशमूर्ती घरी नेल्यावर बापू बेन्जोच्या तालावर सॉलिड नाचतात. त्यावेळेला जे तिथे वातावरण असते त्याचे कुणी वर्णनच करु शकत नाही, असे मला वाटते. ही गोष्ट प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी. गेल्यावर्षी मी हे सारे अनुभवले...आता यंदा काय काय होतेय याची मला आता उत्सुकता लागली आहे...मिरवणूक सुरु होण्यापर्यंतची अधीरता आणि सगळा कार्यक्रम संपल्यानंतरची तृप्तता याच्यासारख दुसर काही नाही....अरे हो!! ही तर फक्त आगमनाच्या मिरवणूकीची गोष्ट सांगितली....खरतर विसर्जनाच्या मिरवणूकीची याहून मोठी धम्माल आहे...आगमनाची मिरवणूक म्हणजे विसर्जन मिरवणूकीच्या तुलनेत फक्त १ टक्के आहे असे मला वाटते...सो. आज या. अनुभवा! पण एक लक्षात ठेवा...हा ट्रेलर आहे....पूर्ण पिक्चर तर सोमवारी आहे!!!!!
मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!

Sunday, July 18, 2010

आई...

हरी ओम
आई...हा शब्द मी कधीच त्या एका उत्कट भावनेने कधीच उच्चारला नाही. आमच्या घरी मम्मी म्हणण्याची सवय आहे ना म्हणून.
आई अशी उत्कट हाक मी पहिल्यांदा नंदाईलाच मारली..अगदी आतुन...खोल खोल अंतराच्या मुळापासून..तिची माया आणि तिचे आईपण नेहमीच अनुभवत आले..अप्रत्यक्षपणे...किंवा सूक्ष्म पातळीवर म्हणा हव तर...पण अनुभवले..मात्र आज ही आई..तीचे आईपण प्रत्यक्ष अनुभवले..बाळासाठी असलेला तीचा कळवळा..तीची धडपड...तीची शिस्त...तीचा धाक सर्व काही...आई अनुभवली..

आईने काळजाला हात घातला..तिचे बोलणे हे हृदयाचे पाणी पाणी करणारे होते...आई प्रेमाचा उन्माळा येऊन एखादा डोंगर, पाषाण ही फुटुन रडू लागेल असं!!!

काय बोलू? काय सांगू? शब्दांची देखील तारांबळ उडाली आहे...आईचे हितगुज वर्णन करण्यासाठी..त्यामुळे ते सांगणे या क्षणी तरी शक्य नाही मला.

आज अस वाटल!!!!
तिला कवटाळून ओक्साबोक्सी रडून घ्याव. असलेली-नसलेली, असली-नकली, मोठी-छोटी सगळी दुःखं तिच्या ओटीत टाकावी. केवळ आणि केवळ तिच्या डोळ्यातून वाहणार्या लाभेविण प्रेमामध्ये, अकारण कारुण्यामध्ये न्हाहून निघावे. मन रितं करावे....संपूर्णपणे...तिच्या पायाशी...आणि भरभरून घ्यावं तिचं प्रेम...

अगदी पहिल्याच दिवशी आपल्या पदराचा एक एक तुकडा आपल्या प्रत्येक लेकीला देऊन प्रत्येकीची जन्माची काळजी मिटवून टाकली तिने..

अरे तुम्हाला हे सांगितलेच नाही ना!!! हे कुठे....अस नंदाईचे भरभरुन प्रेम अजून कुठ मिळणार? आत्मबल विकास केंद्रात...
आत्मबल - जेथे स्त्री शक्तीची जाणिव होते. जेथे स्त्रियांचा विकास साधला जातो.