Showing posts with label Deathpoems. Show all posts
Showing posts with label Deathpoems. Show all posts

Sunday, November 8, 2015

मृत्यूच्या कविता - 3 = मूळ मृत्यू

खुप प्रेम होत दोघांचं
मनापासून स्विकारलेल
कशाचाही विचार न केलेल
पण मनपूर्वक जपलेल
तो होता प्रोफेसर
ती झाली बडी ऑफीसर
जबाबदारीच्या कसरतीत
सुरू होता संसार
तिच्या सततच्या अनुपस्थित
तो संसार रेटत होता
जणू रूक्ष कवितेत
भाव तो भरत होता
एकट्याने संसार ओढता ओढता
अवचित दोरी तुटली
संसाराची रांगोळी 
क्षणात फिस्कटली
संसाराची मजा तीला
उमगलीच नाही कधी
करियरची नशा तिची
उतरलीच नाही कधी
पैसा..प्रतिष्ठा यापुढे 
करियरची व्याख्या
तिची गेलीच नाही
नवरा..मुलाबाळांच्या
वाट्याला ती कधी आलीच नाही
सगळ्या पासून घटस्फोट घेऊन
स्वतःला मोकळ केल होत
करियरच्या नशेत पाखरू 
स्वछंद उडणार होत...
पुढे वर्षा मागून वर्ष गेली...
रिटायर होऊन ही एकटी उरली...
नाना नानी पार्कात एकदा
जुन्या सखीला कडकडून भेटली
ती ही बडी होती अधिकारी 
हिच्यापेक्षा ही तीचे पद लय भारी
पण ती समाधानी सुखी दिसत होती
कारण पदरात गोंडस नात होती
नातीचे आजोबा तिथे आले फिरून
चमकली ही पुन्हा त्याला असे पाहून
नजरानजर होताच तिला धक्का बसला होता..
कारण त्याच क्षणी तिला जाणवले...की
पत्नी...आई....आज्जी...अशा स्त्रीच्या 
मूळ करियरचा मृत्यू झाला होता...

- रेश्मा नारखेडे



Thursday, November 5, 2015

मृत्युच्या कविता - २ - रिपुमृत्यू


डोळे बंद केले की तो समोर यायचा
ओळख जुनी पण चेहरा नसायचा
मला हवे तसे गुण होते त्याचे
स्वप्न असुनही सत्य ते भासे
रोज रात्री भेट व्हायची स्वप्नात
अन् उरायची जाणीव त्याची क्षणाक्षणात
तोच त्याचा रुबाब, तोच त्याचा थाट
कुठे सापडेल का मला ह्याची वाट?
स्वप्नातला राजकुमार सत्यात येइल का?
आयुष्य माझे त्याच्याभोवती गुंफेल का?
याच विचारात वर्षां मागुन वर्ष गेली
अनापेक्षितपणे माझ्या स्वप्नाशी भेट झाली
आयुष्यातला तेव्हा पहिला चमत्कार झाला होता
स्वप्नातला राजकुमार समोर प्रकटला होता
>
>
>
तेच गुण, तोच स्वभाव, तीच आकृति, तोच कुमार
अखेर मिळाला चेहरा, आनंदाला नाही सुमार
हळुहळू आता माझं सारं त्याच्यातच गुंतत गेलं
सर्वस्वाने आता त्याला मी आपल मानलं
स्वप्न पूर्ण करण्याचा हट्ट 
आत्ता कुठे पूर्ण होणार होता
तेव्हाच कळले की, 
तो लवकरच लग्न करणार होता
>
>
>
जिच्याशी तो करणार होता लग्न
मैत्रीण होती ती  माझी ख़ास मग झाले मी भग्न
तिच्या सुखाच्या आड़ 
मी कसे येणार होते
तिने इतके वर्ष जपलेले प्रेम 
कसे मी तोडणार होते
स्वप्नातला राजकुमार माझ्या समोर तर होता
फरक इतकाच की तो माझा नव्हता
माझं  स्वप्न सहजच तिच्या पदरात पडले
त्या दिवशी मी एकदाच शेवटचे रडले
त्याच्यावरील प्रेमाला सहज तिलांजलि देऊन
स्वप्न पहायचेच सोडले, शपथ घेउन
पण कुणास ठाउक का, 
पण कुणास ठाउक का, 
तिचा राग मला कधीच आला नव्हता
कारण
>
>
त्याच्यावरील प्रेमाने 
माझ्यातील "मत्सराचा" मृत्यु झाला होता
माझ्यातील "मत्सराचा" मृत्यु झाला होता
कायमचा......
-- 
- रेश्मा नारखेडे 

(मत्सराचा मृत्यू हा पवित्र प्रेमाने होऊ शकतो.  जिथे स्पर्धा येते तिथे मत्सर येतो पण जिथे निर्व्याज, परिपक्व आणि "देण्याचे" प्रेम येत तिथे मत्सरचा मृत्यू अटळ असतो. काहीश्या याच विचारातून लिहलेली कविता.  )

Tuesday, November 3, 2015

मृत्युच्या कविता 1 - मरण आलं होतं....


कामासाठी वणवण फिरत होते
हातात होते वजन
पण पोटात नाही कण
खिशात होता दाम
पण संपत नव्हते काम
कसबस काम संपवून
अखेर जेवायला गेले
भुकेचे वादळ केवळ
वासानेच शमले
पक्वान्नाने भरलेले समोर ताट
शेवटी पिण्यासाठी थंडगार ताक
घेणार पहिला घास तोच……

समोर रस्त्यावर लक्ष गेले
कुणातरी कोवळया पोराला
लोकांनी होते बेदम मारले
हातातला घास तसाच राहिला
होटल मालकाला जाब विचारला……… 

भुकेचे वादळ शमावयाला
म्हणे, पोराने केली होती चोरी
फुकट मार बसला
अन् नाही मिळाली भाकरी
चार दिवस अन्न न मिळालेला पोरगा
स्व:तासाठी नाही तर 
आईसाठी जगत होता
चोरी करुनी का होइना
पण आईसाठी सोसत होता………. 

लागलीच ते पक्वान्न
पॅक करुन त्याला दिले
देव दिसला त्याला माझ्यात
चटकन माझे पाय धरले
ओशाळून मी जरा
चार पावले मागे गेले
जड़ झाले अंतकरण
अन्, त्या दिवशी नाही जेवले………

काय माहित त्यादिवशी
मोठं असं काय घडलं होतं
ज्यामुळे न शमनाऱ्या माझ्या
भुकेला मरण आलं होतं
भुकेला मरण आलं होतं

- रेश्मा नारखेडे