Tuesday, October 26, 2010

परेड - अविस्मरणीय अनुभव - भाग ५ (PARADE - 5)

हरी ॐ
खुप दिवस झाले ब्लॉगवर काही अपडेट माहिती द्यायला वेळच मिळाला नाही. गणपती गेले...नवरात्र गेली आणि आता दिवाळी आली...पण कामाच्या गडबडीत ब्लॉगकडे जरा दुर्लक्ष झाले. म्हणून आज जरा जबरदस्तीने लिहायला बसले...मी प्रोमिस केले होते की परेडचा अविस्मरणीय प्रवास पुढे पण लिहीत राहीन..आता तोच धागा पकडून पुढचा प्रवास सुरु करुया...

तर चौथ्याभागात तुम्हाला मी सांगितले की परेड रेस्क्युची धम्माल आता सांगणार आहे...पण मुहूर्त नाही मिळाला..तर आता ऐका...

रेस्क्यु
परेड हा ए ए डी एमचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सगळ्या परेडच्या मुलांनी रेस्क्युमध्ये सहभागी हॊणे तर क्रमप्राप्त होते..हो पण रेस्क्युच्या टीममध्ये माझी निवड कशी झाली हेच मला कळले नाही...हो पण तेव्हा आम्ही केवळ पाचच मुली होतो...बाकी सगळी मुले होती...कुठे कुठे सराव करायचो...खर तर सराव करायला जागाच नसायची...पण तरी देखील जागा मिळेल तसा सराव करायचो...अगदी झोकून देऊन...


तिसर्या माळ्यावरुन उडी मारलेली...
रेस्क्युच्या लेक्चरमध्ये  सगळ्या मेथड तर शिकलो...पण प्रात्यक्षिकाचे काय? याचा सराव कुठे करायचा....
तर आम्ही सगळे बांद्राला आपल्या हरीगुरुग्रामच्या मागे एक मैदान होते...तिथे एक मोठे होर्डींग होते. त्या होर्डींगवर म्हणजे त्या होर्डींगच्या पिलर्सवर सराव करायचे ठरविले.  आधीतर ती उंची बघून माझ्या काळाजात धस्स झाले...पण आता ही भिती गेली पाहिजे. म्हणून पुढे पाऊल टाकायचे ठरविले. तेव्हा आमच्या बरोबर वैभव कुलकर्णी, अजय भिसे, प्रसाद धुवाळी ही सगळी मंडळी होती..

Rescue
साधारण वीस एक फुटावरुन शिडीचा दोर सोडलेला असायचा. त्याच्यावर चढून वर जायचे...शिकलेले प्रत्यक्षात आणणे वाटते तितके सोपे नाही. शिडी गाठेवरुन वर चढण्यासाठी विशीष्ट टेक्नीकचा वापर करावा लागायचा.. त्यामुळे गोल गोल न फिरता सलग वर चढता येत होते..शिडी गाठीवर चढण्यासाठी हातात खूप जोर असणे आवश्यक आहे..आणि तोच नेमका नव्हता. म्हणून पूल अप्स.सूर्यनमस्कार मारायचो..शिडी गाठीवर चढून अंगठा आणि त्याबाजूचे बोट हे कायम दुखापतीत असायचे...पण पर्वा केली कुणी...बॅंडेज बांधून पुन्हा सराव करु लागायचो...म्हणूनच बहुतेक आजही शिडी गाठीवर चढण्याचा आत्मविश्वास आहे...

वरती चढलो की त्या होर्डींगच्या पट्ट्यांवर जाऊन बसायचो..उंच टॉप ऑफ दी वर्ल्ड वाटायचे...तिथे बसून आम्ही हॅपी होम दिसतेय का? ते पाहायचो...हो पण आम्ही आमच्या सुरक्षीततेची पूर्ण काळ्जी घ्यायचो बर का!!!

बैल गाठ बांधून बसायचो...म्हणजे खाली पडणार नाही. मग एक आम्हाला दिव्य शिकवल...ते म्हणजे स्लायडींग....बापरे..म्हणजे त्या उंचावरुन उडी मारायची...दोरीवर टाकलेल्या लूप ला पकडून उडी मारायची आणी खाली घसरत यायचे...पहिल्यांदा केले...तेव्हा पोटात असला गोळा आला काय सांगु...वाटल मेलो!!! पण नंतर सवय झाली....अगदी डाव्या हातचा मळ जणू काही....

बरच काही शिकलो...खुर्ची गाठने कस सोडायचे....कस उतरायचे....मंकी क्रॉअल...इत्यादी...
मग या रेस्क्यु टीम तर्फे अनेक ठीकाणी डेमो झाले...अनेक ठीकाणी आम्ही शिकवायला गेलो...चांगलेच लक्षात राहणारे डेमो म्हणजे...बांद्रा पी एफ ऑफीसला झालेला डेमो आणि हरिगुरुग्रामला अहिल्या आणि बलच्या विद्यार्थ्यांसाठी झालेला डेमो...

चढण्याच्या तयारीत मी
बांद्रा पी एफ ऑफीसला डेमो जोरात सुरु होता. तेव्हा कळल की रेक्लमेशन जवळच्या झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे...आम्ही तसेच पळालो...मला जीवरक्षक गाठ बांधण्यात आली होती. मी तशीच पळाले...ती  गाठ धावता धावता सोडवली. एका टॅक्सीवाल्या थांबवून आम्ही त्याच्या टॅक्सीत घुसलो आणि अपघात स्थळी गेलो. त्या पुलावरुन खाली धगधगती आग पाहिली...अत्यंत भीती वाटली...पण खाली गेलो आणि क्राऊड मॅनेजमेंटला सुरुवात केली...त्यानंतर हरीगुरुग्रामला झालेला डेमो भन्नाट होता...हरीगुरुग्रामच्या तीसर्या माळ्यावर रॅपलींग करत चढत जायचे...मग वरुन खाली उडी मारायची...खरच हा अनुभव भारी होता...


हरीगुरुग्रामच्या भिंतींवर चढताना मी
या सरावामुळे इतका आत्मविश्वास मिळाला की पुढील आयुष्यात कराव्या लागणार्या उचापत्यांसाठी पक्की तयारी झाली...ते कसे ते पुढील काही भागात पाहू. या रेस्क्यु सरावा दरम्यान जी काही भीती होती..ती बापूंनी मनातून काढली. उंचीची भीती, पाण्याची भीती, उडी मारण्याची भीती, आगीची भीती, सापाची भीती, रक्ताची भीती सगळ्या प्रकारच्य़ा भीती मनातून बापूंनी काढल्या.

नेरुळला, डहाणूला डेमोला जाण्याची संधी मिळाली होती. या दरम्यान भरपूर काही शिकता आले..खरचं बापू आपल्याला काय काय शिकण्याची संधी देत आहे. याची जाणीव झाली..एक समर्थ डीएमव्ही बनण्यासाठी बापू घेत असलेली मेहनत शब्दात वर्णूच शकत नाही. केवळ शरीरानेच नाही तर मानसिक आणि बौधिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी बापू सर्व त्याच्या डीएमव्हीव मेहनत घेतात..प्रश्न आपला आहे...मी किती करतो? असो...
डहाणू डेमो..सापाला हाताळताना....

या कणखर प्रशिक्षणामुळे भविष्यात फोटोग्राफर म्हणून एका पुरुष फोटोग्राफर सारखेच किंबुहना त्याच्याहून जरा जास्तच कष्ट आणि उचापत्या करण्याचे बळ या प्रक्षिणातून मिळाले.
आता पुढील भागात नालासोपारा परेड केंद्राची जडण घडण पाहू...जिथे मी माझे प्राण ओतले होते....नालासोपारा परेड केंद्राचे परेड कमांडर म्हणून सेवा करताना माझ्यात होणारा बदल हा विलक्षण होता.. अवघ्या २१ वयाची असताना परेड केंद्रावर येणार्या सर्व मुला मुलींची मी पालक झाले होते...आणि हा अनुभव खूप काही शिकविणारा होता...अंतर्मूख करणारा होता. लहान वयातच जबाबदारींची जाणिव परेड कशी काय करुन देऊ शकते हे तुम्हालाही कळेल..

परेड - अविस्मरणीय अनुभव - धम्माल,सोहळा, भाग ४,भाग ३,भाग २, भाग १

Monday, October 4, 2010

परेड एक अविस्मरणीय सोहळा - PARADE FOUNDATION DAY

हरी ॐ,
परेड एक अविस्मरणिय अनुभवाचे चार भाग लिहून झाले......आणि पुढच लिहायचे राहिले....पण आता पुन्हा ही सिरिज सुरु करणार........पण सुरु करणार ते एका अविस्मरणिय सोहळ्यापासून...परेड फाऊंडेशन डेच्या सोहळ्यापासून........जो ३ ऑक्टोबर २०१० रोजी श्री हरीगुरुग्राम येथे पार पडला....काय झाल या सोहळ्यात? अहो तर, विचारा काय नाही झाले.....गेल्या सात वर्षात परेड डीएमव्हींनी विचारही केला नसेल. ते सर्व झाले...मला तर खर शब्दात मांडणे ही कठीण होतेय....एकच शब्द "भन्नाट"

२३ सप्टेंबर हा परेडचा फाऊंडेशन डे. ह्या दिवसाचा सोहळा रविवारी ३ ऑक्टोबरला परेड डीएमव्ही ने आयोजित केला होता. दिंडी, पादुकापूजन, पठण, सत्संग असा दिवसभरात कार्यक्रम आखला होता. सर्व परेड डीएमव्हींनी या कार्यक्रम करण्यासाठी चांगलीच कंबर कसलेली दिसत होती.

प्रवेशद्वारा जवळ भव्य रांगोळी....मग आतमध्ये साईबाबा आणि बापूंची सुंदर रांगोळी...स्टेजवर सुंदर डेकोरेशन...बापू, आई, दादा, आद्यपिपा, दत्तबाप्पा या सर्वांना लड्यांचे हार घातले होते..अत्यंत सुंदर आणि सुबक हार बनविले होते....माहीती कक्षामध्ये परेड प्रोजेक्टची माहीती देणारे बॅनर्स होते.. एका बाजूला चरखे सुरु होते...सकाळी दिंडीतून बाप्पाच्या पादुकांचे आगमन झाले...खर तर मी सोहळ्याला फार वेळ उपस्थित नव्हते. त्यामुळे माझ्या मित्र मैत्रिणींनी शेअर केलेली मज्जा तुम्हाला सांगतेय....

सगळे मुले-मुली दिंडीत तुफान नाचले...सकाळी स्वप्निलसिंह, पौरससिंह आणि समीरदादा ही होते...मी दुपारी अडीचच्या सुमारास पोहोचले. दत्तबावनी, हनुमानचालिसा अटेंड केली. दर्शन घेऊन....सगळ्यांना भेटले...जुने नवीन डीएमव्ही भेटले....खूप छान वाटले... तीन वाजता मी ऑफीसला जायला निघाले...खर तर जावेसे वाटत नव्हते....पण नाईलाज होता..जड अंतःकरणाने निघाले...आणि काहीही झाले तरी रात्री परत यायचे अस ठरवले.. दरम्यान फोनवर फोन सुरु होते...नंदाई आणि सुचितदादा सोहळ्याला आल्याचे कळले...ऐकूनच मला खूप भरुन आले...आईने सगळे डेकोरेशन पाहीले. खूप कौतुक केले सगळ्यांचे...लड्यांचे हार आणि पादुकांखाली केलेली गादी हात लावून पाहीली...तीला खूप आवडले..असे एका मैत्रिणीने सांगितले...एका मुलीने आईला निघताना म्हटले, "आई आणखी थोडा वेळ थांब ना." तेव्हा आई म्हणाली, "बाळांनो, मी तुमच्यासाठीच आलेली आहे." अस मला एका मुलीने सांगितले..

दिवसभर तर सर्व डीएमव्हींनी मज्जा केली...पण संध्याकाळी लवकर ये अस....प्रितीवीरा, नेहावीरा, प्रणालीवीरा या सगळ्यांनी सांगितले...त्यामुळे मला ही कधी पोहोचतेय अस झाल...चार वाजता मी गुरुक्षेत्रमला काही कामानिमित्त गेले तेव्हा बापू हॅपी होम मधून निघाले..मस्त दर्शन झाले....बापू मिटींगला जात असावेत असा अंदाज बांधला...पण बापू परेड सोहळ्यासाठी जातील का? असा प्रश्न मला पडला...बापू सोहळ्याला जावेत अस मला खूप वाटत होते...आणि ते जाणारच असा मला विश्वास वाटतच होते..आणि तेव्हा बापूंना म्हटले काहीही झाले तरी मला आता तूम्ही वेळेत पोहचवा हरीगुरुग्रामला...आणि तसेच झाले....

खार एस. व्ही. रोड वरुन हरीगुरुग्रामला जायला रिक्षा मिळत नाही एरव्ही..पण त्या रात्री पटकन रिक्षा मिळाली...आणि १५ मिनिटांच्या आत ८.३५ ला मी हरीगुरुग्रामला पोहचले...मी वेळेत पोहोचल्याचा आनंद माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणी नेहा आणि प्रितीलाच झाल्याचे त्यांच्या चेहर्यावर दिसत होते. मी गेले हॉलमध्ये बसले...परेडचे डीएमव्ही गात होते...बापू बसले होते....सगळेच गात होते.....मी पोहोचले तेव्हा....ओंकार व्यापका अनिरुद्ध नाथा हा अभंग सुरु होता....मग हरी हरा हा अभंग सुरु झाला...मग ए ए डी एमचे गाणे सुरु झाले...दे मनःसार्मथ्यदाता....शहारे आले अंगावर....

सगळे जण प्रत्येक गाण्यानंतर ललकारी देत होते...तेव्हा बापू म्हणाले "आता प्रत्येक गाण्यानंतर ललकारी देत राहीलात तर कार्यक्रम वाढेल आता...तर ललकारी सगळ्यात शेवटी द्या. आता ओरडायचे नाही आणि रडायचेही नाही...मात्र गायचे सर्वांनी"

त्यानंतर पुढच्या गाण्याला सगळे नाचायला उठले....याचा फायदा घेत मी आणि सर्व मागे असलेले डीएमव्ही पुढे गेले...थेट स्टेज समोर....आणि तूफान नाचलो....अरे सगळ वेगळच होते.....काय एनर्जी होती बापूंमध्ये आणि सर्व डीएमव्ही मध्ये... सगळे उड्या मारत होते उंच उंच...मुलांची डोकी तर वरच्या भिंतींना आपटतील की काय अस वाटले!!!

बापूंचे नाचायच्या एक एक स्टेप तर भारी होत्या...आणि एक्सप्रेशन तर लई भारी...जोगवा, गोंधळ, घरबा...सहीच

 एक गाणे झाले माखन की चोरी...ते तर भारी होते...त्या गाण्याच्या प्रत्येक वाक्याला तसेच हावभाव बापू करत होते....
बापू के संग करो माखन की चोरी
चोरो की पूरी हो गई तय्यारी
पकडे गये तो बापू मारेगी आई
आई का गुस्सा बापू तुझसे भी भारी
दाऊ को भी ना ये चोरी है प्यारी
अरे भाग मत रे.
माखन लिए
चखवा दे अपनेही ऊंगली से....

ह्या गाण्यांच्या ओळीप्रमाणेच बापू नाचत होते...आई का गुस्सा म्हटल्यावर दोन्ही हात गालावर ठेवून "बापरे" अस करतात ना तसेच केले. अरे भाग मत रे....ला धावतोय अशी ऍक्टींग केली..अरे लई भारी...

नंतर सलग गजर अभंग...धम्माल.....शेवट्च्या गजर नंतर....बापूंनी एक ऍक्शन केली. आपण एखादी गोष्ट जिंकल्यावर कस दोन्ही हाताच्या मुठी वळून "येस" अस करतो...तस केले... अरे काय काय सांगू...मला सांगता पण येत नाही....

शेवटी बापू बोलायला लागले...

कधीही दमलात , कंटाळलात , नाराज झालात ,डीपरेशन
येतंय असं वाटलं, तर माझ फक्त एक वाक्य ऐकायचं , परत परत स्वत:च्याच
कानांनी स्वत:च्याच मनात ऐकायचे , हे वाक्य कधीही विसरू नका
"I LOVE YOU"

हे बापू बोलल्यावर आम्ही देखील "I LOVE YOU" "I LOVE YOU" ओरडलो. आणि श्रीराम श्रीराम ओरडलो...

त्यावेळी काय वाटल हे याचे वर्णन शब्दात करताच येणार नाही.....नंतर बापूंनी परेडच्या सर्व डीएमव्हींना जे सकाळ पासून होते त्यांना आत बोलवल...आणि त्यांच्याशी बोलले...नंतर बापूंनी माहिती कक्षात परेड बद्दलची माहिती घेतली..सगळे जण खूप खूष झालेत....

सगळे परेड डीएमव्हींनी बापू आई दादांना खूप जवळून अनुभवल....कधी विचार ही केला नसेल...इतक प्रत्येकाला मिळाले....२५० हून अधिक जण होते...त्या प्रत्येकाचा वेगळा आनंद वेगळा अनुभव.....

त्या हॉलमध्ये आनंदाचा उत्साहाचा नुसता स्फोट झाला होता....काय सांगू? त्याच्या प्रेमाच्या वर्षावात सगळे ओले चिंब....संपूर्ण वातावरणात तारुण्य, चैतन्य सळसळत होत.....कालच्या सोहळ्याने नवीन उमेद आणि आत्मविश्वास मिळाला आहे प्रत्येकाला...खरच काल खूप बर वाटल...

गेली सात वर्षे परेड डीएमव्ही बापूंच्या हृदयापर्यंत त्यांच्या चरणापर्यंत पोहचण्यासाठी सेतू बांधत होते..जेव्हा बापू I Love You  बोलले...तेव्हा सगळ्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. ही मेहनत एका दिवसाची तर एका महिन्याची नव्हती. ही मेहनत गेल्या सात वर्षांची होती..परेड डीएमव्हींनी घेतलेल्या शारिरीक, मानसिक, बौद्धीक आणि आध्यात्मिक कष्टांचे चीज झाले आणि ते ही त्यांनीच करवून घेतले...देता है तो छप्पर फाड के....असच झाल... हा सेतू बांधण्यासाठी समिरदादा, पौरससिंह आणि स्वप्निलसिंह यांचे सातत्याने मिळालेले प्रोत्साहन आणि पाठबळ अत्यंत महत्त्वाचे आहे.

कालचा सोहळा म्हणजे मधुफलवाटीकाच वाटला मला....मेहनतीनंतर श्रमपरिहारासाठी असलेली मधुफलवाटीका....

आता पुढील रामराज्याच्या प्रवासासाठी नवीन उत्साह, चैतन्य आणि आत्मविश्वास मिळाला....प्रत्येक परेड डीएमव्हींनी बापूंना चांगला डीएमव्ही बनण्याचे, नेहमी तरुण राहण्याचे वचन दिले आहे आणि ते आता पूर्ण करायचे आहे...आणि तोच करवून घेणार...नक्की १०८ टक्के....

मला एका गोष्टीचे अत्यंत वाईट वाटले...ते म्हणजे माझ्या नावाच्या सुरुवातीला असलेल्या "EX"  या शब्दाचे...एक्स परेड डीएमव्ही रेश्मावीरा हरचेकर....या "एक्स" चा खून करणार आहे मी. हा एक्स काढून, फाडून, त्याचा चोळामोळा करुन, जाळून टाकायचा आहे मला.....एकच प्रार्थना.....हा एक्स पुन्हा माझ्या वाट्याला आणू नकोस....आणि कायम ऍक्टीव्ह डिएमव्ही ठेव...जशी जाणिव तू रविवारी दुपारी करुन दिलीस..

(रविवारी दुपारी वसई स्टेशन वर एक म्हातार्या बाईंना चक्कर आली..तेथे मी माझे डीएमव्हीचे कर्तव्य पार पाडले.. बापूंनी जाणिव करुन दिली की मी अजूनही परेड डीएमव्ही आहे...)

कदमताल करणार्यांच्या
हृदयाचा ताल तू केव्हा धरलास
कळलेच नाही

तुझ्या बरोबर नाचताना
दमलेल्या मनाचा क्षीण कधी संपला
कळलेच नाही

तुझ्याकडे पाहत असताना
आम्ही कधी संपलो कधी ते
कळलेच नाही

तुझ्या रंगात रंगताना
आम्ही कधी असे बदललो
कळलेच नाही

तुझ्यासाठी झिजताना
आम्ही कधी घडलो
कळलेच नाही

"आय लव्ह यू" म्हणालास
तेव्हाआम्ही रडलो की हसलो
कळलेच नाही

- रेश्मा हरचेकर ४/१०/१०

Wednesday, September 22, 2010

पर्यावरण हिताय...पुनर्विसर्जन आणि स्वच्छता

गौरी गणपतीच्या विसर्जन अगदी थाटामाटात केले..वाजत गाजत मिरवणूकी काढल्या..मुंबईचे सागर किनारे भक्त सागराने भरुन गेले......पण.....दुसर्या दिवशी तुम्ही याच किनार्यावर गेलात का? चैत्यन्य आणि उत्साहाने रसरसला हा सागर दुसर्या दिवशी अगदी भकास दिसत होता... अत्यंत उदास....केविलवाणा....का?
ज्या गणरायाला आदल्या दिवशी वाजत गाजत त्याच्य घरी पाठवले.....तो गणराय घरी न पोहचताच अगदी असाह्य परिस्थीतीत किनार्याच्या कुशीत तड्फडत होता.....ऐकायला अगदी भयानक वाटते ना!!! पण खर सांगू हे अस दृश्य पाहणे अधिक भयानक आहे....हृदयाला चिरा पाडणार आहे....गेली कित्येक वर्षे हे दृश्य असच दिसत आहे...आणि आपण मात्र सोईस्करपणे या कडे कानाडोळा करीत आहोत...

विसर्जनाच्या वेळेस केवळ गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. एकदा का विसर्जन केले की त्या मूर्तीतला देव निघून जातो...अस म्हणतात....अरे पण ती मूर्ती असते देवाचीच ना!!! मग त्यात देव असो वा नसो....ती दुसर्या दिवशी भग्न अवस्थेत कशी पहावेल...किती स्वार्थी आहोत ना आपण...आपला हेतू साध्य झाला की देवाकडे पण आपण दुर्लक्ष करतो....ही तर स्वार्थीपणाची परीसीमा असल्याचे मला वाटते.

हे दृश्य दिसू नये यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत..वैयक्तिक...सामाजिक...सांघिक...सरकार आणि प्रसारमाध्यमेदेखील हे दृश्य दिसू नये यासाठी प्रयत्न करताना दिसतात...त्यांचे कौतुकच आहे....पण आणखीन एक गोष्ट करणे आवश्यक आहे...ती म्हणजे चौपाटी स्वच्छता आणि गणेशमूर्तींचे पुनरविसर्जन....
पालिका करते ना हे सगळ पण आम्हाला काय गरज? खरच गरज नाही आम्हाला? नीट विचार करायला हवा....पालिका करते कारण ते त्यांचे काम आहे...आम्ही करायचे कारण आमचे ते कर्तव्य आहे....देवाच्या प्रती...पर्यावरणाच्या प्रती....पर्यावरण हितासाठी मोठमोठ्या बाता करुन भागणार नाही....त्यासाठी झटले पाहिजे...माझ्या दैनंदिन कामातून वेळ काढून....आणि ते सहज जमते....मला ही यावर्षी ते जमले...

अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या चौपाटी स्वच्छता आणि पुनर्विसर्जन सेवेला यंदा मी गेले...सकाळी ९ वाजता बोलाविले होते...पण साधारण ८:४५ ला सेवेला सुरुवात झाली. मी चौपाटीला १० ला पोहचले..नाव नोंदवून आणि बॅच लावून बीचवर सेवेला पळाले...मी गेले तेव्हा पाहिले...की चौपाटी तशी स्वच्छ करण्यात आली होती..निर्माल्य आणि इतर कचरा उचलण्यात आला होता...

समिरदादा आणि डॉ. पौरससिंह यांच्यासह इतर कार्यकर्ते गणेशमूर्ती पूनर्विसर्जीत करीत होते..आम्ही पूर्ण बीचवर फेरफटका मारला...ओहटी सुरु होती...त्यामुळे मूर्ती वाळूत रुतलेल्या दिसत होत्या...त्या मूर्ती आणि मूर्त्यांचे भग्न अवशे़ष उचलून आम्ही एका ठीकाणी गोळा करीत होतो...त्यात दुसर्या टोकाला जमा झालेला अवशेषांचा खच जेसीबी मशीनने आणला गेला...आतातर अवशेषांची एक टेकडी तयार झाली...समुद्र बाहेर मूर्त्या ओकतच होता...आणि आम्ही जमा करीत होतो...मग मूर्त्या सापडणे थांबल्यानंतर आम्ही समुद्रात एक साखळी केली..अवशेषांच्या टेकडीपासून थेट आत समुद्रात...तिथे पहिला मुलगा लाईफ जॅकेट घालून गेला,...त्याच्या कमरेला दोरी बांधली होती...त्या दोरीच्या आधारे आम्ही कमरेहून अधिक पाण्यात उभे होतो...महिलांना मागे ठेवण्यात आले होते...पण यामध्ये मी आत समुद्रात पहिली उभी होते..माझ्यापुढे पुरुष कार्यकर्ते होते...माझ्यापुढे महिलांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता...त्या पाण्यात वाळूमध्ये पाय रोवून मी उभी होते..आणि मागून येणारे अवशेष पूढे पास करीत होते...पुढे ती मुले हे अवशेष पुनरविसर्जित करीत होते...

SameerDada
समिरदादा आणि डॉ. पौरससिंह अविरत काम करीत होते...त्यांच्याबरोबरीने आणि मार्गदर्शनाखाली सेवा करायला भारी मज्जा आली....खरच आपल्या संस्थेचे सर्वोच्च कार्यकर्ते...संचालक...ज्या प्रमाणे झोकून देऊन काम करीत होते...ते पाहून खरच प्रोत्साहन मिळाले....त्यांच्याकडून शिकता आलं की कशी सेवा करायची...संस्थेचे संचालक असूनही सामान्य भक्त आणि कार्यकर्त्याच्या पातळीवर येऊन झोकून देऊन काम करणारे पौरससिंह आणि समिरदादांना पाहताना एकच वाटल....की कार्यकर्ता असावे तर असे..."मी करतो हा भावच नाही यांच्याठायी."


Dr. Paurassinh Aniruddh Joshi (center)



Sameerdada


Dr. Paurassinh Aniruddh Joshi


आणि खरच!! आपण ईथे काही करतो...अस समजण चूकीचे आहे....कारण जी काय सेवा देवाने करवून घेतली ती जर मी करायची म्हटली तर अशक्यच होती...कारण एरव्ही नेहमीचे वजन उचण्यासही कां कू करणार्या माझ्यात मोठ मोठ्या मूर्त्या एकटीने उचलण्याची ताकद आली कुठून? जीना चढायला ही दम लागतो...मग त्या समुद्राच्या पाण्यात जोरदार लाटेच्या तडाख्यात खंबीरपणे उभे राहण्याची ताकद तेथे उपस्थित महिलांमध्ये आली कुठून? रात्रभर जागरण पण सकाळी एकदम फ्रॆश...सेवा करताना एकही जांभई नाही...हे कसे? अंगात इतके बळ कुठून आले आणि कधी आले ते कळलेच नाही? आणि सेवा करुन पुन्हा ३ वाजता ऑफीसचे काम थेट ९ वाजे पर्यंत नॉनस्टॉप करणे मला कसे शक्य झाले.....हे सगळे प्रश्न म्हणजे माझ्यासाठी सदगुरुचा चमत्कारच आहे. तोच सगळ करवून घेतो....याची प्रचिती सेवे दरम्यान आली.

समुद्रात आम्ही अवशेष पुनर्विसर्जित करत होतो...तर ते समुद्राच्या लाटा पुन्हा बाहेर फेकत होते..आम्ही पाण्यात उतरलो होतो तर आमच्या पायावरुन अवशेष सरकत होते...हे अत्यंत वाईट वाटत होते...पाय हलवताच येत नव्हता....चारी बाजूला अवशेष...खूप लागले पायाला....पण आम्ही हटलो नाही...परत परत  अवशेष आत टाकत होतो...एका क्षणानंतर आम्ही हताश झालो...कारण अवशेष पुन्हा बाहेर येत होते किनार्यावर....मग एक आयडीया केली...ओहटी असल्याने पाणी बर्यापैकी आत होते...त्यामुळे पाणी जिथपर्यंत येत होते...तिथेच खड्डे करुन त्यात अवशेष ठेवले आणि चारी बाजूंनी आणि वरुन वाळू टाकली...म्हणजे भरती आल्यावर हे अवशेष बरोबर पाण्याखाली जातील आणि पुन्हा किनार्यावर येणार नाहीत...अशी सेवा झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी शांतीपाठ आणि शुभंकरा स्तोत्र घेतले आणि सेवा संपविली.
खरच एक वेगळा अनुभव घेतला... 

अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी म्हणजेज उद्याच्या गुरुवारी देखील दुपारी २ ते ७ या वेळेत अशीच सेवा गिरगाव, माहिम, दादर, जुहू चौपाटीवर आहे...मातॄभूमीचे ऋण फेडण्याची, पर्यावरणाचे ऋण फेडण्याची चांगली संधी आहे...वेळ काढून या सेवेस हजर राहता आले तर उत्तमच आहे....
मग येणार ना!!!  

अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने लोक या सेवेसाठी येणे आवश्यक आहे...कारण या दिवशी गणेश मूर्त्यांची संख्या आणि आकार अवाढव्य असतात...आणि चौपाटीवरील दृश्य अत्यंत विदारक असते....मला वाटते पीओपीचा वापर करणार्या प्रत्येकाने हे दृश्य पहावे...ती व्यक्ती निश्चितच पुढल्यावर्षी ईको फ्रेंडली अर्थात पर्यावरण हिताचा मार्ग स्विकारेल.

Saturday, September 18, 2010

दे...धम्माल...मिरवणूक गणूबाप्पाची

अनिरुद्ध गुरुक्षेत्रम गणपती मिरवणूकीचा हॅंग ओव्हर अजून उतरलेला नाही..त्यामुळे जरा वृत्तांत लिहण्यास उशीर झाला. असो..पण जास्त उशिर करुन चालायच नाही...बरोबर ना!!!
अडीच दिवसासाठी येतो आणि नुसत खुळ करुन टाकतो...हा गणपती बाप्पा पण आणि हा अनिरुद्ध बाप्पापण...नादखुळा...खर तर शेवटच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना मन खूप भरुन येत...पण त्याला पूर्ण भक्तीभावाने आणि वाजत गाजत निरोप देण्यास हवाच ना!!! त्यात बापूंच्या घरचा गणपती जो कधी परका वाटतच नाही...मग त्याच्या निरोप समारंभात छे छे निरोप उत्सवात..झोकून देणे इतकच आपल्याला करता येऊ शकते..बापूंच्या गणपती विसर्जन मिरवणूकीची मजाच आणि थाटच निराळा असतो. आणि खरच या भक्ती प्रेमाच्या सोहळ्यात पूर्णतः धुंद होऊन जातो...या सोहळ्याची झिंग अशी आहे की बापू आई आणि दादांसह गणपती बाप्पा देखील डोळ्यासमोरुन जात नाही. आहा आहा!!! अगदी लोभस आणि गोंडस रुप आहे...शब्दच नाहीत माझ्याकडे...
यावर्षी मला फोटो काढण्यासाठी "प्रत्यक्ष" मधून पाठविले होते...मी जरा टेंशनमध्येच होते..उगाचच...आदल्या रात्रीपासून प्लॅनिंग सुरु होते. कसे फोटो काढायचे..कुठून काढायचे...कुठे चढायचे...सगळ काही प्लॅन्ड...पण आयत्यावेळी पोपट व्हायचा तो झालाच...असो...तर प्लॅनिंगप्रमाणे मी फोटो काढायला सुरुवात केली. फोटोच नाही तर व्हीडीओ शूट देखील केले. पण मज्जा आली..सर्वप्रथम आई बापू दादा दोन लिफ्टने खाली आले...ते आले नाही तर आम्ही खटाखट क्लिक करायला सुरुवात केली. आई सोबत शाकंबरीवीरा दत्तोपाध्ये (मुलगी) आणि निष्ठावीरा जोशी (सून) दोघीही होत्या. शांकबरीवीराच्या हातात औक्षणाचे ताट होते..थोड्यावेळाने एका लिफ्ट्मधून दत्तबाप्पा आणि एका लिफ्टमधून गणपती बाप्पाची मूर्ती आणली गेली. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये (जावई) आणि डॉ. पौरससिंह जोशी (मुलगा) यांनी आसनावर दत्तबाप्पा आणि गणपती बाप्पाला ठेवले..नंतर सर्वप्रथम नंदाईने गणपती बाप्पाचे औक्षण केले...अगदी प्रेमाने....मग शांकबरीवीरा आणि निष्ठावीरा यांनी औक्षण केले..त्यानंतर सुचितदादांच्या आईंनी औक्षण केले..मग सुखकर्ता दुःखहर्ता आरती घेण्यात आली. आरती झाल्यानंतर गणपती आणि दत्तबाप्पाच्या मूर्तीला सजवलेल्या गाडीवर ठेवण्यात आले आणि गाडी हळूहळू ढकलत हॅपी होम गेटच्या बाहेर आणण्यात आली. काय मस्त वाटत होते...दोन्ही बाजूला तुतार्या वाजत आहेत आणि त्यामधून गणपती बाप्पा हळू हळु पुढे सरकत आहे..गणपतीच्या मार्गावर आई  पवित्र जल शिंपडत आहे. अस करत मोठ्या सजवलेल्या ट्रकजवळ गाडी येते...पौरससिंह आणि स्वप्निलसिंह आधी दत्तबाप्पाला त्याच्या जागी विराजमान करतात आणि मग गणपती बाप्पाला..मग बापू आई दादा सजवलेल्या ट्रकवर चढतात आणि अत्यंत प्रेमाने दत्तबाप्पा आणि गणूबाप्पाचे दर्शन घेतात..मग त्या ट्रकच्या मागे असलेल्या भक्त समुदायाला हात वर करुन दर्शन देतात.. मग बापू आईचा हात धरुन सावकाश खाली उतरतात...पुढे बापू कागद्याच्या लगद्याने बनविलेल्या शंकराच्या मोठ्या पिंडीच्या ट्रकवर चढतात..पिंडीला फुले, बेल आणि हार अर्पण करुन भक्तांच्या गर्दीमधून कोपर्यावरील स्टेजवर जातात..स्टेजवर जाताच...मोठ्या आवाजात गजर स्पिकरवर सुरु होतात..गणपती बाप्पा मोरया.....
मग एके एक ग्रुप पुढे बापू आई दादांचे दर्शन घेत पुढे सरकतो...प्रत्येकाला मनसोक्त दर्शन मिळते..ते देतात...मला एक गम्मत वाटली.. एवढी गर्दी होती...या गर्दीतही नंदाईला कुणी तरी अगदी ओळखीचे दिसले...तेव्हा बापूंचे लक्ष दुसरीकडे होते....तेव्हा आईने बापूंना त्या व्यक्तीकडे पहायला सांगितले..."अनिरुद्ध तिकडे बघ" अस काहीस ती पुटपुटलेले मी ऐकले...तेव्हा मी खालीच स्टेज जवळच होते ना!! आणि मग बापूंनी आईने सांगितलेल्या दिशेने बघून मस्त हात वर करुन अच्छा केला.. मला कमाल वाटली. आईचे किती बारीक लक्ष असते प्रत्येकाकडे...यावरुन ते मला समजले...
सगळे भक्त स्टेजच्या समोर आले की हलतच नव्हते..तेव्हा बापू आई दादा त्यांना हळूहळू पुढे सरका असे सारखे सांगत होते...भक्त थोडीच ऐकत आहे......आपल्या प्राणप्रिय सदगुरुला पाहण्यातच ते सगळे विसरुन गेलेले दिसले...खर तर हे भक्त पुढे सरकतच नव्हते स्वतःहून...मागचे भक्त पुढच्याला धक्का मारत पुढे येत होते...त्यामुळे हे पुढे जात होते...आणि तो मागचा भक्त स्टेजसमोर आला की तो तीथेच खिळायचा...मग त्याच्या मागचा भक्त स्टेजसमोरुन येण्यासाठी त्याला धक्का मारायचा...हे असच चालत होत...मला जाम गम्मत वाटली. एरव्ही जरासा धक्का लागल्यावर रागाने पेटणारी माणसे सदगुरु समोरुन कुणी धक्का मारल्याशिवाय हलणारच नाही अशाच ऍटीट्युड्मध्ये दिसली...जाम गम्मत वाटली...देवाला किती पाहू आणि किती सामावून घेऊ हाच भाव त्यांचा दिसत होता...आणि कितीही पाहीले सदगुरुला तरी ते कमीच वाटते...

मी फुल्टू फोटो काढण्यात बिझी होते...इथे तिथे लक्ष नव्हते....काही ग्रुप्स पुढे गेल्यानंतर बापू आणि त्यांचे सुरक्षारक्षक जाऊ लागले...स्टेजवर आई आणि दादा दर्शन देत होते...सगळे ग्रुप्स मिरवणूकीत गेल्यावर आई दादा पुन्हा हॅपी होमला गेले..

मिरवणूकीत सर्वप्रथम समीरदादा चालत होते...त्यांच्या पुढे तुतारीवाले आणि मागे लेझीम पथक होते...त्यांच्याबरोबरच स्वप्निलसिंह आणि पौरससिंह होते...ते सगळी मिरवणूकीची व्यवस्था पाहण्यात रमले होते...अधून मधून नाचत ही असावेत...मग झेंडे, गरुडटका घेऊन डीएमव्ही होते..नंतर एक एक ग्रुप्स पुरुष व महिलांचे होते....दिंडीचे ग्रुप होते...सगळे जण सॉलिड म्हणजे सॉलिडच नाचत होते...या सगळ्यांचे फोटो काढले...पाणी वाटप अखंड सुरु होते...प्रसाद वाटप चालत होते...वेगवेगळ्या स्पॉटवर गणूबाप्पाचे औक्षण करण्यात येत होते...सर्व भक्तांना औक्षण करण्याची संधी मिळत होती...

सगळे बेदम नाचले....मूली आणि महिलापण कुठेही कमी नाही...

बापू देखील भक्तांबरोबर नाचले....आणि काय नाचले सांगू!!!! त्यांच्या सारखे नाचणारे कुणीही नाही...मध्येच नाचायचे...चालायचे दोन्ही बाजूंनी जमलेल्या भक्तांना मनसोक्त हात वर करुन दर्शन द्यायचे...खरच ही मिरवणूक म्हणजे भक्तांची ऐश असते...

साधारण दहा वाजता मिरवणूक आटोपती घेतात...सगळे स्पीकर्स बंद करुन भक्तांना माघरी हॅपी होमला प्रसाद घेण्यासाठी पाठवतात...आणि काही ठराविक मंडळी बीचवर जातात...

हॅपी होमला सगळ्या भक्तांना प्रसादाच्या पॅकेटस देण्यात येते...यंदा आई आणि दादा स्वःत सगळ्यांना प्रसाद देत होते...आईच्या हातून प्रसाद घेऊन आम्ही आमच्या घरी परतलो....आता वाट पाहत आहोत ती पुढच्या वर्षीची अगदी त्याच दिवसापासून जेव्हा गणूबाप्पा त्याच्या घरी परतला...

अजूनही मिरवणूकीतील बापू आई दादा माझ्या डोळ्यासमोरुन जात नाही...आणि नकोच जायला....त्यांचे एक एक हाव भाव आठवत आहेत...अविस्मरणीय.....

सगळे  जण माझ्या मागे लागले आहेत...रेश्मा, आई बापू दादांचे फोटॊ देना!!! व्हीडीओ दाखव ना!!!..ब्लॉगवर टाक ना!!! पण खर सांगू. जरा वाट पहा....आपल्या नव्याने सुरु झालेल्या मनःसामर्थ्यदाता वेबसाईटवर लवकरच या अनोख्या गणेशोत्सवाचे फोटॊ आणि व्हीडीओ पाहण्यास मिळतील....थोडा धीर धरा....मला ही हे फोटो कधी साईटवर येत आहे अस झालेय....मला ही राहवत नाही म्हणून शेवटी शब्दातून चित्र उभं करण्याचा प्रयास केला आहे...देवाने जमवून घेतल आहेच...श्रीराम!!!! हरी ओम...बोला गणपती बाप्पा मोरया! अनिरुद्ध बाप्पा मोरया!!!!

Sunday, September 12, 2010

रांग....देवाची....

हरी ओम
काल बापूंच्या घरच्या गणपतीला जाण्याचे ठरविले होते. खर तर रात्रीची महाआरती अटेंड करायची होती. त्या हिशेबाने मी माझी मैत्रिण सोनाली शिंदे आणि तीची बहीण अशा आम्ही तीघी जणींनी कार्यकर्ताच्या पासाची रांग लावली. आम्हाला वाटले महाआरती पर्यंत आम्ही आत जाऊ..पण झाले भलतेच...आम्ही महाआरतीला ही हॅपी होम पासून खूप लांब उभे राहिलो होतो. खूप वेळ लागत होता दर्शनाला. यावर्षी पासून बाप्पाने संकल्प सुपारीची प्रथा सुरु केली आहे. त्यामुळेच हळू हळू पुढे रांग सरकत होती.. संध्याकाळी सात वाजता रांग लावली होती. पोटात काहीही नव्हते..त्यात साडी नेसली होती..बापरे...कस काय उभे राहणार होते देवालाच ठाऊक...

खर तर मला कधी देवासाठी ताटकळत रांगेत उभे राहण्याचा प्रश्नच आला नव्हता. तेही इतका वेळ...जेव्हा प्रथम बापूंच्या प्रवचनाला आले...तेव्हा मला कसलेच भान नव्हते...तर रांगेचे कसले असणार...पण इतकेच आठवते की तेव्हा ही फार काळ आम्हाला रांगेत उभे रहावे लागले नव्हते.. आणि त्यानंतर कायम मी कुठल्याना कुठल्या सेवेला असायचे म्हणून दर्शन पटकन व्हायचे..असो तर काल अर्थात गणेश चतुर्थीला बापूंच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी रांग लावली. संध्याकाळी सात वाजता रांग लावली. पण ते संकल्प सुपारीच्या प्रथेमुळे दर्शन खुप हळू सुरु होते. प्रंचड वेळ लागणार असल्याचे कळले. तरी पण ठरवले की रांगेतूनच जायच..काही ही झाले तरी...आमची पासाची रांग होती. पण ती जनरल रांग पाहून माझ्या पोटातच गोळा आला..त्या रांगेत उभे असणार्या प्रत्येक भक्ताला मनापासून वंदन करावेसे वाटले...इतका वेळ इतका मोठ्या रांगेत धीराने उभे राहणे हे कस शक्य आहे...हे फक्त तो भक्तच जाणतो आणि बापूच जाणतो. या रांगेत आबालवृद्ध, लहान मुले, स्त्री पुरुष अगदी शिस्तीने उभे होते. प्रत्येकाला काही ना काही त्रास होत होता..पण सगळे जण बाप्पाचे नाव घेत होत असलेला/नसलेला त्रास सहन करत रांगेत उभे होते. कुणी अखंड जप करीत होते, कुणी रामनाम वही लिहत होत, कुणाच्या अखंड बाप्पाच्या गप्पा रंगल्या होत्या आणि मी मात्र आपल्या मोबाईलवरुन नेट सर्फ करण्यात गुंगले होते...अर्थात आपली मनःसामर्थ्यदाता वेबसाईट पाहण्यात. मधे मधे पाऊस कोसळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र जणू बापूने दम दिला आणि गपचूप बसला अशी त्याची गत झाली होती. त्यामुळे हलकासा शिडकावा केवळ झाला. मला एका जागेवर स्थिर उभे राहणे अजिबातच शक्य नव्हते. त्यामुळे माझ्या सारख्या हॅपी होमच्या बाहेर चकरा सुरु होत्या. खर तर मी अस्वस्थ होते...कारण मला रांगेतूनच दर्शन घ्यायचे होते आणि महाआरती देखील अटेंड करायची होती...पण हे शक्य होईल असे वाटत नव्हते.

आठ-सव्वा आठ वाजता गुरुक्षेत्रमची आरती सुरु झाली. झाल!!! दर्शन थांबवले. त्यानंतर गणपतीच्या महाआरतीला सुरुवात झाली..अकरावाजे पर्यंत आरती सुरु होती..म्हणजे साधारण आठ वाजल्या पासून रात्री ११/११:३० पर्यंत दर्शन बंद होते...

पण काल वेळेची पर्वा कुणाला होती? प्रत्येक जण दर्शन घेऊनच जाणार या निर्धारानेच आला होता.. पण माझी गोची झाली. मला महाआरती अटेंड करायची होती आणि मी बाहेर...मी महाआरतीला कधीच थांबत नाही...पण आज खास महाआरती अटेंड करायची याच उद्देशाने आले होते...असो...वेळ पुढे जात होता....पोटात कावळे त्रास द्यायला लागले...जवळपास काही नव्हत....मग कुठे काही मिळतय का या उद्देशाने आम्ही पुढे हॅपी होमच्या दिशेने जाऊ लागलो...तोच आरती सुरु झाली. आणि आम्ही हॅपी होमच्या गेट समोरच उभे राहीलो....खूप गर्दी होती...पण मला अशी जागा मिळाली की जिथून थेट टीव्ही आणि टीव्हीवर बापूंच्या घरातील आरती स्पष्ट दिसत होती. आरतीचा आवज देखिल मस्त येत होता लाऊडस्पीकरवरुन...महाआरती अटेंड करण्याची इच्छा मस्त बापूंनी पूर्ण केली...जवळपास २२ ते २३ आरत्या मनमोकळेपणे म्हटल्या. अस वाटतच नव्हत की आपण कोणत्या तरी रस्त्यावर उभे राहून आरती अटेंड करतो...जी स्पंदने आतील लोकांना जाणवतील तसे़च मला बाहेर ही जाणवत होते...प्रसन्न वाटत होते...सगळ्यात मज्जा महिषासुरमर्दीनीच्या "माते गायत्री" या आरतीला आली. समोर आई चण्डीका होती...आणि उदे उदे उदे चा गजर आसमंतात भरल्यासारखा वाटला....त्यावेळी रोमांच उठले..त्यानंतर कोट्यावधी अपराध पतीत मी या रेणूकामातेच्या आरतीला डोळे भरुन आले...ही आरतीच अशी आहे. बापू पण भावूक झाल्य़ासारखे वाटले...नंतर आरती संपली आणि बापूंचे आभार मानून मी पुन्हा आपल्या रांगेत गेले..आरती सुरु होण्यापूर्वी भूक लागली होती हे मी विसरुनच गेले.. रांगेत गेल्यानंतर मग गजर सुरु झाला....रांगेत पुसटच ऐकू येत होता गजर... एक-दोन मिनिटे गजर झाल्यानंतर अचानक..."बापू गजर म्हणत आहेत" अस वाटल मला...हा आवाज बापूंचाच आहे..हे ओळखता आले...मी पुन्हा हॅपी होमला धूम ठोकली..गेटच्या बाहेरुन टीव्हीवर पाहण्याचा प्रयत्न केला...तर अरे हो!!  बापूच गजर घेत होते...सही..."मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया" मस्त गात होते....मज्जा आली...वेगवेगळ्या चालीत...मध्येच फास्ट मध्येच स्लो....त्यांना हवा तसा. आणि मध्येच त्या कॅमेर्यावाल्याने बापूंचा क्लोज अप घेतला..सॉलिड....त्या कॅमेर्यावाल्याला नशीब बुद्धी झाली क्लोज अप घ्यायची...आणि आम्हाला मस्त दर्शन झाले...क्लोज अप घेतल्यावर सगळे भक्त बापूंना पाहण्यासाठी धडपड करु लागले...सगळ्यांना धन्य धन्य वाटले...गजर झाला आणि पुन्हा रांगेत उभे राहिलो...
मग बरोबर १२ ला आम्ही गुरुक्षेत्रममध्ये शिरलो....इतक्यावेळ पायाला खडी लागत होती...पण जेव्हा गुरुक्षेत्रमच्या फरशीचा स्पर्श झाला....तेव्हा सगळा क्षीण निघून गेला....आता कितीही वेळ झाला तरी चालेल...पण बाप्पाचे दर्शन घ्यायचेच....रांगेत उभे होतो....उशीर झाला होता....१२:३० झाले....बहुतेक शेवटची ट्रेन चुकणार आता असच वाटले...म्हटल चुकली तर चुकली...होईल काही तरी सोय...आणि पुढे काय झाले ते माहीत नाही पण १२:४५ ला दर्शनाला आम्ही ७ व्या मजल्यावर गेलो होतो...हातात संकल्प सुपारी घेऊन... बापूंच्या घरी शिरलो तेव्हा काहिच त्रास होत नव्हता....तसेच गणपती बाप्पाचे आणि दत्तबाप्पाचे मनसोक्त दर्शन घेता आले..शांत चित्ताने नवस ही बोलता आला....पण बापू आई दादाचे दर्शन नाही झाले...

बापू आई दादाचे दर्शन नाही झाले.....पण कोणतीही खंत वाटली नाही किंवा वाईट वाटले नाही...कारण रांगेत उभे राहिल्यापासून बापू आई दादा तीघेही माझ्याबरोबर होते....त्यांचा हा "सहवास" मला त्यांच्या घरातून बाहेर पडताना जाणवला...कारण तीघांचेही दर्शन झाले नाही याची तसू भरही खंत तेव्हा मनात नव्हती....का? याचा विचार केल्यावर कळल की ते माझ्या बरोबरच होते कायम....अगदी घरी रात्री २:२० ला पोहचेपर्यंत. तसे ते नेहमी असतातच..पण मीच विसरते..

रात्री बिछान्यावर पडताना....शरिराचा एकेक भाग दुखत होता...पण या देवाच्या रांगेतील एक एक गोष्ट आणि एक एक अनुभव आठवून मला हसू येत होते....मी कशी काय या रांगेत उभे राहीले? हा प्रश्न पडला...पण लगेच त्याचे उत्तर सापडले...रांगेत मी उभीच नव्हते....ही देवाची रांग होती...आणि देव़च रांगेत उभा होता...नाही का? नाहीतर आपल्यात एवढी शक्ती आहेच कुठे?
पण एक बर वाटल....देवासाठी ताटकळत राहण....ज्या वाटेने हजारो भक्त गेले त्या वाटेने आपणही जाण....आणि मुख्य म्हणजे रांगेत उभे राहून देह झिजवणे....आणि थोडे शारिरिक कष्ट घेणे अस बरच काही अनुभवता आले....आणि खरच जे इतक्या वेळ रांगेत उभे राहिले...नेहमी राहतात....या सामान्य भक्तांच्या या असामान्य निर्धाराला मनापासून सलाम!!!! आणि  मी देखिल यांच्यातलीच एक आहे...आणि कायम राहो ही प्रार्थना!!! श्री राम

झालो जरी कुणीही आम्ही
सामान्यत्व सुटु नये
सामान्यातील असामान्यत्व
आमुचे कुणी लुटू नये....

Friday, September 10, 2010

गणपती माझा नाचत आला!!!

आज घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे..मी अनुभवलेले गणरायाचे सगळ्यात सॉलिड आगमन म्हणजे बापूंच्या घरच्या गणपतीचे आगमन. संध्याकाळी चार पाचच्या सुमारास बांद्रा पश्चिम लिंक रोडवरील अमरसन्स शोरुमजवळच्या गल्लीतून बापूंच्या घरच्या गणरायाच्या आगमनाची मिरवणूक निघते. सगळ्यात पुढे लेझीम पथक, नंतर दिंडी, आणि बेन्जो असे वेगवेगळे ग्रुप्स या मिरवणूकीत् सहभागी होतात. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करुन मिरवणूकीला सुरुवात होते..अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लहान मुले-मुली, महिला-पुरुष भक्तगण या मिरवणूकीत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या मिरवणूकीत सगळे स्वतःला विसरुन सहभागी होतात. सॉलिड नाचतात. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये आणि डॉ. पौरससिंह जोशी यांच्यासह समस्त बापू भक्तगण परिवार या मिरवणूकीत सहभागी होतो. अंधार होता होता...मिरवणूक बापूंच्या घराजवळ हॅपी होमला पोहचते..गजर, संगीत आणि बाप्पाच्या आगमनाचा आनंद टीपेला पोहोचतो. हॅपी होमच्या गेटजवळ भक्तांची अलोट गर्दी दाटलेली असते. गेटवर लेझीम पथक आधी येते...बापू आई दादा स्वतः गणरायाचे स्वागत करण्यासाठी खाली सज्ज असतात. लेझीम पथक आपले वेगवेगळे कर्तब बापूंपुढे सादर करतात..प्रत्येक जण बापूंचे दर्शन घेऊन नाचत पुढे जातो...मग मागून गणराय येतो...नंदाई गणरायाचे स्वागत करण्यासाठी औक्षणाचे ताट घेऊन आलेली असते. अत्यंत प्रेमाने नंदाई गणरायाचे औक्षण करते. मग गणेशमूर्ती घरी नेल्यावर बापू बेन्जोच्या तालावर सॉलिड नाचतात. त्यावेळेला जे तिथे वातावरण असते त्याचे कुणी वर्णनच करु शकत नाही, असे मला वाटते. ही गोष्ट प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी. गेल्यावर्षी मी हे सारे अनुभवले...आता यंदा काय काय होतेय याची मला आता उत्सुकता लागली आहे...मिरवणूक सुरु होण्यापर्यंतची अधीरता आणि सगळा कार्यक्रम संपल्यानंतरची तृप्तता याच्यासारख दुसर काही नाही....अरे हो!! ही तर फक्त आगमनाच्या मिरवणूकीची गोष्ट सांगितली....खरतर विसर्जनाच्या मिरवणूकीची याहून मोठी धम्माल आहे...आगमनाची मिरवणूक म्हणजे विसर्जन मिरवणूकीच्या तुलनेत फक्त १ टक्के आहे असे मला वाटते...सो. आज या. अनुभवा! पण एक लक्षात ठेवा...हा ट्रेलर आहे....पूर्ण पिक्चर तर सोमवारी आहे!!!!!
मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!

Friday, September 3, 2010

शक्ती दे_ एका दहावीतल्या मुलाची सुंदर कविता

 माझ्या सहकारी प्रभावीरा खिलारी यांचा मुलगा निखिल खिलारी याने बापूंवर अत्यंत सुंदर कविता केली आहे.. तो नववीत असताना त्याने ही कविता केली होती...नक्की वाचा...


शक्ती दे


तूच आहेस मनःसामर्थ्यदाता
तूच आहेस शक्तीदाता
विनायका तू, गजानना तू
तूच आहेस बुद्धीदाता
कृपासिंधु तू बलदाता

तूच धावशी संकटाला
तूच येई मदतीला
इथवर आलो दोन्ही कर जोडूनी
तुझ्या चरणांशी ठेवूनी मस्तक माझे
म्हणता, म्हणता माझे जीवन सर्व झाले तुझे

नकोसा झाला हा लाचार जन्म
ह्या जन्माला तू कुठेतरी वळण दे
दे मज शक्ती तू बलशाली
प्रतिकार करावया त्या शत्रूशी

पेटून उठू दे अंगात त्यागाच संचार
नसानसांत सळसळून उठू दे रक्ताचा अंगार
पुन्हा नव्याने जगण्याची, उसळण्याची तू शक्ती दे

निलेश सुरेश खिलारी
इयत्ता दहावी