Tuesday, February 1, 2011

MAHARASTRA TIMES- SAGUN NIRGUN

महाराष्ट्र टाईम्समधील "सगुण-निर्गुण - माझे अध्यात्म" या सदरामध्ये २५ जानेवारी २०११ आणि १ फेब्रुवारी २०११ रोजी  डॉ. राजीव कर्णिक यांचे "श्रद्धेतील बळ" व "नास्तिकेकडून आस्तिकाकडे" हे लेख प्रकाशित झाले आहेत. प. पू. सदगुरु श्री अनिरुद्ध बापू...यांच्या मनःसामर्थ्यदायत्वाची साक्ष देणारे हे लेख वाचून भरुन आले. महाराष्ट्र टाईम्सने डॉ. राजीव कर्णिकांचा हा अनुभव आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. टाईम्स ग्रुपकडून नेहमीच सदगुरु अनिरुद्ध बापू यांच्या बद्दल माहिती दिली जाते.  त्यांच्याकडून प. पू. बापूंच्या संस्थेतर्फे सुरु असलेल्या भक्तीमय सेवांची कायम दखल घेतली जाते. याबद्दल टाईम्स ग्रुपचे आभार.....



Saturday, December 25, 2010

बापूराया, हे वर्ष चमत्कारीक आहे


हे वर्ष चमत्कारीक आहे
जे कधी नव्हते ते
सगळ यंदा घडत आहे

मनात उमटलेली पुसटशी इच्छा देखील
सदगुरु पूर्ण करीत आहे
त्याचे भरभरून प्रेम अनुभवताना
माझी आकृती घडत आहे
जे कधी नव्हते ते
सगळ यंदा घडत आहे
बापूराया, हे वर्ष चमत्कारीक आहे

परीसस्पर्शाची अनुभूती
सोबतीला अनिरुद्ध गती
प्रत्येक सुप्त इच्छेची पूर्ती
सुख आणि दुःखाचीही तृप्ती
सगळी कसं असं जमवून आणले आहे
जे कधी नव्हते ते सगळ यंदा घडत आहे
खरच बापूराया,  हे वर्ष चमत्कारीक आहे

गेल्या २५ वर्षात जगले नसेन
असे आयुष्य या एका वर्षात जगले
सदगुरु तुझी मी किती ऋणी झाले
अन तुझीया लिलेने भरुनी पावले
यशाअपयशाच्या व्याख्या तू सार्या बदलल्या
कल्पना ही केली नसेन अशा घटना घडविल्या
अजब लाभेवीण प्रेमाची ही जणू गजब कहाणी आहे
जे कधी नव्हते ते सगळ यंदा घडत आहे
खरच बापूराया,  हे वर्ष चमत्कारीक आहे

जे घडतेय ते असच सुरु राहू दे
सुख असो की दुःख ते तुझ्या इच्छेने येऊ दे
तुझी इच्छा माझे प्राण होऊ दे
माझी इच्छा तुझे गुणगान होऊ दे
हे वर्ष संपताना माझ्या इच्छा देखील संपतील
पुढील वर्षी मात्र फक्त तुझ्या इच्छा उरतील
तुझ्या इच्छेच्याच प्रातांत राहण्याचा माझा
नवीन वर्षांचा संकल्प आहे
जे कधी नव्हते ते सगळ यंदा घडत आहे
खरच बापूराया, हे वर्ष चमत्कारीक आहे

- रेश्मा हरचेकर २५/१२/२०१०

Friday, December 24, 2010

वास्तूबाधा

वास्तूबाधा विषयी सागताना प.पू. बापूंनी २३ -१२ २०१० च्या प्रवचनात  सांगितलेले काही महत्वाचे points

१) स्वतःच्या घरात कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये .

२) तुमच्या घरात कोणीही मनुष्य बाहेरून आत आला की प्रथम त्याला तुमच्या देवाचा /सद्गुरूंचा फोटो दिसलाच पाहिजे.(ह्यामुळे जर कोणी मनुष्य वाईट हेतू घेवुन तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर त्याचे विखार (वाईट विचार ) तुमचा देव स्वत:कडे घेतो .)

३) किचन मध्ये तुमच्या शेगडीच्या विरुद्ध (समोरच्या बाजूस तुमच्या  देवाचा फोटो असलाच पाहिजे .
ह्यामुळे तुमच्या घरात जे अन्न शिजते ते तुमच्या देवाच्या नजरेखाली बनते.

४) तुमच्या बाथरूम मध्ये नळाच्या वरती कुंकू/हळद/अष्टगंध ह्याने रोज स्वस्तिक काढावा. तो paint करून घेवु नये . तर रोज हाताने काढणे आवश्यक आहे. जर शौचालय  व  बाथरूम एकत्र असेल तर शौचालायापासून दूर नळाच्या वर स्वस्तिक काढावा.

५) रोजची अंघोळ म्हणजे स्वत: स्वत:ला अभिषेक करणे म्हणून रोजची आंघोळ करताना सद्गुरूंचे नामस्मरण करावे .(ॐ ग्लौम  अनिरुद्धाय नम: )

**** तुमच्या राहत्या घरात जर वास्तू बाधा आहे असे जाणवत  असेल तर पुढील तीन  महत्वाच्या गोष्ठी प.पू.बापूंनी  करण्यास  सांगितल्या .

१) कुठल्याही एका मंगळवारी आदिमाता चंडीकेचा फोटो हृदयाशी डाव्या बाजूला धरून श्री गुरूक्षेत्रम मंत्र म्हणत दिवसाच्या आठ भागात प्रत्येक वेळी कमीत कमी ६ मिनिटे घरात फिरावे . ( दिवसाचे  आठ भाग म्हणजे रात्री ११.३० ते दुसर्या दिवशी रात्री ११.३० पर्यंतचा काळ .ह्या काळाला ८ भागात विभागणे म्हणजे ३ तासाचा एक भाग होतो. ह्या एका भागात ६ मिनिटे असे ८ वेळा म्हणजे ४८ मिनिटे वर सांगितल्या प्रमाणे श्री गुरूक्षेत्रम मंत्र म्हणावा .( ** असा मंत्र म्हणताना त्या मंगळवारी  घरात उपस्थित असणार्या कोणाचा वाढदिवस नसावा व तो दिवस अमावास्येचा नसावा )

२)  घराला जर भूत किवा अन्य कुठली बाधा जाणवत असेल तर कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी डाव्या हातात उदीचे भांडे  घेवून उजव्या हाताने घराच्या  उंबरठ्यापासून उदी लावायला सुरुवात करावी व सगळी कडे  भिंती , कपाटे ,बाथरूम  प्रत्येक ठिकाणी घरात उदी लावत जावे . उदी लावण्याचा काळ पौर्णिमा जेव्हा सुरु होते व जेव्हा संपते ह्या मधलाच असावा. ही गोष्ट वर्षातून एकदा केली तरी चालते .

३) तिसरी महत्वाची  वास्तू बाधानाशक गोष्ट  म्हणजे प्रपत्ती ..श्री रण चंडिका  प्रपत्ती व  श्री मंगल चंडिका प्रपत्ती .

" तुमची स्वत:ला जेवढी खात्री नसेल तेवढी मला तुमची  खात्री आहे ..तुमचे दोष मी मोजत नाही तर तुमचे गुण मी मोजतो ". --- प.पू. सदगुरू श्री अनिरुद्ध बापू

----- ( श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन ..२३-१२-२०१० )

Friday, November 26, 2010

मला समजलेली अनिरुद्ध परेड - १ (ANIRUDDH PARADE)

हरी ॐ
परेडचे अनुभव लिहून झाल्यावर आता मी मला समजलेली अनिरुद्ध परेड यावर थोडसे लिहणार आहे. अर्थात हे पूर्णतः माझ मत आहे. कारण नुसत परेडला येणं आणि जाणं अस मी कधीच केल नाही. परेड समजून घेऊन पूर्णतः त्यात सहभाग घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यामुळे ही परेड मला काही तरी नवीन शिकवीत आली. जे काही मला समजल तेच मी तुमच्यापुढे मांडणार आहे. बाकी काही नाही. आज पर्यंतच्या लिखाणाला तुम्ही भरभरुन प्रतिसाद दिला त्याबद्दल श्रीराम!!! यापुढे ही देत राहाल ही खात्री आहे. तर सुरुवात करुया आपल्या अनिरुध्द परेडला.

प्रत्यक्षमध्ये लागले त्याच्या दुसर्या वर्षी मला शिवाजी पार्कमध्ये प्रजासत्ताक दिनाला होणार्या परेडचे फोटो काढण्याची संधी मिळाली होती. हा इव्हेंट माझ्या दृष्टीने फारच महत्त्वाचा होता. कारण प्रथमच मी अशी परेड पाहणार होते. परेडला सुरुवात झाली. त्यातील पहिल्या आणि दुसर्या प्लाटूनची परेड पाहून मी क्षणभर फोटो काढायचीच विसरले. आहाहा!! काय ती सुरेख परेड. एका लयीत हात, पायची हालचाल..कुठेही कुणीही चुकत नाही. कमालीची शिस्त..क्लासिक दहिने देख..त्यांना पाहून वाटले..छे!! आपण काही अशी परेड केलीच नाही..माझा कधी पायच बेंड होतो..तर कधी हातच बेंड होतो..कधी पोक काढून चालते..कधी शूटींग लेगला प्रोब्लेम..पण हे सैनिक कसे बरे एवढ परफेक्ट करतात..कस जमत कस यांना...नकळत केली होती तुलना मी तेव्हा..पण ही केलेली तुलना मला खूप काही देणारी होती. खूप विचार करायला लावणारी होती. तेव्हा मला प्रश्न पडला हे लोक का करतात परेड? यांचे काही परेड करण हे काम नव्हे? मग मला ही प्रश्न पडला मी का केली परेड? का बर करायची परेड? हे प्रश्न पडले आणि या प्रश्नांची उत्तरे बापूरायानेच शोधून दिली. (एव्हाना परेड सोडून मला वर्ष उलटल होत.)

ए ए डी एम आणि रेस्क्यु ही माझी सेवा...हे माझे काम..आणि हे काम ही सेवा करताना मला शिस्त लागावी म्हणून परेड...ही माझी प्रामाणिक समजूत. परेड करण्याच्या आधी मी अनेक ए ए डी एमच्या सेवा अटेंड केल्या..पण परेडमध्ये जॉईन झाल्यानंतर सगळ्या सेवा एका शिस्तीने करण्याची सवय मला लागली..म्हणजे साध उदाहरण द्यायच म्हणजे लाईन कंट्रोल करताना तासनतास टंगळ मंगळ न करता एका जागेवर उभी राहण्याची सवय..मी मुळातच फार चंचल आहे..त्यामुळे एका जागी उभे राहून सेवा करण म्हणजे मला तरी अशक्य...परेडच्या सवयी मुळे ही चंचलता दूर झाली. तसच उभ राहण्याचा स्टॅमिनापण वाढला. खर तर सेवेला उभ राहिले की कुणीही निष्ठेने सेवा करत पण शेवटी प्रत्येकाच्या शरीराच्या क्षमतेची मर्यादा असते..ही क्षमता वाढविण्याचे काम परेडमुळे झाले..पूर्वी तर तासन तास आम्ही उभे राहयचो. त्याचा फायदा झाला. सेवा करतानाच नाही तर पुढे फोटोग्राफीच्या करीयरमध्ये परेडचा प्रचंड फायदा झाला.

लालबागच्या राज्याची गर्दी आणि त्याची विसर्जन मिरवणूक तुम्हाला सांगायला नको. तिथे परळला लालबागच्या राज्यावर पुष्पवृष्टी होते. तो फोटो काढण्यासाठी सकाळी ११.३० वाजल्यापासून मी एका दुकानाच्या छपरावर जागा पकडून उभी होती. आजूबाजूला व्हीडीयोग्राफर आणि फोटोग्राफर होते. जरा हलले की शिव्या पडायच्या. त्यामुळे नुसती उभी. पायाला खालून गरम पत्र्याचा चटका आणि डोक्यावर मध्यानीचा सूर्य अशा परिस्थीत तिथे बाप्पाचे नाव घेत उभी होते. आधी इतर गणपती आले. त्यांचे फोटो काढले आणि मग चारच्या सुमारास लालबागचा गणपती आला. तेव्हा श्वास रोखून त्याचे फोटो काढले. तो एक क्षण टीपण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. खर तर बापूरायाची कृपा म्हणून मी उभी राहू शकले..पण मी करु शकेन उभी राहेन हा आत्मविश्वास कुठून आला? परेडमुळेच. अगदी १०८ टक्के. परेडमुळेच माझा आत्मविश्वास विकसीत झाला आणि ही परेड कुणासाठी आणि कुणाची तर अनिरुद्धाची आणि अनिरुद्धाचसाठी..

या अनुभवानंतर मला समजले की ही परेड का करायची आणि याने काय होते ते. परेडमुळे स्टॅमिना वाढतो. तसेच आत्माविश्वास ही वाढतो. रेस्क्युअर म्हणून काम करताना स्टॅमिना आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. मला सगळ्या रेस्क्युच्या मेथड येतात पण समोर असलेली कॅझ्युलटी हॅण्डल करण्याचा आत्मविश्वास आणि स्टॅमिना नसेल तर???

परेडमध्ये गेल्यानंतर मी आणखी कणखर झाले. मनाने कणखर झाले. समोर आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याची हिम्मत वाढली. तसेच मी एक रेस्क्युअर आहे आणि त्यानुसार निडर आणि संयमी मानसिकता बनविणे शक्य झाले. जेव्हा मी सैनिक आहे ही भावना दृढ होते...तेव्हा सगळ आपोआप जमतेच...वेगळ काही करण्याची गरज भासत नाही अस मला वाटते. असे नसते तर गुरुपौर्णिमेला रेल्वेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील जखमी प्रत्यक्ष पाहण्याची आणि त्याहूनी वाईट, त्यांचे फोटो काढण्याची हिम्मत झाली नसती. त्यावेळी डोक फुटलेला एक माणूस रक्ताच्या थारोळ्यात समोरुन येत होता, त्याला पाहून मला धक्का बसला पण नंतर परेडने दिलेला संयमीपणा कामी आला आणि स्वतःला सावरता आले. दुसर्याच क्षणी निडर होऊन कणखर होऊन छिन्नविच्छीन्न झालेल्या मृतदेहाचे आणि उद्धवस्त झालेल्या त्या फस्ट क्लासच्या डब्याचे फोटो काढले. तिथे तर जणू रक्ताची रंगपंचमी झाली होती.

परेड केल्यावर आधीचे दोन रविवार त्रास होतो मग नंतर एकदम फ्रेश वाटू लागत. चरखा रेग्युलर चालवला तरच तो मस्त चालतो. खूप दिवस चरखा बंद असेल आणि  अचानक आपण चालवायला घेतला तर तो नीट चालतो का? सूत निघते का व्यवस्थीत? नाही..आपल्या शरीराचेही तसेच आहे. रेग्युलर परेडमुळे कायम ऍक्टीव्ह राहता येत. शरीर ऍक्टीव्ह राहत. बुध्दी ऍक्टीव्ह राहते आणि मनही ऍक्टीव्ह राहत. तर आज तुम्हाला परेडचे काही फायदे सांगते जे मला समजले.
१) शिस्त लागते
२) स्टॅमिना वाढतो
३) आत्मविश्वास वाढतो
४) ऍक्टीव्हनेस वाढतो
५) संयम वाढतो
६) निडरता वाढते
७) सभानता वाढते
८) जाणिव वाढते
९) कार्यक्षमता वाढते
१०) एकाग्रता वाढते
११)  निरिक्षण क्षमता वाढते
१२) कल्पकता वाढते
१३) नेतृत्व क्षमता वाढते
१४) संपर्क व संवाद वाढतो
 हे काही फायदे आहेतच...या व्यतिरिक्त  ही अनेक आहेत...ह्या गुणांच्या विकासामुळे आपल्या खाजगी, व्यावहारीक, शालेय, कार्यालयीन आयुष्यामध्ये ही फायदा होतो..हो पण तसा तो फायदा करुन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

शिवाय आपली ही परेड अनिरुद्ध परेड आहे म्हणजेच अध्यात्माचा पाया असलेली परेड... मग हीचा प्रत्येक फायदा हो दुप्पटच होणार..अध्यात्मामध्ये सांघिक भक्तीला महत्त्व जास्त आहे...त्याचे फायदे ही जास्त आहेत. त्याचप्रमाणे परेडमध्ये ही सांघिकतेलाच महत्त्व आहे. एकट्याची परेड कधी असूच शकत नाही. सर्वांना एकत्र आणण्याची, माणसे जोडण्याची ताकद असणारी ही परेड आहे.....फक्त प्रश्न  माझ्या दृष्टीकोनाचा आहे..माझ्या मेहनतीचा...आणि माझ्या कमिटमेंटचा आहे...बाकी सगळ क्षेम कुशल पाहण्यास अनिरुद्ध समर्थ आहे....आहेच....
आता जे मला वाटले ते मी तुमच्यासमोर मांडले...पुढेही मांडत राहीत...कारण एकच

युद्धकर्ता श्रीराम ममः
समर्थ दत्तगुरुः मूलाधार
साचार वानरसैनिको अहं
रावण वधः निश्चितः

Wednesday, November 24, 2010

अनिरुद्धाचे तरुण...

हरि ॐ

"कायम तरुणच रहा" हा बापूरायाने दिलेला मंत्र खूप काही सांगून जातो...परेड फाऊंडेशन डेला बापूरायाने त्याच्या परेडच्या सर्व "तरुण" फौजेला हा मंत्र दिला...पण इथे वयाचे तारुण्य अपेक्षित नव्हते....तर वृत्तीचे, कृतीचे, कार्याचे तारुण्य अपेक्षित होते...तारुण्य म्हणजे केवळ कॉलेज विश्वात फुकट शायनिंग मारणार्या मुलांचे भरकटलेल वर्तन नव्हे...तर तारुण्य म्हणजे चैतन्य...तारुण्य म्हणजे नवीन काही करण्याची उर्मी...तारुण्य म्हणजे नवीन बदल स्वीकारण्याची मानसिकता...तारुण्य म्हणजे मोठेपणावर मारलेली काट आणि स्विकारलेले जाणारे लहानपण...तारुण्य म्हणजे एखाद्या ध्येयाने प्रेरित झालेले आयुष्य....तारुण्य म्हणजे कार्यशक्ती....अस मला वाटते...कारण जो स्वतःला वृद्ध समजू लागला त्याची कार्यशक्ती आपोआपच मंद होत जाते..मग अगदी २५ वर्षाचा तरुण आळसात आपले दिवस घालवू लागला तरी तो वृद्धच आणि वयाने वृद्ध असणारे पण तरुणांना लाजवेल अशा जोशाने कार्यरत असणारे सर्व जण म्हणजे जिंदादील तरुणच...अशा या आगळ्या तरुणाईशी अनिरुद्ध परेडमध्ये ओळख झाली....त्यांच्याविषयीच थोडेसे लिहणार आहे....

शनिवारी परेड सराव म्हणजेच रंगीत तालिम करताना एका प्लाटूनमध्ये एका व्यक्तीला परेड करताना पाहिले आणि आश्चर्याने पाहतच बसलो...आमच्या आजोबांच्या वयाचे एक डीएमव्ही सफाईदारपणे परेड करीत होते...दुसर्या दिवशी त्यांची भेट घेण्याचे ठरविले...औरंगाबाद प्लाटून मधील अरुणसिंह शास्त्री वयवर्षे
Arunsinh Shastri
६५.....त्यांच्याशी संवाद साधायचा म्हणजे कुठून सुरुवात करु हेच कळेना....त्यांना मी विचारले...कधी पासून अनिरुद्ध परेड पथकात आहात...मला उत्तर अपेक्षित होत...आत्ताच जॉईन केली...पण खर तर त्यांनी २००४ पासून परेड जॉईन केल्याचे त्यांनी सांगितले..हे ऐकून खरच मला त्यांचा अभिमान वाटला....त्यांनी सी सर्टीफीकेट मिळविले आहे....आणि त्यांना परेडची सवय असल्याचे त्यांनी मला सांगितले...त्यांना कुठलाही त्रास होत नाही...आणि तरुणांच्या बरोबरीने ते परेड करतात...आणि खरच त्यांची परेड खूप सुंदर आहे...त्यांना मी सहज एक प्रश्न विचारला की आम्हा लहान मुलांसोबत परेड करताना...आमच्या कमांडखाली कार्य करताना कस वाटत...तेव्हा ते म्हणाले खरच खूप छान वाटते...अस लहान मोठ काही वाटत नाही...सगळे एकाच पातळीचे आहोत...त्यांच्या या उत्तराने मला त्यांच्यातील तरुणाईची साक्ष पटली...त्यांनी स्वतःहून दोन ते तीन पिढ्यांमधील जनरेशन गॅप कमी केला....आणि यापूढेही ते परेडमध्ये राहणार अस त्यांनी सांगितले...
Vinayaksinh Joshi

त्यानंतर मी औरंगाबादचे ४५ वर्षीय विनायकसिंह जोशी यांची भेट घेतली...त्यांच्याशी संवाद साधताना...इच्छा असेल तिथे मार्ग...ही उक्ती कशी परफेक्ट आहे हे जाणवले...विनायकसिंह यांना सैन्यात जाण्याची फार इच्छा होती...मात्र त्यांना त्यांच्या कमी उंचीमुळे जाता आल नाही..एनसीसीमध्येही त्यांना भाग घेता आला नाही..सैन्यात भरती होण्याची त्यांची ही तीव्र इच्छा पूर्ण झाली नाही....मात्र ही तीव्र इच्छा अनिरुद्ध पथक परेड मध्ये पूर्ण होणार होती..म्हणून त्यांनी परेड जॉईन केली...सैनिक नाही होता आलं. पण वानरसैनिक बनण्याची संधी त्यांनी सोडली नाही..आणि परेड मध्ये असल्याचा आनंद, अभिमान आणि उत्साह त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता...ते पुढे तर परेड कंटीन्यू करणारच आहेत..शिवाय त्यांनी आपल्या मुलीला देखील परेडमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठींबा दिला आहे...त्यांची मुलगी देखील पुढच्या प्लाटूनमध्ये होती...
Vinaysinh Chndrate
त्यांच्याच प्रमाणे विनयसिंह चंद्राते (५७) दिलीपसिंह जोशी (५०) यांनी देखील याचवर्षी पासून परेड जॉईन केली...आणि ते पुढे देखील परेड करीत राहणार आहे...या सर्वांना सुरवातीला थोडा त्रास झाला...पण म्हणतात ना डर के आगे जीत है.....तसच...त्या त्रासाची पर्वा न करता त्यांनी परेड करण्याचा निर्धार केला आणि आता ते फिट आहेत...

परेडसाठी फिटनेस हवा हे महत्त्वाचे आहे....म्हणजे अगदी कसला तरी भयानक त्रास आहे आणि मी परेड जबरदस्ती करतोय व त्रास वाढवून ठेवतोय..हे चूकीचेच..पण जर आपण फिजीकल फीट आहोत तर परेडमध्ये सहभागी होऊन हा फीटनेस वाढविता येऊ शकतो...पुढे बापूरायाचीच इच्छा...

Kailassinh Shete
Ganeshsinh Nanivadekar
त्याची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत परेड नक्कीच करु अस रत्नागिरि प्लाटूनच्या ४७ वर्षीय कैलाससिंह शेटे आणि ५३ वर्षीय गणेशसिंह नानीवडेकर यांनी सांगितले..कैलाससिंह यांची मुलगी आणि गणेशसिंह यांचा मुलगा परेडमध्ये सहभागी आहेत...खरच असे प्रोत्साहन देणारे वडील पाहून खरचं खूप छान वाटले..नुसते प्रोत्साहनच नाही तर स्वतः देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून परेडमध्ये सहभागी झाले...खरच त्यांना हॅटस ऑफ..
त्यानंतर मी मुंबई प्लाटूनच्या ५३ वर्षीय किरणसिंह पेटीवाले यांना भेटले...त्यांना तर मी स्वतः सराव करताना पाहिले...कुठलिही कुरकुर न करता इतरांप्रमाणे सर्व काही करीत होते...त्यांच्या उत्साहाला खरच सलाम....
Kiransinh Petiwale
Darshanaveera Bhat
जिथे हे सर्व सिंह आपले धैर्य दाखवत होते तेथे वीरा ही मागे नव्हत्या. प्रत्येक मुलींच्या प्लाटूनमध्ये या महिला डीएमव्ही आपला ठसा उमटवून होत्या....त्यांचे वयच कुणी सांगू शकणार नाही या जोशात परेड करत होत्या. आणि परेडचा ड्रेस अंगावर चढवला की मुलगा मुलगी..लहान मोठे हा फरकच विरुन जातो...उरतात फक्ता सिंह आणि वीरा....
पुणे प्लाटूनच्या ३३ वर्षीय दर्शनावीरा भट ह्या गेली २ वर्षे परेड येत आहेत आणि प्राऊड फील करतात. अनेक महिला होत्या...खरच त्यांच्याकडे पाहून खूप अभिमान वाटला..नेहमी साडी आणि पंजाबी ड्रेस घालणार्या महिला परेडचा गणवेष घालताना जराही कचरत नाही...त्यांच्या ह्या धीराला सलाम...खरी मज्जा तर मला नंतर आली...आमच्या मुंबईच्या दुसर्या प्लाटूनमध्ये नालासोपार्याची एक मुलगी होती...तिचे नाव आठवत नाही आडनाव सिंग आहे. तिची आईपण आमच्याच प्लाटूनला होती...मी म्हटल आई आणि मुलगी एकत्र वा छान!! तेवढ्यात दुसरी मुलगी म्हणाली आई आणि मुलगी नाही तर मुलगा पण आहे....तो अंडरट्रेनी प्लाटूनमध्ये होता...वा...खरच या सिंग कुटुंबाचा अभिमान वाटला...याच बरोबर तीन जोडपी देखील परेडला होती..नवरा बायको....दोघेही परेडला...खरचं..एक जण तर होते...ते लवकरच दुबईला शिफ्ट होणार होते...पण त्या आधी परेड करायची म्हणून ठरविले होते..आदल्या रात्री गणवेश शूज तयार ठेवले आणि परेडला दुसर्या दिवशी हजर...
खर सांगायची तर ही काही निवडक उदाहरणे मी दिली आहेत...अजून अनेक उदाहरणे परेडमध्ये आहेत...यांच्या उदाहरणातून काही मुद्दे तुमच्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
खर तर इच्छा असेल तर काहीच अशक्य नाही..आणि बापूराया म्हणतोच...तू आणि मी शक्य नाही अस या जगात काहीच नाही...मग अडतय कुठ....आपल्याच मधील ह्या डीएमव्हींकडून शिकले पाहिजे....आणि एकदा तरी त्याला सलामी देता आली पाहिजे....
ही सलामी म्हणजे देखील दुसर काय हो...."मी तुझा आहे आणि फक्त तुझाच आहे....तुझ्यासाठीच इथे आहे....आणि तू आहेस म्हणून मी आहे" हाच भाव...मी देतो ती सलामी म्हणजे मी बापूंना घातलेली "साद" आणि तो देतो ती सलामी म्हणजे "प्रतिसाद"...आणि माझी "साद" जितकी तीव्र तितका त्याचा "प्रतिसाद" जलद...ह्याचा अनुभव देणारी सेवा म्हणजे "अनिरुद्ध पथक परेड"

Tuesday, November 23, 2010

परेड - अविस्मरणीय अनुभव - भाग शेवटचा (LAST PART)

हरि ॐ
अनिरुद्ध पथक सावधान....अनिरुद्ध पथक बाये से तेज चल........
चिफ परेड कंन्सलटण्ट बांगर सर यांनी ही कमांड दिली...आणि घोषपथकाने व सर्व परेड डीएमव्ही ठेका धरला...एक दो एक....तेज चल करीत स्टेजच्या उजवीकडून डावीकडे परेड सुरु झाली. स्टेजवर बापू उभे होते...तिरंगा आणि संस्थेचा ध्वज घेऊन पहिले परेड डीएमव्ही पुढे आल्याबरोबर बापूंनी सलामी दिली...नंतर मागाहून येणार्या प्रत्येक प्लाटूनने बापूंना सलामी दिली...

आम्ही सलामी देताना आणि बापू सलामी स्विकारतानाचे चित्र......हेच परेडचे शिखर...

ह्यावेळी काय वाटत हे तिथे परेड केल्याशिवाय खरच कळणार नाही...पण बापूंना त्यांच्या चिल्ल्यापिल्यांना सलामी देताना नक्कीच अभिमानाने उर भरुन येत असणार...बापूंना सलामी देताना पाहून परेड डीएमव्ही म्हणून माझ्यावर त्याने सोपविलेल्या जबाबदारीची जाणिव झाली...किती विश्वास ठेवतोय बापू माझ्यावर...किती कौतुक करतोय हा बापूराया माझ....अस वाटत..आणि सहज मनातून एकच शब्द उमटतो श्री राम!! आणि पुढचा प्रवास सुरु होतो....

सुमारे ८०० हून अधिक परेड डीएमव्ही एका तालात परेड करीत होते...ही परेड पाहताना...अनेकांचे डोळे भरुन आले....अंगावर शहारे आले...ही परेड कशी झाली हे खरच मी नाही सांगू शकत...कारण त्या परेडचा मी एक भाग होते...ज्यांनी ती पाहिली ते खूप चांगले सांगू शकतात...माझ्यासाठी ही परेड म्हणजे अविस्मरणीय सोहळा होता....या पलिकडे मी काही सांगू शकत नाही....

मला सांगायला खुप आनंद होतोय की अखेर परेड एक अविस्मरणीय अनुभव हा या अनिरुद्ध पौर्णिमेच्या परेड अनुभवापाशी "थांब"तोय...खर तर आता जो काय परेडचा अनुभव आहे तो शब्दांपलिकडचा आहे...आणि खर सांगू मला आता फार रिकामे रिकामे वाटतेय...आणि खूप बरे वाटत आहे...त्यामुळे आता या पूढे मी तुम्हाला पिडणार नाही....
BACK IN ACTION

परेड अविस्मरणीय अनुभवांची मालिका निरोप घेत आहे...काय करणार जे काही अनुभवले ते सर्व तुम्हाला सांगितले....आता माझा परेडचा नव्याने प्रवास सुरु झालाय...आता नवीन अनुभव येणार....त्यामुळे अनुभव म्हणून लिहण्यासारखे माझ्याकडे काही उरलेले नाही...

पण एक गोष्ट नक्कीच आहे.....मला समजलेली अनिरुद्ध परेड....आणि यापूढे मी तुमच्याशी हीच समज शेअर करणार आहे....पण त्याआधी....यंदा काही परेड डीएमव्हींनी माझे लक्ष वेधून घेतले..त्यांच्याबद्द्ल मीपुढील भागात माहीती देणार आहे....सो...जस्ट वेट..फॉर दी नेक्ट