Tuesday, October 29, 2013

About Hemadpant - 2

हेमाडपंतांबद्दल विचार करताना मला नेहमी एक गोष्ट बेस लेव्हलला दिसते ती म्हणजे ते गुरुचरित्राचे ४० वर्षे पारायण करत होते. म्हणजेच त्यांना गुरुची / सदगुरुंची अनामिक आणि त्यांनी कधीही दाखविली नसावी अशी ओढ असावी. सदगुरुतत्त्वावर त्यांचा विश्वास होता आणि त्या सदगुरुच्या त्यांच्या आयुष्यातील प्रवेशासाठी ते चातका प्रमाणे तळमळत असावे. कारण या तळमळीशिवाय पहिल्या भेटीतच कुणीही “धुळभेट” घेऊ शकत नाही असे मला वाटते. गुरु बाबत त्यांच्या मनात विकल्प आला. हे १०० टक्के. परंतु खर्‍या सदगुरुच्या दिशेनेच आपले पाऊल पडावे आणि कोणत्याही भोंदू बाबाच्या फंदात पडू नये यासाठी ते दक्ष असावेत अस मला वाटले. साईनाथांबद्दल जेव्हा कळले तेव्हा त्यांच्याकडे जाण्यासाठी त्यांनी वेळ घेतला असावा. जाऊ की नको या व्दंव्दमध्ये ते अकडले असावेत….आणि हे व्दंव्द साक्षात साईनाथांनी सोडविले असे मला वाटते. त्यांच्या मनात गुरुतत्त्वाबद्दल काही शंका असावी अस वाटत नाही. पंण आपण ज्या साईबाबांकडे जाणार आहोत ते नक्कीच आपल्याला हव असलेले अंतिम स्थान आहे का? या बाबत साशंक असावेत. असे आपले देखील होते. अगदी सामान्य भक्ताचेही होते. बापूंकडे येण्याआधी येऊ की नको, यास सदगुरु मानू की नको अशी व्दीधा अवस्था असते. पण बापूंना पाहिल्यावर ही व्दीधा अवस्था विरुन जाऊन आयुष्याची समिधा कधी होते हे त्या भक्ताला ही कळत नाही. यावरुन मला एक गोष्ट कळते की हेमाडपंत कीतीही श्रेष्ठ भक्त असले तरी त्यांच्या प्रवास एखाद्या सामान्य भक्ताप्रमाणे विकल्पाचा अडथळा पार करुनच झाला. हा विकल्प ते मनातून सक्षमपणे काढू शकले एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे पहिल्या धुळभेटीपासून ते लेखणी ठेवेपर्यंत त्यांचा विश्वास हा पूर्ण होता. पूर्ण १०८ टक्के.

Read Saisatcharitra Articles - http://www.pratyaksha-mitra.com/category/shree-sai-saccharitra/
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer : साईसच्चरित हा माझा सर्वात आवडता ग्रंथ आहे आणि याची गोडी ही परमपूज्य बापूंनी लावली आहे. श्रीसाई समर्थ विज्ञान प्रबोधनीकडून घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परीक्षा घेतल्या जातात. ह्या परिक्षा देताना जे विचार मनात आले ते इथे मांडत आहे. प्रत्यक्षात तसेच असेल असा किंवा या प्रकारचा माझा कोणताही दावा नाही याची कृपया नोंद असावी. साईनाथ व बापूंचे गुणसंकीर्तन व्हावे  आणि त्यातून निर्मळ आनंद मिळावा ही प्रेमळ इच्छा आहे. अंबज्ञ - रेश्मावीरा नारखेडे

About Hemadpanta

इतर फुटकळ विषयांवर चर्चा करीत बसण्यापेक्षा हेमाडपंतांची भक्ती, सेवा, शारण्य कसे आहे याचा अभ्यास करणे जास्त श्रेयस्कर वाटते. बापूंनी आपल्याला जागृकतेचे महत्त्व सांगितलेले आहे. हेमाडपंत हे जागृक होते. त्यांची भक्ती डोळस होती. म्हणून गहू दळण्याच्या प्रसंगाचे अनोखेपण त्यांना कळू शकले. तसेच हेमाडपंताचे निरिक्षण आणि ऍनालॅसिस उत्कृष्ट होते. हे आपल्याला प्रत्येक कथेतून कळत जातेच. हेमाडपंत हे श्रेष्ठ भक्त आहेतच…त्यांनी भक्ती कशी करावी हे देखील शिकविले आहे. परंतु एक श्रेष्ठ भक्त बनण्यासाठीचे मुलभूत गुणधर्म त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रतित होतात. 

१. जागृकता : भक्ती करताना जागृक असलेच पाहीजे. 

२. डोळसपणा : भक्ती डोळस असावी. 

३. निरक्षण : सदगुरुचे निरिक्षण करता आले पाहीजे 

४. आकलन : या निरिक्षणातून सदगुरुच्या अकारण कारुण्याचे, सदगुरु लिलेचे आकलन करुन घेतले पाहिजे. 

५. अनु्भव : उचित निरिक्षण आणि आकलन केले की आपोआपच आपण सदगुरुंच्या अनुभवासाठी पात्र ठरतो. 

६. विश्वास : ह्या सार्‍या गुणांचा वापर करण्यासाठी मुळ सदगुरु तत्त्वावर विश्वास असणे आवश्यक आहे. आणि हेमाडपंतांचा सदगुरुतत्त्वावर विश्वास होता. ठाम विश्वास होता. कारण ते चाळीस वर्षे गुरुचरित्राचे पारायण नित्यनियमाने करित असत आणि हे सदगुरुतत्व मूर्तिमंत साई स्वरुपात त्यांच्या समोर उभे ठाकले ते्व्हा त्यांनी धूळभेट घेतली. गुरुची उपयुक्तता काय? हा वाद जरी हेमाडपंत घालत असले तरी त्यामागचा हेतू, त्यामागचा विचार हा अत्यंत वेगळा असला पाहिजे. कारण ते अत्यंत विचारी होते. 

गुरुचरित्र वाचणार्‍या हेमाडपंत सारख्या व्यक्तीला गुरुचे महत्त्व माहित नसावे हे विसंगत आहे. त्यामुळे गुरुची उपयुक्तता काय? ह्या वादामध्ये हेमाडपंत कुठेही मला अहंकारी वाटत नाही. उलट त्यांच्या मन बुद्धीतील विचारांचा प्रचंड मोठा गुंता आणि तो गुंता सोडवण्यासाठी चाललेली हेमाडपंतांची धडपड इतकेच मला दिसू येते. 

आणि हा गुंतला सुटला अगदी क्षणार्धात…..जेव्हा बाबा म्हणाले, “काय म्हणाले हे हेमाडपंत”? हा गुंता सुटला म्हणून आपल्याला साई सच्चरित्र लाभले, असे मला वाटते

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer : साईसच्चरित हा माझा सर्वात आवडता ग्रंथ आहे आणि याची गोडी ही परमपूज्य बापूंनी लावली आहे. श्रीसाई समर्थ विज्ञान प्रबोधनीकडून घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परीक्षा घेतल्या जातात. ह्या परिक्षा देताना जे विचार मनात आले ते इथे मांडत आहे. प्रत्यक्षात तसेच असेल असा किंवा या प्रकारचा माझा कोणताही दावा नाही याची कृपया नोंद असावी. साईनाथ व बापूंचे गुणसंकीर्तन व्हावे  आणि त्यातून निर्मळ आनंद मिळावा ही प्रेमळ इच्छा आहे. अंबज्ञ - रेश्मावीरा नारखेडे

Friday, August 30, 2013

Sai For Me....AAI For Me


HARI OM



नुकतच Aanjaneya Publications आंजनेया प्रकाशनच्या वेबसाईटवरुन मागावलेली Happy English Stories ची पहिली सिरिज साई फॉर मी Sai For Me ची पुस्तके घरी आली. अगदी सुंदर पॅकींग असलेले पार्सल अत्यंत अधाश्याप्रमाणे फोडून त्यातून आईची भेट बाहेर काढली. झपझप आठही पुस्तकांवर नजर फिरवून साई फॉर मी चे पहिले पुस्तक वाचण्यास घेतले.


पुस्तकावरील ओळ न ओळ वाचली. अगदी पब्लीकेशन कुठले...पत्ता वगैरे.....


आणि बिगनर्स सेक्शन पासुन सुरुवात केली. सर्वप्रथम विद्यार्थी म्हणून न वाचता...कुतुहूल म्हणून वाचले...आणि मग वाचता वाचता खरच amazed झाले.

आता तुम्ही म्हणाल अस का? कारण तसेच आहे. मराठी माध्यमाची विद्यार्थीनी असल्यामुळे कायम इंग्लिश सुधारण्यासाठी धडपड करत होते. इंग्लिश बोलताना आत्मविश्वास नसल्याने कायम मागे मागे राहायचे. इंग्लिश सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली सर्वच प्रसिद्ध पुस्तके माझ्याकडे आहेत. त्यांच्या मदतीने इंग्लिश बोलता आले, लिहिता आले, वाचता ही आले, समजता देखिल आले पण आत्मविश्वास काही आला नाही. कारण या सगळ्या पुस्तकातून मी मराठीतच इंग्लिश शिकले. आणि त्यामुळे मराठीत विचार करुन मग इंग्लिश्मध्ये बोलण्याची सवय लागली आणि त्यामुळे आत्मविश्वास अधिकच खालावत गेला. 

साई फॉर मी - १ चे बिगिनर्स आणि इंटरमिजिट सेक्शन वाचतानाच एक लख्ख प्रकाश डोक्यात पडला आणि लक्षात आले की हेच मला हवे होते...आणि असच हवे होते.

प्रत्येक पुस्तकामागे मग ते कोणतेही असो त्यामागे एक संकल्पना असते. एक हेतू असतो. एक प्रवाह असतो....आणि त्या पुस्तकांचा एक प्रभाव देखील असतो. खरं तर पुस्तक म्हणजे कागद आणि त्यावरील काळी शाळी नसून एक जिवंत, अनुभवसंपन्न, मार्गदर्शक व्यक्तीमत्व असते. मात्र त्या दृष्टीने पुस्तके वाचली पाहिजेत.

साई फॉर मी म्हणजे तर माझ्या सोबत माझी आईच असल्यासारखे आहे. अर्थात नंदाईने लिहलेल्या या पुस्तकातून तीचे वात्सल्य पदोपदी जाणविते. आणि मी हे ठामपणे सांगू शकते; नव्हे सिद्ध करु शकते. आज मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे बाळाचे संगोपन भरण पोषण कसे करावे हे मला ठाऊक आहे. कोणत्या वयात बाळाला काय खायल द्यावे याचे भान मला राखावे लागते. चार महिन्यापर्यंत केवळ आईचे दूध, चौथ्या महिन्यानंतर फळांचा रस, मग हळू हळू पेज, मऊ खिचडी मग हळू हळू पूर्ण जेवण असा क्रम असतो. कारण बाळाला झेपेल पचेल तेवढच द्यायचे. हेच तत्त्व नंदाईने या पुस्तके लिहताना वापरले आहे असे मला वाटते. 

बघा ना एकाच अर्थाचे तीन वेगवेगळे शब्द बिगिनर्स, इंटरिमिडीएट आणि अडवान्स लेव्हलवर वापरले आहेत. उदा. मिशन, असायमेंट, टास्क...तीन वेगळ्या लेव्हलवर आईने शब्द introduce केले आहेत. गम्मत पुढे अशी आहे की एकच गोष्ट सांगण्यासाठी आईने हे तीन शब्द एका समान वाक्यात वापरले आहेत. अस प्रत्येक ठीकाणी आहे.
Beginners : to begin the mission of writing stories.
Intermediate : to begin the assignment of writing stories
Advance : to begin the task of writing stories.

बाळाला त्याच्या पचनशक्तीनुसार जसे अन्न दिले जाते त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आकलनशक्तीनुसार इथे शिकविले गेले आहे. त्यामुळे मला एकच वाक्य तीन वेगळ्या शब्दांचा वापर करुन कसे लिहता येते हे कळते. 

तसेच शेवटी आईने हेच तीन शब्द तीन वेगवेगळ्या वाक्यात वापरुन दाखविले आहेत; जिथे हे शब्द APT कसे वापरायचे हे कळते.
B : Neil Armstrong was the first person who accomplished the mission of landing on the moon.
I : Advance nations outsource assignments to developing countries.
A : Tending to a special child is a huge task for the parents.

अगदी प्रत्येकाला उपयोगी पडेल अशी ही पुस्तके आहेत. याआधी आईकडून इंग्लिशचे धडे आत्मबलमधून गिरिवले आहे. आज पुन्हा या क्लासला गेल्यासारखे वाटते. या पुस्तकांना अनेकविध पैलू आहेत. 

त्यातील महत्त्वाचा पैलू म्हणजे साईकथांच्या माध्यमातून इंग्लिश शिकणे. आज अधिक सोप्या भाषेतून मग ती इंग्लिश का असेना साईसच्चरित्र वाचल्याची अनुभूती आली. फेरिटेल्समध्ये हरविणार्‍या लहान मुलांना साई कथांच्या माध्यमातून संस्कार करणे अधिक सोपे आहे. पण या कथा सोप्या करुन कशा सांगाव्यात हा प्रश्न पडला होता. हा प्रश्न देखील या पुस्तकांमुळे सुटला आहे. तसेच जणू साईसच्चरित्र चित्र रुपातही समोर आले आहे त्यामुळे अगदी लहान मुले ही या चित्रांतुन कथा समजू शकतील. 

एकाच संकल्पनेतून अनेक हेतू या पुस्तकाच्या माध्यमातून साध्य होतात. आईने व बापूंनी ही पुस्तके आपल्या हातात तर दिली आहेत आता कितीक व्यापक आणि विविधांगी उपयोग आपण करुन घेतो हे आपल्यावर आहे.

मी तर बाबा जाम खुश आहे..."वात्सल्याची शुद्ध मुर्ती आई काळजी वाही"    याची पुरेपुर अनुभूती मला आलेली आहे. कारण मला प्रश्न पडलाच होता...की माझ्या बाळाला मी पुढे कोणत्या गोष्टी कश्या सांगणार आहे? जे संस्कार मला त्याच्यावर करायचे आहेत ते मी कसे करणार...

पण हा प्रश्न त्याच्या "MOM" नेच सोडविला. 

आता त्याची आज्जीच ("MOM") रोज रात्री गोष्ट सांगायला येणार हे नक्की.

(सोबत माझे ही इंग्लिशची उजळणी आई घेणार)

Happy English Stories चा साई फॉर मी सारखा प्रवाह अखंड माझ्या आयुष्यात रहावा व ह्या अशा पुस्तकांची घरोघरी लायब्ररी व्हावी व पिढ्यान पिढ्या इंग्रजी शिकण्यासाठी यांचा वापर व्हावा ही मोठ्या आईच्या चरणी सदिच्छा....मी अंबज्ञ आहे....

- Reshmaveera Narkhede


Monday, May 13, 2013

कमळ पाहिले मी राया..कमळ पाहिले मी...


किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात....
कमळ पाहिले मी राया..कमळ पाहिले मी...

गुरुवारी हा अभंग ऐकला आणि मन अजूनही ह्या अभंगाच्याच अवती-भोवती घुटमळतेय. ह्या अभंगाचि जादू अशीच आहे. मात्र, ह्या अभंगाचा इफेक्ट इतके दिवस टिकून राहण्यास कारणीभूत ठरलेली अजून एक व्यक्ती...जॉर्ज वॉशिंटन कार्व्हर..
यास योगायोग म्हणा किंवा आणखी काहीही...परंतु ह्या अभंगाचा भावार्थ, अर्थ, मतितार्थ मला कळावा म्हणूनच की काय गुरुवारीच बापूंनी माझ्याकडून "एक होता कर्व्हर" हे पुस्तक वाचून पूर्ण करुन घेतले. मंगळवारी रात्री पुस्तक हातात मिळाल्यानंतर दोन दिवसात झपाटल्यासारखं वाचून काढले. तसे हे पुस्तक मी दुसर्‍यांदा वाचत होते पाच सहा वर्षांपूर्वी जेव्हा मी हे पुस्तक वाचले होते...तेव्हाची अधीरता आणि उत्साह आजही वाचताना होता. त्यावेळी ह्या पुस्तकाने अर्थात कार्व्हर यांच्या चरित्राने जसे अंतर्मूख केले होते तसेच आजही केले...फक्त यावेळी साथ मिळाली ती आद्यपिपादादांच्या "कमळ पाहिले मी रे राया" या अभंगाची. 
डॉ. कार्व्हर यांच्या चरित्राने मला कमळ पाहिले राया हा अभंग समजण्याची बुद्धी मिळाली...तर अभंग काय सांगतो हे अनुभवण्यची सुसंधी कार्व्हर यांच्या चरित्रातून मिळाली. अंबज्ञ.
खरचं, 
कमळ पाहिले मी राया....कमळ पाहिले मी...॥धृ॥

काय त्याची सुंदरता....काय त्याचा थाट...
चिखलामधूनी वर येऊनी...झळके दिमाखात राया...झळके दिमाखात ॥१॥

गुलामगिरीच्या चिखलातूनवर आलेल्या कार्व्हर यांच्या जीवन कमळाने सार्‍या जगाला उजळून टाकले. अठराविश्व दारिद्र्य, गुलामगिरीचे ओझे, आईपासून कायमचा विरह, कृष कुपोषित शरिर असलेला ज्याचे नाव ही स्वतःचे नाही...कुळ नाही...पूर्वजांचा पत्ता नाही असे हे "मेरीचे पोर" परमेश्वरावरील असीम निष्ठेने व स्वकष्टाने चिखलातून वर आले आणि दिमाखात झळकले. 

मोझेस कार्व्हर या जर्मन शेतकर्‍याने मेरीला गुलाम म्हणून विकत घेतले. पुढे गुलाम पळविणार्‍या टोळीने मेरीला पळवून नेले व तिचे दोन महिन्याचे पोर पोरके झाले. मात्र कार्व्हर व त्याची पत्नी सूझन ह्यांनी या मरणोन्मुख पोराचा नीट सांभाळ करुन वाढविला. त्यांनीच त्याची विनम्र आणि प्रामाणिक वृत्ती पाहून जॉर्ज असे नामकरण केले. कार्व्हर कुटुंबियांचेच नाव त्याने लावले. 

निसर्गाच्या सानिध्यात रमणे, झाडा-फुलांबरोबर खेळणे, बागकाम करणे हेच काय ते जॉर्ज करीत असे. हा छोटा जॉर्ज म्हणजे छोटा माळी झाला होता. अंगाने कृश, दुबळा, नाजूक होता. मात्र त्याच्या हातात विलक्षण कसब होते. चुली लिंपणं, लोकर पिंजणे, कातडी कमावणं, मेणबत्या बनविणे, मसाले तयार करणे, पाव-बिस्कीट तयार करणे, विणकाम करणे, चित्रकला, असं सगळ सगळ तो लहानपणीच करायला शिकला होता.

त्याला खूप शिकायचे होते आणि आपल्या बांधवातून या गुलामगिरिच्या चिखलातून बाहेर काढायचे होते. हे एकच ध्येय त्याचे होते आणि म्हणूनच चित्रकार किंवा म्युझिशियन न होता तो एक कृषिशास्त्रज्ञ झाला. 
दहा वर्षाचा असताना त्याने शिक्षणासाठी कार्व्हर यांच्या घरच्या सुरक्षित वातावरणातून अज्ञात असुरक्षित अशा जगात पाऊल टाकले. काबाडकष्टकरुन शिक्षणासाठी पैसा गोळा केला. कित्येक दिवस उपासमारिला सामोरे गेला. शिक्षणाचा खर्च वाढला की काबाडकष्ट ही वाढले. या दरम्यान लावणी, पेरणी, लॉंड्री अशी बरीच कामे तो शिकला. त्याने कोणाकडूनही कधीच काहीही फुकट घेतले नाही. जो त्याला मदत करी त्याच्या घरी जाऊन तो त्याचे घरकाम, बागकाम करीत असे. पुढे तो तोतरा बोलणारा मुलगा उत्तमरित्या गाणे ही गाऊ लागला. 
अशी उत्तरोत्तर प्रगती करीत त्याने अवघ्या जगावर आपली प्रभा पसरली. काय नाही केले ह्या कार्व्हरने...अगदी सगळ काही...एका तपस्वी सारखे आपले आयुष्य मानवजातीच्या कल्याणासाठी व्यतित केले.
आपण केलेल्या प्रयोगांवर संशोधनावर कधीच पेटंट घेतले नाही. मुक्त मनाने आणि मुक्त हस्ताने ज्ञानदान केले.  पुढे जसे झाडांवर उपचार करणारा डॉक्टर, हा जनावरांचा आणि माणसांचाही डॉक्टर झाला. तेही कोणतेही विधीवत प्रशिक्षण न घेता. त्यांना लोकांनी डॉक्टर ही पदवी दिली. त्यानंतर कित्येक वर्षांनी त्यांना डॉक्टरेट मिळाली होती. 

मधमाशी नेई मध...कधी नारीच्या केसात..
कधी सुकूनी उन्हात...कमळ झाकळत राया....कमळ झाकळत ॥२॥

खरंच कमळाचा वापर ज्या मुक्तपणे होतो तशाच मुक्तपणे विविध मार्गांनी कार्व्हर यांचा उपयोग समस्त काळ्या गोर्‍या समाजाला झाला. कधी कुणी त्यांच्याकडे मोठ मोठ्या संशोधनासाठी ऑफर घेऊन येई तर कधी एखादा सामान्य शेतकरी आपल्या शेतातील साधीशी अडचण घेऊन येई. दोन्ही परिस्थीतीत कार्व्हर तितक्यात तन्मयतेने उपयोगी राहिले. याबदल्यात त्यांनी घेतले काय? तर काहीच नाही....साध्या दुवा किंवा आर्शीवादाची देखील अपेक्षा नाही...देवाचे कार्य म्हणून करीत गेले...कमळ म्हणून वर आले आणि कमळ बनूनी राहिले...
कित्येकदा कष्टाच्या उन्हात सुकून झाकळले...कधीच स्वतःचा विचार केला नाही...त्यांनी केलेल्या कष्टाचा आणि सहन केलेल्या हालआपेष्टांचा आपण विचार ही करु शकत नाही. त्यांच्या वाटेला  "काळा" म्हणून शेवटपर्यंत येत राहीलेली हिनतापूर्वक वागणूक पाहून या अभंगाच्या पुढील चरण आठवते...

इतुके कष्ट केले त्याने, पंकातून दूर गेला
मग व्यर्थ का रे सारे, जीव दुर्दैवात राया...जीव दुर्दैवात...॥३॥

मला असे वाटते हा प्रश्न आद्यपिपा बापूंना विचारत आहे. किंवा आपल्या मनात सहज प्रश्न उमटतो की इतके कष्ट केले तरी शेवटी काय मिळाले, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी झटलो पण शेवटी मी दुर्दैवातच असा प्रश्न पडतो. आणि इथेच परमेश्वरावरील विश्वासाला हादरे बसू लागतात. आपल्यासाठी आद्यपिपादादा बापूंना हा प्रश्न विचारत आहे...आणि या प्रश्नाचे खरे समाधान पुढील चरणात बापू करीत आहे असे दिसते...
कार्व्हरच्या बाबतित तेच झाले...वरकरणी पाहता त्यांचे आयुष्य इतरांना दुर्दैवी वाटले, त्यांची दया आली..कुणी त्यांची कीव केली... पण या सार्‍याकडे त्यांनी दुर्लक्ष केले...जणू काही त्यांना माहित होते...
पिप्या ऐक माशी तृप्त, सौंदर्याचा गुण सत्व
किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात...काहीही ना व्यर्थ जा...॥४॥

त्यांच्या कार्यामुळे त्यांनी अनेकांना तृप्त केले होते...समाधान दिले होते..स्वतःतर कमळ बनले पण अनेकांना देखील कमळ बनण्याची प्रेरणा दिली...
त्यांच्यासाठी परमेश्वराचे बाहू किरण होऊन पसरले...सार्‍या जगावर... 
त्यांचा हातगुण, त्यांचे कार्य किरणांप्रमाणे परमेश्वरांच्या बाहूंनी जगभर पसरविले...
कारण लहानपणापासून त्यांचा एका गोष्टीवर ठाम विश्वास होता....
काहीही ना व्यर्थ जात.....
त्यांनी घेतलेल्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत काहीही व्यर्थ गेले नाही. अगदी भौतिक गोष्टीत त्यांच्याकडे टाकाऊ असे काहीच नव्हते. टाकाऊ पासून त्यांनी अनेक टीकाऊ गोष्टी बनविल्या....आपले आयुष्य ही आणि इतरांचे ही...
आद्यपिपादादांच्या या अभंगाचे रसरशीत उदाहरण माझ्यासमोर आले...ही बापूरायांची असीम कृपा...
आणि मी सहज म्हणते...सगळं व्यर्थ आहे...
या अभंगाद्वारे आद्यपिपांनी खरच डोळे उघडले आहेत...
या अनिरुद्धासारखा सद्गुरु माझ्या बरोबर असताना माझा देखील श्वास व्यर्थ नाही जाणार...कारण याचे बाहू किरण आहेत...

खरं तर या अभंगाचा भावार्थ कीती खोल असेल माहित नाही...पण वरवर का असेना जे मला समजले, जसे समजले ते लिहल्यापासून राहावले नाही...

कारण 
किरण असती बाहू माझे....
काहीही ना व्यर्थ जात....
ह्या ओळी म्हणजे माझाही जीवंत अनुभव आहे. कार्व्हर या संतपदाला पोहोचलेल्या शास्त्रज्ञापासून ते माझ्यासारख्या सामान्य भक्ताच्या आयुष्याला हा आद्यपिपांचा अभंग व्यापून टाकतो. हीच या अभंगाची खासियत आहे. आयुष्य असावे कसे तर कमळासारखे...खरंच बापू आयुष्य असावे तर या कमळासारखे...आणि खरंच बापूंवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचे आय़ुष्याचे कमळ होणारच..
कारण प्रत्येकजण ह्या कलियुगातील विविध प्रकारच्या चिखलातून सूर्यरुपी बापूंच्या ओढीनेवर आलेला आहे...
चिखलात लोळणार्‍या सुकराचे देखील कमळ करण्याचे सामर्थ्य या माझ्या सदगुरु अनिरुद्धात आहे, हे कदापि विसरुन चालणार नाही.

- रेश्मावीरा शैलेशसिंह नारखेडे

Wednesday, May 8, 2013

न्हाऊ तुझिया प्रेमे



अकारण कारुण्याची नित्य वाहतसे गंगा....खरंच बापूंचे अकारण कारुण्याचे वर्णन करणे कदापी शक्य नाही. गंगेची जशी व्यापकता आणि विस्तार आहे..त्याप्रमाणेच किंबहुना त्याहून अधिक माझ्या बापूंचे अकारण कारुण्य अधिक व्यापक आ
णि विस्तारीत आहे. आणि हे सारं; ही ओळ माझ्या मनात आली...ते आजची एक गुड न्यूज ऐकून...

अनिरुद्धाच्या प्रेमात न्हाऊन निघण्यासाठी होणार्‍या उत्सवात "त्याचा" कोणताही श्रद्धावान बाळ कोरडा राहू नये यासाठी, उत्सवात सहभागी होण्यासाठीच्या प्रवेशपत्रिकेचे मूल्य कमीत कमी १५० रुपयांपासून ठेवण्यात आले. मात्र, कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असल्याने अनेकांना १५० रुपयांच्या हिशेबानेसुद्धा एकदम प्रवेशपत्रिका राखून ठेवणे अडचणीचे जात होते. त्यामुळेच अकारण कारुण्याचा झरा असलेल्या बापूरायाच्या "सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या शिकवणीनुसार" ह्या प्रवेशपत्रिका आता इंस्टॉलमेंटमध्ये देणगीमूल्य देऊनही राखून ठेवता येणार आहेत.

यासाठी इच्छुक श्रद्धावानांनी सीईओ कार्यालय, अनिरुद्धाज अ‍ॅकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (ए ए डी एम), श्री हरिगुरुग्राम व हॅपी होम येथिल न्हाऊ तुझिया प्रेमेचे काऊंटर येथे संपर्क साधावा.

मागिल झालेल्या मोठमोठ्या उत्सवात देखिल अशी सोय करण्यात आली होती. अगदी गायत्री उत्सवाच्या वेळेस गायत्रीमातेच्या पूजनासाठी पुरेश्या निधीची जमवा जमव मी विद्यार्थी असल्याकारणाने करु शकले नव्हते. त्यावेळी अशाच एका सुविधेचा लाभ देऊन बापूंनी माझ्याकडून गायत्रीमातेचे पूजन करुन घेतले होते. त्यानंतर मी अर्थाजन करु लागल्यावर हे पूजन मूल्य भरले. खरंच बापूंच्या अकारण कारुण्यामुळे गायत्री मातेच्या पूजनाचे पूण्य प्राप्त झाले.

त्यामुळे न्हाऊ तुझिया प्रेमे या अभंगोत्सवाच्या संदर्भातील या बातमीमुळे निश्चितच मन खूप भरुन आले आहे.

- रेश्मावीरा नारखेडे

Saturday, April 13, 2013

अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा

न्हाऊ तुझिया प्रेमेच्या कार्यक्रमात कोणते अंभग घेतले जाणार आ्हेत याची खरच उत्सुकता लागली आहे. पण खरोखर असे वाटते की हा कार्यक्रम अतंर्मुख करणारा असेल. मी तर आता सध्या ईमाजिनच करतेय...की या स्टेडीअम मध्ये बसले आहे...चिक्कार श्रद्धावान आलेले आहेत. स्वतः आई बापू दादा आलेले आहेत. कुठे पडद्यावर किंवा एलईडीवर थेट प्रक्षेपण सुरु आहे. स्टेजवर समोर सगळे आर्टीस्ट आहेत...इतक सगळ असूनही मन शांत शांत झालेय..कारण अभंग सुरु आहे..

 ...अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा....

 माझ्या फेव्हरेट अभंगा पैकी असलेला हा अभंग असेल का? कुणास ठाऊक... पण नुसते ईमॅजिन करुनच अंगावर काटा उभा राहिला आहे. या अभंगाच्या पहिल्या दोन ऒळ्या ऐकल्या की भरभरुन कौतुक करत मोठ्या आईला श्रीराम म्हणणारे माझे बाबा अर्थात बापू आठवतात. पूर्वी जेव्हा हा अभंग ऐकायचे तेव्हा असे मनात यायचे आद्यपिपांचा लळा जसा बापूंना लागला तसा माझा ही लागेल का? बापू माझे ही कौतुक कधी करतील का? पण जस जस या बापूरायाच्या चरणी बापूज्ञ होत गेले तसे तसे जाणवू लागले की मुळात या अनिरुद्धाला त्याच्या सार्‍याच भक्तांचा तितकाच लळा आहे...आणि प्रत्येक बाळाचे तितकेच कौतुक आहे. आणि मी ही हे अगदी सामान्य पातळीवर बोलत आहे...कारण मी हे स्वतः अनुभवले आहे...माझ्य बाबतीतही आणि इतर अनेकांच्या बाबतीत ही.... 

एकदा काय झाले बापू, समिरदादा आणि आम्ही काही ऑफीस दोन एक मंडळी समिरदादांच्या रुममध्ये बसलेलो होतो. तेव्हा आपलाच एक श्रद्धावान भक्त तिथे आला. तो श्रद्धावान एका मराठी मालिकेमध्ये तीन ते पाच मिनिटाचा रोल करीत होता. त्याचा तो रोल बापूंनी पाहीला आणि खरंच त्या रोलसाठी त्या भक्ताचे इतके पोट भरुन कौतुक केले...की विचारु नका...त्यावेळी बापूंच्या चेहर्‍यावर जो आनंद आणि समाधान होता तो पाहण्यात मलाच खुप भरुन आले. मग तो भक्त गेल्यानंतर बापू पुन्हा आम्हाला म्हणाले, की अगदी छोटासा रोल होता पण काय मनापासून आणि आत्मविश्वासाने केला होता. छान.... त्यावेळी अगदी सहज माझ्या मनात आद्यपिपांच्या या अभंगाच्या सुरुवातीच्या ...अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा.... या ओळ्या उमटल्या... 

आद्यपिपां आणि इतर श्रेष्ठ भक्तांचे सगळेच अभंग आपल्या दैनंदिन आयुष्यात अनुभवता येतात. हेच अभंग पूर्ण तल्लीन होऊन ऐकण्याची संधी फार कमी वेळा मिळत असते....ह्या कार्यक्रमाच्या निम्मित्ताने आपल्या प्रत्येकाला आता ही संधी मिळणार आहे. बस्स आता ह्या कार्यक्रमाला बापू नावाचा घननीळ मेघ दाटून आला असेल आणि अभंगांचा मुसळधार...मन शितल करणारा पाऊस पडणार आहे....मग फक्त मला पिसारा फुलवून तयार राहयचेय...या प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघायला....
अंबज्ञ -

रेश्मावीरा नारखेडे