Showing posts with label latest. Show all posts
Showing posts with label latest. Show all posts

Monday, August 29, 2016

पंढरीची वारी ३ - मी एक वारकरी

माऊलीच्या पादुकांच्या दर्शनानंतर आम्हाला वाटल की आता आम्ही निघू. पण पुढे दुसरा प्रश्न उपस्थित झाला. जायच कुठ? म्हणजे माघारी ११ किलोमीटर सासवडला की पुढे जेजुरीला. कुठही जायच म्हटल तरी पायीच जाव लागणार होत. मग तिथे एकाला विचारल जेजुरी किती लांब आहे? आणि काही वाहन मिळेल का? मुंबईला जायला तेथून. तेव्हा तो म्हणाला इथून तरी तुम्हाला कोणतच वाहन मिळणार नाही. जेजुरीतून मिळेल कदाचित. जेजुरी असेल पाच एक किलोमीटरवर.

आम्ही विचार केला की मागे ११ किलोमीटर चालत जाण्यापेक्षा पुढे पाच किलोमीटर चालत जाण जास्त सोप्प आहे. आणि मग जेजुरीवरुन काही वाहन मिळाल की जाऊ थेट मुंबईला...हा विचार करुन वारी बरोबरच पुढे निघालो.

आत्ता कसली घाई नव्हती आणि ओढ ही नव्हती म्हणुन पावले पण उचलणे होईना. एक एक पाऊल ही टाकण मला का जड झाल होत तेच कळेना. मध्ये या पाच जणांना माझ्या हातातील छत्री पकडून पुढे ओढत न्या हे सांगायची वेळ माझ्यावर आली.

जरा गरगरायला लागले. तेव्हा कुठे बॅगेतून बिस्कीटचा पुडा काढण्याची बुद्धी झाली. तेव्हा लक्षात आले सकाळी १० वाजल्यानंतर आम्ही साधा पाण्याचा घोटपण घेतलेला नाही आणि सुमारे ४ वाजले होते. एक एक बिस्कीट तोंडात टाकून पुढे चालायला लागलो. आता खर तर मी कॅमेराला सुट्टी दिली आणि वारीत फक्त चालत होते.

चालताना मी मला सुचेल तो अभंग गजर म्हणत होते. जे नाम मुखात येईल ते घेत होते. पण मुख्य म्हणजे डोक्यात अनेक विचार घुमत होते.

आमचा प्लान तर वारी फोटोग्राफीचा होता पण माऊलीने वारी कशी असते आणि तिचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे उदाहरणासहित पटवून दिले. चालता चालता मनात अनेक गोष्टी घोळू लागल्या. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्षापासून वारीची फोटोग्राफी करण्याचे मनात होते आणि ती इच्छा आपली पूर्ण झाली. एक वारीचा अनुभव घ्यायचा होता तोही मिळाला. पण यापेक्षा ही महत्त्वाचे या "वारी" चे विलक्षण महत्त्वही समजले.

सकाळपासून एका फोटोग्राफरच्या नजरेने मी ही वारी पहात होत पण आता एका भक्ताच्या नजरेने ही वारी पाहत होते. विठ्ठलाच्या नामावर ताल धरुन चालणारे हे वारकरी मला विलक्षणच वाटत होते. त्यांना म्हणतात सुद्धा काय तर "वारकरी" म्हणजे वार करणारे...वारी करायची म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ आणि अहंकारावर वार करणे आवश्यक असते. या षडरिपुंवर वार केल्याशिवाय ही वारी होऊच शकत नाही. ही वारी जाते पंढरीरायाच्या पायाशी. त्याच्या पायाशी या षडरिपुंसहित मी पोहचू शकत नाही. मला त्यांचा त्याग करावा लागतो.

एक गोष्ट खुप आवडली...ती म्हणजे इथे प्रत्येक जण "माऊली"...षडरिपुंचे बाण चालणार तरी कोणावर...खरा वारकरी या षडरिपुंनी मुक्त होत असतो. मी वारी करतो हा भाव ही त्याच्यात नसतो. सर्व काही माऊलीच करुन घेत असते. मग वारकरी करतो तरी काय? तर त्याला नेमून दिलेल कार्य ते म्हणजे भगवंताचे नामस्मरण आणि चालणं. बस्स..तेच करण त्याच काम आहे. बाकी ज्या गोष्टी व्हायच्या त्या आपोआप होत राहतात. आणि मी हे अनुभल देखील.

चालणं...अनेकांना माहित नसेल पण केवळ अर्धातास चालणं हे पुण्यकर्म मानलं जातं. आपण चालणं विसरत चाललोय. शरिरावर ही नाही तर मनावरही हे चालण परिणामकारक ठरतं. मला तर हे चालणं हाच एक मोठा योग वाटतो. कारण रेग्युलर चालणार्‍या माणसाचे शरिरच नाही तर मन देखील फीट असते. चालण्यासाठी चालाव. भगवंताचे नाम घेत चाललो तर त्याचा फायदा अधिक. यामागे विज्ञान देखील आहे. कुठेतरी वाचल होत. Walking makes you more creative. तसेही चालण्याने आपल्या शरिरातील शक्ती केंद्रे अ‍ॅक्टीव्हेट होतात. अ‍ॅक्युप्रेशरच्या विज्ञानात दुसरे काय आहे? सर्व प्रेशर पॉईंटस तळपायावर आहेत. त्यामुळे कदाचित चालण्याचा हा परिपाठ शरिराला फायदेशीर ठरत असावा. म्हणूनच कदाचित ७० नी ८० वर्षाचे वृद्ध वारकरी फिट राहू शकत असतील. साईसच्चरितातमध्ये एक गवळीबुवांची गोष्ट येते. ४ थ्या अध्यायात. ते ९५ वर्षाचे वारकरी होते. मला तर वारीत चालताना असे वृद्ध वारकरी गवळीबुवाच वाटत होते. साईसच्चरितातील हे गवळीबुवा माझे एकदम फेव्हरेट. साईनाथच प्रत्यक्ष पंढरीराव आहेत हे सांगण्याची त्यांची ताकद होती. अशा अनेकविध गोष्टी मला वारीत चालताना आठवत होत्या.

मनात येत होते ज्ञानेश्वर महाराज कशी वारी करत असतील? तुकाराम महाराज कशी वारी करत असतील. अस आपल्याला लागेल का अशी ओढ आणि तळमळ. मन अशा गुणसंकिर्तन आणि कथांमध्ये गुंगुन गेल्यावर जेजुरीपर्यंत कधी पोहोचलो कळलच नाही. पाचच किलोमीटर पुढे असे समजत समजत चक्क ९ किलोमीटर चालत आलो.

जेजुरीत शिरण्याआधीच एका हॉटेलमध्ये शिरलो. ६ वाजलेले. फ्रेश होण्याची नितांत गरज होती. तेव्हा लक्षात आले की सकाळी १० वाजल्यापासून नैसर्गिक विधी उरकायचे सुद्धा भान उरले नव्हते. ना खाण्याची आठवण, ना पाणी पिण्याची ना कसलीच आठवण.....आणि तस प्रसन्न वाटत होत. 

त्या हॉटेलमध्ये अक्षरशः झणझणीत मिसळवर ताव मारला व जेजुरीत शिरलो. हॉटेलमधून समोर उंच उभा राहिलेला जेजुरी गड दिसत होता. खंडोबा आमच कुलदैवत. माऊली खंडोबाच्या पायथ्याशी आणून सोडेल अस वाटलं नव्हत. जेजुरीत पाऊल ठेवल आणि  सोन्याची सोनपिवळी जेजुरी पाहीली. जेजुरीला  माऊलीची पालखी आल्यावर तिच्यावर भंडारा उधळला जातो. अवघे वारकरी मग खंडोबाची कधी होतात कळत नाही. हरि विठ्ठल...जय मल्हार हा गजर कधी मिसळत जातो कळत नाही.

गडावर जाऊन  दर्शन घेण्याची खूप इच्छा होती पण ते शक्य नव्हत. कारण 7 वाजले होते. परतीसाठी बस डेपोत गेलो तर डेपो बंद. सोमवार सकाळपर्यंत सुरू होईल याची शाश्वती नाही. मग काय? आता इथेच रहावं लागणार अशी चिन्हे दिसू लागली. कारण संपूर्ण ट्रान्सपोटच बंद होते. तरिही आमचा प्लॅनिंग किंग नागेश राव काही सोय होतय का ते पहाण्यास  गेला.  मी  त्या  अंधारतही मल्हार  गडाचे  फोटो  काढण्याचा प्रयास करित होते. 
तो मल्हार गड विठ्ठ्लच भासत  होता. काळाकुट्ट तो  डोंगर आणि  वर पसरलेले  घननीळ  आकाश..

एक  वेगळ्याच आकृतीचा भास  तेथे  मला  होत  होता.  म्हणजे  तो  डोंगर कटेवर हात  ठेवून उभा विठ्ठ्ल  तर भासत  होता पण त्या विठ्ठ्ला खंडोबाच्या  घनदाट "त्या" मिश्या असल्याचे  भासत  होते.                       
घनदाट मिश्यांमधून तो खंडॊबा-विठ्ठ्ल माझ्याकडे पाहून हसत होता. ते घननीळ आकाश म्हणजे त्याच्या नजरेतून वाहणारी करुणाच वाटत होती. कधीही ही करुणा माझ्यावर बरसेल अस दिसत होते आणि तसच झाले...त्याच्या कृपेचा पाऊस सुरु झाला. जोरदार पाऊस सुरु झाला. 
पायथ्यावरुनच खंडू विठूला हात जोडले आणि आता मुंबईला पोहचवायचे की नाही हे तूच ठरव असे म्हणत नागेशची वाट पाहत बसले.

त्या पावसात तो भंडारामिश्रित चिखल तुडवत नागेश धापा टाकत आला. चला रे तिथे आपल्याला पलिकडे काहीतरी वाहन मिळेल. म्हणून डेपोतून वाट काढत पलिकडे गेलो. नुकतीच एक टमटम टमाटम भरुन पुण्याला निघाली आणि आम्ही दुसर्‍या गाडीचा शोध घेत होतो. पण बराच वेळ आम्हाला काहीच मिळत नव्हते. एक व्हॅनवाला होता पण तो पुण्यास जायला तयार होत नव्हता. पण आमची घालमेल पाहून तो  अखेर तयार झाला. १५०० रुपयात पुण्याला सोडण्यास तयार झाला. आम्ही मागचा पुढचा विचार न करता त्याच्या व्हॅनमध्ये बसलो आणि रात्री ८ च्या सुमारास जेजुरीहून पुण्याला निघालो होतो.

हुश्श मनोमन मी माझे सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंचे आभार मानले कि त्यांनीच आमच्या परतीच्या प्रवासाची सोय केली. तो गाडीवाला पण चांगला होता. गप्पा मारत मारत नेत होता. त्याला कळलं की आम्ही केवळ फॊटो काढायला आलेलो होतो. म्हणून त्याने दिवे घाटातही थोड्यावेळ गाडी थांबवली. रात्रीच्या पदराखाली हिरा माणिकांनी नटलेले पुणे पाहून मस्त वाटले. 

पुढे तो आम्हाला सांगत होता..की बरे झाले आम्ही निघालो कारण सोमवारी सोमवती अमावस्या होती आणि या दिवशी खंडोबाची पालखी स्नानास खाली येते. दीड दोन लाख भाविक सहज असतात. ट्रान्सपोटही नसतो. आणि १२ वाजे पर्यंतच जेजुरीमधील भंडारा संपून जातो. थांबला असता ते ती पालखी पहायला मिळाली असती. पण उद्याही निघण कठीण होतो....

आम्ही अवाकच झालो...कारण काहीही करुन प्रत्येकाला सोमवारी ऑफीसला जायचच होत. त्याप्रमाणे बापूं माऊलीने आम्हाला  सहज जेजुरीतून बाहेर काढल. पुण्याला आलो तर पुन्हा मुंबईला नेणार्‍या टॅक्सी आणि बस वाल्यांच्या कचाट्यात सापडलो. कस बस त्यांच्यापासून सुटका करत व्हॉल्वोचा टिकीट काढल आणि निघालो. रात्री २ वाजता दादरला पोहचलो मी मैत्रिणीकडे थांबले आणि सकाळी घरी आले. पायाचे फुल टू टुकडे पडले होते. लंगडत चालत होते. थकवा होता. पण ठरवले ऑफीसला जायचेच..

तसच घरी आले आणि फ्रेश होऊन ऑफीसला निघाले. तीन दिवस सतत काही ना काही दुखत होत. पण म्हटल कोणतेही औषध घ्यायची गरज नाही. माऊली बर करणार आणि तसच झालं तीन दिवसांनी गाडी रुळावर आली...पण एक बदल झाला होता...

माझ्यातला बराचसा आळशीपणा कमी झाला होता. विनाकारण असणार्‍या तक्रारी कमी झाल्या होत्या. स्फुर्ती आणि शक्ती वाढली होती. जणू नव्यानेच मी स्वतःला सापडली होती. विचारचक्र सतत वारी भोवती फिरत होते. 

तेव्हा लक्षात आले की ही साधीसुधी वारी नाही...ही वारी म्हणजे एक न संपणारा प्रवास आहे. जीवा पासून शिवा पर्यंतचा प्रवास आहे. आता पहा ना सासवडहून निघालो ते थेट माऊलीने जेजुरीलापोहचवल. खंडोबाकडे...म्हणजेच शिवाकडे...याचाच अर्थ हे माऊलीने प्रत्यक्ष पटवून दिले.

जन्माला आल्यानंतर मृत्य़ूपर्यंत जीव हा प्रवासच करत असतो. रडत-खडत कुढत हा प्रवास करण्यापेक्षा आयुष्याचीच वारी करण्यास हवी हा मोठा अर्थबोध मला येथे झाला.
आता नको नाती सारी
याचे पायी माझी वारी
पिपा म्हणे आपुली दिंडी
नेऊ वैकुंठाच्या दारी
जेथे उभा बापू हरि |

प्रत्येकाने खर तर आपल्या आयुष्यात पाहीले पाहीजे. माझ आयुष्य म्हणजे दिंडी आहे की नुसतच धक्काबुक्कीचा, स्पर्धेचा, असुयेचा प्रवास आहे हे ऍनालॅसिस केले पाहिजे. आयुष्य दिंडी होण्यासाठी एक ध्येय ठरवून त्यासाठी नेटाने मार्गक्रमण केले आणि परमेश्वरी तत्त्वावर दृढ विश्वास ठेवला तर आयुष्य दिंडी आपोआप होईल. पण हो ध्येय आणि मार्ग पावित्र्याच्या चौकटीतच हवं बरं का! उदाहरण घ्यायचे तर सीमेवर लढणार्‍या जवानांचे आयुष्य दिंडीच नाही का? "रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग" म्हणत ते भारतमातेची सेवा करित असतात. एकाच रुटीन मध्ये घरात सर्वांसाठी निष्काम भावनेने कार्यरत असणारी आई...हिच आयुष्य ही दिंडीच नाही का? चांगल्या भवितव्यासाठी झपाटून अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्याचे आयुष्य दिंडीच नाही का? ही प्रत्येकाची दिंडी त्याला वैकुठांच्या द्वारी न्यायची असते. 

आपले आयुष्य खर तर वारीच असते आणि गृहस्थाश्रम ते वानप्रस्थाश्रम ह्या दिंड्या. पण याची जाणिव मात्र परमेश्वरावर विश्वास असल्यावरच होते. अस मला वाटते.

आता पहा ना महान शास्त्रज्ञ डॉ. निकोला टेसला (http://www.newscast-pratyaksha.com/hindi/category/pratyaksha-lekhmala/dr-nikola-tesla/) याचे आयुष्य वारीच आहे आणि त्याने लावलेला प्रत्येक शोध हा त्या वारीतील दिंडी आहे अस मला वाटते.  हा ही एक वारकरी. दिंडी म्हणजे काय? एक श्रद्धावानांचा समुह. जो गजर नामस्मरण करत पुढे चालत राहतो. बरोबर. माझ्या आयुष्यातील दिंडी म्हणजे माझ्यातील सदगुणांचा समुह आहे अस मला वाटते. जे एकत्र येऊन नामस्मरण आणि गजर करत..कार्य करत आयुष्याच्या वारीचे एक भाग बनतात. अशा सदगुणांना एकत्र आणून आयुष्याची वारी करुन मला विठ्ठल चरणी स्थिर होऊन वैकुंठात स्थिर होणे हेच जन्माला येण्याचे एकमेव कारण असते. यासाठी काय फार मोठ करण्याची गरज नसते.

माझे काही मित्र यावर्षी पंढरपूरला अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटकडून (http://www.aniruddhasadm.com/ , https://twitter.com/aniruddhasadm)  सेवेसाठी गेले आहेत. एक जण डॉक्टर आहे. एक इंजिनियर आहे. एक तर चक्क वकिल आहे. पण सगळे आपल प्रोफेशन विसरुन आज आषाढी एकादशीला क्राऊड मॅनेजमेंटची सेवा करित आहेत. जवळपास असे ३०० कार्यकर्ते तिथे सेवा करित आहेत...त्यांच आयुष्य काय एक दिंडीच झाली ना!! सदगुरुच्या पायांशी नेणारी सेवा दिंडी. 

नको राऊळी नको मंदीरी...
जिथे राबती हात तेथे हरि....
आज हा प्रत्येक कार्यकता देखील माऊलीच झाला. या मंडळीना पण काम असतील..त्रास असतील..संकट असतील पण सर्व काही बाजूला सारुन सर्व नकारात्मक गोष्टींवर वार करुन हे देखिल वारकरीच आहेत अस मला वाटत. अगदी एकही पाऊल न उचलता एकाच जागेवर उभे राहून केलेली ही सेवा वारी...आणि मला अभिमान आहे की मी देखील यांच्यासारखीच एक "वारकरी" आहे. 
तुमचं काय? स्वतःमधील वारकऱ्याचा शोध घ्या. 
।। जय हरी विठ्ठल ।।
मी एक वारकरी - अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा डीएमव्ही (डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर अर्थात डॅड(बापू) माऊलीचा वारकरी)
- रेश्मा नारखेडे



Tuesday, June 21, 2016

योगा...योगासने...योगमुद्रा..ध्यानयोग

आज २१ जून उत्तरायणाची सुरुवात. हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून भारताने जगाला दिला. अशीही योगाची देण ही देखील भारताची आहे. योगाचे फायदे सर्व स्तरावर मान्य आहे. अनेक सेलिब्रिटी अनेक उद्योजक किंबहुना आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी सुद्धा नियमित योगा करणारे आहेत. योगाचे फायदे इथे मला विशद करण्याची इच्छा नाही ते आपल्या सर्वांना ठाऊकच आहेत. मुद्दा असा की ह्या योगाची आपल्या प्रत्येकाला किती आवश्यकता आहे?

आज जागतिक पलटावर पाहिले तर नुसता हिंसाचार, नैराश्य, वैफल्य अशा सर्व नकारात्मक गोष्टी वाढत आहेत. मनःशांती हरवून बसली आहे त्यामुळे उचित निर्णय घेण्याची क्षमता माणूस हरवत चालला आहे. सद्‍ विवेकबुद्धी नाहीशी होत चालाली आहे आणि त्याचे परिणाम ही भयानक होत आहेत. युरोपमध्ये निर्वासिंतांच्या समस्या गगनाला भिडल्यामुळे तिथला भूमीपुत्र अस्थिर झाला आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात कोणीही उठून गोळीबार करु लागला आहे. या वर्षभरातच अशा घटना घडल्या. ब्रेक्झिटच्या भितीने भल्याभल्यांची झोप उडाली आहे. सिरियातील परिस्थिती तर अतिशय भयानक आहे. अशा अत्यंत अस्थिर अशा जागतिक परिस्थितीत योगासने हा एक भक्कम आधार वैयक्तिक पातळीवर ठरू शकतो.

ही योगासने केवळ हातापायांच्या कवायती नसून परमेश्वराच्या जवळ नेण्याचे एक साधन आहे. सत्याची अनुभूती होण्याचे हे साधन आहे. शांतता व समाधान मिळवून देणारे साधन आहे. आरोग्य चांगले ठेवण्याचे साधन आहे. योगासनांमधून स्थैर्य प्राप्त होते आणि जागतिक पातळीवर सर्वत्र स्थैर्य येणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने भारताने जगाला दिलेला योगा आणि योगा दिवस महत्त्वाचा आहे. यासाठी प्रयास करणार्‍या भारत सरकारचे सर्वप्रथम अभिनंदन.

माझ्या वैयक्तिक आयुष्यात योगासनांची ओळख झाली ती मुळात माझे सदगुरु डॉ. अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू) शिकवणीतून. त्यांनी लिहलेल्या श्रीमदपुरुषार्थचा द्वितिय खंड प्रेमप्रवासमध्ये योग आणि आसने यांचे महत्त्व विशद केलेले आहे. उचित प्राणायमची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच प्राच्यविद्यांच्या अभ्यासात बापूंनी सूर्यनमस्कार शिकविला. या सूर्यनमस्कारचा फायदा ही अपरंपार आहे. प्रचंड शक्ती एकाग्रता या सूर्यनमस्कारातून प्राप्त होते. सर्वांगिण विकास यामधील एक महत्त्वाचा भाग योगा आहे. किंबहुना ही आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण प्रत्येकाला मनःशांती हवी आहे व ही योगा आणि ध्यान धारणांतून मिळू शकते.

बापूंनी भक्ती आणि सेवेच्या जोडीने योगा आणि ध्यानधारणा यावर ही मार्गदर्शन केलेले आहे. हे मार्गदर्शन करताना त्यांनी "श्रीशब्दध्यानयोग" दिला आहे. "श्रीशब्दध्यानयोग" सारखं अदभुत काहीही नाही. या आधी त्यांनी दररोज दहा मिनीटे शांत बसण्यास त्यांनी सांगितले होते.
ते पुढील व्हिडीओत हे पाहू शकता.
यात बापू म्हणतात, दररोज दिवसातून वेळ काढून किंवा रात्री कमीत कमी दहा मिनिटांसाठी तरी शान्त बसा. शरीर स्थिर आणि मन शान्त करा.

ही दहा मिनिटांची शांतता खूप काही देऊन जाते. हा माझा अनुभव आहे. दिवसभरातील तारेवरची कसरत, प्रचंड दबाव या दहा मिनिटात मोकळा होतो आणि मग दुसर्‍या दिवशीसाठी नवशक्तीसह नवचैतन्यासह तयार असतो. ही दहा मिनीटे मन शांत केल्याने पुढील दिवसभरात कोणतेही संकट आले तरी त्याचा सामना करणे शक्य होते आणि बिकट परिस्थितीतही तोल सांभाळणे सहज शक्य होते. सदगुरुंचे अधिष्ठान असलेली ही दहा मिनिटे ही कमाल करु शकतात तर सदगुरुंचे अधिष्ठान असलेला ध्यान योग काय जबरदस्त बदल करुन जाईल आणि हे देखील एक योगच आहे, अस मला वाटते.

असाच श्रीशब्दध्यानयोग बापूंनी आम्हा सर्वांना दिला. या श्रीशब्दध्यानयोगमध्ये सप्तचक्रांची उपासना केली जाते. त्यामध्ये वेदांमधील ऋचांचे पठण होते व सप्तचक्रांचे एक-एक करुन पूजन होते. यावेळी आपण केवळ सप्तचक्रांवर आपले ध्यान केंद्रीत करणे आवश्य़क आहे. तदनंतर प्रत्येक चक्रांचा गायत्रीमंत्र बापूंच्या आवाजात लावला जातो व त्यानंतर प्रत्येक चक्राचे स्वस्तिवाक्य म्हटले जाते. याची माहिती पुढील लिंकवर आहे. - http://www.aniruddhafriend-samirsinh.com/shreeshabda-dhyan-yoga/ हा श्रीशब्दध्यानयोग दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राम (न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रा पू) येथे होतो. पण आपण ही उपासना घरी करु शकतो. ती उपासना व पुस्तिका पुढील लिंकवर मिळेल. https://www.aanjaneyapublications.com/productDetails.faces?productSearchCode=SSDMAR
असा हा श्रीशब्दध्यानयोग "श्रीश्वासम" या उत्सवातून साकार झाला. "श्रीश्वासम-गुह्यसुक्तम" म्हणजे हिलिंग कोड ऑफ द युनिव्हर्स.


प्रत्येक आजारपण दूर करणारा आणि प्रत्येक अडचण दूर करणारा हा कोड अर्थात गुह्यसूक्तम आहे. त्यावेळच्या पितृवचनात बापू म्हणाले होते की, प्रत्येक मानवाच्या शरिरात नऊ चक्र असतात. त्यातील सात चक्रे जागृत अवस्थेत व दोन चक्रे सुप्त अवस्थेत असतात. ही सप्तचक्रे प्रत्येक मानवाच्या प्राणमय देहात असतात. आपण केवळ विचार करतो की ही सप्तचक्रे केवळ मानवात असतात तर एका अर्थी ते बरोबरही आहे आणि चूकीचेही. कारण प्राण्यांमध्ये अधिककरुन ४ चक्रे असतात. केवळ मानवामध्येच ७ चक्रे असतात हे मानणे चुकीचे आहे. कारण एका मानव म्हणजे एक पिंड. वेदांमध्ये एका व्यक्तिला पिंड म्हटले गेले आहे आणि या सृष्टीला ब्रम्हांड म्हटले गेले आहे. जर एका पिंडीत सप्तचक्रे आहेत तर ब्रम्हांडातही सप्तचक्रे असली पाहीजे. जे जे पिंडी ते ब्रम्हांडी. सगळ्या समस्या अडचणी दोष या उदभवतात ते या सप्तचक्रांच्या असमतोलामुळे. त्यामुळे पिंडीच्या अर्थात आपल्या सप्तचक्रांचा समतोल उचित राखण्यासाठी ही श्रीशब्दध्यानयोग सप्तचक्र उपासना.   

आपण ज्या लोकांबरोबर राहतो त्या लोकांच्या सप्तचक्रांशी आपले सप्तचक्र जोडलेले असतात. त्यामुळे ज्या घरात समतोल नाही तिथे लक्षात घ्यावे की त्या घरातील लोकांची सप्तचक्रे एका हार्मेनीमध्ये नाहीत. किंबहुना आपण ज्या वसुंधरेवर राहतो तीचे देखील सप्तचक्रे आहेत आणि ज्या देशात आपण राहतो त्या देशाचेही सप्तचक्र आहेत आणि ते कोण बनवतो तर देशवासी बनवतो. तसेच आपल्या निवासी प्रदेशाचे सप्तचक्रे आहेत. जर मी भारतीय आहे पण राहतो अमेरिकेला तर माझे सप्तचक्र भारताच्या व अमेरिकेच्या निवासी प्रदेशाच्या सप्तचक्रांशी जोडलेले असते. तसेच ज्या घरात मी राहतो त्या घराचे देखील ७ चक्रे आहेत. ह्या अशा चक्रांचा जेव्हा समतोल राखला जातो तेव्हाच आम्हाला सुख शांती मिळते. यालाच खर्‍या अर्थाने कनेक्टड लिव्हींग आपण म्हणू शकतो. हा सप्तचक्रांमधील समतोल राखण्यासाठी श्री शब्द ध्यान योग आवश्यक आहे...आणि त्यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला बापूंनी दिली ती म्हणजे योग मुद्रा.
अवधूतमुद्रा

योगाभ्यासात मुद्रांचा देखील अभ्यास केला जातो. या मुद्रांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. "आपलाच हात जगन्नाथ" आपण म्हणतो याचा खरा अर्थ मुद्रा अभ्यास केल्यावरच कळतो. अनेक मुद्रा आहेत आणि त्यापैकी सप्तचक्रांशी निगडीत असलेल्या सात मुद्रा बापूंनी आम्हाला शिकविल्या. सध्या त्याचे विविध उपासना केंद्रांत प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. मुद्रा नुसत्या शिकणे नाही तर त्या त्यांच्या कार्य आणि परिणामासह शिकणे आवश्यक आहे. हा मुद्रा क्लास केल्यावर आपल्या ऋषीमुंनीचे इतके कौतुक वाटले की किती सोप्पे उपाय त्यांनी आपल्याला आधीच देऊन ठेवले आहेत. ज्याच्या वाट्यालाही आपण जात नाही. पण आज बापूंच्या परिश्रमामुळे प्रत्येकाला ह्या मुद्रांचा मोफत अभ्यास करण शक्य झाले. बापूंनी सात मुद्रा दिल्या जेवढ्या आवश्य़क तेवढ्याच आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात त्या करण्यास वेळ किती अपेक्षित आहे तर केवळ सात मिनिटे. आणि या सात मिनीटांचा देखील कसला जबरदस्त परिणाम होते हे मी स्वतः अनुभवलय. डायबेटीस पासून ते एखाद्या मानसिक आजारांवरही मुद्रा परिणामकारक  आहे. तसेच या मुद्रांचे अध्यात्मिक महत्त्व आहे.

स्वस्तिकमुद्रा, रसमुद्रा, त्रिविक्रममुद्रा, शिवलिंगमुद्रा, आंजनेयामुद्रा, अंबामुद्रा व अवधूतमुद्रा अशी सात मुद्रांची नावे म्हणजे  संपूर्ण श्रीश्वासमच. मुद्राक्लासमध्ये डॉ. योगिन्द्रसिंह जोशी अतिशय सुंदररित्या मुद्रा व त्यांचे महत्त्व समजावून सांगतात. नंतर केवळ आपल्या हातात मुद्रा करणे उरते. जितक मी श्रद्धेने करिन तितका त्याचा मला फायदा जास्त. योगासने, योगामुद्रा कुठलाही साईड ईफेक्ट नसलेली रामबाण औषधे आहेत अस मला वाटते.

हा जेव्हा मुद्रा अभ्यास करित होते तेव्हा एक जाणवले की एखाद्द्या विशिष्ठ पद्धतीने मुद्रा केल्यास एक चांगला विशिष्ठ परिणाम साधला जातो तसेच उलट्या व चुकीच्या पद्धतीने मुद्रा केल्यास तसा वाईट परिणामही साधला जातो. त्यामुळे हाताच्या मुद्रा करताना पूर्ण अभ्यासनिशी करणे आवश्यक वाटते. नमस्कारही देखील एक मुद्रा आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीत नमस्कराला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आपल्या शरिरातील पंचतत्त्वांचे प्रवाह हाताच्या पाचही बोटात खुले होत असतात. जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा ही पाचही बोटे जोडली जाऊन ते प्रवाह जोडले जातात आणि त्याचा खुप चांगला फायदा आपण जेवतो त्या अन्नातून होतो. म्हणून भारतात हाताने जेवण्याचीपद्धत आरोग्यासाठी चांगली मानली गेली असावी. म्हणजेच काही हाताच्या बोटांच्या काही ठरावीक हालचाली चांगली किंवा वाईट स्पंदने निर्माण करु शकत असतील. मग प्रत्येकाने थोड जागरुक असणे आवश्यक आहे की माझ्या कळत नकळत हाताच्या मुद्रा काय होत आहेत याबद्दल, अस मला वाटत...कारण Yo किंवा Cool साठी वापरण्यात येणारी हस्तआकृती its really not cool. तिचे  नावच मुळी सैतानाचे चिन्ह असे आहे.  आपण मात्र सावध असले पाहिजे.

आजचा योग दिवस या दिवसाचे औचित्य साधून आणि योगाचे महत्त्व जाणून आयुष्यात प्रत्येकाने स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना "उचित" योग स्विकारावा. कारण शेवटी या देशाची सप्तचक्रे संतुलीत असण आवश्य़क आहे आणि ती तेव्हाच संतुलीत जेव्हा आपली सप्तचक्रे संतुलीत होतील. मी तर स्विकारला आहे. योगा, योगासने, योगमुद्रा व श्रीशब्दध्यानयोग. तुमच काय?

- रेश्मा नारखेडे
Twitter - @reshmanarkhede
#YogaDay2016 #Yoga #ShreeShabdaDhyanYog


Thursday, June 16, 2016

माझेच मला कळेना


माझेच मला कळेना
माझेच मला वळेना
अंतरातील हळवे शब्द
माझेच मला पटेना

मीच मला पाहि ना
मीच माझे ऐके ना
अंतरातील हळवे भाव
मीच माझे जाणे ना

सुटू पहावे तरी सुटेना
हटू पहावे तरी हटेना
अंतरातील हळवी ओढ
तुटू पहावे तरी तुटेना

म्हणून आत आत जळताना
जीव तीळ तीळ तुटताना
अंतरातच विरघळतात अश्रु
जड पापण्या मिटताना

- रेश्मा हरचेकर ९ मार्च २०११

Friday, November 20, 2015

श्री हरिगुरुग्राम माझ्या कॅमेरामधून - भाग 3


ॐ साई श्री साई जय जय साई राम ही आरती भक्तांसमवेत करताना 

दर्शन

माझे तुझ्यावर लक्ष आहे.....

असेच हृदयी बंद करावे हे अनिरुद्ध रुप

दर्शन

पुजन

दत्तगुरु हे दैवत माझे

मी तुझ्या पाठीशी आहे..

मी तुला कधीच टाकणार नाही

I Love You My Dad

अनिरुद्ध आहे...

आरती.....

श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराज - श्रद्धावानांचा आधार आणि उद्धार स्तंभ

वर्षोनोवर्ष हिंदी आरतीचा हा एक क्षण अनुभवतोय आणि प्रत्येक वेळेस हवाहवासा वाटतो