Wednesday, July 18, 2012

Birthday Gift to Nandai

लहानपणी मला कॅमेर्‍याचे जाम वेड होते आणि हे वेड प्रोफेशनमध्ये केव्हा बदलले हे कळले नाही. आज जरी वेगवेगळ्या फिल्डमध्ये मी काम करीत असले तरी फोटोग्राफीशी नाळ ही जुळलेलीच आहे. परंतु याचे सर्वस्वी श्रेय जाते ते माझ्या एकमेव ख‌‍र्‍या मित्राला. डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी अर्थात माझे सदगुरु श्री अनिरुद्ध बापू. २००५ पासून मी फोटोग्राफर झाले पण आज सात वर्षानंतर मला उमगतेय की "मला फोटोग्राफर व्हायचे होते म्हणून मी फोटोग्राफर झाले नाही. तर, बापूंना मला फोटोग्राफर करायचे होते म्हणून मी फोटोग्राफर सहज झाले." आजही मला वाटते की या क्षेत्रात अजून मला बरच काही शिकायचे आहे. अनेक वेगवेगळे टप्पे गाठणे आवश्यक आहे. अजून फोटोग्राफी प्रॅक्टीस आवश्यक आहे आणि म्हणूनच माझे फोटोग्राफीचे शिक्षण आणि सराव अजूनही सुरु आहे. ह्या फोटोग्राफीच्या फिल्डमधून बक्कळ पैसा कमावू शकते. परंतु पैसा कमाविण्याच्या दृष्टीने या फिल्डकडे कधी पाहिलेच नाही. पैश्यापेक्षा लाखमोलाचे असलेले समाधान कमविण्यात मला जास्त इंटरेस्ट होता, आहे आणि राहणार. आणि म्हणूनच मी स्वतःला मोस्ट सस्केसफुल फोटोग्राफर म्हणू शकते कारण मला माझ्या या कलेतून जे हव ते समाधान प्राप्त झाले आहे आणि हे तोच समजू शकतो ज्याचे त्याला अवगत असलेल्या कलेवर प्रेम आहे.
एकंदरीतच फोटोग्राफर म्हणून वावरताना मला इतर कोणत्याही फोटोग्राफरशी स्पर्धा आहे आणि ती मला जिंकली पाहिजे अस काही वाटले नाही. कारण "समाधाना"ची स्पर्धा कधीच नसते आणि ती कुणी ठेवू शकत नाही. आपले फोटोग्राफीचे टेक्नीक्स दुसर्‍यांबरोबर शेअर करायला देखिल कधी भिती वाटली नाही आणि वाटणार देखिल नाही. कारण एकच "समाधान"

इतिहासात अजरामर राहतील असे क्षण टिपण्याची संधी मिळतेय यासारख मोठ अवॉर्ड नाही. आता तुम्ही म्हणाल हे कस काय? अरे पुन्हा होणार नाही असा "श्री वरदाचण्डीका प्रसन्नोत्सव" कव्हर करायला मिळाला हे काय कमी समाधान देणारे आहे का? किंवा गेल्यावर्षी नंदाईचा ५० वा वाढदिवस कव्हर करण्यास मिळणे हे काय कमी समाधान देणारे आहे का? आज नंदाईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सारं आठवतेय. एक एक क्षण आठवतोय. तेव्हाचे सारे क्षण मेमरी कार्डवर किंवा हार्ड डिक्सवर तर आहेतच. पण हे सारं माझ्या मेमरीत आणि हार्ट डिक्सवर आहेच. त्यामुळेच आई बापू दादांचे सर्व एक्सप्रेशन्स, एक एक नाजूक अप्रतिम क्षण लक्षात आहेत.
अनेकांना बापूंचे वेगवेगळे अनुभव आले आहेत. मला असे काही अनुभव आलेले नाही. पण मी जे काय अनुभवलेय ते आता मला शेअर करावेसे वाटते. केवळ बापूंची एक भक्त म्हणून किंवा बापूंची सेवेकरी किंवा बापू आईंची मुलगी म्हणून नाही तर त्यासोबतच एक फोटोग्राफर म्हणून मी तुमच्याशी माझे अनुभव शेअर करणार आहे. त्यामुळे आजच्या शुभदिनापासून "The Bapu - From My View Finder" ची सुरुवात करीत आहे. मला माहित नाही मी पुढे आता काय काय लिहणार पण जे काय लिहेन ते मला समाधान देणारे, वाचकांना समाधान देणारे नक्कीच असेल याची खात्री मी देऊ शकते. कसे?
Because My View Finder is based on Camera of Pure and Ultimate SAMADHAN and this series is birthday gift to my beloved NANDAI. 
Happy Birthday Aai.
I love You.

Wednesday, July 11, 2012

मोबाईलगिरि

आज काय एक एक धम्माल मोबाईल आलेले आहेत. अगदी आख्खा कॉम्प्युटर आपल्या इवल्याश्या हातामध्ये आला आहे. अनेक फिचर या मोबाईलमध्ये आले आहेत. परंतु या फिचरचा आपल्याला पूरेपूर वापर करताच येत नाही.
फोन करणे, एसएमएम पाठविणे, गेम खेळणे, गाणी ऐकणे इत्यादी या पलिकडे मोबाईलचा आपण काही वापर करतो का? याचा विचार करण्यास हवा. स्टाईलसाठी महागडे मोबाईल घेतो खरे पण त्याचा क्रीएटीव्ह वापर करायला पाहिजे,
मी नुकताच एनरॉईड ऑपरेटींग सिस्टीम असलेला सॅमसंग गॅलेक्सी मोबईल घेतलाय आणि खर सांगू या मोबाईल माझी बरीच कामे होतात.
ऍनरॉईड देत असलेल्या ऍपलिकेशनचा सॉलिड फायदा होतोय. खर म्हणजे मी तो करुन घेतेय. त्यात सगळ्यात आवडते ऍपलिकेशन म्हणजे पीडीएफ रिडर...सर्व पीडीएफ फाईल्स कोणत्याही त्रासाशिवाय मी त्यावर वाचू शकते. आताच साईसच्चरित्र पंचशील परिक्षेची तयारी मी मोबाईलवर केली. कसे काय? तर साईसच्चरित्रचे अध्याय मोबाईलवरच वाचले आणि त्याचा अभ्यास केला. प्रवासात साईसच्चरित्र नेणे आणने अवघड. मोबाईलमध्येच आख्ख साईसतचरित्र असल्याने अभ्यास आणि पारायण किती सोपे झालेय.
याव्यतिरक्त आजकल मला उपासनेची पुस्तके कॅरी करावी लागत नाही. आदीमाता स्तवनम, अशुभनशिनी स्तोत्र, दत्तस्तव स्तोत्रम, रामरक्षा, हनुमान चालिसा, गुरुक्षेत्रम मंत्र असे अनेक जप व स्तोत्र स्टोर करुन ठेवलेली आहेत. हा माझ्या मोबाईलचा भक्तीमय उपयोग मी करुन घेतलाय.

यव्यतिरिक्त माझी आवडती ई बुक्स हॅरी पॉटर, चेतन भगत इत्यांदीची पुस्तके पण मोबाईल वर आहेत. त्यामुळे पुस्तकांचे वाचन ही होते. शिवाय मार्गदर्शक पुस्तके देखील आहेत. म्हणजे चालती फीरती लायब्ररी आहे माझ्याकडे.


या नंतर दुसरे ऍपलिकेश म्हणजे थिंक ऑफीस. यामध्ये ऍक्सेल्, वर्ड, पॉवर पॉईंट हे सगळे चालते. त्यामुळे  माझी डाटाबेसची अर्जंट कामे मोबाईलवरच होतात.

शिवाय नेट कनेक्शन असल्याने जी टॉक आणि फेसबुक वरुन मित्रांशी संपर्कात राहता येते. तसेच इमरजन्सीमध्ये फाईल ट्रान्सफरींग करता येते.


डिझास्टर मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये वेगवेगळ्या रेस्क्यु नॉटस शिकले होते. त्या आणि त्यांच्यासारख्य अनेक महत्त्वाच्या गाठींची माहीती नॉटस गाईड या ऍपलिकेशनमधून मिळते,
तसेच डीझास्टर अर्लट या ऍपलिकेशनमधून जगभरात झालेल्या आपत्तींची अपडेट मिळत राहते.
शिवाय न्यूज चॅनेलच्या ऍपलिकेशनमुळे दैंनदिन घडामोडी कळतात. 

कॅम कार्ड ऍपलिकेशन मुळे एखाद्याचे बिझनेस कार्ड केवळ त्याचा फोटॊ काढून सेव्ह करता येते. 
शिवाय डिक्शनरी, वायकीपिडीया, गुगल सर्च आहेच. यासारखी लाखो ऍपलिकेशन्स असतील. त्यातील किति ऍपलिकेशन्सचा वापर आपण करतो हे महत्त्वाचे आहे.

गुगल मॅप, गुगल स्काय मॅप, पियानो, वेदर रिपोर्ट हे पण ऍपलिकेशन माझी आवडती आहेत. विरंगुळा करायचाच आहे ना. मग या ऍपलिकेशन्सचा वापर करणे मला जास्त आवडते. दररोज नवनवीन ऍपलिकेशन्सची भर पडत असते. 

नुसता गेम्स खेळण्यासाठी या अशा हायटेक मोबाईलचा वापर करणे म्हणजे या मोबाईल्सची लाज काढल्यासारखे मला वाटते. त्यामुळे या अशा मोबाईल्सचा उचित वापर आपल्या स्वतःच्या विकासासाठी करुन खर्या अर्थाने आपल्याला हायटेक व्हायला हवे. नाही का?

Saturday, July 7, 2012

Samirsinh Dattopadhye Blog


Pujya Samirdada  has launch his Blog

Samirsinh Dattopadhye

Kindly Visit

www.aniruddhafriend-samirsinh.com

Tuesday, April 17, 2012

नंदावन फुलवत....नंदाईच्या वनात दुसरी भेट...१६/०४/२०१२

नंदावन फुलवत....नंदाईच्या वनात दुसरी भेट...१६/०४/२०१२

by Reshmaveera Shaileshsinh Narkhede on Tuesday, April 17, 2012 at 3:59pm ·
सोमवारी अचानक माझ्यासाठी कोमलवीराचा फोन आला. साडे सहा वाजता तूला कॅमेरा घेऊन हॅप्पी होमच्या सातव्या मजल्यावर फोटो काढायला बोलाविले आहे. अर्ध्यातासात कॅमेर्‍याची सोय करुन मी सातव्या मजल्यावर पोहचले. तिथे धांगडधिंग्याच्या मावशी-दादांची नंदाई मिटींग घेत होती. मी गेल्यावर मला पाच मिनिट बसायला सांगितले. तोपर्यंत मला माहितच नव्हते काय कुठले फोटो काढायचे ते. आईने मिटींग थांबविली आणि बाहेर आली. तिच्या हातात बॅटरीवर चालणारा छोटा पंखा होता. त्याने आई हवा घेत बाहेर आली आणि मला म्हणाली, हे बघ किती छान आहे ना!!! मी बघतच बसले...मला काही कळतच नव्हते. आई म्हणाली फोटो काढ..मग आईने छान पोझ देऊन फोटो काढून घेतला. मग म्हणाली चल वर. तेव्हा माझ्या लक्षात आले की आई गच्चीत नेतेय...म्हणजेच तिच्या नंदावनात. मी पुढे होते. मी आधी नंदावनात शिरले. मागून आई आली. आत येण्याआधी आईने नंदावनाच्या उंबरठ्याला वाकून हात लावून नमस्कार केला. जसे आपण देवळाची पायरी चढताना करतो तसेच. हे पाहून माझी मलाच लाज वाटली. आपण ही या नंदावनात येताना नमस्कार करुन यायला हवं होतं. म्हणून मी मनोमन नमस्कार केला.

आता या नंदावनात मला खरी मेजवानी मिळणार याची मला खात्री होती. त्यामुळे मी तयारीतच होती. आईने सर्वप्रथम मला तिच्या नंदावनात आलेला लाल भोपळा दाखविला. एक नाही तर चक्क दोन..छोट्याश्या मचाणावर भोपळ्याची वेल चढत गेली होती आणि त्यावरुन दोन मस्त जाडजूड भोपळे आईकडे टकामका पाहत असल्याचे मला जाणवले. आपल्या बाळांचे फोटो काढण्यास ज्याप्रमाणे आई सांगते त्याच भावनेने माझ्या या भोपळ्यांचे फोटो काढ अस आईने सांगितले. अग माझे नको काढू या भोपळ्यांचे फोटो काढ. तेव्हा मला मी पण एक भोपळा असल्याचे जाणवले. मग पुढे आई मला सूर्यफुलांनी बहरलेला विभाग दाखविला. तेव्हा आई सांगत होती की सुर्याच्या दिशेने ही फुले फिरत असतात. जिथे सूर्य आहे त्या दिशेनेच सुर्यफुलांची ओढ असते. हे समजवून देताना यातील खर मर्म मनात उतरत होते. आपणही या सूर्यफुलांप्रमाणे असावे सद्गुरुरुपी सूर्याची कायम ओढ असलेल्या फुलासारखे. पुढे आईने या फुलांना खुप प्रेमाने कुरवाळले. त्यावेळी मला मी सुद्धा सूर्यफुल व्हावे असे वाटले.

त्यानंतर आईने मला भोपळी मिरची दाखवायला नेले. पण ती मिरची गळुन पडली होती. तेव्हा तिच्या चेहर्‍यावरची खंत स्पष्ट दिसत होती. इथे छान भोपळी मिरची आलेली पण ती गळून पडली ग! अस म्हणत ती छोटीशी भोपळी मिरची तीने हातात उचलून दाखविली. त्याबद्दल तिला खूप वाईट वाटत होत. पण तिला खात्रीपण होती की पुन्हा या रोपाला भोपळी मिरची येईल. काहीही दुखलं खुपलं, कितीही वाईट झाले, कितिही दुःख वाट्याला आले तरीही श्रद्धावान हा कायम होपफुल असावा हे आईने मला दाखवून दिले.

पुढे आईने मला शतावरीची वेल दाखविली. त्याची लाल चुटुकदार फळे आईने छान हातावर घेतली आणि मला फोटोसाठी पोझ दिली आणि पुढे म्हणाली अग शतावरीचा काढ हं फोटो. मी हो म्हटल आणि आईचापण फोटो काढला..

मग आईने वेगवेगळी झाडे फुले दाखवत मला लिंबाच्या झाडापाशी नेले. तिथे एक मोठा लिंबू आला होता. पण तो दिसतच नव्हता. आई खुप शोधत होती. पण सापडलाच नाही. शेवटी एक चिटुकला लिंबू दाखवला आणि त्याचा फोटो काढायला सांगितला. मी फोटो काढला. मग आई बोलली किती छान वास येतोय ना!! अस म्हणत तीने लिंबाच्या पानाला हात चोळला आणि सरळ माझ्या नाकावर ठेवला. मला काही कळेच ना!! वास घे म्हणाली. वास खरच खूप छान होता. पण तो जास्त छान होता कारण तो आईच्या हाताला येत होता. यावेळी काय वाटल ते सांगायला जमणार नाही पण छान वाटले. त्यानंतर तो मोठा लिंबू सापडला आणि तो पाहायला आई मागे फिरली आणि मग त्याचा फोटो काढायला सांगितला.

मग आईने वांगी, पेरू, चिकू आणि झाडाला आलेल्या मिरच्या दाखवल्या. नंतर दाखवला तो आंबा. एकदम एक्साईट होऊन आईने झाडाला आलेला पहिला आंबा दाखविला. जणू नवी नवरी सगळ्यांसमोर खुले पणाने यायला लाजते त्याप्रमाणे ही मोठ्या आंब्याची कैरी हिरव्यागार पानांच्या पडद्यामागे लपली होती. आईने अलगद हा पडदा दूर सारला आणि या आंब्याचे मी फोटो काढले. मग आईने सांगितले माझ्या बोन्सायच्या झाडालापण आंबा लागला आहे आणि मी त्याचा ही फोटो काढला.

आईने मग नंदावनातील वेगवेगळ्या रंगाची, शेडसचे गुलाब दाखविले. मग छोट्या छोट्या कुल्लडमध्ये लावलेली तुळशीची रोपे दाखविली. छोट्या कुंडीतील वडाचे झाड ही दाखविले. मग आईने एक काट्यांचे रोप दाखविले पण ते पूर्ण फूलांनी बहरले होते. आई म्हणाली बघ हे काट्यांचे झाड असूनही कस फुलांनी बहरले आहे. असच असाव. या एका वाक्यात आई बरच काही बोलून गेली. आपल्या सगळ्यांना हे तीने धीराचे बोल दिले, अस माझ मत आहे. बापू सांगतात की आता पुढचा मार्ग हा काट्याकुट्यांच आहे पण तरिही आपल्या आयुष्यात बहर आपण्यासाठी प्रयत्न करावा आणि हे शक्य आहे हे आईने त्या रोपाच्या मार्फत दाखवून दिले.

आईचे नंदावन पुन्हा पाहताता खूप छान वाटले. पण या दुसर्‍याभेटीत हे नंदावन वेगळे भासत होते कारण इथे क्षणाक्षणाला बदल होत असतो, क्षणा क्षणाला विकास होत असतो. फक्त बदलत नसते ती नंदाईची माया, तिचे प्रेम, तिचे कष्ट..आणि तिचा उत्साह....आईच्या या नंदावनात गेल्यावर आपण कुठेतरी वेगळीकडे आहोत हे प्रकर्षाने जाणविते. वाटतच नाही मुंबईसारख्या शहरात आपण आहोत.
ग्रामराज्यातील "परस बाग" कशी असावी हे आईच्या नंदावनाकडे पाहून कळते. ज्यांच्याकडे जागा आहे गच्ची आहे त्यांनी आईच्या नंदावनावनासारखे आनंदवन करायला हरकत नाही. असे आनंदवन उभारता उभारता आयुष्याचे आनंदवन कधी होईल हे कळणार सुद्धा नाही.

आणि हा सगळा खटाटोप तिच्या सगळ्या बाळांसाठी....तिचे नंदावन सर्वांना पाहयला मिळावे म्हणून तीने हे फोटो शूट करुन घेतले आणि फेसबुकवर मला शेअर करायला सांगितले.....आहे ना आई आपली सॉलिड..........

Thursday, August 18, 2011

राम बिना कछु मानत नाही.....हनुमान चलिसेचा अनुभव

हरि ॐ

सध्या श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे श्रीमद पुरुषार्थ यंत्राचा उत्सव म्हणुन हनुमान चलिसाचे पठण एक सप्ताह केले जात आहे. १५ ऑगस्टला परम पुज्य नंदाईच्या सानिध्यात या पठणाला सुरुवात झाली. अत्यंत उल्हासित आणि पवित्र वातावरणात हे पठण सुरु आहे. जे २१ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. या अशा मंगलमय आणि पवित्र उत्सवात सहभागी होण्याची संधी मला १७ ऑगस्टला मिळाली.

अत्यंत सुंदर आणि सर्व टेंशन्स नाहिशी करणारा हा दिवस ठरला. अत्यंत शांत आणि प्रसन्न मन झाले या पठणानंतर. आमची दुसरी बॅच होती पठणासाठी. दोन्ही बॅचेसना एक एक तास आलटून पालटून पठणाला बसण्याची संधी मिळत होती. आम्ही जेव्हा दुसर्‍यांदा बसलो. तेव्हा नंदाई देखील पठणाला आली. नंदाईचे सानिध्य रोज या पठणादरम्यान अनुभवण्याची संधी मिळते. आई आल्यानंतर आम्ही अगदी जोरोशोरोत हनुमान चालिसा म्हणालो. आई संपूर्णपणे या हनुमान चलिसेच्या शब्दात भावात हरवून तल्लीन होऊन हनुमान चालिसा म्हणत होती. मध्येच आपलाच एक प्रेमळ कटाक्ष सार्‍या लेकरांवर टाकत होती. तिच्या डोळ्यात तिच्या लेकरांसाठी अपरंपार कौतुक होत. मध्येच हनुमान चलिसा म्हणण्याचा आमचा आवाज अगदी लहान झाला. जणू झोपलोच की काय? तेव्हाच आईने सगळ्यांना पुन्हा उत्साहाने हनुमान चालिसा म्हणण्यास खुणावले. तसे आम्ही परत उत्साहाने चलिसा म्हणू लागलो. आई देखील टाळ्यांनी ठेका धरत हनुमान चलिसा म्हणू लागली. मग आमची उठायची वेळ आली. आम्ही जेव्हा उठलो तेव्हा जाताना छान आईचे दर्शन झाले. प्रेमाने तीने प्रत्येकाला पाहिले. खूप मज्जा आली हे अनुभवून.

खरंच हनुमान चलिसा पठण कस कराव हे आई कडून शिकाव. हनुमान चालिसा सुरु झाल्यावर ही तर मी पहिलीच बोलतोय या भावनेने पूर्णपणे तल्लीन होऊन म्हणावी. आपल्याला हे प्रत्येक वेळेला शक्य होईल असे नाही. पण खरंच जेव्हा कधी शक्य होते जेवढ जमतं ते अनुभवून खूप छान वाटते. कानावर पडणारी मुखाने गायली जाणारी हनुमान चलिसा कधी अनुभव देऊन जाते हे खरच कळत नाही आणि हा अनुभव असतो तृप्तीचा समाधानाचा आणि सध्या आवश्यक असणार्‍या मंगल शांततेचा. हे सार अनुभवयाचे असेल तर गुरुक्षेत्रमला जाऊन थोड्यावेळ तरी जाऊन पठण करुन यावे.

साक्षात दत्तगुरु, महिषासुरमर्दिनी, अनसूयामाता, त्रिविक्रम आणि सद्गुरुच्या सानिध्यात केलेल्या पठणाची मजा काही औरच आहे.

पठण करताना संध्याकाळ केव्हा झाली ते कळलेच नाही आणि साधारण ६.१५ च्या सुमारास बापू देखील पठणाला आले. गुरुक्षेत्रमला असलेल्या घंटे जवळच्या गेटवर उभे राहून बापूंनी किमान दोनदा तरी हनुमान चालिसा म्हटली. अत्यंत प्रेमाने सर्व भक्तांकडे, जपकांकडे त्यांनी पाहिले. काहीतरी वेगळेच वाटत होते त्यांच्याकडे पाहून. हनुमान चालिसेच्या शब्दा शब्दाचा अनुभव घेत बापू हनुमान चलिसा म्हणत होते. प्रत्येक ओळीला त्यांचे भाव बदलत होते. आपण म्हणतो ना पूर्ण ऍन्जॉय करीत म्हणतात ना! अगदी तसेच. शांत आणि आश्वासक डोळे....नजरेत अकारण कारुण्य...हृदय विरघळवणारे पुसट हास्य..आणि कृपावर्षाव करणारा हात....एवढच आठवतय.
आणि आणखीन हवय तरी काय...
राम बिना कछु मानत नाही.....ही धारणा दृढ करणारा दिवस ठरला हा

Saturday, August 6, 2011

.मैत्रीदिनाच्या अनिरुद्ध शुभेच्छा

काल आमच्या कॉलनीत काही चिल्ली पिल्ली एकमेकांच्या हातावर आपली नाव लिहित होती. रिबिन्स बांधत होती. मी जरा अधिक कुतूहलाने पाहिले त्यांच्याकडे तर ही चिल्ली पिल्ली फ्रेंडशीप डे साजरा करीत होती. हे पाहून मला खूपच हसू आले आणि मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. तेव्हा मला कॉलेजमध्ये गेल्यावरच कळले होते या दिवसाबद्दल.

आता तर शाळेतल्या पोरांना पण हा डे कॉमन झालाय. मी दहावीत असताना आलेला कुछ कुछ होता है या चित्रपटाने फ्रेंडशीप डेचे फॅड आणले होते. पहिल्यावर्षी मी जवळपास १०० च्या वर बॅण्डस जमा केले होते आणि तळहातापासून खांद्यापर्यंत नावांनी हात बरबटले होते. घरी जाऊन हात धुण्याआधीच आईने मला धुतले होते. असली थेर चालायची नाहीत.....असा रद्दड दम दिला होता. त्यानंतर पुढल्यावर्षी मात्र शिस्तीत एक डायरी बाळगली. कुणाला मैत्री करायची असल्याच त्या डायरीवर नाव लिहून पुढे जावे असा दंडकच मी घातला. मग काय उगाच आईचा दंडुका कोण खाईल. खूप छान दिवस होते ते...

असे वाटते...

पण नंतर कळते...की नाही...त्यावेळेच्या प्रवाहाबरोबर विनाकरण फुकट गेलेला वेळ...क्षणभंगूर आनंद देणारा तो काळ होता...ज्याच्यावर आता आठवले की हसू येते....

मैत्री दिनाच्या दुसर्‍यादिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर आठवेनाच या मुलाने अथवा मुलीने आपल्याशी मैत्री केली आहे का ते नाही. १०० बॅण्डस पैकी एकही बॅण्ड माझ्या आयुष्याशी घट्ट बंधू शकला नाही. दुसर्‍या दिवशी हाताला बांधलेला बॅण्ड सैल व्हावा तशी ही मैत्रीची नाती काळाच्या ओघात सैल होत गेली आणि नाहीशी झाली. ज्यांच्या जाण्याने दुःख ही झाले नाही. पण मैत्री हा कंन्सेप्ट मात्र मनात घट्ट वीण करुन राहिला. पुढील आयुष्यात आलेल्या अनुभवांवरुन मैत्रीच्या संकल्पना बदलत गेल्या आणि एका डे पुरती मर्यादीत ठेवावी अशी मैत्री आपल्याला नकोच अशा ठाम मताची मी झाले आणि यानंतर असा काय डे वैगरे साजरा करायचा नाही असे ठरवले.

पण हा दिवस पुन्हा हवाहवासा वाटू लागला. जेव्हा कधी न सुटणारा बॅण्ड घेऊन काही जण आयुष्यात आले. कुठल्याही आणा भाका नाही...कुठलेही वचन नाही...किंवा कुठलेही कारण नाही...केवळ मैत्रीसाठी मैत्री म्हणून ते बरोबर आले. ते म्हणतात ना गिफ्टेड....अगदी तसच...

काळ लोटला....वाटा बदलल्या...पण ही मंडळी आणि त्यांची मैत्री आहे तशीच आहे...
जगण्य़ाची दिशा देणारे....खराब असलेला मुड ठीक करणारे...रडू येण्याआधीच थांबविणारे...विनाकारण भांडणारे....अगदी राग काढण्यासाठी हक्काची जागा समजणारे...मर्यादाही जाणणारे....निरागस असे हे मित्र आणि मैत्रिणी....

किती बोलावे तितके कमी....यांची साथ म्हणजे आयुष्यातील चैतन्य स्थळे...ज्यांच्या ठीकाणी विसाव्याला गेल्यानंतर भरभरुन चैतन्यच मिळते असे....
परंतु हे मला अशी मैत्री आणि मी त्यांना अशी मैत्री का देऊ शकते...असा प्रश्न पडतो....
आणि तेव्हा कळते.....
दोघांकडे किंवा त्यांच्याकडे आणि माझ्याकडे असलेला मैत्रीचा मूळ स्त्रोत......मैत्रीचे खरे तत्त्व...मैत्रीचा खरा अर्थ....मैत्रीचा खरा गाभा...मैत्रीचा मर्म....मूळ मित्र...अनिरुद्ध.....

हा अनिरुद्ध माझा खरा मित्र आहे....तोच मैत्रिचे खरे नाते जगतो...मैत्री कशी असावी हे ही तोच शिकवतो...आणि त्याच्यासारखी मैत्री कुणीही करुच शकत नाही....तो माझा मित्र आहे म्हणूनच आज माझे अनेक मित्र आणि मैत्रिणी आहेत....त्यांची मैत्री एखाद्या दागिन्याहून अधिक मौल्यवान आहे...कारण ते माझ्या अनिरुद्धाने दिलेले जणू वरदानच आहे.....

माझ्या सर्व खास...जिवश्च कंठश्च....मित्र....मैत्रिणींना...सखा आणि सखींना....मैत्रीदिनाच्या अनिरुद्ध शुभेच्छा....

- Reshma Harchekar...

Monday, June 27, 2011

गोविद्यापिठमचा अनुभव...

हरि ॐ

बापूंची इच्छा अस आपण सहज म्हणतो आणि तितक्या सहज अनुभवतो देखिल...आणि तसच मी अनुभवले...रविवारी कोठींबेला सेवेला जाण्याची मिळालेली संधी ही देखिल बापूंची इच्छा होती. कारण कोठींबेला जायच हे आदल्या रात्री ठरवल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी मी कोठींबेला पोहचले देखील. रिक्षातून कोठींबेला उतरलो आणि समोर गोविद्यापिठम आणि अनिरुद्धाज इन्स्टीट्यूट ऑफ ग्राम विकासाचा बोर्ड दिसला. रामराज्यातील महत्त्वाचा प्रोजेक्ट ग्रामविकासच्या सेवेसाठी आपण येथे आलो आहोत हीच एक्सायमेंट होती. काय मिळेल सेवा? या विचारातच गोविद्यापिठममध्ये पाऊल ठेवले. फार थोडेच श्रद्धावान आले होते तेव्हा. अगदी शांत वाटत होत...खर तर डोके अजिबात शांत नव्हते.
पण अशी ही शुद्ध व आह्लादायी शांतता कधी शांत करुन गेली कळलेच नाही.

सर्वप्रथम आम्ही द्वारकामाईत धाव घेतली. किती वर्षांनी गोविद्यापिठमला गेले होते ना!!!! लाल मातीने सजलेला रस्ता आणि दुतर्फा हिरवा गालिचा..असा हा रस्ता थेट द्वारकामाईत घेऊन गेला. द्वारकामाईत पाऊल ठेवले आणि शांतता आणखीन गडद झाली. नुकतीच बाबांची पूजा झाली होती आणि आम्ही नंतर दर्शनास पायरी चढलो. द्वारकामाईत पाऊल ठेवल आणि साईसच्चरित्र आठवायला लागले..द्वारकामाईचे वर्णन आठवू लागल. अरे मग म्हटल..आठवतेय काय मी "द्वारकामाईत"च नाही का??? मग शांतपणे द्वारकामाईत दर्शन घेतले. खर तर द्वारकामाईत गेल्यावर काय म्हणू काय जप करु सुचतच नव्हते. पण मग असच "बाबा, बाबा" म्हणत बसले..थोड्याच वेळात तिथून निघाले आणि सभामंडपात गेले.

श्रीकृष्णाला पाहिले...किती आणि कधी या श्रीकृष्णाला पाहिले होते आठवत नाही. पण जेव्हा पाहिले होते तेव्हा हा कृष्ण किशोरवयातील भासला आणि आज हाच युगंधर स्वरुपातील भासला..सोप्या शब्दात म्हणायचे तर "मोठा" वाटला. शांतपणे या सावळ्याच दर्शन घेतले...त्याच्या कृष्ण वर्णावर मोरपिशी रंगाचे उपरणे खुलून दिसत होते. अधिक वेळ जर याच्याकडे पाहत बसले असते तर बहुतेक विसरुनच गेले असते की मी इथे सेवेला आलेय..म्हणुन श्रीकृष्णाला नमस्कार करुन त्याच्या परमप्रिय भक्तांकडे पाहिले. गोपिनाथशास्त्री पाध्ये, संत मीराबाई, संत तुकाराम, संत देवीअंडाळ, गौरांगचैतन्य प्रभू इत्यादी सर्व संतांच्या तसबरींना पाहिले..एकच गोष्ट कॉमन जाणवली मला..शांतता..तेवढ्यात सेवेसाठी कॉल आला..सेवेसाठी पळालो..आणि बाहेर आलो तर काय..ही गर्दी...बरेच श्रद्धावान श्रमदानासाठी रविवारी आले होते...आणि येतच होते..

भौतिक पातळीवर काही मिनिटांपूर्वीची शांतता भंग पावली होती...पण माझे मन मला शांत वाटले..हीच तर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गोविद्यापिठमची किमया आहे...

मग आम्ही सेवेला गेलो..सेवेचा इतिवृत्तांत नंतर सविस्तर देईनच...

आमच्या फेसबुक गृपला जल संधारणची सेवा अर्थात बंधारा बांधण्याची सेवा आली होती. पण मी त्या बरोबरच फोटोग्राफीची पण सेवा घेतली. त्यामुळे मला सर्वच ग्रामविकासाच्या सेवा अनुभवायला मिळाल्या.

अस काय आहे या गोविद्यापिठममध्ये माहित नाही. पण येथील प्रत्येक गोष्ट मनात आमुलाग्र बदल घडवून आणू शकते. याची जाणिव झाली. मी तर यास भक्ती सेवेचे रिसॉर्ट म्हणेन..रिसॉर्टला आपण का जातो तर मज्जा करायला, मज्जा लुटायला, खेळायला, पोहायला..रिलॅक्स व्हायला..

या रिसॉर्टमध्ये तर भक्तीच्या समुद्रात पोहायचे आणि सेवेच्या मैदानात खेळायचे. नेहमीच्या रिसॉर्टमध्ये जो आराम, शांतता, चैतन्य मिळणार नाही ते सार काही इथे मिळून जात. खर रिलॅक्सेशन...

हिरव्या गार जमिनीवर मुसळधार पावसात अनिरुद्धाचे नाव घेत चालत जाणे यासारखा आनंद.

थंड थंड वातावरणात एक एक श्वास घेताना धुनितून मिळणारा उबदारपणा...अगदी आईच्या कुशीत असल्याचा भास देऊन जातो.

सेवा करताना होणारा या लाल मातीचा स्पर्श मोहावून जातो. मातीच्या कणाकणात अनिरुद्धाची कृपा असल्याचे जाणवत राहते. त्यामुळे या मातीत सेवा करताना सार काही विसरुन जायला होत.

तिथल्या गाईंशी, बकरींशी, ससा, बदक यांच्याशी जाऊन गप्पा माराव्यात इतके जवळचे ते भासतात.

नंदाई प्लॉटवरील आमराईत जरा चक्कर मारली. तेव्हा सहज तोंडातून शब्द बाहेर पडले.."बघितल!! माझ्या आईची आमराई...कोण म्हणत माझ्या गावाला आमराई नाही म्हणून. हेच माझ गाव आणि ही माझ्या आई बाबांची आमराई"

मला कधीच गाव आणि गावातील मजा अनुभवयाला नाही मिळाली..आंब्याच्या झाडाखाली क्षणभर विश्रांती घ्यायला नाही मिळाली. पण या पसरलेल्या आमराईत चक्कर मारुनच सर्वच इच्छा पूर्ण झाल्यासारख्या वाटल्या.

खुप मज्जा आली. या आल्हादायी वातावरणात आपल्यावर अखंड कृपेचा वर्षाव होतोय याची जाणिव होत होती. येथील प्रत्येक झाड प्रत्येक रोप आणि प्रत्येक दगड मनावरील, मेंदूवरील आणि शरिरावरील ताण कमी करत होत. खोट वाटेल तुम्हाला पण वृक्षारोपण करताना, बंधार्‍यासाठी दगड उचलताना हे सार होत होत. फोटो काढण्याच्या सेवेमध्ये प्रत्येक क्षण टीपताना मनातील विचारांच्यागुंत्यातील एक एक धागा सुटत होता.

गोविद्यापिठमला का जावे हे ज्याचे त्याने ठरवावे. पण इतर कुठेही जाऊन रिलॅक्स होण्यापेक्षा माझ्या आई बाबांच्या या गावाला जाऊन रिलॅक्स होणे मला जास्त श्रेयस्कर आहे. इथे सेवा करुन, भक्ती करुन आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेऊन नक्कीच रिलॅक्स होता येते.

सेवा संपल्यानंतर आम्ही नेरळ स्टेशनला पोहोचलो.. स्टेशनवर ही अफाट गर्दी..माथेरानला जाण्यासाठी किंवा माथेरानवरुन येणारी...आणि होतो आम्ही. तेही रिलॅक्स होऊन आलेले आणि आम्ही देखील...पण किती फरक होता...हे ही कळले.
ट्रेनमध्ये एका अनोळखी बाईने मला विचारले...माथेरानवरुन आलात का? मी म्हटले नाही. आम्ही कोठींबेवरुन आलो. गोविद्यापिठम येथे सेवेला गेलो होतो. त्याबाईला कळले नाही. कुठे?तिन्ही पुन्हा विचारले. मी तीला सोप्या शब्दात सांगितले तिथे मंदिर आहे तिथे सेवेला गेलो होतो. ती बाई हसली आणि म्हणाली मी पुढेच उतरणार आहे तुम्ही इथे बसा मग. आता मला प्रश्न पडला हिला माझ्या चेहर्यावर थकवा दिसला की काय? मग रात्री घरी जाऊन स्वतःचाच चेहरा आरश्यात पाहिला तेव्हा कळल की तिला थकवा नाही तर चेहर्यावरील थकव्याच्या मागे असलेली डोळ्यातील शांतता, आनंद आणि हालचालीतील चैतन्य दिसले. म्हणूनच आख्या ट्रेनमध्ये तिला आम्हालाच विचारावेसे वाटले. हाच तो फरक. नाही का? त्याच्यासाठी थकण पण वेगळच असत.
रात्री निवांत झोपताना कळल की सर्व सेवा झाल्यानंतर कोठींबेवरुन निघताना मन का अगदी जड झालो होत..
मशिनचा माणूस होऊन निघत होता म्हणून..आणि हिच बापूंची इच्छा...
हाच गोविद्यापिठमचा अनुभव...
हरि ॐ
HARI OM