Showing posts with label ARTICLES. Show all posts
Showing posts with label ARTICLES. Show all posts

Thursday, February 12, 2015

आत्मबल - तुझे माझे नाते आई

आत्मबलचा कार्यक्रम नुकताच झाला. मला प्रत्यक्ष कार्यक्रमाला जाता आले नाही. परंतु या कालावधीत मी माझ्या वेळच्या आत्मबलच्या आठवणींमध्ये रमले होते...खरच एक एक आठवण जपून ठेवण्यासारखी आहे. किती सांगू आणि किती नाही. या आत्मबलच्या क्लास मध्ये मला काय मिळाल हे शब्दात सांगता येणार नाही पण तीन प्रमुख गोष्टी मला मिळाल्या त्या म्हणजे आई, मी आणि सख्या. आज जेव्हा लग्न झाले आणि बाळ झाले तेव्हा जाणवतेय आत्मबल संपलेले नाही. आज खरच जाणवते एका मुलीचे रुपांतर पत्नी आणि आईमध्ये जेव्हा होते...तेव्हाचा बदल हा साधासुधा नसतो. आत्मबल हा बदल स्वीकारण्यास व पेलण्यास समर्थ करते. ते ही अगदी हसत खेळत. 

नंदाईच्या सानिध्यात आपल्यात सहज होणारे बदल आपल्याला देखील कळत नाही. मग वेळ जसा पुढे जातो तशी आपल्याला त्याची जाणिव होत जाते. आणि तेव्हा लक्षात येते की आई आपल्यावर किती मेहनत घेत आहे आणि जर आपण तिला हवी तशी साथ दिली तर आपल्या आयुष्याचे सोने होऊ शकते. होय!!! नंदाईने माझ्या आयुष्याचे सोने केले...

आईने मेहनत घेतली म्हणजे नक्की काय? आई जेव्हा क्लासमध्ये येते आपल्याला काही शिकविते तेव्हा ती आपल्यावर मेहनतच घेत असते. ती आपल्या छोट्याश्या रोलसाठी सुद्धा जीवाच रान करते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी ती आपल्यापेक्षा जास्त प्रयास करते. आपल्या वाट्याला जी काही भूमिका येईल त्यात १०८ टक्के पूर्ण प्रयास करायचे ही मोठी शिकवण आई देते...हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहीजे. माझ्या आयुष्यात जो रोल मला बापूंनी दिला आहे तो १०८ टक्के पूर्ण समर्थाने पार पाडणे आवश्यक असते व ते कसे करावे हे आई स्नेहसंमेलनाच्या मार्फत शिकविते असे मला वाटते. आत्मबल हे स्वार्म सायन्स आहे. संघशक्तिचा एक उच्चतम अविष्कार आहे. 


मला अजूनही आठवत तेराव्या बॅचमधील भूक नाटकातील "बॉस’ चा रोल. अधिक वेळ न देऊ शकल्याने मला अगदी छोटासा हा रोल मिळाला होता. पण आईने दिलेल्या बळामुळे आणि बापूंच्या कृपेमुळे हा रोल खरच अजरामर ठरला. माझी लहानपणापासून इच्छा खुप होती की आपण रंगमंच गाजवावा. ती इच्छा आईने आत्मबलमधून पूर्ण करुन घेतली. रोल छोटा होता की मोठा होता ह्या पेक्षा ती आईने दिलेली एक महत्त्वपूर्ण जबाबदारी होती याची मला जाणिव होत होती. 

माझा रोल लंपट, बाईलवेडा अश्या ठरकी बॉसचा होता. जे मला सुरुवातीला पचविणे कठीण झाले. पण तरीही आईने दिलेले काम आहे हे जमणारच ह्या विश्वासाने मी मेहनत करु लागले. या रोलसाठी आवश्यक ते सर्व काही केले. हा रोल नीट व्हावा म्ह्णून सिगरेट, दारु पिणार्‍या लोकांचे निरिक्षण केले. चित्रपट सिरिअल्स मधून ठरकी पुरुष कसे बाई कडे बघतात याचे निरिक्षण केले. व तसे आपल्या अभिनयात उतरविण्याचा प्रयत्न केला. It was challenge to me. 
THE BOSS - AATMABAL DRAMA

माझा एक वाईट बॉस म्हणून आईला राग आला पाहिजे आणि तिला मला चप्पल काढून मारावेसे वाटले पाहिजे. हे माझे टारगेट होते. त्याप्रमाणे एका रन थ्रूला बेसमेंटमध्ये रिहसल सुरु होती. जागा कमी असल्यामुळे एरव्ही लांब असणारी आई यावेळेस अगदी समोर म्हणजे अगदी एक फुटाच्या अंतरावर बसली होती. मला एक डायलॉग समोर पाहून बोलायचा होता आणि आई समोर होती. पण खर तर मी घाबरले होते. मग मनातून मोठ्या आईचे, दत्तबाप्पा आणि बापूंचे स्मरण करुन जे काय होईल ते होईल अस म्हणत आईच्या डोळ्यात डोळे घालून तो डायलॉग म्ह्टला. यावेळी मला स्पष्ट दिसत होते की आईला माझ्या डायलॉगची आणि नजरेची किळस वाटत होती. आणि शेवटी आई म्हणालीच की तुला चप्पल काढून मारावेसे वाटत आहे.....
ऍण्ड येस इथे सगळ जिंकले होते. आईला हवा तसा माझा रोल झाला होता. 

ह्या नंतर मुख्य कार्यक्रम झाला. कौतुक झाल, पण एक गोष्ट आजही डोक्यातून गेली नाही.....
ती म्हणजे आईने मला हा बॉसचा रोल देऊन काय साधल? माझ्यासाठी हा रोल काय देऊन गेला?
तर खूप काही देऊन गेला. एक आत्मबलचा साधा रोल आपल्या मन बुद्धीत बदल घडवून आणू शकतो. विचारसरणी बदलू शकतो. आपल्याला सतर्क करु शकतो हे प्रथमच मी अनुभवले आणि यापेक्षा बरच काही. 
जसे पंचतंत्रच्या गोष्टींमधून आपल्याला बोध मिळत असतो तसा त्मबलच्या प्रत्येक क्षणातून आपल्याला बोध मिळत असतो...फक्त ते बोधामृत पिण्यासाठी आपल्याला चातक असावे लागते....
आज पुढे कितीही वर्षे गेली आणि अगदी मरणाच्या दारावर असेन तेव्हाही मला आठवेल आपण अस काहीतरी आयुष्यात केले होते ज्यामुळे काही क्षण तरी आई समाधानी झाली होती. आणि हा अनुभव आत्मबलच्या प्रत्येक सखीने मिळवून हृदयाच्या कप्प्यात ठेवावा. यात खुप मोठी ताकद आहे, असे मला वाटते. 

तुझे माझे नाते
जगावेगळे काही
माझ्यातले बळ तू
शक्ती तू आई

तुझ्या चेहर्‍याचे हास्य
अन समाधाना पायी
स्वतःशीच शर्यत पहा
लावली मी आई

सुवर्ण क्षणांची
सुवर्ण गाठोडी
पुन्हा उघडण्याची
लागली मला घाई

चरण उराशी
आत्मबल हाताशी
संसार माथ्यासी
समर्पित होण्यास
बोलव ग आई

- रेश्मा नारखेडे
२/१२/१५

Wednesday, February 11, 2015

एक एक पाकळी प्रेमाची


वेबसाईटवरील चित्र पाहिले ना...नाजूकपणे फुलाची एक एक पाकळी कोणतरी खुडत बसलय...अगदी प्रेमाने...बहुतेक प्रेमासाठी.

यावरुन मला एक गोष्ट आठवली..मी काँलेजला असताना आमच्या Fun Do ग्रुपमध्ये एक मित्र होता.. अक्षय खुडे....sorry. खुडे नाही कुडे. अक्षय कुडे. आम्ही त्याला खुडे म्हणायचो. अक्षरक्षः तो नावाप्रमाणे अक्षय, अखंडपणे गुलाबाचे फूल हातात घेऊन ते खुडत बसायचा. एक संपल...की दुसरं..दुसरं संपलं की तिसरं...पुढे गुलाब महागली...मग मिळेल ते फूल घ्यायच...पाने ही...चिंचेची डहाळी घेउन बसायचा खुडत खुडे. sorry कुडे.

हे कर्म सुरु असताना तोंडात एकच जप...She Loves Me...She Loves Me Not....या दोन जपांच्या साक्षीने एक एक पाकळी शहीद होत होती..न जाणॊ या प्रेमाच्या हवनात किती पाकळ्या आणि पानांची आहुती गेली असेल? पण या त्याच्या तपश्चर्यचे फळ काय त्याला मिळतय...किंवा नजिकच्या काळात मिळेल असे वाटत नव्हते. 

आणि त्याची ही तपश्वर्या अधिकच उग्र नी उग्र होत होती. collage मधली सगळी झाडे, झुडपे, फुल, पाने घाबरुन गेली असावीत बिचारी. आम्ही पण जाम वैतागलो होतो...एकदा त्याची "SHE" सापडू देत...अशी प्रार्थना आम्ही करत होतो. त्याला विचारयाचा प्रयत्न केला देखिल आम्ही...कोण आहे रे ही मेनका..फुलराणी..जिच्यावर तु ही अशी फुलांची बरसात (मनातून बरबादी असं म्हणायच होत) करीत आहेस? कोण आहे सांग ना? आम्ही करतो काही तरी? पण हा पठ्या हुं का चूं करायला तयार नाही. खुप शोध घेतला.

 त्याच्या डोळ्यांवर नजर ठेवली. तेव्हा कळल...की आमच्याच वर्गातील सीमाला पाहिल्यावर याच्या डोळ्याचे भाव बदलतात...मग आम्ही लागलो आमच्या तयारीला..कसल्या काय विचारता हो..अक्षय सीमाची सेटींग करण्याच्या...दोन दिवसांनी आमच्या म. टा. ने खबर आणली...

म.टा म्हणजे मनिष टाकळे..आमच्या ग्रुपची चालती बोलती वृत्तसंस्था "ही सीमा बायो हेड धाक्रसची पोरगी आहे." बापरे हेडची पोरगी..हेडएकच होईल..म्हणून अक्षयची सेटींग परिक्षेनंतर करायचे ठरविले..१२ वीची परिक्षा जवळ आली..सगळे अभ्यासाला जुंपले...Practical's झाल्या..लेखी झाली..शेवटचा पेपर झाला आणि कट्ट्यावर जमलो...त्याच झाडाखाली...ज्याची पाने गळून (खुडून) इतस्त विखुरली होती.

आता एकच ध्येय...अक्षय आणि सीमाची सेटींग...Plan आखला...आजच तिला गाठायच...आणि अक्षयच्या वतीन विचारायच..Fix....

जवळच सीमा होती बसलेली...विखुरलेली पाने, पाकळ्या चिवडत..
तेवढ्यात अक्षय आला...खुशीत होता...त्याने आम्हाला सगळ्यांना एक एक रसरशीत..भरपूर पाकळ्या असलेलं गुलाब दिल आणि आम्हाला ओळख करुन दिली. Meet My GirlFriend Priya...आमची नजर त्या गुलाबाकडेच खिळली होती...सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न..खुडेच्या हातात गुलाब शिल्ल्क कस राहिल..अरे!! फुलाकडे काय पाहताय...इकडे पहा...ही माझी girlfriend..Priya...

आम्ही जीवावर उदार होउन पण थोड्याश्या कुतुहलाने प्रियाकडे पाहिल..तर....एकजात सगळे केकाटले...तु या प्रियाला पटवली? दुश्मन गँगची पोरीवर प्रेम करायला लाज नाही वाटली. खुप खुप बोललो त्याला..खुप राग आला..बाजूला सीमा सगळं पाहत होती..आम्ही हताशपणे तिच्याकडे पाहिले आणि घरच्या वाट्याला लागलो...तो आमच्या collage चा अखेरचा दिवस होता आणि अक्षयबरोबरील मैत्रीचा सुद्धा...

पाहता पाहता दोन वर्षे उलटली...एका शनिवारी शांतपणे बसले असताना कुरियरवाला आला...आश्चर्यच..अक्षयची लग्नाची पत्रिका होती..आमच्या ग्रुपमध्ये लग्न करणारा तो पहिलाच..दोन वर्ष संपर्कात नव्हतो तरी ग्रुपमध्ये होता तो कायम...पत्रिका सुंदर होती...फुलाफुलांची....अगदी collage चे दिवस आठवतील अशी..पण जरा निरसपणेच उघडली...चि.अक्षय याचा विवाह चि.सौ.का. सीमा धाक्रस हिजबरोबर....SHOCK.....SHOCK......हे कसं काय? काही कळेना...पत्रिका दहा वेळा वाचली....माझा विश्वासच बसेना... आठवड्याने लग्न होत....दरम्यान त्याला फोन केला..पण तो फोनच उचलेना...

सगळे लग्नाला गेलो...शुभेच्छा द्यायला स्टेजवर...तेव्हा आमची सगळ्यांची अचंबीत थोबाडपाहून तोच म्हणाला...
"मित्रांनो, जिच्यासाठी मी वर्षभर फुलांच्या पाकळ्या खुडत बसलो...तिनेच वर्षाच्या आतच मला एखाद्या पाकळीप्रमाणे स्वतःच्या आयुष्यातून खुडून टाकल. मी पाकळ्या खुडत असताना..नेहमी जिने त्या पाकळ्या अलगद, प्रेमाने उचलून आपल्या वहीत जपून ठेवल्या..तिनेच मग मला अलगद, प्रेमाने, मानाने उचलून आपल्या ह्रदयात स्थान दिले. जिने टाकलं तिच्यासाठी जीव जाळण्यापेक्षा, जिने वेचलं तिच्यासाठी...तिचा होऊन राहणे अधिक श्रेयस्कर नाही का?

आम्ही सगळे निशब्दः झालो होतो...ओठांवर फक्त समाधानाचे हास्य होते...

निघताना सीमा..अर्थात सीमा वहिनींनी आम्हाला थांबविले..आणि हळूच त्याला कळणार नाही असे म्हणाली.."एक गोष्ट सांगायची राहीली..माझ्याकडे पाहून अक्षयच्या डोळ्यातले भाव कधिच बदलले नव्हते...भाव बदलत होते तर ते माझ्या डोळ्यातले...अक्षय तर फक्त ते भाव टिपत होता...मात्र, तेव्हा काही कळण्याची बुद्धी्च एका एका पाकळीसोबत गहाणच पडली होती त्याची."

आम्ही हसतच आणि आनंदातच स्टेजवरुन खाली उतरलो...त्या दोघांकडे पाहून या दोन वर्षात नेमके काय आणि कसे घडले हे जाणून घेणेच विसरुन गेलो...असे वाटत होते जणू आमचा collage मधील Plan  आता यशस्वी झाला...अक्षयसीमाच्या सेटींगचा..

कथा - रेश्मा नारखेडे 
(काल्पनिक कथा आहे याची नोंद घ्यावी) 
 २२/०५/२०१०

Thursday, December 18, 2014

स्व-आरोग्याकडे पाहण्याचा एक स्वार्थी दृष्टीकोन


Self-Health-Doctor

१३ डिसेंबर हा दिवस दृष्टीकोन पालटणारा ठरला. आरश्यात केवळ आपण कसे दिसतो हेच आज पर्यंत पहात आले पण १४ डीसेंबरला प्रथमच आरश्यात स्वतःचे आरोग्य कसे आहे हे न्याहळायला लागले. तेव्हा जाणवले की चांगले आरोग्य हेच खरे सौंदर्य आणि खरे सौंदर्य चेहर्‍यावर नसून पोटात आहे.....हा हा हा....नक्कीच अजब वाटले असेल. पण हे १०८ टक्के खर आहे. कारण १३ डिसेंबर २०१४ रोजी डॉ. अनिरुद्धसिंह धैर्यधर जोशी (अनिरुद्ध बापू) यांचा सेल्फ हेल्थचा सेमिनार अटेंट केला आणि माझे माझ्या आरोग्याबद्दलचे विचारच बदलले. खरच आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही आणि घ्यायची म्हटली तर नेमके काय करायचे हेच कळत नाही. जोपर्यंत आपण स्वतःच्या आरोग्याविषयी स्वार्थी बनत नाही तोपर्यंत चवीच्या आणि खाण्याच्या मोहातून सुटका होत नाही. बापूंनी या व्याख्यानातून ही जाणिव करुन दिली.व्याख्यानाची सुरुवातच मुळी बापूंनी सकारात्मक करुन दिली.

Everything can be repair. हो आपण सगळ काही सुधारु शकतो. दुरुस्त करु शकतो. आरोग्याच्या बाबतीत बोलताना सेमीनारच्या शेवटापर्यंत ह्या वाक्याची पूरेपूर जाणीव झाली.

बापूंनी डॉ थॉमस यांचे एक वाक्य सांगितले. Health is not value till sickness come. आरोग्याची किंमत आजारपण आल्याशिवाय कळत नाही आणि खरंच आज एकही अशी व्यक्ती नसावी की ती आजारी नाही. प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या व्याधीने पछाडलेलाच आहे. काहींची व्याधी मानसिक तर काहींची शारीरिक. आणि या व्याधींचा वापर आपण अनेकदा सांत्वनासाठी करुन घेतो.

मी देखील अनेक व्यक्ती पाहील्या आहेत की त्यांना झालेल्या (?) आजारांचा वारंवार उच्चार करुन जगाची सिंपथी मिळविण्याचा प्रयत्न करतात व जबाबदार्‍या टाळतात. कधी तरी खरंच व्यक्ती आजारी असते पण अनेकदा हे आजारपण ओढावून घेतलेले असते. आपण वारंवार एकाच गोष्टीचा विचार केला की ती मनात जाऊन मोठी होते किंवा प्रत्यक्षात येते. अनेकदा तसेच काहीतरी होत असावे . मग आजाराचा विचार करण्यापेक्षा आरोग्याचा विचार केला तर ८० ट्क्के आजार दूर पळतील आणि आरोग्याचा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचे हे बापूंनी सांगितले.

मनाला फ्रेश वाटत असेल तर शरिराला ही फ्रेश वाटत असत. मन थकलेले असेल तर शरीरही आपले कार्य नीट करु शकत नाही. म्हणून मनाने उदास असणार्‍या व्यक्ती विशेष कार्यशील ठरु शकत नाही. त्यामुळे मनाचा उदासपणा जाऊन त्यास चैतन्य येणे आवश्यक असते. पण खर तर मन हे अन्नमय आहे. म्हणजे शेवटी आपण काय खातो यावरच आपले सर्वस्व अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. आणि आपण काय खावे व काय खाऊ नये तसेच ते कसे खावे हे बापूंनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले.

हे कनेक्शन सांगताना बापूंनी "दी फरगॉटन ऑर्गन" ची ओळख करुन दिली. ते म्हणजे आपल्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरीया. या चांगल्या बॅक्टेरियांचे महत्त्व विशद करताना बापूंनी अगदी थक्क करणारी माहीती दिली. या चांगल्या बॅक्टेरियांच्या प्रभावामुळे माणूस आस्तीक बनत जातो, धीट बनत जातो आणि हे सिद्ध होण्यासाठी आणखी काही कालावधी जाईल. पण हे १०८ टक्के खर आहे असं बापूंनी सांगितले आहे आणि गुन्हेगारांमध्ये वाईट बॅक्टेरियाचे प्रमाण अधिक असल्याचेही शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.

याबाबत मी एक जवळून अनुभव घेतला आहे. माझ्या ओळखीतला एक तरुण मुलगा अतीशय व्यसनी व गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. आस्तीकता नावाला देखील असेल की नाही माहीत नाही. एक दिवस काय झाले माहीत नाही पण व्यसनाचा अतिरेक झाला आणि स्वतःच ठरवले की बस झाले....आता आपण तब्येत सुधरायची.  यासाठी त्या व्यक्तीने व्यायामाचे व्यसन घेतले. बॉडी बनवायची. या ध्यासासाठी त्याने अन्न बदलले....व्यसने सोडली.....व्यायामाचे वेड जरा अतीच होते...पण तरिही त्यामुळे नकळत बदल होत होता....आणि हा बदल आस्तिकतेकडे भक्तीकडे झुकणारा होता...पुढे व्यायामाचे वेड सुटले...पण भक्ती आणि आस्तिकता कायम राहीली.....त्या व्यक्तीने ही हा बापूंचा सेमिनार अटेंड केला. सेमीनारनंतर त्या व्यक्तीनेच मला या गोष्टीची कबूली दिली....की व्यायाम आणि डायट केले नसते तर आज इथे भक्तीमय परिवारात नसतो...भक्तीमय परिवारात नसतो तर आयुष्याला वळण लागले नसते....आयुष्याला वळण लागले नसते तर आता नोकरी आणि अभ्यासात प्रगती केली नसती. आता पुन्हा बापूंच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम व डायटमधील वेड बाजूला सारुन प्रकृतीला उचित असे व्यायाम व डायट करीन.....असा निर्धार केला.

हे ऎकून मला बापूंनी सांगितलेल्या चांगल्या बॅक्टेरियाच्या प्रभावाचे जबरस्त उदाहरण पहायला मिळाले. मग मी स्वतःकडे देखील पाहीले. कारण नुकतच डॉ. सुचित दत्तोपाध्ये अर्थात सुचितदादांच्या मार्गदर्शनानुसार माझे ही डायट सुरु होते. त्यांनी दिलेले हे डायट म्हणजे बापूंनी दिलेल्या मोठ्या सेमीनारचाच एक भाग होता आणि या डायट फॉलो केल्याने शरिरावरच नाही तर मनावरही उत्तम परिणाम झाला. मी घालवून बसत असलेली माझी कार्यशीलता आणि अर्थात चुणचुणीतपणा मला पुन्हा मिळाला. मन शांत झाले, विचार स्पष्ट झाले. निर्णय क्षमता, निरिक्षण क्षमता, कल्पना क्षमता प्रगल्भ झाली आणि त्याचा रिझल्ट माझ्या रोजच्या कामात मला मिळू लागला. मन अन्नमय याचा अनुभव मी स्वतः घेतला.

स्वतःचा पहिला स्वार्थ म्हणजे स्वतःचे आरोग्य. हे समीकरण बापूंनी दिले. कारण आरोग्य म्हणजे केवळ शारिरिक, मानसिक नाही तर त्यापुढे जाऊन खूप व्यापक असल्याचे या व्याख्याना दरम्यान जाणवले. अशा या स्वतःच्या आरोग्य विषयकची माहीती मी वाट पाहत आहे. लवकरच ही माहीती समिरदादांच्या ब्लॉगवर यावी व डॉ. पौरससिंह जोशी यांच्या टीम अंतर्गत बनणारी वेबसाईट लवकरात लवकर यावी ही सदीच्छा व त्यासाठी शुभेच्छा. तसेच उपासना केंद्रावर ह्या व्याख्यानाची सीडी लावल्यास चुकवू नका.....इतके उचित स्वार्थी तर आपण बनूच शकतो.....अबंज्ञ

http://www.healthonics.healthcare/
-  रेश्मावीरा नारखेडे