Friday, November 7, 2014

माझा नाद राया तू सोडलासच नाही


न मागता राया तू दिलेस सर्व काही
पण त्याची जाण मी कधी राखलीच नाही
अशी मी जन्मासी आले जरी करंटी
पण माझा नाद राया तू सोडलासच नाही



मी चुकत होते तू मला सावरत होतास
मन सुटले होते तू त्यास आवरत होतास
अश्या मी चुका कधी चुकवल्याच नाही
पण तू तुझ्या प्रेमात कधी चुकलासच नाही
आणि माझा नाद राया तू सोडलास नाही



मारुन मुटकून मला वठणिवर आणलेस
ओढून ओढून तुझ्या मार्गावर आणलेस
तुझी पकड माझ्याकडून सुटलीच नाही
तू ही मला एक क्षण मोकळे टाकले नाही
असा माझा नाद राया तू सोडलासच नाही



मी न जाणे काय ते दिसले तुला माझ्यात
दगड मी ज्याचे काही ना अध्यात न मध्यात
तरी मजवरील क्रुपा तुझी आटली नाही
हे तुझे अकारण कारुण्य दुसरे काहीही नाही
म्हणूनच माझा नाद राया तू सोडलास नाही



तुझ्या परिस स्पर्शाने आता सुवर्ण मन झाले
रोम रोमातून राया तुझे सुवर्ण नाम स्त्रवले 
आता मागे वळून कधी पाहणारच नाही
तुझ्या प्रेमाची लूट कधी थांबवणारच नाही
राया आता मीच तुझा नाद सोडणार नाही



तुझा नादच जीवनात साद घेवून आला
साद घालताच तुझा प्रतिसाद देखील आला
साद प्रतिसादाचा खेळ आता थांबतच नाही
असा प्रत्येक क्षण अनिरुद्धमय अनुभव होई
कारण तुला माझा, मला तुझा नाद सोडवत नाही


- रेश्मा नारखेडे

Wednesday, October 8, 2014

My Artwork for Aniruddha Kaladalan


अनिरुद्ध माझा विठू पंढरीचा, विठू  पंढरीचा

प्रेम किती छोटा शब्द आहे


प्रेम किती छोटा शब्द आहे
पण सार विश्व यात सामावले आहे
प्रेमाची सुरूवात नंदाई आहे
अन् प्रेमाची अनंतता अनिरूद्ध आहे

युगान युगे एकमेकांच्या साथीने
हा विश्व संसार चालवित आहेत
सुखाचे करण्यास बाळांचे जीवन
आई बापू दिन रात झटत आहेत

असंख्य वादळे असंख्या वेदना
क्षणा क्षणाला झेलत आहे
बाळांच्या समाधानासाठी मात्र
यांच्या चेहर्यावर प्रेमळ हास्य आहे

बाबा आई जस तुमचे प्रेम
माझ्या जीवनात चैतन्य आणतं
तस तुमच्या चेहर्यावरील समाधान
मनाला खूप शांतता देत असतं

बाबा आई मी तुम्हाला
भेट देण्यास असमर्थ आहेे
तरीहि मला काही तरी
आज द्यावेसे वाटत आहे

समाधान व निश्चिंतता
तुमच्या बाळांकडून तुम्हास कायम मिळो
मोठी आई फक्त एकच कर
कणभर का होईना यास मिही
जबाबदार ठरो....

- रेश्मावीरा नारखेडे

Wednesday, July 30, 2014

मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए


१७ जुलैच्या गुरुवारची गोष्ट....मी ऑफिससाठी निघाले. जरा मूड डाऊन होता पण का ते कळत नव्हते. म्हणून जरा रिफ्रेश होण्यासाठी गाणी ऐकण्याचे ठरविले. गाणी ऐकता ऐकता अचानक मला भरुन आले. डोळे डबडबले आणि काय होतेय हेच कळेनासे झाले. खार स्टेशन आले म्हणून दारात उभे राहिले तर आणखीनच रडू सुटले. डोळ्यातील काजळ ओघळून एव्हाना गालावर आले होते. आजूबाजूचे लोक माझ्याकडे पाहत आश्चर्य व्यक्त करीत होते. ये लडकी क्यो रो रही है? असा प्रश्न त्यांच्या डोळ्यात होता. माझ्या रडण्यामागच कारण काय असावे याचा तर्क ही लोक १०८ टक्के लावत असणार. पण मला कशाचीच फिकीर नव्हती आणि भान ही नव्हते. आपल्या रोजच्या वाटेने पावल चालत होती मात्र सार लक्ष आणि प्राण एकवटला होता तो कानात सुरु असलेल्या गाण्यामध्ये....



अत्यंत तीव्रतेने कुणाची तरी आठवण हे गाणे करुन देत होत. ही आठवण इतकी तीव्र होती की अश्रुंना देखील आवर घालणे मला शक्य नव्हते. कोणते होते हे गाणे आणि कुणाची आठवण करुन देत होते....

मन मस्त मगन, मन मस्त मगन बस तेरा नाम दोहराए.....या त्या गाण्याच्या ओळी ज्या मला माझ्या बापूरायाची आठवण करुन देत होते. आणि खरच तीव्र आठवण. अशी आठवण यापूर्वी कधीही आली नव्हती.....

बापू श्री हरिगुरुग्रामला येत नाही. तपश्चर्येला बसले आहेत. बापू दिसत नाही....अस सगळ आहे. मग काय झाले? आपल्या भल्यासाठीच करत आहेत ना ते! त्यांची तपश्चर्या संपली की भेटतील, दिसतील. अशी मनाची समजूत घालून मी होते. मला बापू दिसले नाही तरी ते माझ्याबरोबर आहेतच हा विश्वासही आहेच. तसेच महिनो महिने बापूंना मी पाहीले नसल्याने "अब तो आदत सी हो गयी है" या आविर्भावातच माझ जगण चाललेल.

पण त्या दिवशी हे गाण ऐकताना जाणवले की ही समजूत म्हणजे माझ्या बापूसाठी माझ्या उफाळून येणार्‍या भावनांना मी जबरदस्तीने घातलेले वेसण आहे. नाही! नाहीच राहू शकत मी बापूंना पाहिल्याशिवाय! हेच सत्य आहे. नाहीच राहू शकत बापूंचे नाव घेतल्याशिवाय! मग ते मंत्र स्वरुप असो किंवा कसेही.

मला बापूंचे दर्शन नाही झाले तरी मी फोटो पाहून राहू शकते हा बुरखाच फाटला त्या दिवशी. मलाही पाहचेय बापूंना अगदी डोळेभरुन. अगदी हृदयभरुन पाहयचेय. अगदी त्यासाठी मी मग कोणतीही रांग ही मोडायला तयार होते आणि कुठेही वर चढायला तयार होते. अगदी कोणतीही धडपड करायला तयार होते. अगदी जे धाडस कधी केले नव्हते तेही करायला मी तयार होते. बस्स!! मला फक्त बापूंना पाहचेय....

मात्र पुन्हा स्वतःच्या भावनेला आणि आवेगाला संयमाने वेसण घातले आणि निमुटपणे ऑफीसला गेले...
कारण अवस्थाच अशी होती

इश्क की धून रोज जलाए
उठता धुऑं तो कैसे छुपाए

अनिरुद्धाच्या प्रेमाची धून मला स्वस्थ बसू देतच नव्हती. जरा स्वस्थ बसावे म्हटले की "अनिरुद्ध धून" जागृत करायचे.....आणि त्यामुळे या आठवणींची तीव्रता अधिकच वाढली....या तीव्रतेमुळे वाहणारे अश्रु कसे थांबवणार होते मी? माझ्या हातातच नव्हत मुळी आणि मग काय
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

आखिया करे जी हजुरी
मांगे है तेरी मंजुरी

बापू राया हे डोळे तुझेच ऐकतात. तुझी इच्छा असल्याशिवाय हे वाहतही नाही आणि थांबतही नाही. तुझ्याकडे डोळे वर करुन बघण्यासाठी देखील तुझी इच्छा लागते. आज हे डोळे वाहत आहेत कारण ती बहुतेक तुझीच इच्छा आहे. तुझ्या आठवणीत त्यांना पाझर फुटण्यासाठी देखील तुझी परवानगी नव्हती. पण बापूराया त्यांना वहायचे आहे. थेट थेट तुझ्या चरणांपाशी. तुझ्यावर अभिषेक करायचाय या डोळ्यातील जलाने. दुसरे तरी काय आहे माझ्याकडे. माझ्या मनातील भाव हा डोळ्यातून जल म्हणून वाहतोय. म्हणून मी रडतेय रडतेय...तुझ्या आठवणीत. तुझी आठवण....आठवणींची साठवण.....काय आहे त्या साठवणीत?

कजरासी आहें दिन रंग जाए
तेरी कस्तुरी रैन जगाए

तुझा हुंकार, तुझी गर्जना, तुझा शब्द....ही तुझी आह...म्हणजेच तुझी साद...माझ्या कानात गुंजतेय...दर गुरुवारी तुझा शब्द ऐकत नाही....पण पूर्वीचे काही तू बोललेलास तेच परत परत ऐकून माझा एक एक दिवस जात आहे. आयुष्यात नवनवीन रंग भरले जात आहेत. तुझ्या प्रवचनाचा एक एक व्हीडीओ बघून माझा एक एक क्षण जातो. तु नसताना तुझे शब्द आठवतात. पाळतो कीती हा जरा प्रश्न आहेच. पण तरी तुझे शब्द आठवतात. तुझ्या या शब्दातून निघणारा कस्तुरी सुगंध घेऊन माझी रात्र होते. खरचं ही कस्तुरी आहे. अगदी महागडी. अगदी दुर्मिळ अशी कस्तुरी.....तुझ्या प्रवचनांची ही कस्तुरी माझ्या आयुष्यातील प्रत्येक रात्र जागवते. मी जरी झोपले असेन तरी माझे भविष्य जागवते....उजळवते....सांभाळते.......

म्हणूनच बापूराया....
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए
चाहे भी तो भुल ना पाए
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

जोगिया जोग लगाके
मखरा रोग लगाके

बापू तू तपश्चर्येला बसलास खरा. माझ्यासाठी. मी जस मन्मथला पाळणा घरात सोडून कामाला निघून जाते. अगदी तसच तू आम्हाला सोडून गेलास. मन्मथने कितीही भेकाड पसरले तरीही कर्तव्य पार पाडण्यासाठी छातीवर दगड ठेवून तीथून निघावे लागते. मन्मथ रडून रडून लालेलाल होतो. पण मला काही दया माया दाखवता येत नाही. पण खर सांगू का आज मी मन्मथच्या जागी स्वतःला पाहत आहे. माझी आई अशी मला सोडून कठोर होऊन लांब गेली आहे. आणि म्हणुनच आज मी देखिल भेकाड पसरले आहे.
पण खर सांगू का बापू एक गोष्ट देखील माहित आहे. जस ऑफीसमध्ये ही सतत बाळाचा विचार माझ्या डोक्यात असतो तसाच तुझ्याही डोक्यात सतत असणारच. हा विचार बाजूला सारुन मी जस काम पुढे करत राहते तस तू ही करत असणार. आणि संध्याकाळी सकाळ पेक्षा दुप्पट वेगाने मी पाळणाघराकडे धूम ठोकते....फक्त माझ्या लेकराला भेटायला....त्याला आपल्या घरी न्यायला....तसच अगदी तसच तूही श्री हरिगुरुग्रामला तुझ्या लेकरांना भेटायला तळमळत असशील याची खात्री आहे. आणि तू येशील.....लवकरच याची खात्री आहे. कारण तुझ्या बाबतीत ही हेच सत्य आहे.....
इश्क की धून रोज जलाए
उठता धुऑं तो कैसे छुपाए
मन मस्त मगन
मन मस्त मगन
बस तेरा नाम दोहराए

बापू गुरु पौर्णिमेला तू आला नाहीस. पण इथे एक वेगळेच चित्र होते. दूरदूरहून तुझे दिवाने तुला भेटायला आले होते. त्यांना पाहून मला एकच वाटले......
ओढ की थारी प्रीत की चादर
आया तेरे शहर में रांझा तेरा

आणि कोण म्हणते की तू तिथे नव्हतास....साफ खोट......अगदी प्रत्येकाचा विश्वास होता की माझा बापू येथे आहेच... अगदी ह्यावर शिक्कामोर्तब व्हावे असे सगळे तुला भेटत होते....तुझे दर्शन घेत होते....
दुनिया जमाना झूठा फसाना
जीने मरने का वादा साचा मेरा
या श्रद्धावानांची कमिटमेंट पाहून खरच पटल....की सार जग हे भ्रम आहे....तुझ्या आणि माझ्यात जे बोलणे होते....ज्या आणा भाका होतात त्याच खर्‍या....
म्हणूनच बापूराया.....
शिश महल ना मुझको सुहाए
तुझ संग सुखी रोटी भाए

खरच बापू तू नसलेला शिश महल नको.....तु नाहीस तेथे काहीच नाही....ज्या सुखासाठी तू लांब जातोस बापू अस सुख ही नको...आमच्या ज्या भल्यासाठी तू लांब जातो अस भल ही नको....
असच दुखाःत ही मी खितपत पडत राहिन पण तू लांब जाऊ नकोस....नाही म्हणजे नाही....
मी उपाशी राहीन, शिळ पाक खाईन
पण दृष्टी आड जाऊ नकोस
दृष्टी गेली तरी चालेल पण तुझी जाणिव नको जाऊ देऊस....
तुला राग येईल, तु भले चिडशील पण तरीही बापू मला तुला घट्ट धरुन राहयचे.....
अगदी मन्मथ करतो तसच कवटाळून राहचेय...
कडेवर उचलून घे...
तू दूर गेल्याची भावना किंवा सिच्युएशन देखिल आता मी हॅंडलही करु शकत नाही....
विचार तर लांबच राहिला....
एक मात्र नक्की...
आई लांब गेल्यावर ढाय मोकलून रडणार्‍या माझ्याच मुलामध्ये आता मीच दिसत आहे....
कारण;
इश्क की धून रोज जलाए
उठता धुऑं तो कैसे छुपाए
----------------------------------------------------------
हे गाणे ऐकताना अशा सगळ्या भावना, विचार उफाळून आले.
आणि दुसर्‍या दिवशी बापू सूचितदादांसह हॅपी होमला भेटले.
आणि अतिशय सुंदर हसले......डोळे मिचकावले.....आणि जे बोलायचे ते डोळ्यांनी बोलले.....
कित्येक दिवस तडफडत असलेल्या बाळाला शांत केले....
तेव्हा मनात एकच पंचाक्षरी मंत्र प्रगटला
......I love you my dad.......
......I love you my dad.......
......I love you my dad.......

- रेश्मा नारखेडे......


Tuesday, January 7, 2014

Paduka Pradan Sohala


बहुत दिनों के बाद मेरा इतवार सद्‍गुरु सेवा में व्यतित हुआ। ५ जनवरी २०१४ को अपने श्री हरिगुरुग्राम में सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूजींकी पादुकाओं का वितरण नए उपासना केंद्रो को हुआ। इन नए केंद्रो को अपने संस्था के वेबसाईटस‌ के बारे में जानकारी देने की सेवा मुझे थी। लेकीन उसके बाद मुझे फोटोग्राफी करने का अवसर मिला। शायद यही सेवा मेरे लिए उस दिन उचित थी। क्योंकी कॅमेरा की नजरसे मैंने इस महा उत्सव को इक नयी तरह से अनुभव किया। इन भक्तो के प्यार का सैलाब देखते देखते मैं खुद इसमें कब बेह गयी मुझे पता भी नही चला। महाराष्ट्र के छोटे छोटे गांव से भक्त अपने सद्‍गुरु की पादुकाएं लेने के लिए मुंबई में आए थे। क्या खुशी थी उनकी चेहरे पे! आहा हा! क्या प्यार था उनकी निगाहो में। 

इस कार्यक्रम की शुरुवात ९ बजे बापूजी के चिन्मय पादुकाओ की पूजनसे हुई। सबसे पहिले संघ में ४१ केंद्र के प्रमुख सेवक पूजन को बैठे थे। वे जिस तरह से पादुकाओं का पूजन कर रहे थे; उसे देखते देखते मेरी भी ऑंखो में पानी आ गया। धीरे धीरे जप के साथ पूजक पादुकाओं पे कुमकुम, हल्दी और अबीर अर्पण कर रहे थे। जैसे हर एक के बापू अलग है, वैसेही हर एक केंद्र को दी गई पादुकाए अलग दिख रही है। सांघिक पादुका पूजन की इससे पहले मैंने अनुभूती नही ली थी; लेकीन आज यह सांघिक पूजन देखकर बहुत अच्छा लगा।
पूजन के बाद पूजनीय समिरदादां के हस्ते संत्संग के वातावरण मे पादुकाओंका वितरण किया गया। हर एक ने अपनी तरह से पादुकाओ बडे प्यार से सद‍गुरु नाम के गजरमे सर पे उठा अपने गांव ले निकले। पादुका लेने के लिए बडे बुढे, बच्चे सारे आए थे। 

कितने जन तो ऐसे थे की जिन्होने बापूजी पहले कभी प्रत्यक्ष देखा नही था। लेकीन उनका उत्साह हमसे कई गुना जादा था। 

बारी बारी हर एक जन पादुकाओ को सर पे उठा के नाच रहे थे। यह सारा महोत्सव मैंने मुख्य स्टेजके ऊपरसे देखा। एक क्षण तो मैं स्तब्ध हो गई। एक बाजू गजर चालू था "मन रमले रे" और दुसरी और सारे श्रद्धावान बेहोश होके नाच रहे थे। इस दृश्य का वर्णन करना मेरे बस की बात नही है। मैं तो सिर्फ इस दृश्य का अनुभव ले रही थी। ऐसे लगा की आषाढ-कार्तिकी में होनेवाली पंढरपूर की वारी यहा मार्गशिष मेंही आगयी है। मेरी ऑंखॊसे धाराएं बहने लगी। 

"मुझे लगा के मेरी ऐसी भक्ती कही खो गई है, ऐसा भाव कही खो गया है। मैं भी कभी इन्ही भक्तो की तरह पागल थी। लेकिन आज मुझे क्या हो गया है मुझे समझ नही आ रहा। क्या करे बापू?" ऐसे मेरे मन मे विचार आने लगा। इसलिए मैंने पिछे बापूजी के तस्वीर को देखा और पलक झपकतेही स्टेज के ऊपरसे उतरकर इसी भक्त सागर की एक बुंद बनगई। 

तब तक "आय लव्ह यू माय डॅड" का गजर शुरु हुआ था। हम सब नाचने लगे। तब मैंने देखा के मेरे आजूबाजू मैं सब गांव के लोग थे जिन्हे शायद ही अंग्रेजी का ज्ञान था। शायद नही था। फिर भी वे "आय लव्ह यू माय डॅड" का गजर जोर शोर से कर रहे थे। तब मुझे एक बात समझ आयी "प्यार को कोई भाषा नही होती" और "आय लव्ह यू माय डॅड" हे सिर्फ पाच शब्द नही...ये तो वो मंत्रस्वरुप शब्द हैं जिसके उच्चारण से हम उत्साहित, उल्हासित होते है। 

मैं समिरदादा की बहुत अंबज्ञ हूं के उन्होने मुझे यह कार्यक्रम अनुभव करने का अवसर दिया। जिसके वजहसे मुझे अपने हृदय मैं बापू की पादुकाए प्रस्थापित करने का मार्ग मिला। मैं अंबज्ञ हूं।

- रेश्मा नारखेडे


Photos on Facebook - 



Tuesday, October 29, 2013

About Hemadpant - 2

हेमाडपंतांबद्दल विचार करताना मला नेहमी एक गोष्ट बेस लेव्हलला दिसते ती म्हणजे ते गुरुचरित्राचे ४० वर्षे पारायण करत होते. म्हणजेच त्यांना गुरुची / सदगुरुंची अनामिक आणि त्यांनी कधीही दाखविली नसावी अशी ओढ असावी. सदगुरुतत्त्वावर त्यांचा विश्वास होता आणि त्या सदगुरुच्या त्यांच्या आयुष्यातील प्रवेशासाठी ते चातका प्रमाणे तळमळत असावे. कारण या तळमळीशिवाय पहिल्या भेटीतच कुणीही “धुळभेट” घेऊ शकत नाही असे मला वाटते. गुरु बाबत त्यांच्या मनात विकल्प आला. हे १०० टक्के. परंतु खर्‍या सदगुरुच्या दिशेनेच आपले पाऊल पडावे आणि कोणत्याही भोंदू बाबाच्या फंदात पडू नये यासाठी ते दक्ष असावेत अस मला वाटले. साईनाथांबद्दल जेव्हा कळले तेव्हा त्यांच्याकडे जाण्यासाठी त्यांनी वेळ घेतला असावा. जाऊ की नको या व्दंव्दमध्ये ते अकडले असावेत….आणि हे व्दंव्द साक्षात साईनाथांनी सोडविले असे मला वाटते. त्यांच्या मनात गुरुतत्त्वाबद्दल काही शंका असावी अस वाटत नाही. पंण आपण ज्या साईबाबांकडे जाणार आहोत ते नक्कीच आपल्याला हव असलेले अंतिम स्थान आहे का? या बाबत साशंक असावेत. असे आपले देखील होते. अगदी सामान्य भक्ताचेही होते. बापूंकडे येण्याआधी येऊ की नको, यास सदगुरु मानू की नको अशी व्दीधा अवस्था असते. पण बापूंना पाहिल्यावर ही व्दीधा अवस्था विरुन जाऊन आयुष्याची समिधा कधी होते हे त्या भक्ताला ही कळत नाही. यावरुन मला एक गोष्ट कळते की हेमाडपंत कीतीही श्रेष्ठ भक्त असले तरी त्यांच्या प्रवास एखाद्या सामान्य भक्ताप्रमाणे विकल्पाचा अडथळा पार करुनच झाला. हा विकल्प ते मनातून सक्षमपणे काढू शकले एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे पहिल्या धुळभेटीपासून ते लेखणी ठेवेपर्यंत त्यांचा विश्वास हा पूर्ण होता. पूर्ण १०८ टक्के.

Read Saisatcharitra Articles - http://www.pratyaksha-mitra.com/category/shree-sai-saccharitra/
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer : साईसच्चरित हा माझा सर्वात आवडता ग्रंथ आहे आणि याची गोडी ही परमपूज्य बापूंनी लावली आहे. श्रीसाई समर्थ विज्ञान प्रबोधनीकडून घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परीक्षा घेतल्या जातात. ह्या परिक्षा देताना जे विचार मनात आले ते इथे मांडत आहे. प्रत्यक्षात तसेच असेल असा किंवा या प्रकारचा माझा कोणताही दावा नाही याची कृपया नोंद असावी. साईनाथ व बापूंचे गुणसंकीर्तन व्हावे  आणि त्यातून निर्मळ आनंद मिळावा ही प्रेमळ इच्छा आहे. अंबज्ञ - रेश्मावीरा नारखेडे

About Hemadpanta

इतर फुटकळ विषयांवर चर्चा करीत बसण्यापेक्षा हेमाडपंतांची भक्ती, सेवा, शारण्य कसे आहे याचा अभ्यास करणे जास्त श्रेयस्कर वाटते. बापूंनी आपल्याला जागृकतेचे महत्त्व सांगितलेले आहे. हेमाडपंत हे जागृक होते. त्यांची भक्ती डोळस होती. म्हणून गहू दळण्याच्या प्रसंगाचे अनोखेपण त्यांना कळू शकले. तसेच हेमाडपंताचे निरिक्षण आणि ऍनालॅसिस उत्कृष्ट होते. हे आपल्याला प्रत्येक कथेतून कळत जातेच. हेमाडपंत हे श्रेष्ठ भक्त आहेतच…त्यांनी भक्ती कशी करावी हे देखील शिकविले आहे. परंतु एक श्रेष्ठ भक्त बनण्यासाठीचे मुलभूत गुणधर्म त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रतित होतात. 

१. जागृकता : भक्ती करताना जागृक असलेच पाहीजे. 

२. डोळसपणा : भक्ती डोळस असावी. 

३. निरक्षण : सदगुरुचे निरिक्षण करता आले पाहीजे 

४. आकलन : या निरिक्षणातून सदगुरुच्या अकारण कारुण्याचे, सदगुरु लिलेचे आकलन करुन घेतले पाहिजे. 

५. अनु्भव : उचित निरिक्षण आणि आकलन केले की आपोआपच आपण सदगुरुंच्या अनुभवासाठी पात्र ठरतो. 

६. विश्वास : ह्या सार्‍या गुणांचा वापर करण्यासाठी मुळ सदगुरु तत्त्वावर विश्वास असणे आवश्यक आहे. आणि हेमाडपंतांचा सदगुरुतत्त्वावर विश्वास होता. ठाम विश्वास होता. कारण ते चाळीस वर्षे गुरुचरित्राचे पारायण नित्यनियमाने करित असत आणि हे सदगुरुतत्व मूर्तिमंत साई स्वरुपात त्यांच्या समोर उभे ठाकले ते्व्हा त्यांनी धूळभेट घेतली. गुरुची उपयुक्तता काय? हा वाद जरी हेमाडपंत घालत असले तरी त्यामागचा हेतू, त्यामागचा विचार हा अत्यंत वेगळा असला पाहिजे. कारण ते अत्यंत विचारी होते. 

गुरुचरित्र वाचणार्‍या हेमाडपंत सारख्या व्यक्तीला गुरुचे महत्त्व माहित नसावे हे विसंगत आहे. त्यामुळे गुरुची उपयुक्तता काय? ह्या वादामध्ये हेमाडपंत कुठेही मला अहंकारी वाटत नाही. उलट त्यांच्या मन बुद्धीतील विचारांचा प्रचंड मोठा गुंता आणि तो गुंता सोडवण्यासाठी चाललेली हेमाडपंतांची धडपड इतकेच मला दिसू येते. 

आणि हा गुंतला सुटला अगदी क्षणार्धात…..जेव्हा बाबा म्हणाले, “काय म्हणाले हे हेमाडपंत”? हा गुंता सुटला म्हणून आपल्याला साई सच्चरित्र लाभले, असे मला वाटते

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Disclaimer : साईसच्चरित हा माझा सर्वात आवडता ग्रंथ आहे आणि याची गोडी ही परमपूज्य बापूंनी लावली आहे. श्रीसाई समर्थ विज्ञान प्रबोधनीकडून घेण्यात येणार्‍या श्री साईसच्चरित पंचशील परीक्षा घेतल्या जातात. ह्या परिक्षा देताना जे विचार मनात आले ते इथे मांडत आहे. प्रत्यक्षात तसेच असेल असा किंवा या प्रकारचा माझा कोणताही दावा नाही याची कृपया नोंद असावी. साईनाथ व बापूंचे गुणसंकीर्तन व्हावे  आणि त्यातून निर्मळ आनंद मिळावा ही प्रेमळ इच्छा आहे. अंबज्ञ - रेश्मावीरा नारखेडे