Tuesday, February 10, 2015

केव्हा तरी पहाटे...विडंबन

एक बिच्चारा प्रियकराने आपल्या प्रेयसीला डोळा मारला आणि नेमके हे तिच्या भावाने पाहिले. ती रात्र त्या प्रियकराच्या आयुष्यातील न भूतो न भविष्य रात्र होती... त्या प्रियकराचे दुःख या विडंबनातून मांडले आहे. मूळ कविता केव्हा तरी पहाटे चे विडंबन करताना...आणि या प्रियकराची वाईट अवस्था मांडताना काही आक्षेपहार्य शब्द वापरण्यात आले आहे.. हे शब्द वापरणे ही या विडंबनाची गरज होती...याची नोंद घ्यावी..

 केव्हा तरी पहाटे, खडबडून जाग आली
मारले चुकून डोळे, मार खात मग रात गेली

सांगू तरी कसे मी, भय तुझिया भावाचे
दाबून श्वास माझा, बदडून रात गेली

कळले मला ना तेव्हा, फुटली कवटी जराशी
कळले मला ना तेव्हा, निसटून धार गेली

उरले शरिरात काही, हुंदके वेदनेचे
आकाश तारकांचे, दाखवूनी रात गेली

उरल्या मला ना तेव्हा, माझ्याच दंत पंक्ती
मग दाढ शेवटाची, कोसळून रात गेली

- Reshma Narkhede

Monday, February 9, 2015

आय लव्ह यू......


वाटते आता सारे तुझ्यावरी उधळूनी द्यावे

तुझ्या सुखासाठी स्वतःला देखील संपवावे



तुझ्याच मिठीत आता स्वप्ने सारी रंगावी

मनातील सारी गुपिते तुलाच आता सांगावी



तुझ्यातच माझे आता माझेपण सुरु व्हावे

तुझेपण आता संपूर्णतः माझे व्हावे



तुझ्या प्रेमाच्या झोक्यावर जीवन हे झुलावे

प्रत्येक क्षणात मी कण कण फुलावे



कश्या मी आणू या सार्‍या भावना अश्या ओठी

बघ, नयन ओसांडले दाटता त्या कंठी



रितेपण नाही उरत तुझ्यासोबत असताना

भरल्या डोळ्यांनी तुझ्यावर प्रेम करताना



एवढ्या दिवसात तुला मला हेच सांगायच होत

पण सांगण्यापूर्वीच नकळत मी तुला दुखवल होत



आता या पुढे मी काही लिहु शकत नाही

तुला दुखवल्याची सल मी मांडू शकत नाही



आय लव्ह यू......

- Reshma Narkhede

Thursday, January 22, 2015

वॉटस अप आता कॉम्प्युटरवरुन वापरा

आज एक जबरदस्त ऍपलीकेशन मिळाले....ते म्हणजे वॉटस अप ऑन पीसी...
Whats Up On Pc
वॉटस अपने आपले वेब ऍप लॉंच केले आहे. जे फक्त गुगल क्रोममध्ये चालू शकते...
तर पाहूया हे ऍपलीकेशन कसे काम करते...

सर्वप्रथम गुगल क्रोम हा ब्राऊझर ओपन करा. त्यामध्ये https://web.whatsapp.com/ वर जा. तिथे तुम्हाला एक क्यु आर कोड दिसेल व लॉग इन राहण्यासाठीचे ऑप्शन दिसेल.
आता तुमच्या ऍनरॉईड फोन्समधील वॉटस अपचे ऑप्शन सुरु करा. सेटींग्स मध्ये जा. तिथे वॉटस अप अपडेट केल्यावर "व्हू वेब ऍप" हे ऑप्शन दिसेल. ते ऑप्शन निवडा.तिथे ऍटोमॅटीक वॉटस अपचा स्कॅनर सुरु होइल आता..तुमचा हा फोन कॅमेरा कॉम्प्युटरच्या स्क्रीन समोर धरुन कॉम्प्युटरवरील क्यू आर कोड स्कॅन करावा.
तो ऍटोमॅटीक स्कॅन होतो. आणि क्षणार्धात तुमच्या मोबाईलवरील वॉटस अप तुमच्या पीसी वर दिसू लागते.
आणि तूम्ही पीसी वरुन वॉटस अप वापरु शकतात...यावेळेस मोबाईलचे वाय फाय चालू ठेवावे. मोबाईल चालू ठेवावा.


या सुविधेमुळे फाईल शेरिंग हा प्रकार अत्यंत सोप्पा होणार आहे. आणि वॉटस अप हे केवळ टाईमपासचे साधन न राहता महत्त्वांच्या कामांसाठी याचा वापर करता येऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे मोबाईल आणि पीसी दोन्ही कडे एकाच वेळी वॉटस अप सुरु राहते. आणि जेव्हा कधी तुम्ही हा वेब बेआऊसर बंद करुन पुन्हा सेम लिंक वर याच ब्राऊझरमध्ये परतता तेव्हा तुमचे वॉटस अप लगेच कनेक्ट होते...या मध्ये डेक्सटॉप नोटीफीकेशन देखील आहेत. आणि लॉग आऊटचे देखील ऑप्शन आहे.

या ऍपची अधीक माहीती पुढे घेऊच....

पण शुभच्छ शिघ्रम.....

आम्हा कॉम्पुटरवर सतत असणार्‍यांसाठी आणि वॉटस अपवर कामे करणार्‍यांसाठी हे वरदानच...

- रेश्मा नारखेडे

Monday, January 12, 2015

I Love You My Dad


I love you my Dad

Welcoming in Sai Satcharitra Panchasheel Exam Prize Distribution Program 2015

Tum Mile - Superb Performance

Song Tum Mile

तुम मिले....जबरदस्त गाणे...आणि जबरदस्त परफॉर्मन्स....फाल्गुनी पाठक आणि संजय सावंत
अनिरुद्ध मेलोडीज - Aniruddha's Melodies
श्री साई सच्चरित पंचशील परिक्षा पारितोषिक वितरण समारंभ २०१५
Shree Saisatcharit Panchasheel Exam Prize Distribution 2015

सर्वात्मका सर्वेश्वरा....

sai sat charit Panchasheel exam, Aniruddha Bapu


परमपूज्य अनिरुद्ध बापू श्री साई सच्चरित पंचशील परिक्षा 2015  (Shree Saisatcharit Panchasheel Exam 2015) दरम्यान "अनिरुद्धाज मेलोडीज" या गाण्यांच्या कार्यक्रमात "सर्वात्मका सर्वेश्वरा" या संजय सावंत गात असलेल्या गाण्यात समरस होत असताना......
व्हीडीओ - रेश्मा नारखेडे

Thursday, December 18, 2014

स्व-आरोग्याकडे पाहण्याचा एक स्वार्थी दृष्टीकोन


Self-Health-Doctor

१३ डिसेंबर हा दिवस दृष्टीकोन पालटणारा ठरला. आरश्यात केवळ आपण कसे दिसतो हेच आज पर्यंत पहात आले पण १४ डीसेंबरला प्रथमच आरश्यात स्वतःचे आरोग्य कसे आहे हे न्याहळायला लागले. तेव्हा जाणवले की चांगले आरोग्य हेच खरे सौंदर्य आणि खरे सौंदर्य चेहर्‍यावर नसून पोटात आहे.....हा हा हा....नक्कीच अजब वाटले असेल. पण हे १०८ टक्के खर आहे. कारण १३ डिसेंबर २०१४ रोजी डॉ. अनिरुद्धसिंह धैर्यधर जोशी (अनिरुद्ध बापू) यांचा सेल्फ हेल्थचा सेमिनार अटेंट केला आणि माझे माझ्या आरोग्याबद्दलचे विचारच बदलले. खरच आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही आणि घ्यायची म्हटली तर नेमके काय करायचे हेच कळत नाही. जोपर्यंत आपण स्वतःच्या आरोग्याविषयी स्वार्थी बनत नाही तोपर्यंत चवीच्या आणि खाण्याच्या मोहातून सुटका होत नाही. बापूंनी या व्याख्यानातून ही जाणिव करुन दिली.व्याख्यानाची सुरुवातच मुळी बापूंनी सकारात्मक करुन दिली.

Everything can be repair. हो आपण सगळ काही सुधारु शकतो. दुरुस्त करु शकतो. आरोग्याच्या बाबतीत बोलताना सेमीनारच्या शेवटापर्यंत ह्या वाक्याची पूरेपूर जाणीव झाली.

बापूंनी डॉ थॉमस यांचे एक वाक्य सांगितले. Health is not value till sickness come. आरोग्याची किंमत आजारपण आल्याशिवाय कळत नाही आणि खरंच आज एकही अशी व्यक्ती नसावी की ती आजारी नाही. प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या व्याधीने पछाडलेलाच आहे. काहींची व्याधी मानसिक तर काहींची शारीरिक. आणि या व्याधींचा वापर आपण अनेकदा सांत्वनासाठी करुन घेतो.

मी देखील अनेक व्यक्ती पाहील्या आहेत की त्यांना झालेल्या (?) आजारांचा वारंवार उच्चार करुन जगाची सिंपथी मिळविण्याचा प्रयत्न करतात व जबाबदार्‍या टाळतात. कधी तरी खरंच व्यक्ती आजारी असते पण अनेकदा हे आजारपण ओढावून घेतलेले असते. आपण वारंवार एकाच गोष्टीचा विचार केला की ती मनात जाऊन मोठी होते किंवा प्रत्यक्षात येते. अनेकदा तसेच काहीतरी होत असावे . मग आजाराचा विचार करण्यापेक्षा आरोग्याचा विचार केला तर ८० ट्क्के आजार दूर पळतील आणि आरोग्याचा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचे हे बापूंनी सांगितले.

मनाला फ्रेश वाटत असेल तर शरिराला ही फ्रेश वाटत असत. मन थकलेले असेल तर शरीरही आपले कार्य नीट करु शकत नाही. म्हणून मनाने उदास असणार्‍या व्यक्ती विशेष कार्यशील ठरु शकत नाही. त्यामुळे मनाचा उदासपणा जाऊन त्यास चैतन्य येणे आवश्यक असते. पण खर तर मन हे अन्नमय आहे. म्हणजे शेवटी आपण काय खातो यावरच आपले सर्वस्व अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. आणि आपण काय खावे व काय खाऊ नये तसेच ते कसे खावे हे बापूंनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले.

हे कनेक्शन सांगताना बापूंनी "दी फरगॉटन ऑर्गन" ची ओळख करुन दिली. ते म्हणजे आपल्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरीया. या चांगल्या बॅक्टेरियांचे महत्त्व विशद करताना बापूंनी अगदी थक्क करणारी माहीती दिली. या चांगल्या बॅक्टेरियांच्या प्रभावामुळे माणूस आस्तीक बनत जातो, धीट बनत जातो आणि हे सिद्ध होण्यासाठी आणखी काही कालावधी जाईल. पण हे १०८ टक्के खर आहे असं बापूंनी सांगितले आहे आणि गुन्हेगारांमध्ये वाईट बॅक्टेरियाचे प्रमाण अधिक असल्याचेही शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.

याबाबत मी एक जवळून अनुभव घेतला आहे. माझ्या ओळखीतला एक तरुण मुलगा अतीशय व्यसनी व गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. आस्तीकता नावाला देखील असेल की नाही माहीत नाही. एक दिवस काय झाले माहीत नाही पण व्यसनाचा अतिरेक झाला आणि स्वतःच ठरवले की बस झाले....आता आपण तब्येत सुधरायची.  यासाठी त्या व्यक्तीने व्यायामाचे व्यसन घेतले. बॉडी बनवायची. या ध्यासासाठी त्याने अन्न बदलले....व्यसने सोडली.....व्यायामाचे वेड जरा अतीच होते...पण तरिही त्यामुळे नकळत बदल होत होता....आणि हा बदल आस्तिकतेकडे भक्तीकडे झुकणारा होता...पुढे व्यायामाचे वेड सुटले...पण भक्ती आणि आस्तिकता कायम राहीली.....त्या व्यक्तीने ही हा बापूंचा सेमिनार अटेंड केला. सेमीनारनंतर त्या व्यक्तीनेच मला या गोष्टीची कबूली दिली....की व्यायाम आणि डायट केले नसते तर आज इथे भक्तीमय परिवारात नसतो...भक्तीमय परिवारात नसतो तर आयुष्याला वळण लागले नसते....आयुष्याला वळण लागले नसते तर आता नोकरी आणि अभ्यासात प्रगती केली नसती. आता पुन्हा बापूंच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम व डायटमधील वेड बाजूला सारुन प्रकृतीला उचित असे व्यायाम व डायट करीन.....असा निर्धार केला.

हे ऎकून मला बापूंनी सांगितलेल्या चांगल्या बॅक्टेरियाच्या प्रभावाचे जबरस्त उदाहरण पहायला मिळाले. मग मी स्वतःकडे देखील पाहीले. कारण नुकतच डॉ. सुचित दत्तोपाध्ये अर्थात सुचितदादांच्या मार्गदर्शनानुसार माझे ही डायट सुरु होते. त्यांनी दिलेले हे डायट म्हणजे बापूंनी दिलेल्या मोठ्या सेमीनारचाच एक भाग होता आणि या डायट फॉलो केल्याने शरिरावरच नाही तर मनावरही उत्तम परिणाम झाला. मी घालवून बसत असलेली माझी कार्यशीलता आणि अर्थात चुणचुणीतपणा मला पुन्हा मिळाला. मन शांत झाले, विचार स्पष्ट झाले. निर्णय क्षमता, निरिक्षण क्षमता, कल्पना क्षमता प्रगल्भ झाली आणि त्याचा रिझल्ट माझ्या रोजच्या कामात मला मिळू लागला. मन अन्नमय याचा अनुभव मी स्वतः घेतला.

स्वतःचा पहिला स्वार्थ म्हणजे स्वतःचे आरोग्य. हे समीकरण बापूंनी दिले. कारण आरोग्य म्हणजे केवळ शारिरिक, मानसिक नाही तर त्यापुढे जाऊन खूप व्यापक असल्याचे या व्याख्याना दरम्यान जाणवले. अशा या स्वतःच्या आरोग्य विषयकची माहीती मी वाट पाहत आहे. लवकरच ही माहीती समिरदादांच्या ब्लॉगवर यावी व डॉ. पौरससिंह जोशी यांच्या टीम अंतर्गत बनणारी वेबसाईट लवकरात लवकर यावी ही सदीच्छा व त्यासाठी शुभेच्छा. तसेच उपासना केंद्रावर ह्या व्याख्यानाची सीडी लावल्यास चुकवू नका.....इतके उचित स्वार्थी तर आपण बनूच शकतो.....अबंज्ञ

http://www.healthonics.healthcare/
-  रेश्मावीरा नारखेडे