Showing posts with label SLIDER. Show all posts
Showing posts with label SLIDER. Show all posts

Wednesday, February 18, 2015

गुडुगुडू ऍप



मी खूप दिवसांनी ऑफीसला गेले होते. ऑफीसमध्ये पाय ठेवताच क्षणी मला "गुडूगुडू" असा आवज ऐकू आला. मला काही कळले नाही. मग माझ्या एका सखीशी बोलायला गेले तर तिथे ही गूडूगुडू आवाज ऐकू आला. मला क्षणभर वाटले की माझ्याच पोटातून हा गुडगुड आवाज येतोय की काय? म्हणून गप्प राहीले. त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने हा गुडूगुडू आवाज सारखा कानावर पडू लागला. म्हणजे ती हद्दच झाली. शेवटी न राहवून मी एका सखीला विचारलेच हा गुडूगुडू आवाज कसला?
तर ती हसली आणि म्हणाली अग ती रिमायंडरची ट्यून आहे.

रिमायंडर पण कसले? तर पाणी पिण्याचे..

ऑफीसमधील प्रत्येक सखीने हे गुडूगुडूचे रिमायंडर लावले होते. अर्थात पाणी पिण्यासाठी रिमायंडर लावले होते. "वॉटर युअर बॉडी" "Water your Body" या ऍपचा वापर करुन सगळ्याजणींनी पाणी पिणे सुरु केले होते.

मी म्हटल वा!!! काय छान आयडीया आहे. आत्तापर्यंत पाणी येण्याची वेळ पाळायची आवश्यकता होती पण आता पाणी पिण्याची वेळ सुद्धा पाळायची आवश्यकता भासू लागली आणि त्यासाठी हे ऍप आपल्याला उपलब्ध आहे. खरच ही खूप चांगली गोष्ट आहे. नुकतच बापूंनी प्रवचनातून पाणी पिण्याचे महत्त्व अधोरेखीत केले. गेली अनेक वर्ष आपल्याला सांगत आहेत. परंतू आपल्याला वळण लागणे म्हणजे कठीणच गोष्ट. वळण लागण्यासाठी Consciously Correct राहणे आवश्यक आहे. आणि ते या ऍपमुळे जमू शकते.

मी देखील हे ऍप वापरण्यास सुरुवात केली. आणि मग सारखे गुडूगुडू माझ्या आजूबाजूला व्हायला लागले. रिकामा गडू भरण्यासाठी आता मला वेळोवेळी इशारे हे ऍप देत आहे. या ऍपमुळे शरीराला आवश्यक तेवढे पाणी पोटात जाण्यासाठी मदत होते. आपण एका वेळेला जीतके पाणी पितो तेवढी नोंद यात ऍपमध्ये करावी म्हणजे आपण दिवसभरतात किती पाणी पितो याचा अंदाज आपल्याला मिळेल व हळूहळू आपण आपली क्षमता वाढवू शकतो. वापरायला अतीशय सोप्पे असणारे हे ऍप असून याचा निश्चितच वापर करुन पहावा.

या ऍपच्या मजेशीर आठवणीमुळे मीच या ऍप ला गुडूगुडू ऍप असे नाव ठेवले आहे. ह्या ऍपसाठी प्ले स्टोरवर "Water Your Body" असा सर्च मारावा
- रेश्मा नारखेड़े

Monday, February 16, 2015

बिन तेलाचा आलू पालक

साईबाबांनी तेलियाची भिंत पाडायला सांगितली...ती वेगळ्या अर्थाने पण खरे खुरे चांगले आरोग्य हवे असेल तर "तेलाची भिंत" नक्कीच पाडायलाच हवी. तेलाशिवाय अन्नपदार्थ चांगला होऊ शकत नाही ही जी आपली मनात धारणा आहे ना हीच तेलियाची भिंत. ही पाडायला हवी. कारण तेलाशिवाय बनविलेले पदार्थ उत्तम बनतात आणि खाणार्‍याला सांगितल्याशिवाय कळतच नाही की यात तेल नाही... असच काहीसे नुकताच बनविलेल्या या आलु पालक बरोबर झाले.


साहित्य :
दोन जुडी पालक
चार उकडलेले बटाटे (छोटे बटाटे घेतल्यास जास्त घ्या)
दोन कांद्यांची पेस्ट 
चार पाकळ्या लसूण
लाल तिखट - तुम्हाला हवे तेवढे
हळद १ टि स्पून
मीठ चविपुरते
एव्हरेस्ट मटण मसाला १ १/२ टी स्पून
गरम मसाला - १ टी स्पून

कृती :

सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून घ्या. व मीठाच्या पाण्यात शिजवा.
त्यातील पाणी काढून केवळ पालक हा मिक्सरमधून बारीक करुन घ्या. पेस्ट करायची आहे.
त्यावेळी मिक्सरमध्ये पालका बरोबर लसूण देखील टाका.
नॉनस्टीक कढई तापवा त्यात कांद्याची पेस्ट टाका व थोडासा पाण्याचा शिबका मारुन शिजवून घ्या. 
त्यात मग गरममसाला, लाल तिखट (लाल तिखटा ऐवजी हिरव्या मिरच्या देखील वापरु शकतात. मात्र हिरव्या मिरच्यांची पेस्ट करा. (प्रमाण जेवढे तिखट तुम्हाला झेपते तेवढे), हळद व मटण मसाला टाका. थोडासा परतवून त्यात पालकाची पेस्ट टाका. अधिक घट्ट झाली असल्यास पालकाचे उरलेले पाणी थोडे थॊडे ऍड करा. ग्रेव्ही ही क्रीमी वाटली पाहीजे. 
मग त्यात उकडलेले बटाटे (मोठे असल्यास स्मॅश करुन छोटे असल्यास तसेच) टाका.
थोड्यावेळ ढवळत रहा. शेवटी चवी पुरते मीठ टाका. झाला आलु पालक तयार.


मुद्दे :

१. यात तुम्ही टोमॅटो पेस्ट ऍड करु शकता. मात्र कांद्या बरोबर टाकून शिजवून घ्यावी.
२. मी येथे मुद्दामून एव्हरेस्टचा मटन मसाला वापरला आहे. मुळात मटण मी खात नसल्याने या मसाल्याशी कधीच संबंध आला नाही. पण आमच्या जवळ राहणार्‍या कॅटरर्स काकांनी व्हेज बिर्यानीमध्ये तो वापरला होता आणि त्याची चव अप्रतिम होती. तेव्हा त्यांच्याकडूनच कळले की हा मसाला भाज्यांना वापरल्यावर वेगळी छान चव येते म्हणून वापरुन पाहिला.
३. पालका थोडीशी कडवट चव असतेच पण हा मटन मसाला आणि ती कडवट चव छान मिक्स होऊन एक वेगळीच चव लागत होती.
४. भाताबरोबर हा बिन तेलाचा आलु पालक मस्त लागतो.
५. ही ग्रेव्ही उरली तर यात भात शिजवून तूम्ही पालक राईस पण करु शकता.
६. तसाच पालक शिजवलेल्या पाण्याचा वापर ही करु शकता. 

प्रेम, प्रेयसी आणि मी - दीर्घ कविता


प्रेमात गुंतल्यानंतर
बऱ्याच दिसांनी एकटाच फिरत होतो
एरव्ही प्रेयसीच्या मागमाग
पण, आज मित्रांच्या घोळक्यात होतो  ||

पडलेला प्रश्नार्थक चेहरा माझा
मित्रांनी अगदी पटकन हेरला
विचारतात, झालय काय तुला
एवढा का सीरियस झाला ||

काय सांगू मित्रांनो
प्रेमात जरी मी पडलो
पण, प्रेम न उलघडले मला
न्, त्याच्या अर्थापाशी अडलो ||

प्रेयसी म्हणते, प्रेम म्हणजे, प्रेम असत
तुमच आमच सेम असत
शोध आता प्रेमातील गूढ़ अन्
प्रेम म्हणजे "नेमक" काय असत?

ती म्हणे, प्रेम म्हणजे तो शुक्रतारा
जो तुला कधीच ओळखता आला नाही
मी म्हणतो, शुक्रतारा शोधत बसलो
तर, डोळ्यात डोळे मिसळताच येत नाही ||

ती म्हणे, प्रेम म्हणजे तो ताजमहाल
जो अलोट प्रेमाची देतो ग्वाही
मी म्हणतो, तो बांधणे तर दुरच राहिले
साधी जाउन पाहण्याची ऐपत नाही ||

ती म्हणते, प्रेम म्हणजे चन्द्र, सूर्य, तारे
अन्, हे उधाणलेले वारे
अग, नको आता हा पुन्हा भूगोल
दहावीला होते आम्हाला हे सारे ||

तिच्या या प्रेमळ कल्पनांना
देतो मी अशी नेहमीच बगल
या मग बोरिंग कल्पनांवरुन
सुरु होतो आमच्यात स्ट्रगल ||

आता मला शेवटचा
इशारा आहे मिळाला
विचार नसेल पटत तर
मार्ग धर निराळा ||

त्यामुळेच ज़रा धास्तावलोय
चुक ही माझीच आहे
गोड आहे माझी प्रेयसी
फक्त, ज़रा जास्तच रसिक आहे ||

माझ सार पुराण ऐकून
दोस्त माझ्यावरच चिडले
द्या रे ह्याला एक ठेवून
असे, बंडोपंत वदले ||

अरे, प्रेम म्हणजे नव चैतन्य
तू का असा वागतोस रुक्ष
हो जरा रसिक अन्
दे प्रेयसिकडे विशेष लक्ष  ||

तेव्हा हळुवार उलघडत जाणारी
प्रेमाची कळी तू पाहशील
अन्, मग एका अवचित क्षणी
तू न तुझा राहशील ||

तेव्हाच कळेल तुला, तेव्हाच कळेल तुला

प्रेम म्हणजे एक गुलाब
अन्, असतो गुलाबांचा गुच्छ
पण, कधी कधी एका पाकळी पुढे
आख्खी बाग़ ही होते तुच्छ ||

प्रेम म्हणजे अशी ओढ़
की जिचे समाधान होणे नाही
प्रेम म्हणजे असा ओढा
जो कधीही आटत नाही ||

प्रेम म्हणजे अशा गप्पा ज्यात
शब्दांना अस्तित्वच नाही
प्रेम म्हणजे ती शांतता ज्यात
प्रियेचा श्वास ऐकू येई  ||

मी :
थांबा, बंडोपंत इतके रसिक
तुम्ही कधी पासून झालात
प्रेम इतक छान उमगले
एवढा अभ्यास कधी केलात ||

बंडोपंत : 
अरे, वेड्या प्रेम समजण्यासाठी
अभ्यास नाही, ह्रदय लागते
अन्, ते ही नुसते धड़कुन चालत नाही
तर ते "पूर्ण" गमवावे लागते |

अरे इतके टेंशन कसले घेतो 
तुला एक युक्ति सांगतो 
हवा असेल जर प्रेमाचा जॅकपॉट
तर तिच्या हो ला म्हणून हो टाक  

तिच्या कल्पनेत रमताना तिला 
वास्तवाची पण कल्पना दे 
मन मात्र मोडू नको तिचे कधी 
तुटलेले सार जोडून घे 

आज तू जोडून घेतलेस 
तर आयुष्याची पुंजी होईल 
संसारात ती तीळ तीळ तुटताना 
तुझे हे जोडणे कायम लक्षात ठेवेल

मिस चे मिसेस झाले की 
कचाट्यात असा अडकशील 
ती संसारात गढली की 
हीच रसिकता तू मिस करशील 
हीच रसिकता तू मिस करशील 
हीच रसिकता तू मिस करशील 

- रेश्मा नारखेडे 

Saturday, February 14, 2015

प्रेमात पडणे तसे अवघड नसते


चालता चालता केळीच्या सालीवरुन
धपकन घसरुन पडावं
काहीतरी अनाकलनिय घडावं
आणि नंतर जग जणू विस्मृतीत जावं
असंच काहीस घडत असते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

केळीची साल अन पायाचा सुटलेला तोल
यांच्या मिलनाचा जसा योग यावा लागतो
त्याच्या तिच्या नजरेचा कोन
तसा अचुक जुळावा लागतो
नंतर "आई ग" ही एकच हाक उठते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

सालीवरुन घसरुन पडल्यानंतर
कदाचित एखादे हाड मोडू शकते
पण प्रेमात घसरुन पडल्यानंतर
काही नाही तरी कणा नक्कीच मोडतो
पण तरिही,
मोडक्या कण्यासह ताठ उभे राहायचे असते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

केळीचे साल जसे रुग्णालयात नेते
तसे प्रेमाचे भूत पागलखान्यात नेते
म्हणून कृपया केळीचे साल रस्त्यात फेकू नका
आणि खुळचट प्रेमाच्या कल्पने मागे पडू नका
कारण खरे प्रेम पाडत नाही तर सावरते
हे ज्यास समजले तोच म्हणु शकतो

प्रेमात पडणे तसे अवघड नसते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

- रेश्मा हरचेकर ३०/०३/१०

प्रश्न ??



मी जन्माला आले तेव्हा डाक्टरांचा चेहरा प्रश्नार्थक होता. असं मी नाही माझी आई म्हणते. कसला बरा प्रश्न पडला असेल त्यांना? कुणास ठाऊक? काही चिंतेचे कारण असेल म्हणून आईने त्यांना विचारल सुद्धा..पण छे! त्यांनी Every thing is normal  असे म्हणून प्रश्न टाळला. ही होती सुरुवात. तेव्हा पासून आत्ता पर्यंत मी आणि प्रश्न हे काही वेगळे नाहीत. मला प्रश्न पडतात. माझ्या पडिक प्रश्नांवर पुन्हा प्रश्न निर्माण होतात. मी असताना प्रश्न. मी नसताना प्रश्न. माझ्या बोलण्यावर प्रश्न, माझ्या वागण्यावर प्रश्न.

माझे नावच माझ्या जवळच्यांनी "२१ अनपेक्षित प्रश्नसंच" असे ठेवले आहे. काय माहित कधी कुठला प्रश्न विचारेन. त्यामुळे मला टाळण्याचाच लोकांचा कल असतो. असो...

पण २१ अनपेक्षित प्रश्नसंच हे नाव मी पुरेपुर सार्थ ठरवलय..बरं का!! इतरांना झोपले की स्वप्न पडतात..मला प्रश्न पडतात..आता झोप किती वाजता लागेल? स्वप्न कुठलं पडेल? स्वप्नात कोण येईल? कोण यायला हवे? इत्यादी. आणि माझी पहाट होते ती प्रश्नानेच कुठलं स्वप्न पडलं होत? ह्या प्रश्नाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच....आईंची प्रश्नांची सरबत्ती सुरु...अग म्हशे उठलिस का? दात घासलेस का? चहा हवा की दूध? ....भाजी खाशिल ना? उफफ...आईला पण "उत्तरात" बोलता येत नाही का? बघा मीही पुन्हा प्रश्नच विचारला...हे असंच होतं माझं...

आता मला पडलेले प्रश्न ऐका...
  1. भारताच्या पूर्वेला असणार्‍या राज्याला "पश्चिम" बंगाल असे का म्हणतात?
  2. लोक मला म्हणतात तुझे वळण सरळ नाही..आता वळण कधी सरळ असेल का?
  3. ट्रेनमधील विक्रेते माल विकून आलो असे म्हणण्याऐवजी "ट्रेन मारुन आलो" असे का म्हणतात? म्हणजे ते नेमके काय करतात?
  4. खुर्चिवर बसले असतानाही लोक नेटवर बसलोय अस खोट का बोलतात?
  5. आणि सगळ्यात वाईट म्हणजे...develop करायला दिलेल्या फोटोंना "फोटो धुवायला दिले आहेत" अस का म्हणतात? आता ते काय कपडे आहेत?
  6. जेवायला बस आणि बसून जेव..यामधील क्रीया सारखीच आहे...पण शब्दांच क्रम बदलला की अर्थ एकच राहून भाव कसा काय बदलतो?
  7. माझी मैत्रीण फोनवर मला सांगते...की आता मी जेवण करते आहे म्हणजे नक्की जेवण बनवते की जेवण जेवतेय, हे मी कस समजायचे?
  8. महागाई शब्द कसा आला? गाईंशी त्याचा काय संबंध.....
  9. झोपलेले आहे हे दिसत असताना हलवून हलवून उठवायचे आणि विचारायचे की झोपली होती का? या प्रश्नाला उत्तर काय अपेक्षीत असते?
  10. वाढू का? वाढू का? जेवायला बसल्यावर हा प्रश्न तर जाम सतावतो. कारण इतकी मोठी उंच वाढलेली असताना, ताई अजून किती वाढणार? हा प्रश्न मला पडतो?
  11. आता अंधार हा गुडुप कसा काय? गुडूप म्हणजे काय? गुडूप असा अंधाराचा आवाज आहे का जसा पाण्यात दगड पडल्यावर येतो डुबुक तसा?
  12. कंटाळा आला असे आपण म्हणतो पण तो येतो कुठून?



या अशा अनेक प्रश्नांनी माझं आयुष्य आणि मी प्रश्नार्थक झालय आणि उत्तरांनी माझ समाधानही होत नाही....
कंटाळा आलाय मला या प्रश्नमय आयुष्याचा..कुठून ते ही कळत  नाही? खुप नुकसानही झालयं माझ. म्हणून मी ठरवलय...की आता प्रश्नच विचारायचे नाही मुळी...केवळ उत्तरातच बोलायचे. द्यायची फक्त उत्तरे...प्रश्न टाळायचे...

हा विचार माझा पक्का होऊन काही दिवस उलटत नाही तोच.....

एका सुशिक्षित, सुसंस्कृत, सुंदर मुलाने मला वॅलेंटाईनच्या दिवशी विचारले 

Will You Marry Me??? 

मी त्याला ताडकन उत्तर दिले...
Are You Gone Mad??? 
तुला वेड लागलेय का?

झालं....

आता त्या मुलाचा चेहरा प्रश्नार्थक झाला होता.
पण त्याने शांतपणे उत्तर दिले...हो! वेडाच झालोय...

आयुष्यात माझ्या प्रश्नाला मिळालेले हे एकमेव समाधानकारक उत्तर होते.

त्यानंतर विचारु नका काय झाल....

एवढचं सांगू शकते की २१ अनपेक्षित प्रश्नसंचाला अखेर २१ अपेक्षित उत्तरसंच मिळाला आहे....


- रेश्मा नारखेडे 
ही कथ पूर्णपणे काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी 
व याबाबत कृपया प्रश्न विचारु नये.

Thursday, February 12, 2015

डायट भेंडी...

भेंडीची भाजी मला खूप आवडते. परंतु आजपर्यंत मी भरपूर तेलात खरपूस तळलेली भेंडी खाल्ली आहे. भेंड्याची भाजी म्हटली म्हणजे तेल आले. पण डायटमुळे तेल कमी केले असल्याने कमी तेलात भेंड्याची भाजी करण्याचा प्रयास केला. आणि खरच खुप छान भेंडी झाली आणि नंतर लक्षात आले की तेलाशिवाय देखील भेंडी छान होईल. पण आधी लेस ऑईलमध्ये भेंडी कशी बनवली  ते पाहूया.


साहित्य : 
  • अर्धा टी स्पून ऑलिव्ह ऑईल (2.5 Ml पेक्षाही कमी)
  • अर्धा किलो भेंडी (दोन जणांना पुरेल)
  • हळद
  • मीठ
  • लाल तिखट


कृती :
  • सर्वप्रथम भेंडी धुवून कोरडी करुन तीचे नेहमी सारखे काप करावे.
  • नंतर त्यांना अर्धा टी स्पून ऑलीव्ह ऑईल लावावे.
  • तेवढेच ऑलीव्ह ऑईल सगळ्या भेंडींच्या कापांना नीट लागेल हे पहावे. नीट मिक्स करावे. 
  • मग तसेच चवीपुरते मीठ आणि लाल तिखट लावावे.
  • मग नॉन स्टीक कढई तापवून यात भेंडी शिजायला टाकावी.
  • मध्यम गॅसवर झाकण ठेवून भेंडी शिजवावी.
  • पाच-दहा मिनिटानंतर भेंडी शिजल्याचा वास येऊ लागतो.
  • तेव्हा झाकण काढून भेंडी छान परतून घ्यावी. वर खाली फिरवावी.
  • एक तुकडा उचलून नीट शिजली आहे का नाही व चव पहावी.
  • आवश्यकता असल्यास थोडे मीठ व मसाला घालून आणखी पाच एक मिनटे शिजू द्यावी. 


आतिरिक्त :
यामध्ये तुम्ही कांदा, कोकम घालून देखील भेंडी करु शकता.


- रेश्मा नारखेडे 
२/१२/२०१५

आत्मबल - तुझे माझे नाते आई

आत्मबलचा कार्यक्रम नुकताच झाला. मला प्रत्यक्ष कार्यक्रमाला जाता आले नाही. परंतु या कालावधीत मी माझ्या वेळच्या आत्मबलच्या आठवणींमध्ये रमले होते...खरच एक एक आठवण जपून ठेवण्यासारखी आहे. किती सांगू आणि किती नाही. या आत्मबलच्या क्लास मध्ये मला काय मिळाल हे शब्दात सांगता येणार नाही पण तीन प्रमुख गोष्टी मला मिळाल्या त्या म्हणजे आई, मी आणि सख्या. आज जेव्हा लग्न झाले आणि बाळ झाले तेव्हा जाणवतेय आत्मबल संपलेले नाही. आज खरच जाणवते एका मुलीचे रुपांतर पत्नी आणि आईमध्ये जेव्हा होते...तेव्हाचा बदल हा साधासुधा नसतो. आत्मबल हा बदल स्वीकारण्यास व पेलण्यास समर्थ करते. ते ही अगदी हसत खेळत. 

नंदाईच्या सानिध्यात आपल्यात सहज होणारे बदल आपल्याला देखील कळत नाही. मग वेळ जसा पुढे जातो तशी आपल्याला त्याची जाणिव होत जाते. आणि तेव्हा लक्षात येते की आई आपल्यावर किती मेहनत घेत आहे आणि जर आपण तिला हवी तशी साथ दिली तर आपल्या आयुष्याचे सोने होऊ शकते. होय!!! नंदाईने माझ्या आयुष्याचे सोने केले...

आईने मेहनत घेतली म्हणजे नक्की काय? आई जेव्हा क्लासमध्ये येते आपल्याला काही शिकविते तेव्हा ती आपल्यावर मेहनतच घेत असते. ती आपल्या छोट्याश्या रोलसाठी सुद्धा जीवाच रान करते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी ती आपल्यापेक्षा जास्त प्रयास करते. आपल्या वाट्याला जी काही भूमिका येईल त्यात १०८ टक्के पूर्ण प्रयास करायचे ही मोठी शिकवण आई देते...हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहीजे. माझ्या आयुष्यात जो रोल मला बापूंनी दिला आहे तो १०८ टक्के पूर्ण समर्थाने पार पाडणे आवश्यक असते व ते कसे करावे हे आई स्नेहसंमेलनाच्या मार्फत शिकविते असे मला वाटते. आत्मबल हे स्वार्म सायन्स आहे. संघशक्तिचा एक उच्चतम अविष्कार आहे. 


मला अजूनही आठवत तेराव्या बॅचमधील भूक नाटकातील "बॉस’ चा रोल. अधिक वेळ न देऊ शकल्याने मला अगदी छोटासा हा रोल मिळाला होता. पण आईने दिलेल्या बळामुळे आणि बापूंच्या कृपेमुळे हा रोल खरच अजरामर ठरला. माझी लहानपणापासून इच्छा खुप होती की आपण रंगमंच गाजवावा. ती इच्छा आईने आत्मबलमधून पूर्ण करुन घेतली. रोल छोटा होता की मोठा होता ह्या पेक्षा ती आईने दिलेली एक महत्त्वपूर्ण जबाबदारी होती याची मला जाणिव होत होती. 

माझा रोल लंपट, बाईलवेडा अश्या ठरकी बॉसचा होता. जे मला सुरुवातीला पचविणे कठीण झाले. पण तरीही आईने दिलेले काम आहे हे जमणारच ह्या विश्वासाने मी मेहनत करु लागले. या रोलसाठी आवश्यक ते सर्व काही केले. हा रोल नीट व्हावा म्ह्णून सिगरेट, दारु पिणार्‍या लोकांचे निरिक्षण केले. चित्रपट सिरिअल्स मधून ठरकी पुरुष कसे बाई कडे बघतात याचे निरिक्षण केले. व तसे आपल्या अभिनयात उतरविण्याचा प्रयत्न केला. It was challenge to me. 
THE BOSS - AATMABAL DRAMA

माझा एक वाईट बॉस म्हणून आईला राग आला पाहिजे आणि तिला मला चप्पल काढून मारावेसे वाटले पाहिजे. हे माझे टारगेट होते. त्याप्रमाणे एका रन थ्रूला बेसमेंटमध्ये रिहसल सुरु होती. जागा कमी असल्यामुळे एरव्ही लांब असणारी आई यावेळेस अगदी समोर म्हणजे अगदी एक फुटाच्या अंतरावर बसली होती. मला एक डायलॉग समोर पाहून बोलायचा होता आणि आई समोर होती. पण खर तर मी घाबरले होते. मग मनातून मोठ्या आईचे, दत्तबाप्पा आणि बापूंचे स्मरण करुन जे काय होईल ते होईल अस म्हणत आईच्या डोळ्यात डोळे घालून तो डायलॉग म्ह्टला. यावेळी मला स्पष्ट दिसत होते की आईला माझ्या डायलॉगची आणि नजरेची किळस वाटत होती. आणि शेवटी आई म्हणालीच की तुला चप्पल काढून मारावेसे वाटत आहे.....
ऍण्ड येस इथे सगळ जिंकले होते. आईला हवा तसा माझा रोल झाला होता. 

ह्या नंतर मुख्य कार्यक्रम झाला. कौतुक झाल, पण एक गोष्ट आजही डोक्यातून गेली नाही.....
ती म्हणजे आईने मला हा बॉसचा रोल देऊन काय साधल? माझ्यासाठी हा रोल काय देऊन गेला?
तर खूप काही देऊन गेला. एक आत्मबलचा साधा रोल आपल्या मन बुद्धीत बदल घडवून आणू शकतो. विचारसरणी बदलू शकतो. आपल्याला सतर्क करु शकतो हे प्रथमच मी अनुभवले आणि यापेक्षा बरच काही. 
जसे पंचतंत्रच्या गोष्टींमधून आपल्याला बोध मिळत असतो तसा त्मबलच्या प्रत्येक क्षणातून आपल्याला बोध मिळत असतो...फक्त ते बोधामृत पिण्यासाठी आपल्याला चातक असावे लागते....
आज पुढे कितीही वर्षे गेली आणि अगदी मरणाच्या दारावर असेन तेव्हाही मला आठवेल आपण अस काहीतरी आयुष्यात केले होते ज्यामुळे काही क्षण तरी आई समाधानी झाली होती. आणि हा अनुभव आत्मबलच्या प्रत्येक सखीने मिळवून हृदयाच्या कप्प्यात ठेवावा. यात खुप मोठी ताकद आहे, असे मला वाटते. 

तुझे माझे नाते
जगावेगळे काही
माझ्यातले बळ तू
शक्ती तू आई

तुझ्या चेहर्‍याचे हास्य
अन समाधाना पायी
स्वतःशीच शर्यत पहा
लावली मी आई

सुवर्ण क्षणांची
सुवर्ण गाठोडी
पुन्हा उघडण्याची
लागली मला घाई

चरण उराशी
आत्मबल हाताशी
संसार माथ्यासी
समर्पित होण्यास
बोलव ग आई

- रेश्मा नारखेडे
२/१२/१५

Wednesday, February 11, 2015

एक एक पाकळी प्रेमाची


वेबसाईटवरील चित्र पाहिले ना...नाजूकपणे फुलाची एक एक पाकळी कोणतरी खुडत बसलय...अगदी प्रेमाने...बहुतेक प्रेमासाठी.

यावरुन मला एक गोष्ट आठवली..मी काँलेजला असताना आमच्या Fun Do ग्रुपमध्ये एक मित्र होता.. अक्षय खुडे....sorry. खुडे नाही कुडे. अक्षय कुडे. आम्ही त्याला खुडे म्हणायचो. अक्षरक्षः तो नावाप्रमाणे अक्षय, अखंडपणे गुलाबाचे फूल हातात घेऊन ते खुडत बसायचा. एक संपल...की दुसरं..दुसरं संपलं की तिसरं...पुढे गुलाब महागली...मग मिळेल ते फूल घ्यायच...पाने ही...चिंचेची डहाळी घेउन बसायचा खुडत खुडे. sorry कुडे.

हे कर्म सुरु असताना तोंडात एकच जप...She Loves Me...She Loves Me Not....या दोन जपांच्या साक्षीने एक एक पाकळी शहीद होत होती..न जाणॊ या प्रेमाच्या हवनात किती पाकळ्या आणि पानांची आहुती गेली असेल? पण या त्याच्या तपश्चर्यचे फळ काय त्याला मिळतय...किंवा नजिकच्या काळात मिळेल असे वाटत नव्हते. 

आणि त्याची ही तपश्वर्या अधिकच उग्र नी उग्र होत होती. collage मधली सगळी झाडे, झुडपे, फुल, पाने घाबरुन गेली असावीत बिचारी. आम्ही पण जाम वैतागलो होतो...एकदा त्याची "SHE" सापडू देत...अशी प्रार्थना आम्ही करत होतो. त्याला विचारयाचा प्रयत्न केला देखिल आम्ही...कोण आहे रे ही मेनका..फुलराणी..जिच्यावर तु ही अशी फुलांची बरसात (मनातून बरबादी असं म्हणायच होत) करीत आहेस? कोण आहे सांग ना? आम्ही करतो काही तरी? पण हा पठ्या हुं का चूं करायला तयार नाही. खुप शोध घेतला.

 त्याच्या डोळ्यांवर नजर ठेवली. तेव्हा कळल...की आमच्याच वर्गातील सीमाला पाहिल्यावर याच्या डोळ्याचे भाव बदलतात...मग आम्ही लागलो आमच्या तयारीला..कसल्या काय विचारता हो..अक्षय सीमाची सेटींग करण्याच्या...दोन दिवसांनी आमच्या म. टा. ने खबर आणली...

म.टा म्हणजे मनिष टाकळे..आमच्या ग्रुपची चालती बोलती वृत्तसंस्था "ही सीमा बायो हेड धाक्रसची पोरगी आहे." बापरे हेडची पोरगी..हेडएकच होईल..म्हणून अक्षयची सेटींग परिक्षेनंतर करायचे ठरविले..१२ वीची परिक्षा जवळ आली..सगळे अभ्यासाला जुंपले...Practical's झाल्या..लेखी झाली..शेवटचा पेपर झाला आणि कट्ट्यावर जमलो...त्याच झाडाखाली...ज्याची पाने गळून (खुडून) इतस्त विखुरली होती.

आता एकच ध्येय...अक्षय आणि सीमाची सेटींग...Plan आखला...आजच तिला गाठायच...आणि अक्षयच्या वतीन विचारायच..Fix....

जवळच सीमा होती बसलेली...विखुरलेली पाने, पाकळ्या चिवडत..
तेवढ्यात अक्षय आला...खुशीत होता...त्याने आम्हाला सगळ्यांना एक एक रसरशीत..भरपूर पाकळ्या असलेलं गुलाब दिल आणि आम्हाला ओळख करुन दिली. Meet My GirlFriend Priya...आमची नजर त्या गुलाबाकडेच खिळली होती...सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न..खुडेच्या हातात गुलाब शिल्ल्क कस राहिल..अरे!! फुलाकडे काय पाहताय...इकडे पहा...ही माझी girlfriend..Priya...

आम्ही जीवावर उदार होउन पण थोड्याश्या कुतुहलाने प्रियाकडे पाहिल..तर....एकजात सगळे केकाटले...तु या प्रियाला पटवली? दुश्मन गँगची पोरीवर प्रेम करायला लाज नाही वाटली. खुप खुप बोललो त्याला..खुप राग आला..बाजूला सीमा सगळं पाहत होती..आम्ही हताशपणे तिच्याकडे पाहिले आणि घरच्या वाट्याला लागलो...तो आमच्या collage चा अखेरचा दिवस होता आणि अक्षयबरोबरील मैत्रीचा सुद्धा...

पाहता पाहता दोन वर्षे उलटली...एका शनिवारी शांतपणे बसले असताना कुरियरवाला आला...आश्चर्यच..अक्षयची लग्नाची पत्रिका होती..आमच्या ग्रुपमध्ये लग्न करणारा तो पहिलाच..दोन वर्ष संपर्कात नव्हतो तरी ग्रुपमध्ये होता तो कायम...पत्रिका सुंदर होती...फुलाफुलांची....अगदी collage चे दिवस आठवतील अशी..पण जरा निरसपणेच उघडली...चि.अक्षय याचा विवाह चि.सौ.का. सीमा धाक्रस हिजबरोबर....SHOCK.....SHOCK......हे कसं काय? काही कळेना...पत्रिका दहा वेळा वाचली....माझा विश्वासच बसेना... आठवड्याने लग्न होत....दरम्यान त्याला फोन केला..पण तो फोनच उचलेना...

सगळे लग्नाला गेलो...शुभेच्छा द्यायला स्टेजवर...तेव्हा आमची सगळ्यांची अचंबीत थोबाडपाहून तोच म्हणाला...
"मित्रांनो, जिच्यासाठी मी वर्षभर फुलांच्या पाकळ्या खुडत बसलो...तिनेच वर्षाच्या आतच मला एखाद्या पाकळीप्रमाणे स्वतःच्या आयुष्यातून खुडून टाकल. मी पाकळ्या खुडत असताना..नेहमी जिने त्या पाकळ्या अलगद, प्रेमाने उचलून आपल्या वहीत जपून ठेवल्या..तिनेच मग मला अलगद, प्रेमाने, मानाने उचलून आपल्या ह्रदयात स्थान दिले. जिने टाकलं तिच्यासाठी जीव जाळण्यापेक्षा, जिने वेचलं तिच्यासाठी...तिचा होऊन राहणे अधिक श्रेयस्कर नाही का?

आम्ही सगळे निशब्दः झालो होतो...ओठांवर फक्त समाधानाचे हास्य होते...

निघताना सीमा..अर्थात सीमा वहिनींनी आम्हाला थांबविले..आणि हळूच त्याला कळणार नाही असे म्हणाली.."एक गोष्ट सांगायची राहीली..माझ्याकडे पाहून अक्षयच्या डोळ्यातले भाव कधिच बदलले नव्हते...भाव बदलत होते तर ते माझ्या डोळ्यातले...अक्षय तर फक्त ते भाव टिपत होता...मात्र, तेव्हा काही कळण्याची बुद्धी्च एका एका पाकळीसोबत गहाणच पडली होती त्याची."

आम्ही हसतच आणि आनंदातच स्टेजवरुन खाली उतरलो...त्या दोघांकडे पाहून या दोन वर्षात नेमके काय आणि कसे घडले हे जाणून घेणेच विसरुन गेलो...असे वाटत होते जणू आमचा collage मधील Plan  आता यशस्वी झाला...अक्षयसीमाच्या सेटींगचा..

कथा - रेश्मा नारखेडे 
(काल्पनिक कथा आहे याची नोंद घ्यावी) 
 २२/०५/२०१०

Monday, February 9, 2015

आय लव्ह यू......


वाटते आता सारे तुझ्यावरी उधळूनी द्यावे

तुझ्या सुखासाठी स्वतःला देखील संपवावे



तुझ्याच मिठीत आता स्वप्ने सारी रंगावी

मनातील सारी गुपिते तुलाच आता सांगावी



तुझ्यातच माझे आता माझेपण सुरु व्हावे

तुझेपण आता संपूर्णतः माझे व्हावे



तुझ्या प्रेमाच्या झोक्यावर जीवन हे झुलावे

प्रत्येक क्षणात मी कण कण फुलावे



कश्या मी आणू या सार्‍या भावना अश्या ओठी

बघ, नयन ओसांडले दाटता त्या कंठी



रितेपण नाही उरत तुझ्यासोबत असताना

भरल्या डोळ्यांनी तुझ्यावर प्रेम करताना



एवढ्या दिवसात तुला मला हेच सांगायच होत

पण सांगण्यापूर्वीच नकळत मी तुला दुखवल होत



आता या पुढे मी काही लिहु शकत नाही

तुला दुखवल्याची सल मी मांडू शकत नाही



आय लव्ह यू......

- Reshma Narkhede

Thursday, January 22, 2015

वॉटस अप आता कॉम्प्युटरवरुन वापरा

आज एक जबरदस्त ऍपलीकेशन मिळाले....ते म्हणजे वॉटस अप ऑन पीसी...
Whats Up On Pc
वॉटस अपने आपले वेब ऍप लॉंच केले आहे. जे फक्त गुगल क्रोममध्ये चालू शकते...
तर पाहूया हे ऍपलीकेशन कसे काम करते...

सर्वप्रथम गुगल क्रोम हा ब्राऊझर ओपन करा. त्यामध्ये https://web.whatsapp.com/ वर जा. तिथे तुम्हाला एक क्यु आर कोड दिसेल व लॉग इन राहण्यासाठीचे ऑप्शन दिसेल.
आता तुमच्या ऍनरॉईड फोन्समधील वॉटस अपचे ऑप्शन सुरु करा. सेटींग्स मध्ये जा. तिथे वॉटस अप अपडेट केल्यावर "व्हू वेब ऍप" हे ऑप्शन दिसेल. ते ऑप्शन निवडा.तिथे ऍटोमॅटीक वॉटस अपचा स्कॅनर सुरु होइल आता..तुमचा हा फोन कॅमेरा कॉम्प्युटरच्या स्क्रीन समोर धरुन कॉम्प्युटरवरील क्यू आर कोड स्कॅन करावा.
तो ऍटोमॅटीक स्कॅन होतो. आणि क्षणार्धात तुमच्या मोबाईलवरील वॉटस अप तुमच्या पीसी वर दिसू लागते.
आणि तूम्ही पीसी वरुन वॉटस अप वापरु शकतात...यावेळेस मोबाईलचे वाय फाय चालू ठेवावे. मोबाईल चालू ठेवावा.


या सुविधेमुळे फाईल शेरिंग हा प्रकार अत्यंत सोप्पा होणार आहे. आणि वॉटस अप हे केवळ टाईमपासचे साधन न राहता महत्त्वांच्या कामांसाठी याचा वापर करता येऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे मोबाईल आणि पीसी दोन्ही कडे एकाच वेळी वॉटस अप सुरु राहते. आणि जेव्हा कधी तुम्ही हा वेब बेआऊसर बंद करुन पुन्हा सेम लिंक वर याच ब्राऊझरमध्ये परतता तेव्हा तुमचे वॉटस अप लगेच कनेक्ट होते...या मध्ये डेक्सटॉप नोटीफीकेशन देखील आहेत. आणि लॉग आऊटचे देखील ऑप्शन आहे.

या ऍपची अधीक माहीती पुढे घेऊच....

पण शुभच्छ शिघ्रम.....

आम्हा कॉम्पुटरवर सतत असणार्‍यांसाठी आणि वॉटस अपवर कामे करणार्‍यांसाठी हे वरदानच...

- रेश्मा नारखेडे

Monday, January 12, 2015

I Love You My Dad


I love you my Dad

Welcoming in Sai Satcharitra Panchasheel Exam Prize Distribution Program 2015

Tum Mile - Superb Performance

Song Tum Mile

तुम मिले....जबरदस्त गाणे...आणि जबरदस्त परफॉर्मन्स....फाल्गुनी पाठक आणि संजय सावंत
अनिरुद्ध मेलोडीज - Aniruddha's Melodies
श्री साई सच्चरित पंचशील परिक्षा पारितोषिक वितरण समारंभ २०१५
Shree Saisatcharit Panchasheel Exam Prize Distribution 2015

सर्वात्मका सर्वेश्वरा....

sai sat charit Panchasheel exam, Aniruddha Bapu


परमपूज्य अनिरुद्ध बापू श्री साई सच्चरित पंचशील परिक्षा 2015  (Shree Saisatcharit Panchasheel Exam 2015) दरम्यान "अनिरुद्धाज मेलोडीज" या गाण्यांच्या कार्यक्रमात "सर्वात्मका सर्वेश्वरा" या संजय सावंत गात असलेल्या गाण्यात समरस होत असताना......
व्हीडीओ - रेश्मा नारखेडे

Thursday, December 18, 2014

स्व-आरोग्याकडे पाहण्याचा एक स्वार्थी दृष्टीकोन


Self-Health-Doctor

१३ डिसेंबर हा दिवस दृष्टीकोन पालटणारा ठरला. आरश्यात केवळ आपण कसे दिसतो हेच आज पर्यंत पहात आले पण १४ डीसेंबरला प्रथमच आरश्यात स्वतःचे आरोग्य कसे आहे हे न्याहळायला लागले. तेव्हा जाणवले की चांगले आरोग्य हेच खरे सौंदर्य आणि खरे सौंदर्य चेहर्‍यावर नसून पोटात आहे.....हा हा हा....नक्कीच अजब वाटले असेल. पण हे १०८ टक्के खर आहे. कारण १३ डिसेंबर २०१४ रोजी डॉ. अनिरुद्धसिंह धैर्यधर जोशी (अनिरुद्ध बापू) यांचा सेल्फ हेल्थचा सेमिनार अटेंट केला आणि माझे माझ्या आरोग्याबद्दलचे विचारच बदलले. खरच आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही आणि घ्यायची म्हटली तर नेमके काय करायचे हेच कळत नाही. जोपर्यंत आपण स्वतःच्या आरोग्याविषयी स्वार्थी बनत नाही तोपर्यंत चवीच्या आणि खाण्याच्या मोहातून सुटका होत नाही. बापूंनी या व्याख्यानातून ही जाणिव करुन दिली.व्याख्यानाची सुरुवातच मुळी बापूंनी सकारात्मक करुन दिली.

Everything can be repair. हो आपण सगळ काही सुधारु शकतो. दुरुस्त करु शकतो. आरोग्याच्या बाबतीत बोलताना सेमीनारच्या शेवटापर्यंत ह्या वाक्याची पूरेपूर जाणीव झाली.

बापूंनी डॉ थॉमस यांचे एक वाक्य सांगितले. Health is not value till sickness come. आरोग्याची किंमत आजारपण आल्याशिवाय कळत नाही आणि खरंच आज एकही अशी व्यक्ती नसावी की ती आजारी नाही. प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या व्याधीने पछाडलेलाच आहे. काहींची व्याधी मानसिक तर काहींची शारीरिक. आणि या व्याधींचा वापर आपण अनेकदा सांत्वनासाठी करुन घेतो.

मी देखील अनेक व्यक्ती पाहील्या आहेत की त्यांना झालेल्या (?) आजारांचा वारंवार उच्चार करुन जगाची सिंपथी मिळविण्याचा प्रयत्न करतात व जबाबदार्‍या टाळतात. कधी तरी खरंच व्यक्ती आजारी असते पण अनेकदा हे आजारपण ओढावून घेतलेले असते. आपण वारंवार एकाच गोष्टीचा विचार केला की ती मनात जाऊन मोठी होते किंवा प्रत्यक्षात येते. अनेकदा तसेच काहीतरी होत असावे . मग आजाराचा विचार करण्यापेक्षा आरोग्याचा विचार केला तर ८० ट्क्के आजार दूर पळतील आणि आरोग्याचा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचे हे बापूंनी सांगितले.

मनाला फ्रेश वाटत असेल तर शरिराला ही फ्रेश वाटत असत. मन थकलेले असेल तर शरीरही आपले कार्य नीट करु शकत नाही. म्हणून मनाने उदास असणार्‍या व्यक्ती विशेष कार्यशील ठरु शकत नाही. त्यामुळे मनाचा उदासपणा जाऊन त्यास चैतन्य येणे आवश्यक असते. पण खर तर मन हे अन्नमय आहे. म्हणजे शेवटी आपण काय खातो यावरच आपले सर्वस्व अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. आणि आपण काय खावे व काय खाऊ नये तसेच ते कसे खावे हे बापूंनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले.

हे कनेक्शन सांगताना बापूंनी "दी फरगॉटन ऑर्गन" ची ओळख करुन दिली. ते म्हणजे आपल्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरीया. या चांगल्या बॅक्टेरियांचे महत्त्व विशद करताना बापूंनी अगदी थक्क करणारी माहीती दिली. या चांगल्या बॅक्टेरियांच्या प्रभावामुळे माणूस आस्तीक बनत जातो, धीट बनत जातो आणि हे सिद्ध होण्यासाठी आणखी काही कालावधी जाईल. पण हे १०८ टक्के खर आहे असं बापूंनी सांगितले आहे आणि गुन्हेगारांमध्ये वाईट बॅक्टेरियाचे प्रमाण अधिक असल्याचेही शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.

याबाबत मी एक जवळून अनुभव घेतला आहे. माझ्या ओळखीतला एक तरुण मुलगा अतीशय व्यसनी व गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. आस्तीकता नावाला देखील असेल की नाही माहीत नाही. एक दिवस काय झाले माहीत नाही पण व्यसनाचा अतिरेक झाला आणि स्वतःच ठरवले की बस झाले....आता आपण तब्येत सुधरायची.  यासाठी त्या व्यक्तीने व्यायामाचे व्यसन घेतले. बॉडी बनवायची. या ध्यासासाठी त्याने अन्न बदलले....व्यसने सोडली.....व्यायामाचे वेड जरा अतीच होते...पण तरिही त्यामुळे नकळत बदल होत होता....आणि हा बदल आस्तिकतेकडे भक्तीकडे झुकणारा होता...पुढे व्यायामाचे वेड सुटले...पण भक्ती आणि आस्तिकता कायम राहीली.....त्या व्यक्तीने ही हा बापूंचा सेमिनार अटेंड केला. सेमीनारनंतर त्या व्यक्तीनेच मला या गोष्टीची कबूली दिली....की व्यायाम आणि डायट केले नसते तर आज इथे भक्तीमय परिवारात नसतो...भक्तीमय परिवारात नसतो तर आयुष्याला वळण लागले नसते....आयुष्याला वळण लागले नसते तर आता नोकरी आणि अभ्यासात प्रगती केली नसती. आता पुन्हा बापूंच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम व डायटमधील वेड बाजूला सारुन प्रकृतीला उचित असे व्यायाम व डायट करीन.....असा निर्धार केला.

हे ऎकून मला बापूंनी सांगितलेल्या चांगल्या बॅक्टेरियाच्या प्रभावाचे जबरस्त उदाहरण पहायला मिळाले. मग मी स्वतःकडे देखील पाहीले. कारण नुकतच डॉ. सुचित दत्तोपाध्ये अर्थात सुचितदादांच्या मार्गदर्शनानुसार माझे ही डायट सुरु होते. त्यांनी दिलेले हे डायट म्हणजे बापूंनी दिलेल्या मोठ्या सेमीनारचाच एक भाग होता आणि या डायट फॉलो केल्याने शरिरावरच नाही तर मनावरही उत्तम परिणाम झाला. मी घालवून बसत असलेली माझी कार्यशीलता आणि अर्थात चुणचुणीतपणा मला पुन्हा मिळाला. मन शांत झाले, विचार स्पष्ट झाले. निर्णय क्षमता, निरिक्षण क्षमता, कल्पना क्षमता प्रगल्भ झाली आणि त्याचा रिझल्ट माझ्या रोजच्या कामात मला मिळू लागला. मन अन्नमय याचा अनुभव मी स्वतः घेतला.

स्वतःचा पहिला स्वार्थ म्हणजे स्वतःचे आरोग्य. हे समीकरण बापूंनी दिले. कारण आरोग्य म्हणजे केवळ शारिरिक, मानसिक नाही तर त्यापुढे जाऊन खूप व्यापक असल्याचे या व्याख्याना दरम्यान जाणवले. अशा या स्वतःच्या आरोग्य विषयकची माहीती मी वाट पाहत आहे. लवकरच ही माहीती समिरदादांच्या ब्लॉगवर यावी व डॉ. पौरससिंह जोशी यांच्या टीम अंतर्गत बनणारी वेबसाईट लवकरात लवकर यावी ही सदीच्छा व त्यासाठी शुभेच्छा. तसेच उपासना केंद्रावर ह्या व्याख्यानाची सीडी लावल्यास चुकवू नका.....इतके उचित स्वार्थी तर आपण बनूच शकतो.....अबंज्ञ

http://www.healthonics.healthcare/
-  रेश्मावीरा नारखेडे

Sunday, November 16, 2014

वेगळ्या वाटेवरील "मी"

वेगळ्या वळणाची वाट
शोधित चाललो मी
पाहूनी खाच-खळगे काटे
मोहित झालो मी

Saturday, November 15, 2014

अध्यात्म आणि विज्ञान - गाभा एक, दोन भाषा


अध्यात्म आणि विज्ञान गोष्ट सांगणार्‍या दोन भाषा असल्याचे सुप्रसिद्ध लेखक डॅन ब्राऊन यांनी भारतातील त्यांच्या भेटी दरम्यान म्हटले. Link1-The Huffington Post, Link 2-Time of India

Dan Brown
अतीशय सुंदर अशा कादंबर्‍या देणार्‍या ब्राऊन यांचे हे मत ऐकून खुप आनंद झाला. कारण विज्ञानाचे अवडंबर माजवून अध्यात्माला कमी लेखणारे जगात कमी नाही. जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरु होते. बापूआत्तापर्यंत हेच सांगत आले. किंबहुना त्यांच्या प्रवचनात अध्यात्म हे विज्ञानाच्या आधाराने आणि विज्ञान अध्यात्माच्या आधाराने समजवून सांगितले जाते. खरचं आणि त्यामुळेच बापूंचे विचार पटतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर किंवा जस्टीफीकेशन बापूंच्या प्रवचनातून मिळतेच मिळते. ब्राऊन    यांच्या निमित्ताने "अध्यात्म की विज्ञान" हा विषय बाजूला जाऊन अध्यात्म आणि विज्ञान नाण्याच्या दोन बाजू असल्याच्या बातम्या तरी झळकू लागल्या. ज्याला जे पटेल त्यावर त्याने विश्वास ठेवावा. पण सत्य हेच आहे की अध्यात्म आणि विज्ञान हे एकमेकांपासून वेगळे नाहीत.

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥ 
( अयं भगवद्गीतायाः चतुर्थोध्यायस्य ज्ञानकर्मसंन्यासयोगस्य चतुस्त्रिंशत्तमः (३४) श्लोकः)
हा श्लोक सद्गुरूंकडून ज्ञान कसं मिळवावं, हे सांगतो. ज्यांना सद्वस्तूचं ज्ञान झालं आहे, जे खरे यथार्थ सद्गुरू आहेत त्यांना प्रणिपात करून, त्यांची सेवा करून, त्यांना अत्यंत विनयानं प्रश्न विचारला की हे अर्जुना ते तुला यथार्थ ज्ञान देतील, असं भगवंतांनी या श्लोकाद्वारे सांगितलं आहे.

याच प्रमाणे सदगुरु अनिरुद्ध बापू सुद्धा आपल्या प्रवचनातून यथार्थ ज्ञान देत असतात. त्यांच्या श्रद्धावान मित्रांना पडलेल्या प्रश्नांचे समाधान उचित वेळेस करीत असतात. सध्या बापू विविध अल्गोरिदम समजवून सांगत आहेत. संख्याशास्त्रातील अध्यात्माचा त्यांनी परिचय करून दिला. अध्यात्म आणि विज्ञान हे एकरुप आहेत हे त्यांनी डॉ. निकोला टेसलाच्या जीवनगाथेवरुन पटवून दिले आहे. अध्यात्म आणि विज्ञान याचा एकत्रित विचार करताना एक गोष्ट माझ्याही लक्षात आली. ती मांडण्याचा प्रयास करीत आहे. 

बापूंनी प्रवचनातून स्वार्म इंटेलिजन्सची करून दिली. माझा काही फारसा अभ्यास या विषयावर झाला नाही. पण एकंदरीत स्वार्म बद्द्ल जे थोडे फार कळले ते असे की सामुहिक बुद्धीमत्ता आणि त्यातून तयार होणारी अभेद्य शक्ती. बापूंनी प्रवचनात ही स्वार्म टेक्नॉलॉजी स्पष्ट करण्यासाठी एक मुंग्यांचा व्हीडीओ दाखविला. ज्यात सर्व मुंग्या एकत्रित येऊन एकाच पद्धतीचे वर्तन करून भल्या मोठ्या लाटेचा देखील सामना करतात आणि सुखरुप नदी पार करतात. मुंगीसारख्या प्राण्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेबाबत संशोधन झाले आहे आणि होत आहे व या संशोधनात थक्क करणारी माहिती मिळत आहे. सामूहिक बुद्धिमत्तेने अशक्य वाटणारी कार्ये लीलया करता येतात, हा मुद्दा मुंग्याच्या सामूहिक(swarm intelligence) बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. मुंग्यांची वसाहत, त्यामागील त्यांची कल्पकता, त्यांचे अन्न गोळा करणे, शेती आणि पशुपालन करणे याबाबतच्या संशोधनाबद्द्ल सांगून परम पुज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात सामूहिक बुद्धिमत्तेबाबत सविस्तर माहिती दिली, ती आपण या व्हिडियोत पाहू शकतात.


परंतु या ठीकाणी मला मांडायचा मुद्दा असा की या स्वार्म टेक्नॉलॉजीचा आणि अध्यात्माचा निकटचा संबंध आहे. किंबहुना अध्यात्माच्या पिपलिका या मार्गाचे वैज्ञानिक स्वरुप असल्याचे मला वाटते. अध्यात्मामध्ये मुंगीचे फार महत्त्व आहे. पिपलिका मार्ग - पिपलिका म्हणजे मुंगी. मुंगीचा मार्ग.....हा काय आहे मुंगीचा मार्ग? 

आणि आपले आद्य पिपलिका पांथस्थ म्हणजेच आद्यपिपा - सुरेशचंद्र दत्तोपाध्ये. सुचितदादा व समिरदादांचे वडील.  ते म्हणतात,

पिपा म्हणे अनिरुद्धाने| मजसि नेले ह्याची मार्गे|
तुम्ही धावारे सत्त्वर| बापू उभाची तत्त्पर॥

याचे स्पष्टीकरण देताना सुहाससिंह डोंगरे म्हणतात -

आद्यपिपा काय म्हणतात ? मी ह्या मार्गाने गेलो नाही, तर अनिरुद्धाने मला ह्या मार्गाने नेले. पूर्ण शरणागती....कुठेही जराही अहंपणा नाही. अनिरुद्धांचा मार्ग म्हणजे देवयान पंथ, पिपीलिका पंथ म्हणजेच पुरुषार्थ पंथ. पिपीलिका म्हणजे मुंगी. मुंगी जशी सदैव पुरुषार्थ करत असते व ती सदैव सामूहिक प्रयासांसह क्रियाशील असते, त्याप्रमाणे श्रीमद्पुरुषार्थाचा श्रद्धावान सर्व श्रद्धावानांसह एक श्रद्धावंत समाज म्हणून सदैव पुरुषार्थशील असतो. अशा पुरुषार्थी सैनिकांचा पंथ म्हणजेच ‘भक्तिसेतू’ व हा भक्तिसेतू रामाच्या आज्ञेने, हनुमंताच्या मार्गदर्शनाने बांधणारे श्रद्धावान पिपीलिकामार्गाचे प्रवासी आहेत. ह्या सर्व अनिरुद्धभक्तांमध्ये ‘आद्य पिपीलिकापांथस्थ’ म्हणून अग्रणी असणारे असे हे आद्यपिपादादा !

मुंगी हा खरा पुरुषार्थ करीत असते. ही मुंगीच आपल्याला भक्ती, एकनिष्ठता आणि कठॊर श्रद्धा शिकविते. अपार कष्ट सोसूनही ती कधीही आपला मार्ग बदलत नाही. या मुंगीच्या भूमिकेत जाऊन महाधर्मवर्मन योगिंद्रसिंह जोशी म्हणतात,

हेचि मागत आलो, हेचि पुढे मागू 
पिपा संत संगू नामपाठ । 
योग्या मुंगी जैसी जन्मोजन्मी खोडी 
गुळ ना तो सोडी, तुटो मुंडी ॥ २ ॥ 

हा गुळ कुठला...तर या देवयान पंथावर राहण्याची सदिच्छा हाच तो गुळ..त्या परमात्म्याचे चरण हाच गुळ मग त्या गुळासाठी मुंडी मोडली तरी बेहत्तर.

हीच मुंगी काय करू शकते हे मुक्ताबाई सांगते. 
संत मुक्ताबाई म्हणते,

मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सुर्यासी||

मुंगी एवढे लहान असलो तरी मुंगीमध्ये सुर्याला गिळंकृत करण्याची ताकद तिच्यात असते म्हणजेच अशक्य ते शक्य करण्याची ताकद तिच्यात असतेच असते. मात्र त्यासाठी मुंगी बनणे गरजेचे आहे. मुंगी सारखे खडतर परिश्रम आवश्यक आहे. भक्तीमार्गात मुंगीचे महत्त्व अनन्य आहे.

स्वार्म इंटेलिजन्स म्हणजे सामुहिक बुद्धीमत्ता ही गोष्ट दुर्जनांवरील सजन्नांच्या विजयाचा "विजयमंत्र"च आहे, असे मला वाटते. "रावण वधः निश्चितः" हा आत्मविश्वास देणारी मुंगीच वानरसैनिक आहे असे मला वाटते.

- रेश्मावीरा नारखेडे....



भावस्वरूप बापूराया


यावर्षी देखील अधिवेशनला जायची संधी मिळाली. समिरदादा बापूंचे करीत असलेले गुणसंकिर्तन ऐकायचे यासारखी सुवर्ण संधी प्राप्त झाली.  बापू प्रत्यक्ष उपस्थित नव्हते पण...अधिवेशनाचा विषय होता फक्त बापू...आणि मग त्याचे अस्तित्व सर्वत्र जाणावयाला लागले. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच दादा म्हणाले की या बापूंचे प्रेम अक्षरशः अंगावर येते....आणि ते कसे ते दोन दिवस अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर जाणविले. दादांनी म्हटलेली वरील गोष्ट अगदी प्रत्येकाने अनुभवली असेल. इतुके अनंत प्रेम फक्त त्याचे.....

बापूंचे मानवत्व जाणून घेता घेता आपण त्याच्या दिव्यत्वापर्यंत कधी जाऊन पोहचतो हे कळतच नाही हे अगदी उदाहरणासहित दादांनी विषद केले. हा बापू असा आहे, हा बापू तसा आहे....हे जाणून घेताना आधी तो "माझा आहे" हे मान्य केले की मग आपण सहज त्याच्याशी जोडले जातो. मग तो माझा मित्र आहे की डॉक्टर आहे की सद्‍गुरु आहे की देव आहे....कुठल्याही नात्यात त्यास ठेवा. तो ना म्हणत नाही. त्याला फक्त आपलं मानलं पाहिजे. हे जाणवले. 

बापूंचे विविध पैलू जाणून घेताना भारावून गेल्यासारखे होते. केवळ एक व्यक्तीमत्व म्हणून देखील बापूंना जाणून घेण्याचा प्रयास केला तरी आपण त्यांच्या प्रेमात पडतो आणि नकळत आपल्या आयुष्यातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण बापूंना स्थान देऊन मोकळे होतो. बापू आयुष्यात येण्याआधी विविध सेलिब्रेटी माझे आयडॉल असायचे. अगदी प्रत्येक क्षेत्रातील. पण आता प्रत्येक क्षेत्रात महारथ मिळविणारे एकमेव बापूच माझ्या जीवनाचे आयडॉल झाले आहेत. 

या अधिवेशात दादा बापूंबद्द्ल बोलत असताना अक्षरशः अंगावर काटा येत होता. दरवर्षी अधिवेशनात बापू स्टेजवर दिसायचे यावेळी मात्र प्रथमच हृदयात दिसला. हो बापू माझ्या हृदयात दिसला. माझे अंतःकरण बापू प्रेमाने तुडूंब भरल्याचे मला जाणवले. कुठल्याही देवत्वाची किंवा दिव्यत्वाची अनुभूती नाही आली. परंतु बापूंच्या मानवत्वाची, मानवतेची, माणुसकीची आणि मुख्य म्हणजे "माझ्या मनातील माझ्या बापूंची अनुभती आली." तो दुसरीकडे कुठेही नसून माझ्या मनात, माझ्या आयुष्यात आहे याची अनुभूती आली. तो काय म्हणून माझ्या आयुष्यात आहे? हा प्रश्न मला अनेक जण विचारायचे. आज त्याचे उत्तर सापडले. तो केवळ देव म्हणून नाही, सदगुरु म्हणूनही नाही...प्रामुख्याने तो "भाव" म्हणून माझ्या आयुष्यात आहे. हीच मोठी आणि सत्य जाणीव या अधिवेशनात झाली.

खरचं हा बापू, हा अनिरुद्ध म्हणजे "भाव" आहे. प्रत्येक श्रद्धावानाच्या, प्रत्येक सज्जनाच्या मनातील पवित्र भाव म्हणजे माझा हा मूर्तीमंत बापूराया...आणि त्याची आल्हादिनी शक्ती "भावना" स्वरुपात प्रकट होते. हीच ती सरस्वती...हीच ती भक्तीरुपीणी...मनात भाव असल्याशिवाय भावना प्रकट होऊ शकत नाही...आणि या भावापासून भावनेचे प्रकटीकरण होण्यासाठी प्रेरणा देते ती त्याचीच प्रेमशक्ती. 

ह्याच प्रेमशक्तीचा अनुभव घेतला यंदाच्या अधिवेशनात.....